DNA मराठी

BJP

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार अनुपस्थित; कारण काय?

Sunetra Pawar: खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या दिल्लीतील लग्नाच्या रिसेप्शनला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अनुपस्थित राहिल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमक्या का गैरहजर राहिल्या? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले होते. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहानंतर सोमवारी दिल्लीत रिसेप्शनचा भव्य कार्यक्रम पार पडला. हा सोहळा राजकीयदृष्ट्या विशेष चर्चेचा ठरला. देशातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पवार कुटुंबातीलही अनेक सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पार्थ आणि जय पवार उपस्थित, पण सुनेत्रा पवार गैरहजर रिसेप्शनमध्ये पार्थ पवार आणि जय पवार दोघेही उपस्थित होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अनुपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतले. सुनेत्रा पवार सोमवारी दिवसभर पुण्यात होत्या आणि त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत दाखल झाल्या. त्यामुळे त्या दिल्लीला का गेल्या नाहीत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागे कोणतेही राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. अनिल पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार यांचे काही कार्यक्रम आधीपासूनच निश्चित होते. त्यामुळे रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. अनिल पाटील यांनी विशेषतः सांगितले की, या अनुपस्थितीचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाला सुनेत्रा पवार पूर्णवेळ उपस्थित होत्या. कुटुंबातील इतर कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर रिसेप्शनलाही उपस्थित राहणे बंधनकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra Pawar: रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुनेत्रा पवार अनुपस्थित; कारण काय? Read More »

Manoj Jarange Patil Photo

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतच आंदोलन करण्याचा विचार यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजामध्ये पुन्हा मुंबईला जाण्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच समाजातील अनेकजण मुंबईतच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राबाहेरूनही आंदोलक येणार? जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राबाहेरील भागांतूनही मराठा समाजाचे लोक मुंबईकडे येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरत, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा तसेच गोव्याच्या समुद्रमार्गातूनही काही लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. नेमकी मागणी काय? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. विशेषतः मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, हा त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा राहिला आहे. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी अलीकडे सरकारला इशारा दिला आहे. कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुंबईकडे जाण्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : मराठा समाज पुन्हा मुंबईकडे ? मनोज जरांगेंचे मोठे वक्तव्य Read More »

price hike

Price Hike: बिस्किट, साबण, तेलापासून रोजच्या वापराच्या वस्तू महागणार? सप्टेंबर तिमाहीत पुन्हा दरवाढीची तयारी

