DNA मराठी

ahmednagar news

Dhangar Reservation

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार

Ahmednagar News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण आरक्षण लागू व्हावे यासाठी आज  बुधवारपासून (दिनांक 18 सप्टेंबर) सात जण नेवासा फाटा येथे उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास हे सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा सकल धनगर जमातने दिला आहे.  दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत घेतलेली बैठक आम्हाला मान्य नाही व तिथे त्या बैठकीत सहभागी झालेल्या समाजाच्या शिष्टमंडळाला आमची मान्यता नाही, असे स्पष्टीकरणही सकल धनगर समाजाने दिले आहे.  धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा येथे संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केले जाणार आहे.  यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत. उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात शासनाने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही व प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी स्पष्ट केले.  या सात जणांपैकी राजू मामा तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (तालुका पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी तेरा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पन्नास दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग तागड यांनी व्यक्त केला.  दहा वर्षांपासून तेच ऐकतोय  या संदर्भात सोरमारे यांनी सांगितले की, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर वा राहुरी येथे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले व आताही आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील दहा वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय, अशी खंत व्यक्त करून सोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केले आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.  शिष्टमंडळच मान्य नाही  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई व अन्य उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होते. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही, असा दावाही सोरमारे यांनी केला.

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार Read More »

IMG 20240918 WA0001

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन

Ahmednagar News: जामखेड गेले १० दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्रीगणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. जामखेड शहरात मोठया मंडळाचे १४ व लहान मंडळाचे १० असे २४ तर एक गाव एक गणपती १० व ग्रामीण भागात एकुण ५५ मंडळाची म्हणजे एकुण ८९ मंडळांची श्री . ची . स्थापना करण्यात आली होती . सातव्या दिवसापासुन शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती . दहाव्या दिवशी शहरातील१४ व ग्रामीण भागातील १७ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले . प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.  मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण असून, ढोल-ताशा लेझीम फड ढोलीबाजा-बेन्जोबाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने शहर व परिसर दणाणून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने मास्थून निघाले. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते गणेशमूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी  जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत मेनरोड गजबजून गेला होता. हा सारा परिसरच जणू गणपतीमय होऊन गेला होता. भगव्या टोप्या, प‌ट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण  दिसत होते. दरवर्षी प्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्र मंडळाने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे ; प्रा . मधुकर राळेभात ; सभापती शरद कार्ले ; माजी सभापती डॉ .भगवान मुरूमकर व अमित चिंतामणी यांनी केला . तसेच   मोठ्या हौसेने या वर्षी आमदार रोहित पवार यांनी मेनरोड वर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळ यांचे सत्कार त्यांनी केले. गणरायाचे विसर्जन पाहण्या- साठी जामखेडकरांची मेनरोडवर गर्दीची लाट पसरलेली होती. मेनरोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीतून एक विलोभनीय चित्र पाहत होते.  दोन्ही आमदारांनकडून संघर्ष मित्र मंडळाचे कौतुक अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक घेतले आहेत. या वर्षी मंडळाची पहिल्या दिवशाची आरती आमदार राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली. शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्रमंडळाची मिरवणूक आकर्षक होती. गणपती विसर्जन मिरवणुक अगदी शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली . यावेळी दोन्ही ही आमदारांनी संघर्ष मित्र मंडळांचे कौतुक केले.  दोन्ही आमदार  थिरकले !  2024 च्या विनासभेत एकचं तरी विसर्जन होणार : जामखेडकर जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गाण्याच्या ताळावर  बेभानपणे थिरकले होते . विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागाताचे स्टेज स्वतंत्र होते . परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धाच दिसत होती . यावेळी ही जणू विधान सभेची विसर्जन मिरवणुक तर नाही ना ? 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचं तरी विसर्जन होणार असं जनतेतं चर्चेचा विषय चर्चीला जात होता . कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेन व उत्साहात पार पडला .

