DNA मराठी

ahmednagar news

Screenshot 2024 06 25 09 19 24 84 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.  ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

IMG 20240623 WA0000

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती.  मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.  या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी   नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा Read More »

Crime

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यां‌द्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

IMG 20240613 WA0007

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.   शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »

IMG 20240613 WA0004

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंद नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा आहे आणि कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  पावसाळा सुरू झाला असून अहमदनगर शहरात मागच्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा आगमन झालं आहे.  कचरा गाडी बंद असल्याने परिसरातील बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ठेकेदार देखील लक्ष देत नाही आहे.  तर दुसरीकडे 17 जूनला बकरा ईद असल्याने महापालिका आणि ठेकेदारने लक्ष घालून परिसरात जमा झालेल्या कचऱ्याचे ढीग उचलावे अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे तसेच पुन्हा एकदा लवकरात लवकर परिसरात कचरा गाडी सुरू करावे असे देखील स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Ahmednagar News: मुकुंद नगरमध्ये कचरा गाडी बंद! जमा होत आहे कचऱ्याचे ढीग, पालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Ahmednagar Accident News

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते,  अमोल बबन डोंगरे,हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे.   सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू Read More »

IMG 20240608 WA0000

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar Police: अहमदनगर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते.  या आदेशावरून आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेला 05 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सर्जेपुरा भागात इंगळे आर्केडचे तळघरामध्ये कृष्णा अशोक इंगळे हा सार्वजनीकरित्या मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असा तंबाखुजन्य पदार्थ स्वत:कडे बाळगुन हुक्का पार्लर चालवित आहेत.  या माहितीवरून पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन छापा टाकुन हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणारे इसम 1) कृष्णा अशोक इंगळे (वय – 31 वर्षे), 2) प्रशांत गजानन सोनवणे (वय 34 वर्षे), 3) परेश सुर्यकांत डहाळे (वय 34)   यांना ताब्यात घेतले.  ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जामध्ये शासनाने बंदी घातलेले हुक्क्यासाठी आवश्यक तंबाखुजन्य पदार्थ, विविध कंपनीचे फ्लेवर व साधने असा 14,850 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.  आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखु जन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतीबंध आणि व्यापार वाणीज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिनियम) अधि.2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) /21 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagar Police: हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 14 हजारांचा मुद्देमाल जप्त Read More »

Vastu

Vastu Tips : सावधान! ‘या’ 5 गोष्टी कधीही शेअर करू नका, नाहीतर …

Vastu Tips :  आजच्या काळात शेअरिंग ही चांगली गोष्ट मानली जाते. पण  वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवायचा असेल तर अनेक गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणे तुमच्यासाठी कठीण ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या वास्तुशास्त्रानुसार शेअर करणे टाळावे. अन्यथा, त्याचा तुमच्या आनंदी जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. वास्तूनुसार या 5 गोष्टी कधीही शेअर करू नका शूज आणि चप्पल अनेकदा लोक मैत्रीदरम्यान एकमेकांचे शूज शेअर करतात किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांची देवाणघेवाणही करतात. पण वास्तूमध्ये ती वाटू नये असा उल्लेख आहे. शूज आणि चप्पल शेअर केल्याने जीवनात नकारात्मकता येते. अंगठी अंगठी न वाटण्याबाबतही वास्तुमध्ये सांगितले आहे. जर तुम्ही अंगठी शेअर करून ती घातली तर त्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शेअर करून अंगठी कधीही घालू नका. घड्याळ आणि ब्रेसलेट अनेक लोक शुभेच्छांसाठी हातात बांगड्या घालतात. तुम्ही ब्रेसलेट शेअर केल्यास, याचा अर्थ तुम्ही शुभेच्छा शेअर करत आहात. घड्याळे देखील अशा प्रकारे सामायिक करू नयेत. जर एखादी व्यक्ती वाईट काळातून जात असेल तर त्याचे घड्याळ घातल्याने तुमच्यासाठी देखील परिस्थिती खराब होऊ शकते. कपडे लोक सहसा मित्रांसह कपडे बदलतात आणि ते घालतात. मात्र, वास्तुनुसार असे करणे चुकीचे आहे. वेगवेगळे कपडे परिधान केल्याने, एका व्यक्तीचे दुर्दैव दुस-याकडे हस्तांतरित केले जाऊ शकते. म्हणून, हे न करणे चांगले आहे. परफ्यूम आणि पेन तुम्ही कोणाशीही परफ्यूम शेअर करणे टाळावे. याचा व्यक्तीच्या मूडवर चांगला परिणाम होतो. शेअर केल्याने नुकसान होऊ शकते. यासोबतच पेनही शेअर करू नयेत. पेन शेअर करणे म्हणजे तुम्ही तुमचे यश शेअर करत आहात.

