DNA मराठी

DNA Marathi News

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.  22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.  आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील Read More »

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक

Pune Prostitution Racket: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पॉश भागात चालवले जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या राजस्थानी अभिनेत्री आणि दोन परदेशी मॉडेल्सना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुण्यातील विमाननगर भागात ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यात आलिशान हॉटेल्समध्ये वेश्याव्यवसायाचे काळे साम्राज्य चालवताना अभिनेत्री पोलिसांनी पकडल्या आहेत. नुकतेच पुण्यात एका कारवाईदरम्यान एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. ऑनलाइन ग्राहकांशी संपर्क साधून हा वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अभिनेत्री आणि रशियन मॉडेल पुण्यात वेश्याव्यवसायासाठी आल्याची खबर पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विमाननगर परिसरात सापळा रचला. अटक करण्यात आलेली राजस्थानी अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे फोटो आणि बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत असते. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राजस्थानी अभिनेत्रीसह अन्य दोन रशियन मॉडेलनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही अनेकवेळा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.  पोलिसांनी ताथवडे येथील एका लॉजवर छापा टाकून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली. तर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या एका अभिनेत्रीसह अन्य दोन मुलींची सुटका करण्यात आली.

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक Read More »

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार…

Ahmednagar News:  जामखेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, विखे पाटील परिवार कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नेहमी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत खूप उपक्रम या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील परिवाराने राबवले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी शनिशिंगणापूर शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करून महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिणमध्ये साखर वाटप देखील करत आहोत असे सांगून या उपक्रमाचा हेतू म्हणजे सदरील सोहळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल असेही डॉ. सुजय विखेंनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे. आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी संगितले.  विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो. त्यामुळे सदरील विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. दरम्यान आज खासदार सुजय विखेंनी जवळा, खर्डा, शिवूर, मोहा, जामखेड शहरांमध्ये आज चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार… Read More »

Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता

Weather Update :  देशातील सर्वच भागात आता थंडीमुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मैदानापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत कडाक्याची थंडीची लाट आहे.  दिल्ली-पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये किमान तापमान 2 अंशांवर पोहोचले आहे. त्याच वेळी,  यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमधील अनेक भागात तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.  हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. यासोबतच, IMD ने जारी केलेल्या बुलेटिननुसार, पुढील 5 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.  संपूर्ण उत्तर भारतात धुक्याचा कहर 18 जानेवारीला सकाळी दिल्ली-राजस्थान, यूपी, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागात दाट धुके दिसले. या राज्यांमध्ये 22 जानेवारीपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 19 जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत पूर्व भारतातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते आणि त्यानंतर त्यात कोणताही विशेष बदल होणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी बराच उशीर झाला असला तरी, बुधवारी संध्याकाळी शिमल्याच्या चंशाल, नारकंडा आणि हातू शिखरावर तसेच खडा पाथर आणि चुरधर शिखर सारख्या इतर उंच भागात हलकी बर्फवृष्टी झाली. या उच्च उंचीच्या भागात आजही बर्फवृष्टी सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 18 जानेवारी 2024 रोजी देशाच्या पूर्वेकडील भागात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये हिवाळी पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये थंडीच्या दिवसाबाबत सतर्कता हवामान खात्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, झारखंड, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 5 दिवस दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये थंड दिवसाची स्थिती कायम राहू शकते. या राज्यांमध्ये आज पाऊस पडू शकतो स्कायमेट हवामान अहवालानुसार, 18 जानेवारी रोजी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये वेगळ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते.  अंदमान आणि निकोबार बेटांवर, तामिळनाडूचा दक्षिण भाग आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये प्रदीर्घ कोरडा काळ पावसाने संपू शकतो.  पुढील 3-4 दिवसांत, पाऊस लक्षणीयरीत्या कमी होईल किंवा बहुतेक ठिकाणी थांबेल. मात्र, पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता Read More »

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

Pohara Devi Temple : भीषण अपघात! पोहरा देवीला जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू तर ‘इतके’ जखमी

Pohara Devi Temple : यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुसद-दिग्रस रस्त्यावरील बेलगव्हाण घाटात हा अपघात झाला आहे.  बेलगव्हाण घाटात नाल्यात टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.   पोहरादेवी येथे जाण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. नवस पूर्ण झाल्यानंतर सर्व लोक बोकड घेऊन पोहरादेवीला जात होते, असे सांगितले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेलगवण घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन नाल्यात पडले आणि भीषण अपघात झाला. वाहनाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून आसपासचे ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. अपघाताच्या वेळी गाडीत सुमारे 15 ते 20 जण होते. पोलीस मृत व जखमींची ओळख पटवून पुढील तपास करत आहेत. जखमींना पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात  सकाळी 11 वाजता वाहन नाल्यात पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुसद (ग्रामीण) पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश राठोड यांनी सांगितले की, नागपूरपासून 260 किलोमीटर अंतरावरील पुसद येथील जवाहर नगर येथे राहणारे गणेश राठोड यांच्या कुटुंबातील सुमारे 15 जण वाहनातून उमरी पोहरा देवीकडे जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, बेलागवान पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन खाली नाल्यात पडले. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पीडितांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.  या अपघातातील मृत व जखमी पुसद तालुक्यातील मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुर्णा, सिंघनवाडी येथील रहिवासी आहेत.

Pohara Devi Temple : भीषण अपघात! पोहरा देवीला जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू तर ‘इतके’ जखमी Read More »

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश…

Maharashtra News: कुकडी प्रकल्पाचे मागील १५ डिसेंबर पासून आवर्तन सुरु आहे. कुकडीतून विसापुर प्रकल्पातही २१ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार डाॅ. सुजय विखे यांनी दिली.  याप्रश्नी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे विसापूर धरणार पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दिल्याने ना.विखे आणि आ.पाचपुते यांची शिष्टाई कामी आल्याची माहिती दिली.    डाॅ. विखे यांनी बोलताना विसापुरच्या पाण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी आहे. पाणी सोडण्याबाबत आमदार बबनराव पाचपुते हे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या वेळोवेळी संपर्कात होते. विसापूर धरणात पाणी सोडण्याबाबत दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली.  त्यानुसार उपमुखमंत्री पवार यांनी येत्या २१ जानेवारीपासून कुकडीच्या सुरु असणाऱ्या आवर्तनातून विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश दिले. २१ ते २३ जानेवारी दरम्यान ३०० दशलक्षघनफूट पाणी विसापुरमध्ये सोडण्यात येणार असून त्यानंतर ते लाभधारकांना आवर्तनाद्वारे देण्यात येईल.  त्यामुळे त्याभागातील शेतीचा पाणी प्रश्नही मिटण्यास मदत होणार असल्याचे सांगत विसापूर धरणाखालील घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, हंगेवाडी , शिरसगाव बोडखा, पिसोरे या गावांसह लाभधारक गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Maharashtra News: विसापुर प्रकल्पात पाणी सोडण्याचे अजित पवार यांचे आदेश… Read More »

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार?

Maharashtra Politics: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर काही लोक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे.  पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात फोनवरून ही माहिती देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मातोश्रीवर हल्ला करण्याबाबत उर्दूमध्ये 4 ते 5 लोक बोलत असल्याचे त्याने स्वतः ऐकले. वृत्तानुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला  एक फोन आला, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की काही लोक उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मोठा हल्ला करणार आहेत. मात्र, फोन करणाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘मुंबईत भाड्याने घर घेणार’ नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने संशयितांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा केला. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण प्रवास करत होते आणि मातोश्रीबाहेर हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  संशयितांचे संभाषण ऐकून त्यांनी तत्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 4 ते 5 जण उर्दू भाषेत बोलत होते. ते मुंबईतील भायखळा परिसरातील मोहम्मद अली रोडवर भाड्याने खोली घेणार असल्याचे बोलत होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे उद्धव गटनेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.  राऊत म्हणाले, “मला माहित आहे की फोन करणारे कोण होते… विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. त्यांनी मुस्लिमांची नावे घेतली आणि राम मंदिर उडवण्याची धमकी दिली. या देशात लोकसभा जिंकण्याची भाजपची तयारी आहे किंवा निवडणुकीपूर्वी धार्मिक फूट पाडून निवडणूक लढवा, हे सर्व भाजपचे षडयंत्र आहे. ‘राज्यातील सरकार संशयास्पद’ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ते महाराष्ट्र सरकारचे नाही कारण इथे साशंक सरकार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा काढण्यात आली, तशीच शिवसेना नेत्यांची सुरक्षाही काढण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात काही घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृहविभागावर असेल.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धमकी…, मातोश्रीवर मोठा हल्ला होणार? Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. जिल्ह्यात या वारीचा मुक्काम बाराबाभळी मदरसा येथे असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या वारीमध्ये तब्बल तीन ते चार लाख लोकांचा सहभाग राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.  ही वारी अहमदनगर शहरातून भिंगार माळीवाडा बस स्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळायला पुष्पहार अर्पण करून केडगाव मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 21 जानेवारीला अहमदनगर शहरात, जाणुन घ्या संपुर्ण रूट Read More »

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Ahmednagar News: वसीम गुलाब शेख ,समीर अब्दुल शेख ,तन्वीर निसार शेख ,आरिफ ईस्माईल कुरेशी हे चारही लोकं आर टी ओ कार्यालय जवळ वाहनाला रेडियम लावण्याचे काम करतात तेथेच सल्लाउद्दीन शेख उर्फ SS पण रेडियम लावण्याचे व्यवसाय करतात. सल्लाउद्दीन शेख उर्फ SS हे वारंवार वरील सगळ्यांना धमकी द्यायचे काम करतात तुम्ही इथे काम करायचे नाही मी येथे 25 वर्षा पासून काम करतो इथे माझा राज चालणार इथे काम करायचा तर माझ्याकडे करायचा नाही तर काम करू देणार नाही तुम्हाला जीवे मारून टाकीन माझे नेटवर्क लई मोठे आहे.  तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवेन माझा कोण काही वाकडं करू शकत नाही पोलिसांबरोबर आणि आर टी ओ बरोबर पण माझे संबंध आहे. राजकारणात पण माझा चांगला वजण आहे. तुम्हाला आयुष्यातून संपून टाकेन अशी धमकी वारंवार दिल्याने वैतागून वरील वसीम गुलाब शेख याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद 19 एप्रिल 2023 रोजी दिली. या प्रकरणात पोलिसांनी  504,506 प्रमाणे NC दाखल करून घेतले . सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने वसीम शेख याला परत रस्त्यात अडवले व सांगितले कि तू जी NC दाखल केली ना त्या NC ने मला काही फरक पडत नाही ते तर बॉण्ड जामीन वर माझा जामीन होऊन जाईल पण मी तुला जिवंत ठेवणार नाही. नंतर काही राजकारणी यांना मध्यस्ती करायला लावून हे वाद मिटवून घेतला परंतु हे वाद मिटलेले असतांना सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने 29 डिसेंबर 2023 रोजी परत वसीम गुलाब शेख आणि इतर तिघांना परत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हे लोक परत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले व तेथे सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याच्यावर  504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »