DNA मराठी

आरोग्य

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

maharashtra government

Medical College : वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

Medical College: मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. स्वायत्ततेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शासकीय वैद्यकीय संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. समितीत टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, के.ई.एम. रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक, ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक हे समितीचे सदस्य सचिव असतील. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची प्रशासकीय व शैक्षणिक संरचना, स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता,संभाव्य लाभ, तसेच देश-विदेशातील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास समिती करणार आहे. यामध्ये एम्स, पीजीआय चंदीगड आणि टाटा मेमोरिअलसारख्या संस्थांच्या व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे. स्वायत्त महाविद्यालयांसाठी संचालक मंडळ आणि शैक्षणिक परिषद यांची रचना, व अधिकार. संचालक/अधिष्ठाता यांचे अधिकार व जबाबदाऱ्या. स्वायत्त व्यवस्थेसाठी आवश्यक आर्थिक व प्रशासकीय यंत्रणेबाबत शिफारस करणे. आर्थिक स्वातंत्र्य, अंतर्गत महसूल निर्मिती, लेखापरीक्षण व्यवस्था, तसेच कर्मचारी व अध्यापकांसाठी नवीन सेवा अटी आणि धोरणे याबाबत समिती शिफारसी करणार आहे. आवश्यक कायदेशीर, प्रशासकीय व धोरणात्मक बदलांबाबतही समिती शासनाला मार्गदर्शन करणार आहे. शासकीय शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देताना त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता प्रशासकीय व आर्थिक बाबींमध्ये अधिकारांचे हस्तांतरण सुचवणे. स्वायत्त संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी देखरेख, मूल्यमापन व उत्तरदायित्व यंत्रणेबाबत शिफारस करणे. धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याकरिता आराखडा तयार करणे आदि कामे समिती करणार आहे. समितीने सविस्तर अहवाल तीन महिन्यांच्या आत शासनाला सादर करायचा आहे. समितीला आवश्यक ती माहिती आणि तांत्रिक सहाय्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत (डीएमईआर) उपलब्ध करून देण्यात येणार असून सदस्यांना शासन नियमानुसार मानधन, प्रवास खर्च व इतर भत्ते देण्यात येणार आहेत.

Medical College : वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन Read More »

fit body

Health Update : तंदुरुस्त राहण्यासाठी 5 सकाळच्या सवयी जाणून घ्या; होणार फायदा

Helath Update : तुम्ही खूप लहान सवयी आणि बदलांनी स्वतःला निरोगी ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे पहिले काम करता त्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे. दिवसाची निरोगी सुरुवात आजारांना दूर ठेवते. यामुळे दिवसभर ऊर्जा, मानसिक संतुलन आणि शारीरिक आरोग्य सुधारते. लहान सवयी शरीर आणि मन दोघांनाही असंख्य फायदे देतात. तंदुरुस्त राहण्यासाठी 5 सकाळच्या सवयी दररोज काही सूर्यप्रकाश घेणे खूप फायदेशीर आहे. सकाळी सूर्यप्रकाश शरीरात व्हिटॅमिन डी तयार करतो, जो हाडे मजबूत करतो, मूड सुधारतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. सकाळी १०-१५ मिनिटे चालणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे पुरेसे आहे. यामुळे दिवसाची सुरुवात ताजेतवाने होण्यास मदत होते आणि थकवा कमी होतो. मानसिक संतुलन राखणे तितकेच महत्वाचे आहे. खोल श्वास घेणे, ध्यान करणे किंवा सकारात्मक विचार करणे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते. तज्ज्ञ सकाळी काही मिनिटे शांत बसून तुमचे मन शांत करण्याचा सल्ला देतात, ज्यामुळे दिवसभर लक्ष केंद्रित आणि आनंदी राहण्यास मदत होते. नियमित व्यायाम हा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग असावा. २०-३० मिनिटे हलका योगा, स्ट्रेचिंग, चालणे किंवा इतर कोणतीही शारीरिक हालचाल करा. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, वजन नियंत्रित राहते, हृदय मजबूत होते आणि चांगली झोप येते. व्यायामामुळे केवळ शरीर मजबूत होत नाही तर मनही तीक्ष्ण राहते. हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. पालक, मेथी आणि ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्या डोळे, त्वचा आणि पचनासाठी फायदेशीर असतात. तुमच्या दैनंदिन आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केल्याने शरीर विषमुक्त होते आणि आजारांपासून दूर राहते. संतुलित प्रमाणात पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. उठताच १-२ ग्लास पाणी आणि दिवसभर ८-१० ग्लास पाणी प्या. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, चयापचय वाढवते आणि त्वचा उजळवते. कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया देखील सुधारते.