Price Hike : महागाईचा दबाव सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. देशातील आघाडीच्या FMCG अर्थात Fast-Moving Consumer Goods कंपन्या सप्टेंबर तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. बिस्किट, चहा, साबण, तेल आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंवर याचा परिणाम होऊ शकतो. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, कच्च्या तेलाच्या दरातील अनिश्चितता आणि जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थिती यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे नफ्याचे मार्जिन टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या ग्राहकांवर वाढीव खर्चाचा काही भार टाकण्याच्या तयारीत आहेत. थेट दरवाढीऐवजी ‘Shrinkflation’चा पर्याय यावेळी FMCG कंपन्यांकडून केवळ थेट किंमतवाढ केली जाणार नाही. त्याऐवजी ‘Shrinkflation’ चा वापर वाढण्याची शक्यता आहे. Shrinkflation म्हणजे उत्पादनाची MRP किंवा विक्री किंमत जवळपास तशीच ठेवून पॅकेटमधील वस्तूचे प्रमाण कमी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनाचे पॅकेट पूर्वी ₹10 ला 100 ग्रॅम मिळत असेल आणि त्याच किमतीत पुढे 90 किंवा 95 ग्रॅम मिळू लागले, तर ग्राहकाला किंमत वाढल्याचे थेट जाणवत नाही मात्र प्रत्यक्षात प्रति ग्रॅम उत्पादनाची किंमत वाढलेली असते. महागाईच्या काळात ग्राहकांना अचानक मोठी किंमतवाढ जाणवू नये आणि कंपनीच्या वाढलेल्या खर्चाची भरपाईही व्हावी, यासाठी कंपन्या हा मार्ग स्वीकारतात. ब्रिटानियाकडून 1.5 ते 2 टक्क्यांचा अतिरिक्त भार बिस्किट आणि बेकरी उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी Britannia Industries कडून सप्टेंबर तिमाहीत आणखी 1.5 ते 2 टक्क्यांपर्यंत किंमतवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः ₹5 आणि ₹10 सारख्या छोट्या किमतीच्या बिस्किट पॅकवर थेट MRP वाढवण्याऐवजी त्यातील प्रमाण कमी करण्याचा पर्याय वापरला जाण्याची शक्यता आहे. कंपनीसमोर साखर आणि पाम ऑइलसारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीचे आव्हान आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या किंमतवाढीने कंपनीच्या वाढलेल्या खर्चाचा केवळ काही भाग भरून निघाला असून आणखी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे व्यवस्थापनाने संकेत दिले आहेत. गोदरेज कन्झ्युमरकडूनही दरवाढीचा विचार Godrej Consumer Products Ltd (GCPL) ने जून तिमाहीत सरासरी सुमारे 5 टक्के किंमतवाढ केली होती. आता सप्टेंबर तिमाहीत आणखी दरवाढ करायची की नाही, याचा कंपनीकडून विचार केला जात आहे. मात्र कंपनी सध्या कच्च्या तेलाच्या किमतींच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. GCPL च्या अनेक उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींचा संबंध क्रूड ऑइलशी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या दरांनुसार कंपनी पुढील निर्णय घेणार आहे. HUL च्या उत्पादनांवरही महागाईचा परिणाम Hindustan Unilever (HUL) देखील सप्टेंबर तिमाहीत विविध उत्पादनांच्या किमतींबाबत बदल करण्याची शक्यता आहे. एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत पुढील तिमाहीत महागाईचा दबाव 2 ते 5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची कंपनीला अपेक्षा आहे. त्यामुळे खर्च नियंत्रणासोबतच निवडक उत्पादनांवर टप्प्याटप्प्याने किंमतवाढ करण्याचे धोरण कंपनी स्वीकारू शकते. डाबरकडूनही किंमतवाढीचे संकेत Dabur India देखील कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे दबावात आहे. कंपनीने ग्राहकांवर महागाईचा काही भार टाकण्याचे संकेत दिले आहेत. डाबरच्या मते, सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत विक्रीच्या संख्येपेक्षा उत्पादनांच्या किमतीमुळे मिळणाऱ्या महसुलात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच कंपन्यांना पूर्वीइतकीच किंवा काही प्रमाणात कमी उत्पादने विकली गेली तरी वाढलेल्या किमतीमुळे महसूल वाढू शकतो. मात्र महागाई जास्त राहिल्यास ग्राहकांच्या खरेदीच्या प्रमाणावर दबाव येऊ शकतो. ग्राहकांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? FMCG उत्पादनांचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज होतो. त्यामुळे छोट्या प्रमाणातील किंमतवाढ किंवा पॅकेटमधील प्रमाण कपातही दीर्घकाळात घरगुती खर्च वाढवू शकते. याचा सर्वाधिक परिणाम वारंवार खरेदी होणाऱ्या वस्तूंवर होऊ शकतो. उदाहरणार्थ: बिस्किट आणि स्नॅक्सचहा व इतर खाद्यपदार्थसाबण आणि वैयक्तिक वापराची उत्पादनेघरगुती स्वच्छतेची उत्पादनेखाद्यतेलाशी संबंधित उत्पादनांचे दरलहान ₹5 आणि ₹10 पॅक. विशेषतः छोट्या पॅकच्या ग्राहकांना थेट किंमतवाढीऐवजी कमी प्रमाणाचा परिणाम जाणवू शकतो. कंपन्यांसाठीही मोठे आव्हान FMCG कंपन्यांसमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना मोठी किंमतवाढ दिल्यास विक्रीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे कंपन्या एकाच वेळी अनेक उपायांचा वापर करत आहेत—निवडक किंमतवाढ, पॅकेटचे प्रमाण कमी करणे, प्रीमियम उत्पादनांवर भर, खर्चात बचत आणि उत्पादनक्षमता वाढवणे. थेट मोठी किंमतवाढ करण्याऐवजी छोट्या प्रमाणात दर बदलणे किंवा पॅकचे वजन कमी करणे हा ग्राहकांच्या किंमत-संवेदनशीलतेचा विचार करून घेतलेला व्यावसायिक निर्णय आहे. ग्राहकांची मागणी मात्र अद्याप टिकून महागाईचा दबाव असूनही FMCG क्षेत्रासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे ग्राहकांची मागणी पूर्णपणे कोसळलेली नाही. शहरी तसेच ग्रामीण बाजारात मागणी तुलनेने मजबूत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. कमी किमतीच्या ₹5 आणि ₹10 पॅकची मागणीही वाढत असल्याचे उद्योगातील अहवालांमधून दिसते. यामुळे कंपन्यांना छोट्या पॅकच्या माध्यमातून ग्राहकांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करता येतो. पुढील काही महिने महत्त्वाचे कच्च्या मालाच्या किमती, क्रूड ऑइलचे दर, जागतिक राजकीय परिस्थिती आणि हवामानाशी संबंधित जोखीम यावर FMCG कंपन्यांचे पुढील निर्णय अवलंबून राहणार आहेत. जर कच्च्या मालाच्या किमतींचा दबाव कायम राहिला, तर सप्टेंबर तिमाहीत झालेली किंमतवाढ पुढील काळातही सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र खर्चाचा दबाव कमी झाला तर कंपन्या मोठ्या प्रमाणात दरवाढ टाळू शकतात. थोडक्यात काय? FMCG वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे; मात्र प्रत्येक उत्पादनावर थेट MRP वाढेलच असे नाही. काही उत्पादनांमध्ये पॅकेटचे प्रमाण कमी करून ग्राहकांवर अप्रत्यक्ष किंमतवाढीचा भार टाकला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी पुढील काळात केवळ पॅकेटवरील MRP पाहण्याऐवजी किंमत आणि वजन/प्रमाण यांची तुलना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Price Hike: बिस्किट, साबण, तेलापासून रोजच्या वापराच्या वस्तू महागणार? सप्टेंबर तिमाहीत पुन्हा दरवाढीची तयारी Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal : प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद? छगन भुजबळ म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांची भेट झाली असेल, ते आम्हालाही अधूनमधून भेटतात; मात्र त्यांची पक्षाच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुनील तटकरे यांनी पक्षाला कोणत्याही राजकीय सल्लागाराची गरज नसल्याचे मत व्यक्त केले असेल, तर ते त्यांचे मत असल्याचे भुजबळ म्हणाले. दरम्यान, उमेश पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून निर्माण झालेल्या चर्चेवरही भुजबळ यांनी भाष्य केले. अजित पवार यांच्यावर प्रेम होते म्हणूनच आपण शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत आलो, असे त्यांनी सांगितले. पक्षात मतभेद असू शकतात, मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. रुपाली ठोंबरे यांच्या सुनील तटकरे यांच्यावरील टीकेबाबतही भुजबळ यांनी सर्वांनी संयमाने भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सांभाळताना सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal : प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद? छगन भुजबळ म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्षांना निर्णयाचा अधिकार Read More »

