DNA मराठी

latest update

IMG 20240817 WA0000

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यात काही गावांमध्ये तसेच वाड्या, वस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  हे ड्रोन कोण उडवत आहे? कशासाठी उडवत आहे? त्या मागचा हेतू काय आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.  ग्रामीण भागात काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. सुरुवातीला ग्रामीण भागात घिरट्या घालणारे ड्रोन चार पाच दिवसांपासून बालमटाकळी परिसरात  देखील घिरट्या घालताना दिसू लागले.  काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असे काही स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं आहे. रात्रीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली. चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा होती.

Ahmednagar News: ग्रामीण भागात अज्ञात ड्रोनच्या भीतीने नागरिक भयभीत Read More »

Accident

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू

Maharashtra Accident:  सातारा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सातारा-लोणंद महामार्गावर कोरेगाव तालुक्यातील आंबवडे वाघोलीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरने पेट घेतला. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (12 ऑगस्ट) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात कंटेनरला आग लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना पोलिसांनी तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक पूर्ववत केली. या दुर्दैवी घटनेत कंटेनर जळून खाक झाला असून आयशर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.  आयशर टेम्पो किंवा कंटेनर चालक झोपी गेल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा तपास वाठार पोलीस करत आहेत.

Maharashtra Accident: भीषण अपघात! टेम्पो आणि कंटेनरमध्ये धडक, दोघांचा मृत्यू Read More »

Screenshot 2024 08 05 11 17 54 73 99c04817c0de5652397fc8b56c3b3817

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ahmednagar News: मुकुंदनगर भागातील इस्लामी बेकरी परिसरात एका चार वर्षीय मुलाचा हौदमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून. या व्हिडिओमध्ये चालत असताना चिमुकला अचानक हौदमध्ये पडल्याचा दिसून येत आहे. सध्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Ahmednagar News : धक्कादायक, हौदमध्ये पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू Read More »

Rain

IMD Alert: पुणेसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert : देशातील अनेक भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.   जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. केरळच्या वायनाड आणि हिमाचल प्रदेशात गेल्या आठवड्यात झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या अनुक्रमे 221 आणि 13 वर पोहोचली आहे.  उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंसह 370 हून अधिक लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये काही इमारतींचे नुकसान झाले आहे, तर गंदरबल जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा लडाखशी संपर्क तुटला आहे. पूर्व, उत्तर-पूर्व, उत्तर भागात पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने सोमवारी देशाच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व, उत्तर-पूर्व, उत्तर भागात पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने सोमवारी देशाच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमधील पूर्व आणि पश्चिम वर्धमान, बीरभूम, बांकुरा, पुरुलिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार किंवा हलका पाऊस पडू शकतो. झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. शेजारील राज्य पश्चिम बंगालमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. उत्तराखंडमधील क्षतिग्रस्त केदारनाथ यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्याचे बचावकार्य रविवारी सलग चौथ्या दिवशीही सुरू राहिले. केदारनाथ बचाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी 10,374 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. पुण्यातील पाणी तुंबलेल्या निवासी भागात लष्कर तैनात  खडकवासला धरणातून मुसळधार पाऊस आणि पाणी सोडल्यानंतर शहरातील पाणी तुंबलेल्या निवासी भागात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला.

IMD Alert: पुणेसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

Zika Virus

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

Zika Virus: झिका, डेंग्यू यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग तसेच महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी केले. झिका, डेंग्यू आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक तास स्वच्छतेचा हा उपक्रम दर रविवारी राबवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी डॉ. बोरगे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. एडिस डासामुळे विषाणूजन्य आजार पसरतात. एडीस डास हा आपल्या परिसरात स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने आपल्या जवळपास कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नये. फ्रीजचे ट्रे, कुंड्या, पक्षांना पिण्यासाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर भंगार वस्तू इत्यादी ठिकाणी साचणारे पाणी वाहते करून ही डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट केल्यास विषाणूजन्य आजारांना रोखता येईल. त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचे यावेळी डॉ बोरगे यांनी सांगितले.  महापालिका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या परिसरातील डास उत्पत्ती निर्माण करणारी स्थाने नष्ट केली. आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदनगर शहरातील सर्व भागांमध्ये नागरिक स्वयंप्रेरणेने डेंग्यू विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायोजना करीत आहेत. त्यामुळे विषाणूजन्य आजारांवर आपण सर्व निश्चितच नियंत्रण मिळवू असा विश्वास डॉ. अनिल बोरगे यांनी यावेळी व्यक्त केला.  नगर शहरात डेंग्यू मुक्त अभियानात आठवड्यातुन दर रविवारी एक तास नागरिकांना सहभागी करून कुंड्या,कूलर,जुन्या निरोपयोगी वस्तू ,टायर यामध्ये साचलेले पाणी रिकामे करण्यात यावी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच ताप- डोके- डोळे- सांधे दुखणे, मांसपेशी दुखणे तापा सोबत,अंगावर लालसर पुरळ येणे,उलट्या होणे पोट दुखणे उलटी लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सल्ला घ्यावा तसेच डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया हे आजार डासां मार्फत होतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये डेंग्यू आजारावर योग्य वेळेत औषध उपचार केल्यास रुग्ण खात्रीने बरा होतो डेंगू आजाराच्या निदानासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मोफत रक्ताची एलायझा चाचणी करून घ्यावी तपासाची लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन Read More »

IMG 20240729 WA0005

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक

Ahmednagar News: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर- संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे सायंकाळी एक विचित्र अपघात घडला आहे.  माहितीनुसार, अहमदनगरकडून संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागिल बाजुने जोरदार धडक दिली. काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक आपले ताब्यातील वाहन सोडून पळ काढला.  अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक Read More »

Screenshot 2024 07 28 22 57 25 04 99c04817c0de5652397fc8b56c3b3817

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

IMG 20240728 WA0047

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.    बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे.  या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर … Read More »

Gold

Today Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणुन घ्या नवीन किंमत

Today Gold Price: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याने आता देशातील बाजारात सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम 64,940 रुपयांवर उपलब्ध आहे.   काय होती अर्थमंत्र्यांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली होती. सध्याचे कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणण्याबाबत ते बोलले. बेसिक कस्टम ड्युटी 10% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आली आहे, तर त्यासोबत लागू करण्यात आलेला कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) देखील 5% वरून 1% करण्यात आला आहे. या घोषणेनंतर लगेचच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती घसरल्या. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 4,000 रुपयांनी घसरून 72,838 रुपयांवरून 69,500 रुपयांवर आली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमतही 88,995 रुपये प्रति किलोवरून घसरून 84,275 रुपये झाली. दिल्ली सराफा बाजारातही भाव कमी झाले सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव बुधवारी 64,940 रुपयांवर पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 70,850 रुपयांवर उपलब्ध आहे. दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोने 65,090 रुपये आणि 24 कॅरेट सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. चेन्नई-मुंबईसह इतर शहरांतील किमती चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 64,940 रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,850 रुपये आहे. वडोदरा आणि अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 64,990 रुपये मोजावे लागतात, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 70,900 रुपये मोजावे लागतात. गुंतवणूक करण्याची संधी  सोन्याच्या दरातील ही घसरण काही काळच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव अजूनही वाढत आहेत. भू-राजकीय मुद्द्यांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम भारतातही सोन्याच्या किमतीवर होईल. अशा परिस्थितीत, सध्याची कपात ही कमाईसाठी या सोन्यात   गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

Today Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणुन घ्या नवीन किंमत Read More »