DNA मराठी

Devendra Fadanvis

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य

Maharashtra Government: राज्यातील चार चाकी वाहन धारकांना 01 एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल. अशी माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या अखत्यारीत 50 टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य Read More »

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, आता राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’

Devendra Fadanvis : राज्यात ‘ई कॅबीनेट’ आणि या बैठकीत होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कारभार गतीमान आणि पारदर्शी करण्यावर भर दिला असून मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचणे, त्यातून शासकीय कामकाजाला गती देणे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. याबाबतचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केले. राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई कॅबीनेटचा निर्णय घेतला आहे. ‘ई-कॅबिनेट’ हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या हरित उपक्रमांतर्गत स्मार्ट टॅब्लेट्सद्वारे कागदविरहीत मंत्रिमंडळ बैठक सहज पार पडू शकेल. या प्रणालीमुळे मा. मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल. ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल. ही प्रणाली पूर्णपणे डीजिटल स्वरूपात असून याद्वारे प्रत्येक टप्पा सहज पार पाडला जाईल. आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे, ही सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत. हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे कागदांचा वापर कमी होण्यासोबतच मंत्रिमंडळाचा आणि या प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, आता राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ Read More »

Mumbai Caught Fire: मोठी बातमी, प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामाला आग

Mumbai Caught Fire: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबईतील कुर्ला येथे शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. जिथे प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी आग विझवण्यात व्यस्त आहेत. कुर्ल्यातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये बांधलेल्या गोदामात ही आग लागली. गोदामाला सकाळी सहा वाजता अचानक आग लागली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

Mumbai Caught Fire: मोठी बातमी, प्लास्टिक आणि भंगाराच्या गोदामाला आग Read More »

Maharashtra Government: आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करणार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा

Maharashtra Government: जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरिकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.गेडाम यांनी जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण होईल आणि त्या भागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल याचा विचार विकास आराखड्यात असावा. त्यासाठी प्राधान्याच्या विशिष्ट विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात. विविध शासकीय,अशासकीय संस्थांची मदत घेऊन कृषी आणि दुग्ध व्यवसाय आधारित क्लस्टरमधून निर्यात करण्याबाबत शक्यतांचा विचार व्हावा. अशा क्लस्टरच्या विकासासाठी अपेक्षित सुविधा उभारण्यावर भर द्यावा. एखाद्या क्षेत्राचा विकास करताना त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांचा विकास करण्याकडे अधिक लक्ष द्यावे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा विचार करताना तेथील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्यावा. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे, असेही डॉ.गेडाम म्हणाले. डॉ.गेडाम यांनी यावेळी जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव जल परिपूर्ण करण्यासाठी पुढील 30 वर्षाचे नियोजन करा, त्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. गावाच्या पाण्याची गरज लक्षात घेण्यासोबत नदी किंवा नाला प्रवाहितही राहील याचाही विचार करावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विकासाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येऊन प्राधान्याने गायसामुद्रे यांनी जलसंधारण योजनांचा आढावा सादर केला. यावेळी जिल्हा विकास आराखडा, जलयुक्त शिवार योजना , गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, अमृत सरोवर अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

Maharashtra Government: आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करणार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्याकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा Read More »

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज?

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने राज्यात सरकार स्थापन केली आहे तर 15 डिसेंबर रोजी महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र अद्याप खातेवाटप न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील दोन – तीन दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या माहितीनुसार, खातेवाटप लांबणीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे खातेवाटपवर एकमत अजूनही नाही झालेले नाही त्यामुळे खातेवाटप लांबणीवर आहे. अर्थखात पाहिजे आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेनाचे खातेवाटप तयार आहे. 15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज? Read More »

Maharashtra Politics: भाजप देणार शिंदेंना धक्का, मिळणार नाही गृहमंत्रालय?

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलाय. माहितीनुसार 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. बुधवारी (11 डिसेंबर) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली. अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच ही बैठक घेतली होती. ज्यामध्ये महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या खात्यांच्या वाटपावर चर्चा झाली. शिंदे गटाला गृहमंत्रालय मिळणार नाहीया बैठकीबाबत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 14 डिसेंबरला घोषणा होऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गृहमंत्रालय मिळणार नाही, असेही सांगण्यात आले. शिवसेनेला नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी मिळू शकते. भाजप मुख्यमंत्रिपदासह 21 ते 22 मंत्रीपदे राखू शकतो. दुसरीकडे चार-पाच मंत्रीपदे रिक्त ठेवली जाऊ शकतात, असेही मानले जात आहे. राज्यात पोर्टफोलिओ वाटपाच्या चर्चेला सतत विलंब होत आहे, कारण इथल्या सरकारमध्ये तीन पक्ष सामील आहेत की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने 233 जागा जिंकल्या आहेत. त्यात भाजपच्या 132 जागा, शिवसेनेच्या 57 जागांवर आणि राष्ट्रवादीच्या 41 जागांवर भाजपने 149 उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने 81 तर राष्ट्रवादीने 59 उमेदवारांना तिकीट दिले होते, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारमधील खात्यांच्या वाटपात प्रत्येक मित्रपक्षाचा वाटा ठरवण्यासाठी सहा आमदारांवर एक मंत्रिपदाचा फॉर्म्युला विचारात घेतला जाणार आहे.

Maharashtra Politics: भाजप देणार शिंदेंना धक्का, मिळणार नाही गृहमंत्रालय? Read More »

EVM Scam : विरोधकांना धक्का, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी अनियमितता नाहीच..

EVM Scam : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. मात्र आता विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. विरोधकांनी केलेले ईव्हीएम मतांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीच्या डेटामध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. सर्व 288 जागांवर व्हीव्हीपीएटी स्लिप जुळल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 व्हीव्हीपीएटी मशिन्सची मोजणी करण्यात आली होती जेणेकरून ती ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांच्या संख्येशी जुळता येईल. “या अंतर्गत, मतमोजणीच्या दिवशीच 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात एकूण 1440 व्हीव्हीपीएटी मशिन्सची मोजणी करण्यात आली आणि त्यांच्या संबंधित ईव्हीएम क्रमांकाशी जुळणाऱ्या कोणत्याही व्हीव्हीपीएटी स्लिपमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही.” अधिकृत विधानानुसार, 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा जागेवरील 5 यादृच्छिकपणे निवडलेल्या मतदान केंद्रांची व्हीव्हीपीएटी स्लिप मोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली. व्हीव्हीपीएटी स्लिप काउंट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट गणनेमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही.राज्यातील विरोधी पक्षांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे हे विधान आले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हीए) निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत निषेध केला होता. ईव्हीएममध्ये छेडछाड करून सत्ताधारी आघाडीने लोकशाहीची हत्या केली आणि प्रचंड बहुमत मिळवले, असा दावा विरोधकांनी केला. मात्र, महायुतीने विरोधकांचे आरोप फेटाळून लावत ईव्हीएमच्या नावाखाली आपला दणदणीत पराभव लपवायचा असून त्यामुळे जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे.

EVM Scam : विरोधकांना धक्का, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी अनियमितता नाहीच.. Read More »

Maharashtra Politics: ‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार, हसन मुश्रीफ, नितेश राणेंना मिळणार संधी?

Maharashtra Politics: तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 05 डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेला होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी महायुती सरकारच्या काळात मंत्री असणाऱ्या अनेक नेत्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणाला मंत्रीपदाची संधी मिळू शकते.(संभाव्य मंत्री)भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस

Maharashtra Politics: ‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार, हसन मुश्रीफ, नितेश राणेंना मिळणार संधी? Read More »

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र इतर कोणत्याही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नसल्याने कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 20 मंत्री केले जातील, 13 मंत्री शिवसेनेच्या शिंदे गटातून आणि 10 मंत्री राष्ट्रवादीच्या कोट्यातून केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पदाची शपथ घेतल्यानंतर येथील राज्य सचिवालय ‘मंत्रालय’ येथे आपली नवीन अधिकृत जबाबदारी स्वीकारली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ आघाडीच्या तीन नेत्यांनी आझाद मैदानावर एका भव्य समारंभात शपथ घेतली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योगपती आणि चित्रपट कलाकार उपस्थित होते. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्याने फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते. ‘महायुती’चे घटक पक्ष – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून विधानसभेच्या 236 जागा आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर लगेचच ‘महायुती’च्या शिष्टमंडळाने बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक ‘मंत्रालय’ येथे पोहोचल्यावर तिन्ही नेत्यांचे कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यानंतर फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, बी.आर.आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ Read More »

Maharashtra Politics: मुख्यमंत्री कोण होणार? आज सस्पेन्स संपणार, उद्या शपथविधी

Maharashtra Politics: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेल्या मतभेदांमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र आज मुख्यमंत्रीसाठी सस्पेन्स संपू शकतो. आज भाजप मंडळाची बैठक होणार आहे. यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मुंबईत पोहोचले आहेत. या बैठकीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. तर दुसरीकडे माहितीनुसार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी झाले आहेत. अशा परिस्थितीत आता पुढील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात पक्ष नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकतो. तसे पाहता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास अंतिम आहे. मात्र, मंत्रिमंडळाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. केंद्रीय निरीक्षक विजय रुपानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल. फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेतलीमंगळवार 3 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सुरू असलेला गोंधळ जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. मात्र, सुरुवातीला ते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. महायुतीचे तीन नेते शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेऊ शकतात. हे भाजपचे संभाव्य मंत्री असू शकतातभाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अनेक लोक आहेत. त्यापैकी रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर यावेळी डॉ.विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, चंद्रकांत पाटील यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या जागी भाजप नवीन चेहऱ्यांना मंत्री म्हणून नियुक्त करू शकते.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री कोण होणार? आज सस्पेन्स संपणार, उद्या शपथविधी Read More »