Health Update : तंदुरुस्त राहण्यासाठी 5 सकाळच्या सवयी जाणून घ्या; होणार फायदा Read More »

hpv vaccine

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात

HPV Vaccination : जिल्ह्यात ९ मार्च २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून ८ मार्च २०२६ रोजी महिला दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचा राज्यस्तरीय शुभारंभ होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. या मोहिमेत एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्का लाभार्थी अपेक्षित असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येईल. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाईल. लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चालेल व सर्व पात्र लाभार्थ्यांची तसेच दिलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर केली जाणार आहे. लसीकरणापूर्वी लाभार्थी उपाशी पोटी नसेल याची पालकांनी खात्री करावी. लस देण्याआधी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाईल. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला तीस मिनिटे लसीकरण सत्राच्या ठिकाणी थांबवले जाईल. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही. ज्या मुलींना मागील लसीकरणामुळे ॲलर्जी आली असेल किंवा यीस्टची ॲलर्जी असेल त्यांना ही लस दिली जाणार नाही. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना व ज्यांनी यापूर्वी कोणतीही एचपीव्ही लस घेतली असेल त्यांना या मोहिमेत लस मिळणार नाही. या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच गाव पातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचेही प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नगरगोजे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी केले आहे.

HPV Vaccination जिल्ह्यात 14 वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम ; 9 मार्चपासून सुरुवात Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar News : पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत; पुरवठा विस्कळीत ‘या’ दिवशी होणार पुरवठा

Ahilyanagar News : विज वितरण कंपनी कडून शहर पाणी पुरवठा योजने करिता होणाऱ्या विज पुरवठ्या मध्ये बिघाड निर्माण झाल्याने सोमवार दि.१२/०१/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजले पासुन आज पहाटे ४.३० वाजेपर्यंत विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलग आठ तास पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत त्यामुळे मंगळवार दि.१३/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने म न पा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणी पुरवठा हा बुधवार दि. १४/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच बुधवार दि.१४/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो गुरुवार दि.१५/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच सर्व उपनगर भागामध्ये रोटेशन पेक्षा उशीराने पाणी पुरवठा होणार आहे . तरी नागरीकानी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत; पुरवठा विस्कळीत ‘या’ दिवशी होणार पुरवठा Read More »

gutkha ban

Pathardi News: पाथर्डीकरांनो, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आता थेट ‘गुन्हा’!

Pathardi News: पाथर्डी तालुक्यात आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे, धुम्रपान करणे किंवा थुंकणे तुम्हाला चांगलेच महागात पडणार आहे. प्रशासनाने आता ‘कोटपा कायदा 2023’ (COTPA Act) ची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार उद्धव नाईक यांचा कडक इशारा: नियम मोडणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर थेट गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आरोग्याचा गंभीर प्रश्न: तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार जडतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे टीबी (क्षयरोग) सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होतो, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही‌. कृती आराखडा: 🔹 शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांमध्ये जनजागृती मोहीम. 🔹 सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात फलक आणि स्वच्छता मोहीम. 🔹 नियमित तोंडाच्या कर्करोगाची तपासणी शिबिरे. 🔹 व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी.

Pathardi News: पाथर्डीकरांनो, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आता थेट ‘गुन्हा’! Read More »

maharashtra news

Maharashtra News: दारू रोख, दूध उधारीवर : आपलीच प्राधान्ये…प्रगती की मूल्यांची माघार?

Maharashtra News : चपला आज झगमगत्या शोरूममध्ये शोभून दिसतात; मात्र पुस्तकांची जागा रस्त्यावर येऊन ठेपली आहे. ज्ञानाऐवजी उपभोगाला प्राधान्य दिलं जाणारं हे चित्र केवळ बाजारपेठेचं नाही, तर आपल्या सामाजिक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. दारू रोख पैशांत सहज उपलब्ध आहे, पण दूध मात्र उधारीवर घ्यावं लागतंही विसंगती आपल्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभं करते. कुत्रे वातानुकूलित घरांत सन्मानानं राहतात, तर शेतकऱ्याची गाय रस्त्यावर भटकताना दिसते. प्राण्यांप्रती प्रेम असणं गैर नाही मात्र उपयुक्ततेऐवजी दिखाव्याला महत्त्व दिलं जात असेल, तर तो विवेकाचा पराभव ठरतो. शहरांचा विस्तार झाला, उंच इमारती उभ्या राहिल्या, पण संवेदनशीलतेचं अधिष्ठान मात्र ढासळत गेलं. आजची तरुण पिढी परदेशात नोकरी करत आहे, करिअर घडवत आहे, ही बाब अभिमानास्पदच आहे. मात्र ज्यांनी त्यांच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्या आई-वडिलांचं आयुष्य वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजलं जात असेल, तर ही प्रगती एकांगी ठरते. आर्थिक स्वावलंबन मिळालं पण भावनिक नात्यांचं काय? समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, हा प्रश्न पुन्हा एकदा ठळकपणे उभा राहतो. विकास म्हणजे केवळ सोयी-सुविधांची वाढ नव्हे, तर मूल्यांची जपणूकही तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा ही वाटचाल प्रगतीकडे नसून, समाजाच्या अधःपतनाकडे नेणारी ठरेल.

