DNA मराठी

DNA Marathi News

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.  अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे.  अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी  तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे.  या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्याकरिता संदीप मिटके यांनी कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून माहिती दिली.   त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.  तसेच मनोज चंद्रकांत गिरमे (वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव) अल्ताफ बाबू शेख ( वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.  आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

Eknath Shinde:  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहिमेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती

Eknath Shinde: हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुंबईतील अशाच प्रकारच्या मोहिमांच्या यशाने प्रेरित होऊन सखोल स्वच्छता अभियान (Deep Clean Drive) हा उपक्रम सुरू केला आहे.  28 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेली ही मोहीम पुढील तीन महिन्यांत संपूर्ण दुहेरी शहरांमध्ये उलगडण्यासाठी नियोजित केलेल्या सर्वसमावेशक स्वच्छता मालिकेची सुरुवात दर्शवते. दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी नवघर हनुमान मंदिरा जवळील परिसराच्या स्वच्छतेच्या उद्घाटन मोहिमेत सक्रियपणे सहभागी झालेल्या मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आमदार प्रताप सरनाईक आणि मा. आमदार गीता जैन यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवत शहराप्रती सामूहिक बांधिलकीवर जोर दिला.  सखोल स्वच्छता अभियान या मोहिमेचे उद्दिष्ट रस्ते आणि पदपथावरील धूळ दूर करण्याचा आहे. या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि प्रेरणाचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 22 पथके अथकपणे काम करताना दिसली. हे अनेक शुक्रवारच्या मोहिमांपैकी पहिले चिन्हांकित आहे, ज्या दरम्यान नियुक्त वॉर्डांमध्ये रस्ते, दुभाजक, फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. बस स्टॉप वरील, भिंतींवरील बिले आणि स्टिकर्स काढून टाकणे, तसेच शहरातील रेड स्पॉट्स संबोधित केल्याने एकूणच स्वच्छतेच्या प्रयत्नांना हातभार लागला.  मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करत मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी हनुमान मंदिर, इंद्रलोक नाका आणि गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांचा सहभाग आणि क्यूआर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरणावर भर दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांनी सर्व स्तरावर कौतुक केले. मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी येथे अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे प्रदर्शन केले, शहर स्वच्छतेच्या तांत्रिक प्रगतीसाठी वचनबद्धतेचे प्रदर्शन करण्यात आले. मा. मुख्यमंत्री यांनी नागरिकांशी संवाद साधला, उपक्रमातील त्यांची भूमिका मान्य करून स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.  मिरा भाईंदर महानगरपालिका ही गती कायम ठेवण्यास उत्सुक आहे, आगामी मोहिमेद्वारे तेथील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मिरा भाईंदर महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहणार असून नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन मा. आयुक्त संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या वतीने करण्यात येत आहे.  तसेच कार्यक्रमास प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सामाजिक संस्था व नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल मा. आयुक्त यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

Eknath Shinde:  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहिमेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती Read More »

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा

Ahmednagar News: टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023  महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग आयोजित टिपू सुलतान श्री शरीर सौष्ठ्य स्पर्धा भरवणारे सय्यद शहा फैजल (शानु), सोहेल शेख व सर्व आयोजकां विरोधात हिंदु धर्माचे आराध्य दैवत गणपती यांचे श्री हे नाव भारतावरती इस्मामिक राज्य आणण्याच्या हेतुने लाखों हिंदुंचे कतलेआम करणाऱ्या व हजारो हिंदु मंदिरे पाडणाऱ्या, हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपु सुलतान या इस्लामिक जिहादी आक्रमंताचे नाव जोडुन हिंदु धार्मियांची भावना दुखावुन तसेच रहदारीला अडथळा निर्माण करुन शहरातील पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेले अति संवेदनशील आशा टॉकीज परिसर ज्या भागातुन कुठल्याही हिंदुंच्या मिरवणुक, मोर्चे काढण्यासाठी पोलिसांचे परवानगीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागते.  अशा ठिकाणी ही स्पर्धा भरवुन शहरामध्ये धार्मित तेढ निर्माण करण्याचे ठळक उद्देश दिसून येते.  यामधील सय्यद शहा फैजल (शानु) हा अनेक प्रकारच्या हिंदु मुस्लिम वादामध्ये आरोपी आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे कारस्थान करुन शहर व राज्यासह देशात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पोलिसांनी अतिशीघ्र संबंधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत व हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकारणी कठोर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे.

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा Read More »

