DNA मराठी

DNA Marathi News

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद

Ahmednagar News:  कार चालकाचे डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे परराज्यातील 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह 24 तासाचे आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.   25 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी सचिन बापु पठारे हे सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.  यामुळे फिर्यादी यांनी एम. एच.12 व्ही. व्ही. 7336 त्यांच्या गाडीमध्ये  प्रवाशांना बसवुन घेवुन जात असतांना रत्त्याने गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने फिर्यादीचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन त्यांना जखमी केले आणि त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण 5,04,000 रुपये  किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. सदर घटनेबाबत सुपा पोलीस ठाणे भादवि कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   गुन्ह्याचा सखोल तपास करत असताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारामार्फत सदरची कार व त्यामध्ये दोन आरोपी असे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडलगत एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेले असल्याची माहिती मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती त्यांच्या पथकास कळवुन कार व आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.   पथकातील पोलीस अंमलदार हे कोपरगांव ते सिन्नर जाणारे रोडवर चोरी गेलेले कारचा शोध घेत असतांना सदरची कार ही रोडचे कडेला एका पेट्रोलपंपाजवळ उभी असल्याचे दिसुन आल्याने पथकाने सापळा रचुन कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले.   शिवम मातादीन गौतम आणि दुर्जन अनारसिंग गौतम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशमधील आहे.  पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीमध्ये कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेली कार, मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकुण 5,06,250 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि आरोपींना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशनमध्ये हजर केला आहे.

Ahmednagar News: डोक्यामध्ये हातोडा मारुन जबरी चोरी करणारे 02 आरोपी 5,06,250 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद Read More »

Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल

प्रतिनिधि शेख नदीम Sillod News : सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी अजिंठा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत झन्ना मन्ना खेळणाऱ्या 7 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपयाचा नगद व जुगार खेळणाच्या साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवना परिसरातील देशी दारूच्या दुकाना समोरील पत्र्याच्या शेडात झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी सकाळच्या सुमारास धाडी टाकली असता दादाराव काळे,रमेश काळे (दोघे रा.खुपटा),गजानन वाघ,शेख रसूल,विजय बावस्कर,रामराव पवार (सर्व रा.शिवना),हिरामण बावस्कर (रा.सोयगाव ) यांना रंगेहाथ पकडले . आरोपींविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपये नगद व जुगाराचा साहित्य जप्त करण्यात आला आहे .

Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल Read More »

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट!

MP Sujay Vikhe : खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. या प्रकरणात ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. ते उदरमल ता. नगर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.  कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा अमित शाह यांच्या सोबत करणार असून यातून कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार  असं देखील ते म्हणाले. तसेच कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सदरील भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे देखील खासदार सुजय विखेंनी बोलताना स्पष्ट केले.

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट! Read More »

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्….

Maharashtra News:  लातूरमध्ये नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.  लातूरमध्ये 23 वर्षीय मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील सातळा गावात ही घटना घडली आहे.दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता नाथराव मुंडे (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23) असे आरोपी मुलाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वरने त्याचे माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडले होते. सध्या तो शेतीची कामे करतो. दरम्यान, तो मित्रांसोबत दारू पिण्यास शिकला. गावातील नदीकाठावरील शेताच्या शेजारी बांधलेल्या घरात तो आई-वडिलांसोबत राहतो. ज्ञानेश्वरचा लहान भाऊ कृष्णा पुण्यात एका खासगी कंपनीत काम करतो. दरम्यान, शुक्रवारी ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त गावाबाहेर गेले होते. घरी फक्त आई संगीता आणि मुलगा ज्ञानेश्वर होते. दरम्यान दारूचे व्यसन असलेल्या ज्ञानेश्वरने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. अलीकडेच या कुटुंबाने त्यांची म्हैस विकली होती, त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. मात्र आईने पैसे नसल्याचे सांगून काहीही दिले नाही. त्यानंतर रागाच्या भरात ज्ञानेश्वरने घरातील जीवनावश्यक वस्तू विकायला सुरुवात केली. याला आईने विरोध केला असता रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आईला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने कुलर चालू केला आणि दरवाजा बाहेरून लावला. आणि काही माल विकण्यासाठी सोबत घेतला. दरम्यान, गावातील दोन मुले ज्ञानेश्वरच्या घरी गावकऱ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी आली.  दोन्ही मुलांनी पाहिले की दरवाजा बाहेरून बंद होता आणि आतमध्ये कुलर चालू होता. दोघेही घरात शिरले असता संगीता मुंडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.  आजूबाजूच्या लोकांना तातडीने बोलावून संगीताला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वरचे वडील नाथराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून मुलगा ज्ञानेश्वर मुंडे याच्याविरुद्ध किनगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरला अटक करण्यात आली.