Maharashtra News: दारू रोख, दूध उधारीवर : आपलीच प्राधान्ये…प्रगती की मूल्यांची माघार? Read More »

cold wave

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून, अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला असून, जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ​नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना उबदार कपड्यांचा वापर : हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे तसेच शाल, चादर यांसारख्या उबदार कपड्यांचा पुरेसा वापर करावा. आहार व आरोग्य : शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पेय आणि पौष्टिक आहार घ्यावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. प्रवास व निवारा : थंडीची लाट असताना शक्यतो घरातच राहावे. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. घर आणि परिसर उबदार राहील याची दक्षता घ्यावी. ​लहान मुले व वृद्धांची काळजी : घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ​वैद्यकीय सल्ला : थंडीत दीर्घकाळ राहिल्याने त्वचा निस्तेज किंवा बधीर होत असल्यास, तसेच शरीराचा थरकाप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे (Hypothermia) लक्षण असू शकते पशुधनाची काळजी : नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना थंड वाऱ्यापासून वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. ​आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा ‘108’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही Read More »

high cholesterol

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे

Cholesterol 5 Symptoms : कोलेस्टेरॉलच्या समस्या हृदयाशी जोडल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याची सुरुवातीची लक्षणे पायांमध्ये दिसतात? WHO, WebMD आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने उच्च कोलेस्टेरॉलची पाच लक्षणे सूचीबद्ध केली आहेत जी कधीही दुर्लक्षित करू नयेत. लोक सहसा असे गृहीत धरतात की उच्च कोलेस्टेरॉल हृदयाशी संबंधित आहे, आणि म्हणूनच, त्याची लक्षणे हृदयात किंवा छातीच्या भागात दिसून येतील. पण तुम्हाला माहित आहे का की उच्च कोलेस्टेरॉलची सुरुवातीची लक्षणे प्रथम पायांमध्ये दिसतात? आपले शरीर आपल्याला वारंवार हे संकेत देते, परंतु आपण त्यांना साधे थकवा किंवा अशक्तपणा म्हणून नाकारतो? अमेरिकन हार्ट असोसिएशन, WHO आणि WebMD नुसार, उच्च कोलेस्टेरॉलची ही पाच लक्षणे आहेत. चालताना पाय दुखणे जर तुम्हाला चालताना तुमच्या खालच्या पायांमध्ये, मांड्यांमध्ये किंवा कंबरेमध्ये वेदना किंवा पेटके येत असतील आणि थांबल्यानंतर वेदना कमी होत असतील, तर ते रक्त प्रवाह खराब होण्याचे लक्षण असू शकते. थोडे चालल्यानंतरही लवकर थकणे जर तुमचे शरीर ठीक असेल परंतु तुमचे पाय लवकर थकतात, तर हे खराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकते. तुमच्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे तुमच्या स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे पायऱ्या चढणे किंवा लांब चालणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण वाटू शकते. एक पाय दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटू शकते जर एक पाय अनेकदा दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटत असेल, विशेषतः चालल्यानंतर, तर हे रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्त शरीराला उष्णता प्रदान करते, त्यामुळे रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे पाय थंड वाटू शकतो. कधीकधी, त्वचा थोडीशी फिकट किंवा निळी होऊ शकते. बोटांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे पायांच्या बोटांमध्ये वारंवार मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे हे रक्तप्रवाह खराब झाल्यामुळे होऊ शकते. शिरांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचे कार्य बिघडते. जर हे बराच काळ चालू राहिले तर पायांच्या जखमा लवकर बऱ्या होणार नाहीत. पायांवर डाग आणि रंग बदलणे जर चालताना तुमच्या पायांची त्वचा फिकट, डाग असलेली किंवा हलकी निळी झाली तर ते रक्ताभिसरण खराब होण्याचे लक्षण आहे. गंभीर प्रकरणांमध्ये, त्वचा चमकदार दिसू शकते. पायांवर केसांची वाढ देखील मंद असते आणि जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागतो.

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे Read More »

winter

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान

​Ahilyanagar Winter Alert: राज्यातील अनेक भागात आता थंडीची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी तापमान अचानक घसरल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिह्यात सध्या 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान नोंदवले जात असून येणाऱ्या काळात तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ​या गोष्टी लक्षात ठेवा: ​पुरेसे उबदार कपडे वापरा (मफलर, कानटोपी, मोजे). ​ थंडीत शक्यतो घरातच थांबा आणि प्रवास टाळा. ​शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम पेये आणि व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्या. वृद्ध, लहान मुले आणि पाळीव प्राणी यांची विशेष काळजी घ्या. त्वचेचा रंग बदलणे, बधीर होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. ​आपत्कालीन परिस्थितीत: नजिकचे आरोग्यकेंद्र किंवा 108 या क्रमांकावर संपर्क करावा.

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान Read More »