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुढील महिन्यात ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन करणार आहे.  जरांगे येथील शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहोचले. दरम्यान, मुंबईत आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास मुंबईतच आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. तसेच सकल मराठा समाजाने आंदोलनस्थळी येऊन मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती जरांगे यांनी केली आहे. मराठा आंदोलन रद्द होणार नाही पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने दुफळीत पडू नये. सर्वांनी एकत्र यावे. हा गरीब मराठ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जरांगे पुढे म्हणाले की, मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात मैदान लागणार आहे, त्यासाठी तयारी सुरू आहे.  मराठ्यांचा मुंबईत आंदोलनाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. 3 कोटी मराठे मुंबईवर हल्ला करणार! तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक मुंबईत येतील, असा दावा त्यांनी केला. मुंबई दौरा रद्द होणार नाही. 20 जानेवारीपर्यंत हा मोर्चा मुंबईकडे निघणार आहे.  मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील सर्व मैदाने लागतील. आता मैदान देण्याची जबाबदारी सरकारची आहे. थांबवले तर फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करतील मनोज जरांगे यांनी इशारा दिला की, “20 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने मराठा मुंबईत येणार असून सरकारने त्यांची वाहने रोखल्यास थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच आंदोलन करू.  आमची वाहने बंद पडली तर आम्ही आमचे सामान कसे नेणार? मुंबईत राहण्यासाठी तंबू, दैनंदिन जीवनातील गोष्टी हव्या आहेत, ज्या आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉलीने मुंबईत आणू. आम्ही ते दगडांनी भरून आणणार नाही…” मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे म्हणाले की, सरकार आमच्यावर कारवाई करेल… त्यामुळे मराठ्यांनी आपली वाहने जप्त होतील, अशी भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्यक्षात मराठा मोर्चादरम्यान लाखो वाहने शहरात येणे अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी नऊ दिवसांचे बेमुदत उपोषण संपवले. तेव्हा राज्य सरकारने दोन महिन्यात समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही योग्य ती पावले न उचलल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता.  दोन महिन्यांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मुंबईवर मोठा मोर्चा काढणार असल्याचे जरंगे यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातील मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. या मागणीबाबत जरंगे यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केल्यानंतर आंदोलनाला नवी गती मिळाली.  मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरात हिंसाचारही उसळला, अनेक आमदार आणि नेत्यांची घरे, कार्यालये आणि सरकारी मालमत्तांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली.  मात्र, मुंबईत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी पोलिसांनी कंबर कसली असून मराठा समाजातील प्रमुख चेहऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा Read More »

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव,उमाकांत गावडे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले. नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार हे शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना खाटीक गल्ली, शेवगांव व बोधेगांव, ता. शेवगांव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत करत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दिनांक 28/12/2023 व दिनांक 29/12/2023 रोजी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात प्रॉपर्टी डीलर एचएल पाहवा (थम्पीच्या जवळ) मार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. ईडीचे म्हणणे आहे की वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन प्रकरणात आरोपी केले आहे ज्यात त्यांनी लंडनमधील एका घराचे नूतनीकरण केले आणि त्यात वास्तव्य केले. संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात हे घर कथितपणे ‘गुन्ह्याच्या कमाईचा’ भाग आहे. संजय भंडारी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. या प्रकरणात वाड्रा यांचे नाव प्रथमच समोर आले असून ईडीने निवेदन जारी करून ते सार्वजनिक केले आहे. परदेशात कथित अघोषित संपत्ती असलेल्या व्यक्तींवरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे.  ईडीने या प्रकरणी यूएईस्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »

Corona Virus: अर्र.. पुन्हा कोरोना, 24 तासात 702 रुग्णांची भर, ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

Corona Virus : देशातील अनेक भागात कोरोना हळूहळू वाढत चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 702 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,097 वर पोहोचली आहे.  गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने संसर्गाची नवीन आकडेवारी जाहीर केली. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोविड-19 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी देशात संसर्गाची 752 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. अचानक प्रकरणे का वाढू लागली? आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्दी आणि कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांमुळे अलिकडच्या काळात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. यापूर्वी, 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. 2020 च्या सुरुवातीपासून चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, परिणामी 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराला घाबरण्याची गरज आहे का? आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटी झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे. JN.1 प्रकाराला घाबरण्याची गरज नाही, असे बहुतांश आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संसर्ग झाल्यास काय करावे? जर तुम्हाला कोविड-19 ची लागण झाली असेल, तर लगेच स्वतःला अलग करा. तुमची तब्येत बिघडली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मास्क घालण्याची खात्री करा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.

Corona Virus: अर्र.. पुन्हा कोरोना, 24 तासात 702 रुग्णांची भर, ‘इतक्या’ जणांचा मृत्यू Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »

Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्….

Thane News: ठाणे जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या मुलीवर बापाने बलात्कार केला.  पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपले हे घृणास्पद कृत्य लपवण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्काराची खोटी स्टोरी तयार केली.  आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की त्याच्या सावत्र अल्पवयीन मुलीचे 24 डिसेंबर रोजी तीन लोकांनी अपहरण केले होते. यानंतर भिवंडी तालुक्यातील एका गावात तिच्यावर बलात्कार झाला. निवेदनाच्या आधारे, प्रथम पोलिसांनी मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. पण तपासात पोलिसांना वडिलांची भूमिका संशयास्पद वाटली. पोलिसांनी आरोपीच्या जबानीत तफावत असल्याची चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पित्याने 10 वर्षांच्या मुलीवर त्याच्याच घरात बलात्कार केला होता, घटनेच्या वेळी मुलीची आई घरी नव्हती. आरोपीने पीडितेला खोटे सांगण्यास सांगितले होते. स्थानिक न्यायालयाने आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नुकतेच नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका बापाने आपल्या 18 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडितेने स्वतः पोलिस स्टेशन गाठून तिच्या सावत्र वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.  मुलीने आपल्या जबानीत सांगितले की, आरोपीने 22 डिसेंबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ती घरी झोपली असताना आरोपीने हा गुन्हा केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्…. Read More »