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन Read More »

OYO Room

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर…

OYO Room : आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे  आधार कार्ड आहे. आधार कार्ड हे ओळखपत्राप्रमाणे काम करते. बँक खाते उघडण्यापासून कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. कोणत्याही हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड मागितले जाते. तुम्हीही हॉटेल किंवा ओयोमध्ये जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फसवणुक होऊ शकते  आम्ही हॉटेल किंवा OYO बुक करतो. ज्यासाठी आम्हाला आधार कार्ड जमा करण्यास सांगितले जाते. जर तुम्ही हॉटेल किंवा ओयो रूम बुक करताना तुमचे आधार कार्ड जमा केले तर तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आधारचा दुरुपयोग कसा होतो ते जाणून घेऊया. वास्तविक, आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासह सर्व महत्त्वाची माहिती असते. अशा परिस्थितीत कोणीही तुमच्या आधार कार्डमधून डेटा चोरू शकतो आणि मोठी बँकिंग फसवणूक होऊ शकते. त्यामुळे हॉटेल किंवा ओयो रूम बुक करताना मास्क केलेले आधार कार्ड वापरावे. मास्क केलेल्या आधार कार्डमध्ये 12 अंकांऐवजी फक्त 4 अंक असतात. म्हणजे तुमच्या आधार क्रमांकाचे 8 अंक लपलेले आहेत. अशा स्थितीत तुमच्या आधार कार्डद्वारे फसवणूक शक्य होणार नाही. मास्क केलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइट http:uidai.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला My Aadhar Card चा पर्याय दिसेल. यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा टाका. यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. OTP एंटर करा आणि सबमिट करा. आता तुम्हाला आधार डाउनलोड पर्याय दिसेल. आता तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता.

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर… Read More »

UPI

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल

UPI Update:  जर तुम्ही देखील दररोज UPI च्या मदतीने आर्थिक व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. माहितीनुसार आता UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही नवीन मर्यादा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने लागू केली आहे. NPCI ने परिपत्रकात काय म्हटले? NPCI ने 24 ऑगस्ट 2024 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की UPI ही एक प्रमुख पेमेंट प्रणाली म्हणून ओळखली जाते आणि कर पेमेंटसाठी प्रति व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. प्रभावी तारीख आणि अनुपालन नवीन मर्यादा 16 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. NPCI ने बँका, पेमेंट सेवा प्रदाते आणि UPI ॲप्सना 15 सप्टेंबरपर्यंत नवीन मर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, हा नियम रुग्णालये, शिक्षण केंद्रे, IPO आणि RBI च्या किरकोळ थेट योजनांना देखील लागू होईल. व्यापारी पडताळणी हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांची पडताळणी आवश्यक असेल. कर भरणा आणि इतर व्यवहार सोपे आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. UPI पेमेंट पद्धत UPI, किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे भारतात विकसित केलेली डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. ही प्रणाली सोप्या, सुरक्षित आणि जलद पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम करते. UPI च्या माध्यमातून तुम्ही मोबाईल फोन वापरून विविध प्रकारचे व्यवहार करू शकता. UPI ची वैशिष्ट्ये एकाधिक बँक खाती एकाच UPI ॲपद्वारे तुम्ही वेगवेगळ्या बँक खाती लिंक करू शकता आणि एकाच प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकता. सिंगल क्लिक पेमेंट पेमेंट प्रक्रिया जलद आणि सोपी बनवून फक्त एका क्लिकवर UPI व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. 24×7 उपलब्धता UPI प्रणाली सर्व वेळ (24 तास, 7 दिवस) उपलब्ध असते, त्यामुळे तुम्ही कधीही व्यवहार करू शकता. सुरक्षा UPI व्यवहारांसाठी सुरक्षित पिन (UPI पिन) आवश्यक असतो, जो तुमच्या आर्थिक माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करतो. QR कोड QR कोड UPI पेमेंटसाठी वापरले जाऊ शकतात, ज्यामुळे पेमेंट प्रक्रिया आणखी सोपी होते. वैयक्तिक देयके आणि बिले UPI चा वापर व्यक्ती-टू-व्यक्ती व्यवहार, बिल भरणे, टॅक्सी भाडे, रेस्टॉरंट बिले, ऑनलाइन शॉपिंग आणि सरकारी सेवांसाठी पेमेंटसाठी केला जाऊ शकतो.

UPI Update: मोठी बातमी! UPI व्यवहार मर्यादा बदलणार, जाणून घ्या नवीन बदल Read More »

IMG 20240914 WA0004

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाची गाणी, टीजर, ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाला अनोखा मान मिळाला आहे. हा चित्रपट आता  सुप्रसिद्ध अशा पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर झळकत असून याची चर्चा चांगलीच रंगली आहे. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.  सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती,  कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक नवनव्या क्लृप्त्या लढवल्या जातात. त्यात आता पॅकेज्ड मिनरल  वॉटरच्या पॅकेजिंगवर झळकणं हा नवाच प्रकार आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असून तो मान “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाला मिळाला आहे आणि ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

Navra Maja Navsacha 2 : “नवरा माझा नवसाचा 2” झळकतोय पॅकेज्ड मिनरल वॉटरच्या बॉटलवर Read More »

Screenshot 2024 09 13 10 26 50 42 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Nanded News : दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना…

Nanded News: हदगाव तालुक्यातील डोंगरी आणि आदिवासीबहुल धन्याचीवाडी गावातील 65 वर्षीय किशन सयाजी खोकले हे पत्नीसोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगतात. दोन मुलं आहेत. मात्र मुलांकडून जगण्याचा कसलाच आधार नाही.  किशन खोकले हे 1976 मध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा साखर कारखान्यावर मजूरीला होते. त्यांचा उजवा हात मशीनमध्ये जाऊन अपघातामध्ये खांद्यापासून नाहीसा झाला. डाव्या हाताची तीन बोटे तुटल्याने त्यांचे जीवनच अर्थहीन झाले आहे. कारखान्याने त्यांना वॉचमन म्हणून कामावर ठेवले. तेही करता आले नसल्याने खोकलेंना एक हजार रुपये पेन्शन देत घरी पाठवले.  पूर्णतः अपंग आणि उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेल्या खोकलेंनी एक हजार रुपये पेन्शन आणि पत्नीच्या मजुरीतून जगण्याचा आधार बनवला. बैंक खात्यात पेन्शन जमा होत होते, परंतु आधारकार्डची सक्तीआली अन् पेन्शन मिळणे बंद झाले.  आधारकार्ड नसल्याने खोकलेचा जगण्याचा ‘आधार’च संपला. हे विशेष ! तामसा येथील आधार केंद्रावर आधारकार्ड निघत नसल्याचे स्पष्ट झाल्याने खोकले शासन दरबारी खेटे मारतात. तहसीलदार हदगाव व जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन आधारकार्ड काढून देण्याची भीक मागतात. परंतु त्यांच्या मदतीला आजपर्यंत कोणीही भीक घातली नाही.  दोन्ही हात निकामी झाल्याने कोणतेही काम करून पोट भरण्याचा मार्ग बंद झाला. शासनाच्या अनेक लाभाच्या योजना आहेत. मात्र त्या योजना अपंग खोकलेसाठी निरर्थक आहेत. त्यामुळे किशन खोकलेचे जीवन म्हणजे ‘आधार’ विना निराधार बनली आहे.  निराधार योजनेसाठी अर्ज केला तर आधारकार्ड मागतात. ‘आधारकार्डा शिवाय शासनाच्या लाभाच्या योजना घेता येत नसल्याने जीवन जगणे असहा झाल्याचे किशन खोकले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Nanded News : दिव्यांग खोकले यांना आधार कार्ड नसल्याने जगण्याचा आधार मिळेना… Read More »

IMG 20240913 WA0000

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत !

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन नसलं तरी तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून चर्चेत असणारा अभिनेता आहे. आता पुन्हा एकदा नव्याने तो  चर्चेत आला आहे ते म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “विस्फोट” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने.  रितेश देशमुख, फरदीन खान, सीमा बिस्वास ह्या बहुचर्चित नावांच्या यादीत आपल्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्याचं ही नाव आता कौतुकाने आणि बरोबरीने घेतलं जातंय. मराठी प्रेक्षकांना याचा नक्कीच अभिमान आहे ही कौतुकाची बाब आहे.दिग्दर्शक कुकी गुलाटी ह्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने ह्या चित्रपटात केलेल्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.  मुळात आपल्या कामाच्या निवडी बाबत काटेकोर असल्यामुळे नचिकेत कायमच अत्यंत महत्त्वाच्या आणि आशयघन चित्रपट आणि नाटकांचा भाग असतो.  “तू” “रामप्रहर” “सिंधू सुधाकर रम आणि इतर” अश्या प्रायोगिक नाटकांच्या सोबत “दिल दोस्ती दुनियादारी” “पिंजरा” “लक्ष्मणरेषा” ह्या सारख्या मालिकांच्या आणि “अस्तू” “मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर” इत्यादी कलात्मक चित्रपटांच्या बरोबरीनेच मुख्य प्रवाहातील “फोर्स 2” “रॉकी हँडसम” “दगडी चाळ – 2” अश्या अनेक दर्जेदार कलाकृींमध्ये त्यानी ह्या पूर्वी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  आता पुन्हा एकदा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. नचिकेत भविष्यात अनेक उत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत ! Read More »

Gas

Maharashtra Gas Leak: मोठी बातमी! अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती

Maharashtra Gas Leak: अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यात गॅसची गळती होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. गॅस गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  गॅस गळतीमुळे लोकांना डोळ्यात जळजळ आणि घसादुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांनी गुदमरल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान, अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. अंबरनाथ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री उशिरा त्यांना गॅस गळतीची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. गॅस गळतीमुळे रस्त्यावर अंधार असून लोक नाक-तोंड झाकून बाहेर पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. B. केबिन रोड हा धुरासारखा झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनवणे यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. गॅस गळतीनंतर लोकांनी डोळ्यांना जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या. माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ते म्हणाले, आता कंपनीतील गळती कमी झाली आहे. गॅस गळतीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आहे.

Maharashtra Gas Leak: मोठी बातमी! अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यातून गॅस गळती Read More »

Israel Strikes

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू

Israel Strikes : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झालाय. यातच आता पुन्हा एकदा इस्लायने गाझापट्टीवर मोठा हल्ला केला आहे.   माहितीनुसार इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली.  मंगळवारी इस्रायलने पॅलेस्टाईनच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी या भागातील हमास कमांड सेंटरला टार्गेट केले आहे. गाझामधील खान युनिस शहरातील अल-मवासी भागात इस्रायली लष्कराने हा हल्ला केला. हा असा भाग आहे की इस्त्रायली सैन्याने युद्ध सुरू झाल्यावर सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते. हजारो पॅलेस्टिनींनी येथे आश्रय घेतला आहे. स्थानिक आणि डॉक्टरांनी सांगितले की, खान युनिस जवळील अल-मवासी येथील तंबूच्या छावणीला चार क्षेपणास्त्रांनी मारले. हा छावणी विस्थापित पॅलेस्टिनींनी भरलेला आहे. गाझा सिव्हिल इमर्जन्सी सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, 20 तंबूंना आग लागली. इस्रायली क्षेपणास्त्रांनी 30 फूट खोल खड्डे तयार केले आहेत. 60 जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. 40900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे खान युनिसमधील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासने इस्रायलचे आरोप फेटाळले आहेत. हे खोटे असल्याचे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.   7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर मोठा हल्ला केला. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले आणि 250 लोकांना ओलिस बनवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 40,900 हून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.

Israel Strikes : मोठी बातमी! इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, 40 लोकांचा मृत्यू Read More »

IMG 20240909 WA0001

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा

Ahmednagar Crime : 14 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र त्यांच्या मृत्यु संशयास्पद झाला असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत होता.   सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा मित्र प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होता.   या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हेशाखा, युनिट क. 2 कडिल पोहवा/मनोहर शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने  आरोपी प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले.  आरोपीची वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस केली असता आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याची कबुली दिली.  मयत अभिजीत सांबरे हा आरोपीचा मित्र होता. त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता.  27 जुन 2023 रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री 9.00 वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली. त्यातुन मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला.  मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता.  या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा Read More »