DNA मराठी

latest news

Amit Shah On UCC : प्रत्येक राज्यात UCC लागू करणार, अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah On UCC : राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील प्रत्येक राज्यात समान नागरी कायदा लागू करणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शहा म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने देखील अनेक वेळा समान नागरी कायदा लागू करण्यास सांगितले आहे परंतु काँग्रेसने मुस्लिम वैयक्तिक कायद्यासह हिंदू कोड बिल आणले आहे परंतु समान नागरी कायदा आणू इच्छित नाही. यूसीसीबाबत शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाराज्यसभेत अमित शहा यांनी मुस्लिम वैयक्तिक कायद्यावरून काँग्रेसला धारेवर धरले. देशात कायदा असावा की नाही हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारत काँग्रेसने मुस्लिम वैयक्तिक कायद्यासोबत हिंदू कोड बिलही आणले. हिंदू कोड बिलामध्ये कोणताही जुना नियम नाही. त्यांनी समान कायद्याला हिंदू कोड बिल असे नाव दिले. असं अमित शहा म्हणाले. उत्तराखंडमध्ये यूसीसी आणण्याचे काम आम्हीच केले आहे. आम्ही ते इतर राज्यांमध्येही आणू. समाजात परिवर्तनासाठी कायदा आणू आणि चर्चा करून त्याची अंमलबजावणीही करू. बदलाच्या सूचनांचा विचार करून भाजप सरकार प्रत्येक राज्यात आणणार आहे. शहा म्हणाले की, आम्ही तीन फौजदारी न्याय कायदे आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे आणून फौजदारी न्याय व्यवस्थेचे भारतीयीकरण केले. देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी कोणी काम केले असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. राज्यसभेत अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने 77 वेळा, तर भाजपने केवळ 22 वेळा घटनादुरुस्ती केली. 18 जून 1951 रोजी प्रथमच संविधानात दुरुस्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांची वाट पहायची नसल्यामुळे घटना समितीने ही दुरुस्ती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यासाठी संविधानात कलम 19A जोडण्यात आले. असं देखील अमित शहा म्हणाले.

Amit Shah On UCC : प्रत्येक राज्यात UCC लागू करणार, अमित शहांची मोठी घोषणा Read More »

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज?

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने राज्यात सरकार स्थापन केली आहे तर 15 डिसेंबर रोजी महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र अद्याप खातेवाटप न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील दोन – तीन दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या माहितीनुसार, खातेवाटप लांबणीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे खातेवाटपवर एकमत अजूनही नाही झालेले नाही त्यामुळे खातेवाटप लांबणीवर आहे. अर्थखात पाहिजे आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेनाचे खातेवाटप तयार आहे. 15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज? Read More »

Maharashtra News: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा हस्ते ध्वजदिन निधी 2024 निधी संकलन शुभारंभ

Maharashtra News : जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी 2024 निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी सालीमठ यांनी केले. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उप विभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले , साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, कर्नल साहेबराव शेळके (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर वि.ल. कोरडे (निवृत्त) आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जिल्ह्यात सैनिक आणि माजी सैनिकांची साधारण १४ हजार कुटुंबे आहेत. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन महत्वाचे आहे. यावर्षी २ कोटी ८० लाखाचे उद्दिष्ट असले तरी ६ कोटीचा निधी संकलित करण्याचे उद्दीष्ट ठेवून प्रत्येकाने यात भरीव योगदान द्यावे. प्रत्येक अधिकारी – कर्मचाऱ्याने एक दिवसाचा पगार ध्वजदिन निधीसाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याने गेल्यावर्षी विक्रमी संकलन केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी,कर्मचारी आणि नागरिकांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे. सैनिकप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. पद्मश्री पवार म्हणाले, वीर जवान सीमेवर आणि किसान गावातील शेतात देशासाठी कार्य करतो. या दोघांवर देशाची जबाबदारी आहे. देशासाठी सीमेवर लढताना अनेक बांधवांना वीर मरण येते, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अधिकाधिक निधी संकलित व्हावा यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे आणि माजी सैनिकांना शक्य असेल तिथे सहकार्य करावे. पुढील वर्षी जिल्ह्यातील सरपंचांचे ध्वजदिन निधीला भरीव योगदान राहावे यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात कोरडे म्हणाले, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्यात येते. यात लोकसहभागाला महत्व आहे. सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीत राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी ५ कोटी ८ लाख रुपये अर्थात उद्दिष्टाच्या २७५ टक्के निधी संकलन करण्यात आले आणि २ कोटी १८ लाख रुपयांचा निधी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मनोहर नरहरी नातू यांच्यावतीने वीर पत्नी कौसल्या एकनाथ कर्डिले यांना एक लाख रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नातू यांनी सलग दहाव्या वर्षी असा निधी दिला आहे. यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. माजी सैनिक भाऊसाहेब रावजी पवार यांच्यातर्फे देण्यात येणारा १० हजाराचा निधी वीरपत्नी मिनाबाई भानुदास गायकवाड यांना धनादेशाद्वारे देण्यात आला. ध्वजदिन निधीसाठी १० हजार रुपये योगदान देणाऱ्या रामकृष्ण क्षीरसागर महाराज आराधना भक्त मंडळ आणि २ लाख रुपये योगदान देणाऱ्या सन फार्मा प्रा.लि. चा यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. सीजी पॉवर संस्थेतर्फे सामाजिक दायित्व निधीतून सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी २५ लाख रुपयाचे काम केल्याबद्दल संस्थेच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांसाठी कार्य करणाऱ्या अक्षय टेमकर आणि ज्ञानदेव शेळके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता आदी उपस्थित होते.

