मोठी बातमी: जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आदेश प्रभावी
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश २१ डिसेंबर २०२४ पासून ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, धारदार हत्यारे, दारुगोळा, स्फोटके किंवा अनुशासन बिघडवणाऱ्या वस्तू बाळगणे व पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
सवलती यांना लागू नाही बंदी:
- धार्मिक कार्यक्रम
- लग्न समारंभ व मिरवणुका
- प्रेतयात्रा
- पोलिस व शासकीय अधिकारी/कर्मचारी (कामावर असलेले)
- अधिकृत परवानगी घेऊन सभा वा मिरवणूक काढणारे
कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
📢 नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.