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्…. Read More »

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण

Dhananjay Munde: पुन्हा एकदा देशातील अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने सर्वांचे चिंतेत वाढ झाली आहे. आता  कोरोना विषाणूचा महामारी पुन्हा एकदा देशभरात पसरत आहे. कोरोनाचे नवीन सब-व्हेरियंट JN-1 देशभरात पसरू लागले आहे.  राज्यात ही त्याची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क आहेत. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महाराष्ट्रात, कोरोना विषाणू JN.1 च्या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला. यानंतर रविवारी राज्यात JN.1 चे आणखी 9 रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. देशातील JN.1 चे पहिले प्रकरण केरळमध्ये आढळून आले. यानंतर त्याचे काही रुग्ण गोव्यात तर एक रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला. दरम्यान, राज्यात एकाच वेळी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे 9 रुग्ण आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामध्ये एक 9 वर्षांचा मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षीय पुरुष आणि इतर रूग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.  पुण्यात सापडलेला एकच रुग्ण परदेशात गेला आहे. नुकताच तो अमेरिकेहून परतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात आढळलेल्या 9 JN.1 प्रकरणांपैकी 8 जणांना कोविड लसीचे दोन डोस मिळाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. धनंजय मुंडे क्वारंटाईन  राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या त्यांच्या पुण्यातील मॉडर्न कॉलनी येथील घरी क्वारंटाईन आहेत. त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या ते पुण्यातील त्यांच्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. 24 तासांत 50 रुग्ण आढळले रविवारी महाराष्ट्रात 50 नवे कोरोना बाधित आढळले. राज्यातील कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. आज राज्यभरात एकूण 3 हजार 639 जणांची कोविड चाचणी करण्यात आली. JN.1 मधील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत ठाण्यात JN.1 चे सर्वाधिक पाच रुग्ण आढळले आहेत.

Dhananjay Munde : राज्यात एकाच दिवसात JN.1 चे आढळले ‘इतके’ रूग्ण; कृषीमंत्र्यांनाही लागण Read More »

Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण

Lok Sabha Election : येणाऱ्या काही महिन्यात लोकसभेसाठी निवडणुका होणार आहे. मात्र त्यापूर्वी अनेक सर्वेक्षण समोर आले.   राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेस आणि भाजपा मध्ये लढत पाहिला मिळत होती.  तर आता आणखी एक नवीन सर्वेक्षण समोर आला आहे. या सर्वेक्षणात राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वर्चस्व गाजवू शकतो याचा अंदाज लावण्यात आला आहे.  राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. राज्याची राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्याचे निकाल धक्कादायक आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) जिंकण्याची शक्यता आहे. तसेच, महायुतीपेक्षा एमव्हीएला चार टक्के जास्त मते मिळतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती कशी बदलली? राज्यातील ‘महायुती’मध्ये सत्ताधारी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) अजित पवार गट यांचा समावेश आहे.   MVA आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील बंडखोरीनंतर गेल्या वर्षी जूनमध्ये पक्ष फुटला होता, तर या वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी देखील दोन गटात विभागली गेली. 2019 मध्ये शिवसेनेने (उद्धव गट) काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एमव्हीएची स्थापना केली आणि राज्यात सरकार स्थापन केले. परंतु 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एमव्हीए सरकार पडले आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. दरम्यान, जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली.  शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार गट एकत्र आल्याने भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. पण, सर्वेक्षणातून काही वेगळीच समीकरणे समोर आली आहेत. या निवडणूक सर्वेक्षणात 2 लाखांहून अधिक नागरिकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. एबीपी-सी वोटरनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला लोकसभेत 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे.  तर महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, इतर पक्षांना 2 जागा मिळतील, असे सर्वच्या आकडेवारीत म्हटले आहे. कोणाला किती टक्के मते मिळतात? मतांच्या टक्केवारीतही महायुती मागे राहील. महाविकास आघाडीला 41 टक्के मते मिळू शकतात. त्यामुळे महायुतीला 37 टक्के आणि इतर पक्षांना 22 टक्के मते मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.  या सर्वेक्षणाची आकडेवारी महाविकास आघाडीसाठी दिलासा देणारी आहे. त्यामुळे भाजपसोबतच शिवसेना आणि अजित पवार गटाची चिंता वाढणार आहे.

Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण Read More »

Ahmednagar Police: बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई! दारू भट्यावर छापे, वाचा सविस्तर

Ahmednagar Police : दानेवाडी येथे बेलवंडी पोलीस स्टेशनच्या पथकांनी मोठी कारवाई करत दारू भट्यावर विविध ठिकाणी छापे टाकून 2000 लिटर काच्चे रसायन 1 लाख रुपये किमतीचे नष्ट करुन गुन्हा दाखल केले आहे.  सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब यांचे मार्गदर्शनाखली बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ,स.फौ.मारुती कोळपे,पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे,पोहेकॉ भाउसाहेब यमगर,मपोना अविंदा जाधव , माने ,पो.कॉ,कैलास शिपनकर,पो.कॉ. संदिप दिवटे, पो.कॉ. सतिष शिंदे,पोकॉ विकास सोनवणे, यांनी केली. याबात माहिती संजय ठेंगे पोलीस निरीक्षक, बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी दिली आहे.

Ahmednagar Police: बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई! दारू भट्यावर छापे, वाचा सविस्तर Read More »

Maharashtra Accident News : राज्यात 12 तासात दुसरा मोठा अपघात! 3 तरुणांचा मृत्यू

Maharashtra Accident News : सोलापूर जिल्ह्यात  झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.   अधिकाऱ्यांनी सांगितले की, बार्शी-धाराशिव मार्गावर राज्य परिवहन एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडी येथे गुरुवारी सायंकाळी बस आणि दुचाकीची धडक झाली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा बसने चिरडून मृत्यू झाला. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे राज्य परिवहन बसचा 12 तासांत झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. एसटी बसने दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम अतकरे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीला जात होते. त्यानंतर त्यांची दुचाकी पुण्याहून धाराशिवकडे जाणाऱ्या एसटी बसला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर बसलेले तिघेही तरुण बसखाली अडकले. तरूणाचे शीर शरीरापासून वेगळे करण्यात आले. तर इतर दोघांनी हवेत सुमारे 50 फूट उड्या मारल्या. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडी ग्रामस्थ मदतीसाठी धावले. अपघातानंतर बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. त्यामुळे बसमधील काही प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.  सकाळी 6 च्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात झाला. शैक्षणिक दौऱ्यावरून परतत असताना एसटी बसने एका टेम्पोला धडक दिली. या अपघातात 50 वर्षीय शिक्षक बाळकृष्ण काळे यांचा मृत्यू झाला. या अपघातात एक शिक्षक आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.  बसमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. शालेय विद्यार्थी कोकण दौऱ्यावर गेले होते आणि काल सकाळी कोल्हापुरातून परतत होते. शाळेने राज्य परिवहन (एसटी) बस भाड्याने घेतली होती.

Maharashtra Accident News : राज्यात 12 तासात दुसरा मोठा अपघात! 3 तरुणांचा मृत्यू Read More »

Dams Water Storage : राज्यात पाण्याचे संकट!धरणांमध्ये 64 टक्के पाणी; ‘या’ भागात परिस्थिती चिंताजनक

Dams Water Storage:  येणाऱ्या काही दिवसात राज्यातील काही भागांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. समोर आलेल्या आकडेवारीवरून राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. या भागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे.औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 37 टक्के पाणीसाठा आहे. माहितीसाठी जाणुन घ्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील धरणांमधील पाणीसाठा वाढल्याचे समोर आले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षी आजपर्यंत राज्यातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा 64 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अपुरा पाऊस हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यावर जलसंकटाचा धोका निर्माण झाला आहे. कुठे किती पाणी शिल्लक आहे? अहवालानुसार, कोकण विभागातील जलाशयांमध्ये सर्वाधिक पाणी शिल्लक आहे. कोकणातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर औरंगाबादच्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील धरणांमध्ये 67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर नाशिक विभागातील धरणांमध्ये 68 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागातील धरणांमध्ये 74 टक्के तर नागपूर विभागातील धरणांमध्ये 69 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचवेळी कोकण विभागातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 37 टक्के पाणीसाठा आहे. राज्यात कुठे कुठे पाऊस झाला? मिळालेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात एकूण पाऊस सरासरीपेक्षा 13.4 टक्के कमी झाला आहे. महाराष्ट्रात मान्सून अधिकृतपणे 1 जूनपासून सुरू होतो आणि साधारणपणे 30 सप्टेंबरपर्यंत टिकतो. राज्यातील किमान 9 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे.  मात्र, कोकण-गोवा पट्ट्यात सरासरीपेक्षा 18 टक्के जास्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पाऊस झाला, तर मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस झाला. विदर्भात सरासरीपेक्षा दोन टक्के कमी पाऊस झाला आहे.

Dams Water Storage : राज्यात पाण्याचे संकट!धरणांमध्ये 64 टक्के पाणी; ‘या’ भागात परिस्थिती चिंताजनक Read More »