Maharashtra News: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा हस्ते ध्वजदिन निधी 2024 निधी संकलन शुभारंभ Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणपुलावर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. सदरचे वाहन ऊसमाल वाहतूक ट्रक असून उड्डाण पुलाच्या तीव्र वळणावर ट्रक चालकाला वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने ट्रक पुलावर पलटी होऊन गाडीतील काही माल पुलावरून थेट खाली कोसळला. दरम्यान थंडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पूलाखालील वाहतूक कमी होती त्यामुळे पुन्हा एकदा मोठी जीवितहानी टळली. गेल्या वर्षभरात याच बहुचर्चित उड्डाणपुलावर अनेक अपघात घडले असेल तरी अद्याप प्रशासनाकडून कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही.

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी Read More »

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करा अन्यथा…, अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Beed News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून जर आरोपींना शिक्षा झाली नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग ता. केज, जि. बीडचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून अतिशय निर्दयीपणे त्यांचे डोळे काढून खून करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे. याप्रकरणाबाबत आम्ही मागण्या करतो की, संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना व केजच्या पोलीस निरीक्षकांचे निलबंन करून त्यांना सहआरोपी करावे. हे प्रकरण सीआयडीकडे हस्तातरीत करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री. शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देवून पुर्नवसन करावे. आमच्या या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करा अन्यथा…, अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा Read More »

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींची संख्या 49 वर पोचली आहे. यापूर्वी 4 मृत्यू आणि 25 जखमी झाल्याची बातमी होती. बेस्ट बसची धडकमुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा ‘बेस्ट’च्या बसने सोमवारी रात्री पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की असा संशय आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) एल. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने वार्डाजवळ हा अपघात झाला. बस चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मार्ग क्रमांक 332 वर बेस्ट बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडकली. ते म्हणाले की, यानंतर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाची बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली. बस तीन महिन्यांची होतीमिळालेल्या माहितीनुसार, बसचा नोंदणी क्रमांक MH01-EM-8228 असा आहे. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झाला. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12 मीटर लांबीची ही इलेक्ट्रिक बस हैदराबादस्थित ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ने बनवली आहे आणि ती बेस्टने भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशा बसेसचे चालक खासगी चालक पुरवतात, अशी माहिती त्यांनी दिली. तारदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने सांगितले की, “बस फक्त तीन महिन्यांची आहे. यावर्षी 20 ऑगस्ट रोजी EVEY Trans नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदणी करण्यात आली आहे.

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी Read More »

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून

Beed News : बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून हत्या करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय. सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तर मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून Read More »

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला !

Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात. अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर खरंच पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी ला वाहवा दिली आहे. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला ! Read More »

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या

Maharashtra News: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या 75 टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत 4 ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि 19 सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. याशिवाय 3 मातीनाला बांध, 8 चेक डॅम, समतल चर, संयुक्त गॅबियन, सलग समतल चर अशी 39 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांमुळे गावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामे घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. एकूणच गावात जलसंवर्धनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रफिक शेख, सरपंच-एरवी पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने फळबागांना पुरेसे पाणी मिळते आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे घ्यायची आहेत.

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या Read More »

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र इतर कोणत्याही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नसल्याने कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 20 मंत्री केले जातील, 13 मंत्री शिवसेनेच्या शिंदे गटातून आणि 10 मंत्री राष्ट्रवादीच्या कोट्यातून केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पदाची शपथ घेतल्यानंतर येथील राज्य सचिवालय ‘मंत्रालय’ येथे आपली नवीन अधिकृत जबाबदारी स्वीकारली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ आघाडीच्या तीन नेत्यांनी आझाद मैदानावर एका भव्य समारंभात शपथ घेतली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योगपती आणि चित्रपट कलाकार उपस्थित होते. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्याने फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते. ‘महायुती’चे घटक पक्ष – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून विधानसभेच्या 236 जागा आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर लगेचच ‘महायुती’च्या शिष्टमंडळाने बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक ‘मंत्रालय’ येथे पोहोचल्यावर तिन्ही नेत्यांचे कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यानंतर फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, बी.आर.आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ Read More »