DNA मराठी

DNA Marathi News

IMG 20240120 WA0012

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

Sujay Vikhe News: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील भव्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातही व्हावा या अनुषंगाने सदर ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत सुजय विखेंनी प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने आणि सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी सुजय विखे यांनी बोलून दाखविला.

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित.. Read More »

Manoj Jarange Patil

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम असणार आहे.  तर याच ठिकाणी पाटिल एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल 20 ते 25 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची , नाश्त्याची तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  पाटील यांच्या होणाऱ्या सभामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन संघटनेकडून करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम Read More »

Winter

Weather Update: नागरिकांनो, मिळणार नाही थंडीपासून दिलासा! जाणून घ्या अपडेट्स

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात होणाऱ्या पावसामुळे आता राज्यात देखील थंडी हळूहळू वाढत चालली आहे.   सध्या राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र राज्यात 21 जानेवारीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईतही थंडीची तीव्रता वाढत आहे. शहरात थंड वारे वाहत आहेत. सकाळच्या वेळी उपनगरात वाढत्या थंडीमुळे शहरातील काही नागरिक उबदार कपडे परिधान करून शेकोट्या पेटवत आहेत. गेल्या आठवड्यापासून पुण्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुणेकरांना गुलाबी थंडीबरोबरच गारवाही सहन करावा लागत आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात आज सर्वात कमी 9.7 अंश तापमानाची नोंद झाली. मंगळवारी मुंबईत या हंगामातील नीचांकी तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान आठवडा संपेपर्यंत मुंबई आणि उपनगरात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुरुवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 17.5 अंश, तर कुलाबा केंद्रावर 20.5 अंश होते. दिवसाचे तापमान 30 अंशांच्या खाली आहे. IMD च्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांवर कमाल तापमान अनुक्रमे 28.6 आणि 29 अंश नोंदवले गेले. संपूर्ण भागात हवामान कोरडे असल्याचे हवामान खात्याने सांगितले. किमान तापमानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे आज किमान तापमान 10.3 अंश नोंदले गेले. मात्र, गुरुवारी विदर्भात थंडी कमी झाली असून तापमानाचा पारा चढला आहे.

Weather Update: नागरिकांनो, मिळणार नाही थंडीपासून दिलासा! जाणून घ्या अपडेट्स Read More »

IMG 20240119 WA0005

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.  किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली. या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला  समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.  तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी  काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट Read More »

IMG 20240118 WA0004

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.  22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.  आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील Read More »

Prostitution Racket

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक

Pune Prostitution Racket: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पॉश भागात चालवले जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या राजस्थानी अभिनेत्री आणि दोन परदेशी मॉडेल्सना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुण्यातील विमाननगर भागात ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यात आलिशान हॉटेल्समध्ये वेश्याव्यवसायाचे काळे साम्राज्य चालवताना अभिनेत्री पोलिसांनी पकडल्या आहेत. नुकतेच पुण्यात एका कारवाईदरम्यान एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. ऑनलाइन ग्राहकांशी संपर्क साधून हा वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अभिनेत्री आणि रशियन मॉडेल पुण्यात वेश्याव्यवसायासाठी आल्याची खबर पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विमाननगर परिसरात सापळा रचला. अटक करण्यात आलेली राजस्थानी अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे फोटो आणि बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत असते. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राजस्थानी अभिनेत्रीसह अन्य दोन रशियन मॉडेलनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही अनेकवेळा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.  पोलिसांनी ताथवडे येथील एका लॉजवर छापा टाकून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली. तर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या एका अभिनेत्रीसह अन्य दोन मुलींची सुटका करण्यात आली.

