DNA मराठी

ऑटोमोबाईल

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची पीकअप जीप खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. दिवाळीच्या दिवशी यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chandshaili Ghat Accident : चांदशैली घाटात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू 15 गंभीर जखमी Read More »

st co operative bank

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत. आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली.त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला,कपडे फाडले,लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशन पर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे. अशा संचालकांच्या हाती एसटी बँक देऊन एसटीचे सभासद आता पश्चाताप करत आहेत.

ST Co-operative Bank : एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मीटिंगमध्ये तुफान राडा… फ्री स्टाईल मारामारी नंतर पोलीस केस Read More »

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »

cidco lottery

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर

Devendra Fadnavis: दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक आयोजित करणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री नवी मुंबईमध्ये आल्यानंतर पंधरा दिवसात सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये बैठक लावू असे आश्वासन माथाडी कामगार मेळाव्यात देण्यात आलं होतं मात्र सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासंदर्भामध्ये सिडको आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडली आहे. सिडकोच्या लॉटरीत 22 हजारपेक्षा जास्त घरे काढणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ह्या घरांच्या किमती न परवडणाऱ्या असल्याने वारंवार किमती कमी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडल्याने नागरिकांचे स्वप्न भंग झालं असंच म्हणायला हवं.

Devendra Fadnavis: मोठी बातमी! दिवाळीत निघणारी सिडकोची लॉटरी पुन्हा लांबणीवर Read More »

eknath shinde

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान

Eknath Shinde: राज्यातील एसटीच्या 85 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या आणि कृती समितीच्या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Eknath Shinde: मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; मिळणार 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान Read More »

vivo v60e

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त…

Vivo V60e : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एक जबरदस्त कॅमेरा फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी विवोने एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V60e या नावासह भारतीय बाजारात 200 मेगापिक्सलसह स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीने दावा केला की हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला सर्वात परवडणारा फोन आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो सुरळीत कामगिरी आणि मल्टीटास्किंग करण्यास मदत करतो. किंमत आणि व्हेरियंट Vivo V60e तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ₹29,999 आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह दुसरा प्रकार ₹31,999 मध्ये उपलब्ध आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह टॉप मॉडेलची किंमत ₹33,999 आहे. हा स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ते Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर करू शकतात. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्ड ऑफरवर 10% पर्यंत सूट उपलब्ध असेल. उत्कृष्ट डिस्प्ले आणि डिझाइन या फोनमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1600 निट्स आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट होते. हे डायमंड शील्ड ग्लासने संरक्षित आहे, जे टिकाऊपणा वाढवते आणि स्क्रॅचची शक्यता कमी करते. कॅमेरा या फोनमध्ये 200 एमपी प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑरा फ्लॅशसह 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉलिटी वाढवणारी अनेक एआय फिचर्स आहेत. बॅटरी आणि चार्जिंग फोनमध्ये 90 वॅट फास्ट चार्जिंगसह 6500 एमएएच बॅटरी आहे. याचा अर्थ बॅटरी लवकर चार्ज होईल आणि दीर्घकाळ टिकणारा बॅकअप मिळेल. सॉफ्टवेअर आणि इतर फिचर्स विवो व्ही60ई हा अँड्रॉइड 15 वर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक स्मार्ट आणि कस्टमाइज्ड फीचर्स जोडले आहेत. एकंदरीत, हा फोन स्टायलिश डिझाइन, शक्तिशाली कामगिरी आणि प्रीमियम कॅमेरा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त… Read More »

upi

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट

UPI New Rules: देशात आता ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन नियम लागू केले आहे. ज्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे. NPCI ने सांगितले की ही नवीन नियम वापरकर्त्यांना पेमेंट करताना अधिक पर्याय आणि सुरक्षितता प्रदान करतात, ज्यामुळे डिजिटल पेमेंटचा अवलंब करणे अधिक सुलभ होते. नवीन बायोमेट्रिक प्रमाणीकरण फीचर हे नवीन फीचर Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी UPI अॅप्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या पारंपारिक UPI पिनऐवजी ऑन-डिव्हाइस बायोमेट्रिक तंत्रज्ञान, जसे की फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन, वापरण्याची परवानगी देते. सध्या, हे फीचर 5,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. NPCI ने सांगितले की वापरकर्त्यांच्या अभिप्राय आणि कामगिरीच्या आधारे भविष्यात ही मर्यादा वाढवली किंवा समायोजित केली जाऊ शकते. हे वैशिष्ट्य पर्यायी आहे, म्हणजे वापरकर्ते त्यांचा जुना UPI पिन किंवा इतर पारंपारिक पेमेंट पर्याय वापरणे सुरू ठेवू शकतात. सुरक्षा आणि तांत्रिक आवश्यकता जेलब्रोकन किंवा रूटेड डिव्हाइसेसवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण उपलब्ध होणार नाही. UPI अॅप्स आणि PSP बँकांनी ग्राहकाची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्षम करावे आणि ते कधीही अक्षम करण्याचा पर्याय प्रदान करावा. कोणत्याही नवीन डिव्हाइसवर व्यवहार करण्यापूर्वी नवीन ग्राहकांची संमती आवश्यक असेल. बँका आणि अॅप्ससाठी सूचना पात्रता तपासणी: बायोमेट्रिक्स सक्षम करण्यापूर्वी ग्राहक पात्रता आणि प्रमाणीकरण क्रेडेन्शियल्सची पुष्टी करणे आवश्यक आहे. ग्राहक संवाद: बायोमेट्रिक सक्षमीकरण आणि व्यवहार प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना अचूक माहिती आणि सूचना प्रदान केल्या पाहिजेत. पिन बदल: जर ग्राहकाने त्यांचा UPI पिन बदलला किंवा रीसेट केला, तर बँकेने सर्व अॅप्समध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरण अक्षम केले पाहिजे. ग्राहक नवीन संमती देत ​​नाही तोपर्यंत व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. निष्क्रियीकरण नियम: जर 90 दिवसांपर्यंत बायोमेट्रिक पद्धत वापरली गेली नाही, तर अॅप्स आणि बँका ती निष्क्रिय करतील. ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ग्राहक पुष्टीकरण आवश्यक असेल. वापरकर्त्यांना फायदे या नवीन उपक्रमामुळे UPI पेमेंट अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होतील. बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरकर्त्यांना पिन प्रविष्ट न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल, ज्यामुळे डिजिटल व्यवहाराचा अनुभव अखंड होईल. भविष्यात मोठ्या व्यवहारांमध्ये हे वैशिष्ट्य विस्तारित करण्याचे NPCI चे उद्दिष्ट आहे.

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट Read More »

himachal pradesh accident

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता भागात एका प्रवासी बसला भूस्खलनाचा धक्का बसला. बसवर डोंगराचा ढिगार कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनएरएफ) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि बचाव कार्य जलदगतीने सुरू करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल दुःख व्यक्त केले आणि बचाव पथकांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू Read More »

coldrif syrup death case

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा

Coldrif Syrup Death Case: मध्यप्रदेशात रासायनिक अयोग्यता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून बनवलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 16 मुलांचा मृत्यू झाला असल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर, तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाने 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी श्रीसन फार्मास्युटिकल्स कारखान्यावर छापा टाकला. तपासणीत निकृष्ट दर्जाची परिस्थिती आणि बेकायदेशीर पद्धती आढळून आल्या. निरीक्षकांना प्लास्टिक पाईप्समधून गळणारे रासायनिक अवशेष, गंजलेली यंत्रसामग्री आणि संरक्षक उपकरणे नसलेले कामगार औद्योगिक रसायने हाताने मिसळत असल्याचे आढळले. कारखान्यात प्रशिक्षित केमिस्ट नव्हते आणि उत्पादनादरम्यान कोणतीही गुणवत्ता चाचणी घेण्यात आली नाही. औद्योगिक रसायनांपासून बनवलेले कोल्ड्रिफ कफ सिरप सूत्रांनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रोपीलीन ग्लायकॉलसारखी औद्योगिक रसायने स्थानिक वितरकांकडून रोख रकमेत किंवा गुगल पे द्वारे खरेदी केली गेली. कागदपत्रे टाळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. तपासणी अहवालात असेही उघड झाले की कारखान्याने औद्योगिक दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल वापरले होते, ज्याची डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल सारख्या संभाव्य हानिकारक दूषित घटकांसाठी चाचणी केली गेली नव्हती. प्रिंटिंग इंक, अॅडेसिव्ह, ब्रेक फ्लुइड आणि ल्युब्रिकंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या डायथिलीन ग्लायकॉलमुळे मुलांच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान झाले. तपासणीत असे आढळून आले की SR-13 बॅचमध्ये 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकॉल होते, जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट जास्त आहे. तपासणीत असे आढळून आले की: कोणतीही औषधोपचार यंत्रणा नव्हती, म्हणजेच कोणीही दुष्परिणामांचे निरीक्षण केले नाही किंवा रिकॉल केले नाही. उत्पादनादरम्यान कोणतेही प्रशिक्षित केमिस्ट उपस्थित नव्हते. गुणवत्ता चाचणीशिवाय कच्चा माल वापरण्यात आला. अज्ञात स्त्रोतांकडून पाणी मिळवण्यात आले आणि शुद्धतेसाठी चाचणी केली गेली नाही. कारखान्यात एअर हँडलिंग युनिट्स, HEPA फिल्टर्स, वेंटिलेशन, कीटक नियंत्रण किंवा सुरक्षा नोंदींचा अभाव होता. तपासणीत 39 गंभीर आणि 325 प्रमुख उल्लंघने उघड झाली, ज्यात कीटकांचा प्रादुर्भाव, उघडे गटार, तुटलेली उपकरणे आणि एअर फिल्टरचा अभाव यांचा समावेश आहे. SR-13 बॅचचा विनाशकारी परिणाम मे 2025 मध्ये उत्पादित आणि एप्रिल 2027 पर्यंत वैध असलेली SR-13 बॅच अनेक महिने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बाजारात मुक्तपणे फिरत होती. या बॅचचे सेवन केल्यानंतर चिंदवाडा येथील अनेक मुलांना तीव्र मूत्रपिंड निकामी झाले. सोळा मुलांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक पाच वर्षांखालील होते. रेस्पोलाइट डी, जीएल, एसटी आणि हेप्सँडिन सारख्या इतर सिरपची चाचणी घेण्यात आली आणि ते सामान्य दर्जाचे असल्याचे आढळले. देखरेख आणि जबाबदारीचा अभाव तपासात असे दिसून आले की हा अपघात केवळ निष्काळजीपणाचा परिणाम नव्हता तर एक पद्धतशीर बिघाड होता. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीने स्रेसन फार्मास्युटिकल्सची उत्पादन प्रक्रिया थांबवली आणि सर्व साठा गोठवला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि तिचा परवाना निलंबित करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने दोन औषध निरीक्षक आणि एका उपसंचालकांना निलंबित केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली केली, तर चिंदवाडा येथील एका डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा Read More »

oplus 16908288

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार

Shirdi Sai Baba : श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश येथील एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला. याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८० रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

Shirdi Sai Baba: साईबाबांना साई भक्ताने दिला तब्बल एक कोटीचा हार Read More »