dattatray bharne

Dattatray Bharne : दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

Dattatray Bharne : राज्य सरकारच्या वतीने पहिल्यांदा छोट्या आणि दुसऱ्यांदा साधारण १७ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे. कर्जमाफीसाठी केवायसी (KYC) चे काम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत 12 लाखांच्या आसपास काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांमध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळात माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार असून सरकार 40 हजार कोटींची मदत देणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणे ही सरकारची जबाबदारी होती. खचलेला शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार नाही, अशी काळजी घेतली आहे. बँकेला शासनाकडून रक्कम कमी आली तरी उरलेली रक्कम बँकांनी माफ करायची आहे, असा करार झाला आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्याला त्याच दिवशी ‘नील’चा दाखला मिळेल आणि दुसऱ्या दिवसापासून नवीन पीक कर्ज वाटप केले जाईल. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, अजून दोन-तीन याद्या लागायच्या बाकी आहेत. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की, आपण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. सोयाबीन बियाणे न उगवल्याबाबत तक्रारी आल्यावर संबंधित कंपन्यांवर थेट एफआयआर दाखल केले आहेत. अशा कंपन्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही आणि शेतकऱ्यांना दुबार बियाणे मिळण्यासाठी सहकार्य करू. कर्तव्यात कसूर करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यकांना निलंबित करण्यात आले आहे. खतांच्या लिंकिंग बाबत सरकारने जीआर काढला असून लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाही. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मी सहमत असून राज्य सरकार त्यांना निश्चित मदत करेल. राज्यात आतापर्यंत साधारणतः 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक विभागात सर्वाधिक 95 टक्के, तर ठाणे विभागात सर्वात कमी 66 टक्के पेरणी झाली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

Dattatray Bharne : दोन दिवसांत कर्जमाफीची रक्कम खात्यात; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ Read More »

amol khatal

Amol Khatal :  संगमनेर तालुक्यासाठी 357 मेट्रिक टनचा बफार स्टॉक खुला; आ. खताळ

Amol Khatal : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उर्वरित बफर स्टॉक खुला करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन करून सुमारे ३५७ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला केला असून, हा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. संगमनेर तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी एकूण ७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया तातडीने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून युरियाची वाढती मागणी होत असल्याने शिल्लक संरक्षित साठ्यातील युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार खताळ यांनी कृषी विभागाला केल्या. त्यानुसार उर्वरित सुमारे ३५७ मेट्रिक टन बफर स्टॉक खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार युरिया उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई कृषी विभागाच्या नियोजनामुळे तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण होणार नाही. शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच युरिया उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांकडून जादा दर आकारला जात असल्यास किंवा खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असे देखील आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Amol Khatal :  संगमनेर तालुक्यासाठी 357 मेट्रिक टनचा बफार स्टॉक खुला; आ. खताळ Read More »

manoj jarange on eknath shinde

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Manoj Jarange on Eknath Shinde : मराठवाड्यातील काही मराठा महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने त्यांना साथ दिली होती, परंतु आता समाजाचा विश्वासघात झाल्याची भावना आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केल्याचा आरोप केला. यावेळी जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदे तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदे साहेब, तुम्ही डबल गेम खेळत आहात का? एकीकडून ओबीसी सांभाळत आहात का? परळीच्या टोळीवाल्याच्या नादी लागून तुमच्या ऑफिसला कसे येतात? मराठ्यांचा विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येतात कसे? मराठ्यांचे काही समन्वयक तुम्ही माझ्या अंगावर घालत आहात. एकीकडे मी पण लागतो. तुमचाच एक नेता ज्याचे संभाजीनगरला कॉलेज आहे. तिथे माझ्या विरोधात बैठका होतात. मैत्री करावी तर ठासून करावी. तुमचा गद्दारीचा डाग पुसायला आम्ही मराठे आहोत. आमच्यावर उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. आम्ही तुमचे सीट पडणार असा इशारा मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

Manoj Jarange on Eknath Shinde : गद्दारीचा डाग पुसणार आम्ही, आता सीट पडणार; जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा Read More »

abhijit deepke photo

Abhijit Deepke : कोकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या घरासमोर गोंधळ; दोन तरुणांचे अन्न-पाणी त्याग आंदोलन

Abhijit Deepke : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर कोकरोच जनता पार्टीच्या पुढील वाटचालीबाबत सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आज नवा वाद निर्माण झाला. पक्षाच्या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही, असा आरोप करत गुजरातमधील अहमदाबाद येथील मनीषा ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांनी पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या घरासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, जंतर-मंतर आंदोलनादरम्यान त्यांनी पोलिसांचा मार सहन केला, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, मात्र बैठकीसाठी केवळ कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाच निमंत्रित करण्यात आले. आंदोलनात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनामुळे दिपके यांच्या घरासमोर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात पोलिसांचीही हालचाल वाढली. या प्रकरणावर अभिजीत दिपके किंवा कोकरोच जनता पार्टीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही बाजूंची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Abhijit Deepke : कोकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्या घरासमोर गोंधळ; दोन तरुणांचे अन्न-पाणी त्याग आंदोलन Read More »

abhijit deepke

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार

Abhijit Deepke : सीजेपी (CJP) च्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या सीजेपी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसून लोकांच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करणारा प्रभावी दबावगट म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले. देशातील युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या सत्तेची नव्हे, तर मजबूत लोकचळवळीची गरज असल्याचे दीपके यांनी नमूद केले. त्यामुळे संघटना आपले आंदोलन आणि जनजागृतीचे काम अधिक व्यापक करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर सविस्तर चर्चा झाली. विविध राज्यांतील कार्यकर्ते आणि समर्थकांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. सध्या राजकीय पक्ष स्थापन करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि सरकारला जबाबदार धरणे, यावरच संघटना लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यातील राजकीय पर्याय पूर्णपणे बंद नसल्याचे संकेत देत, योग्य वेळ आल्यास संघटना पुढील निर्णय घेईल, असेही दीपके यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या सीजेपीची प्राथमिकता ही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणे आणि जनआंदोलन अधिक मजबूत करणे हीच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Abhijit Deepke : CJP राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट म्हणून काम करणार Read More »

paneer

Tukaram Munde: राज्यात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई

Tukaram Munde : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने अॅनालॉग पनीरवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जारी केलेल्या आदेशानुसार ॲनालॉग पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि वापर यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग सेवा आणि इतर खाद्य व्यावसायिकांनाही ॲनालॉग पनीर वापरता येणार नाही. ॲनालॉग पनीर हे पारंपरिक दुधाच्या पनीरऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केले जाते. दिसायला ते पनीरसारखे असले तरी त्याची गुणवत्ता आणि पोषणमूल्ये वेगळी असतात. अनेक ठिकाणी ग्राहकांना याची स्पष्ट माहिती न देता ते पनीर म्हणून विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक थांबवणे आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, विक्रेते किंवा खाद्य व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, ग्राहकांनी पनीर खरेदी करताना उत्पादनावरील माहिती, लेबल आणि दर्जा तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Tukaram Munde: राज्यात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई Read More »