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक Read More »

IMG 20240118 WA0002

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार…

Ahmednagar News:  जामखेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, विखे पाटील परिवार कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नेहमी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत खूप उपक्रम या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील परिवाराने राबवले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी शनिशिंगणापूर शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करून महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिणमध्ये साखर वाटप देखील करत आहोत असे सांगून या उपक्रमाचा हेतू म्हणजे सदरील सोहळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल असेही डॉ. सुजय विखेंनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे. आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी संगितले.  विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो. त्यामुळे सदरील विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. दरम्यान आज खासदार सुजय विखेंनी जवळा, खर्डा, शिवूर, मोहा, जामखेड शहरांमध्ये आज चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार… Read More »

Rain 1

Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता

Weather Update :  देशातील सर्वच भागात आता थंडीमुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मैदानापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत कडाक्याची थंडीची लाट आहे.  दिल्ली-पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये किमान तापमान 2 अंशांवर पोहोचले आहे. त्याच वेळी,  यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमधील अनेक भागात तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.  हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. यासोबतच, IMD ने जारी केलेल्या बुलेटिननुसार, पुढील 5 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.  संपूर्ण उत्तर भारतात धुक्याचा कहर 18 जानेवारीला सकाळी दिल्ली-राजस्थान, यूपी, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागात दाट धुके दिसले. या राज्यांमध्ये 22 जानेवारीपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 19 जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत पूर्व भारतातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते आणि त्यानंतर त्यात कोणताही विशेष बदल होणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी बराच उशीर झाला असला तरी, बुधवारी संध्याकाळी शिमल्याच्या चंशाल, नारकंडा आणि हातू शिखरावर तसेच खडा पाथर आणि चुरधर शिखर सारख्या इतर उंच भागात हलकी बर्फवृष्टी झाली. या उच्च उंचीच्या भागात आजही बर्फवृष्टी सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 18 जानेवारी 2024 रोजी देशाच्या पूर्वेकडील भागात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये हिवाळी पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये थंडीच्या दिवसाबाबत सतर्कता हवामान खात्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, झारखंड, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 5 दिवस दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये थंड दिवसाची स्थिती कायम राहू शकते. या राज्यांमध्ये आज पाऊस पडू शकतो स्कायमेट हवामान अहवालानुसार, 18 जानेवारी रोजी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये वेगळ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते.  अंदमान आणि निकोबार बेटांवर, तामिळनाडूचा दक्षिण भाग आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये प्रदीर्घ कोरडा काळ पावसाने संपू शकतो.  पुढील 3-4 दिवसांत, पाऊस लक्षणीयरीत्या कमी होईल किंवा बहुतेक ठिकाणी थांबेल. मात्र, पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता Read More »

Loksabha

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

Accident

Pohara Devi Temple : भीषण अपघात! पोहरा देवीला जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू तर ‘इतके’ जखमी

Pohara Devi Temple : यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुसद-दिग्रस रस्त्यावरील बेलगव्हाण घाटात हा अपघात झाला आहे.  बेलगव्हाण घाटात नाल्यात टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.   पोहरादेवी येथे जाण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. नवस पूर्ण झाल्यानंतर सर्व लोक बोकड घेऊन पोहरादेवीला जात होते, असे सांगितले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेलगवण घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन नाल्यात पडले आणि भीषण अपघात झाला. वाहनाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून आसपासचे ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. अपघाताच्या वेळी गाडीत सुमारे 15 ते 20 जण होते. पोलीस मृत व जखमींची ओळख पटवून पुढील तपास करत आहेत. जखमींना पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात  सकाळी 11 वाजता वाहन नाल्यात पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुसद (ग्रामीण) पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश राठोड यांनी सांगितले की, नागपूरपासून 260 किलोमीटर अंतरावरील पुसद येथील जवाहर नगर येथे राहणारे गणेश राठोड यांच्या कुटुंबातील सुमारे 15 जण वाहनातून उमरी पोहरा देवीकडे जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, बेलागवान पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन खाली नाल्यात पडले. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पीडितांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.  या अपघातातील मृत व जखमी पुसद तालुक्यातील मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुर्णा, सिंघनवाडी येथील रहिवासी आहेत.

Pohara Devi Temple : भीषण अपघात! पोहरा देवीला जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू तर ‘इतके’ जखमी Read More »