Vastu Tips : सावधान! ‘या’ 5 गोष्टी कधीही शेअर करू नका, नाहीतर … Read More »

Uddhav Thackeray

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’

Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक 2024 चे निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यात देखील  भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर (एकनाथ शिंदे गट) अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. वायकर यांनी अत्यंत निकराच्या लढतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला आहे. निकराच्या लढतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी उद्धव गटाचे अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला, जो राज्यातील सर्वात कमी फरकाने विजयी झाला आहे. मात्र, या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी उद्धव गटाने चालवली आहे. बातम्यांनुसार, कीर्तिकर दुपारपर्यंत बहुतेक ईव्हीएम मतांच्या मोजणीत पुढे होते, दुपारी 4 वाजेपर्यंत ते 1700 मतांच्या फरकाने आघाडीवर होते. पण काही वेळाने टेबल उलटले. त्यांची आघाडी केवळ एका मताची झाली. यानंतर पोस्टल मतपत्रिका जोडण्यात आल्यावर वायकर विजयी होऊ लागले. यानंतर दोन्ही उमेदवारांनी रिटर्निंग ऑफिसरकडे फेरमतमोजणीसाठी अपील केले. त्यानंतर, नियमानुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी 111 अवैध किंवा नामंजूर पोस्टल मतपत्रिकांची पुनर्तपासणी केली.  पोस्टल मतपत्रिकेवर चुकीची खूण केली असेल किंवा फाटली असेल तर ती अवैध घोषित केली जाते. तथापि, अशा मतांची (अवैध मते) छाननी केली जाते जेव्हा ईव्हीएमद्वारे मिळालेल्या मतांमधील विजयाचे अंतर अवैध पोस्टल मतांच्या संख्येपेक्षा कमी असते. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी ती मते बेकायदेशीर मानली, परिणामी वायकर थोड्या फरकाने विजयी झाले. निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालानुसार शिवसेनेचे अमोल कीर्तिकर (उद्धव ठाकरे) यांना एकूण 4,52,596 मते मिळाली, तर शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना 4,52,644 मते मिळाली. कोण आहेत रवींद्र वायकर? कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जाणारे रवींद्र वायकर काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे कॅम्पमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे देखील शिंदे गटात आहेत आणि 2019 मध्ये मुंबई उत्तर-पश्चिममधून खासदार म्हणून निवडून आले होते. उद्धव यांचे विश्वासू मानले जाणारे वायकर सध्या मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) चे आमदार आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वायकरशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. वायकर हे बीएमसीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा नगरसेवक आणि जोगेश्वरीतून चार वेळा आमदार राहिले आहेत.

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’ Read More »

BJP

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

Exit Poll 2024 : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडले. यानंतर आता वेगवेगळ्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताना दिसत आहे.  या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टप फाईट असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. ही शक्यता आता एक्झिट पोलमध्ये देखील दिसत आहे.  ABP-CVoter ने जाहीर केलेल्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात महायुतीला 24 तर महाविकास आघाडीला 23 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.  4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या एक्झिट पोल नुसारच जर निकाल जाहीर झाला तर राज्यात भाजपला मोठा धक्का बसू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने 42 जागांवर विजय मिळवला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीला 23 ते 25 आणि महायुतीला 22 ते 26 मिळण्याचा अंदाज  आहे.  एक्झिट पोल नुसार  भाजपला 17 शिंदे गटाला 06 आणि अजित पवार गटाला 01 जागा मिळणार तर  ठाकरे गटाला 09 काँग्रेसला 08 आणि शरद पवार गटाला 06 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजपला धक्का! एक्झिट पोलनुसार मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »