DNA मराठी

ताज्या बातम्या

dharmendra passed away

Dharmendra Passed Away : धर्मेंद्रच्या आयुष्यातील असं प्रेम जे कधीही पूर्ण झाले नाही

Dharmendra Passed Away :  बॉलीवूडचा “ही मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब असल्याने सुरुवातीला त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होता. धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी अनेक सुपरहिट चित्रपट आणि त्यांच्या आयुष्यातील असंख्य स्टोरी पाठीमागे सोडून गेले. अशीच एक स्टोरी म्हणजे मीना कुमारीशी असलेल्या त्यांच्या नात्याची. ही स्टोरी अन्नू कपूर यांनी त्यांच्या लोकप्रिय रेडिओ शो “सुहाना सफर” मध्ये सांगितली होती. ही स्टोरी धर्मेंद्र यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आहे. मीना त्यावेळी चित्रपट उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होती. कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक मीना कुमारी यांच्यासोबत काम करण्यास तयार होते मात्र धर्मेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये काम करावे अशी मीना कुमारची इच्छा होती. दोघांनी 1964 ते 1968 दरम्यान अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यात “मैं भी लडकी हूं,” “काजल,” “फूल और पत्थर,” आणि इतर चित्रपटांचा समावेश होता. अफेअरची सर्वत्र चर्चा या काळात मीना कुमारी धर्मेंद्र यांच्याशी जवळीक वाढली. त्यांच्या जवळीकतेची सर्वत्र चर्चा झाली. दिल्लीतील एका कार्यक्रमातही तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मीना कुमारी यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारले. मात्र त्यानंतर “फूल और पत्थर” या चित्रपटामुळे धर्मेंद्र स्टार झाले. त्यानंतर मीना कुमारींपासून त्यांचे अंतर वाढत गेले. अखेर त्यांचे नाते तुटले. धर्मेंद्र मीनाच्या घरी गेले नाहीत तेव्हा त्यांचे मन दुखावले. काही काळानंतर मीना कुमारी आणि धर्मेंद्र पुन्हा एकमेकांना भेटले. प्रसंगी के. आसिफ यांनी आयोजित केलेल्या पार्टीचा होता. मीना कुमारी थोडी आधी आली होती. काही वेळाने धर्मेंद्र आले. त्यांनी मीना कुमारीला पाहिले. मीनालाही त्यांनी पाहिले. पण, ते दोघेही पाहत राहिले. त्यांनी थोडा वेळ शोध घेतला, नंतर धर्मेंद्र निघून गेले. यामुळे मीना दु:खी झाली. तिने तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसू नयेत म्हणून खूप प्रयत्न केले. तथापि, ती अपयशी ठरली आणि पार्टी सोडून गेली.

Dharmendra Passed Away : धर्मेंद्रच्या आयुष्यातील असं प्रेम जे कधीही पूर्ण झाले नाही Read More »

asia cup rising stars

Asia Cup Rising Stars: मोहसिन नक्वी दिली पाकिस्तानला आशिया कपची ट्रॉफी; BCCI काय निर्णय घेणार

Asia Cup Rising Stars : भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप स्पर्धा जिंकली होती मात्र त्यानंतर पुन्हा ट्रॉफीवरून भारत आणि मोहसिन नक्वी यांच्यात वाद झाल्याने भारताला आतापर्यंत आशिया कप 2025 ची ट्रॉफी मिळालेली नाही. तर दुसरीकडे मोहसिन नक्वीने आशिया कप रायझिंग स्टार्सची ट्रॉफी पाकिस्तानला दिली आहे. रविवारी, 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान अ संघाने बांगलादेशला हरवून आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकून इतिहास रचला. आता पाकिस्तानने सर्वाधिक विजयांचा विक्रम केला आहे. दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये त्यांनी बांगलादेश अ संघाला सुपर ओव्हरमध्ये हरवले. इरफान खान नियाझीच्या संघाने शेवटच्या क्षणी आपला संयम राखला आणि अकबर अलीच्या बांगलादेश संघाला स्पर्धेत पहिले विजेतेपद जिंकण्यापासून रोखले. तर दुसरीकडे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी आशिया कप रायझिंग स्टार्सच्या अंतिम सामन्यात संपूर्ण संध्याकाळी विशेष उपस्थिती होती. पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर, मोहसीन नक्वी कर्णधार इरफान खानला ट्रॉफी सादर करण्यासाठी मैदानावर आले. त्याच्या आगमनाने दुबईत 2025 च्या आशिया कप फायनलच्या वादग्रस्त समाप्तीच्या आठवणी परत आणल्या. भारत अजूनही ट्रॉफीच्या प्रतीक्षेत भारताने पाकिस्तानला हरवून 2025 चा आशिया कप जिंकला आहे. मात्र त्यावेळी भारतविरोधी वक्तव्ये करणाऱ्या मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नकार दिला. सूर्याला दुसऱ्या एसीसी अधिकाऱ्याकडून ट्रॉफी घ्यायची होती. नक्वीने स्वतः ट्रॉफी सादर करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर, दोन्ही संघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी अनेक बैठका झाल्या, परंतु भारताला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. सामन्याची स्थिती पाकिस्तानच्या डावात अनेक चढ-उतार आले. यासिर खान आणि मोहम्मद फैक यांना सुरुवातीच्या धक्क्यांचा सामना करावा लागल्यानंतर माज सदाकत (18 चेंडूत 23) आणि अराफत मिन्हास (23 चेंडूत 25) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर साद मसूदने सामन्यातील सर्वोत्तम खेळी खेळली, त्याने 26 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा करत पाकिस्तानला 125 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. बांगलादेशकडून रिपन मोंडलने तीन आणि रकीबुल हसनने दोन बळी घेतले. सुपर ओव्हरमध्ये ऐतिहासिक विजय बांगलादेश अ संघाने हबीबुर रहमान सोहनच्या 17 चेंडूत 26 धावांसह चांगली सुरुवात केली, परंतु सुफियान मुकीमने 11 धावांत 3 आणि अराफत मिन्हासच्या दोन बळींमुळे संघ अडचणीत आला आणि 7 बाद 53 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये, रकीबुल हसन (24), सकलेन (16) आणि मोंडल (11) यांच्या शानदार कामगिरीमुळे बांगलादेशने सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश अ संघ 4 चेंडूत 6 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरादाखल, पाकिस्तान अ संघाने 4 चेंडूत 7 धावा करत ऐतिहासिक विजय नोंदवला.

Asia Cup Rising Stars: मोहसिन नक्वी दिली पाकिस्तानला आशिया कपची ट्रॉफी; BCCI काय निर्णय घेणार Read More »

img 20251122 wa0004

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल…

Pune News : स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये प्रामाणिक पणाची सुद्धा कमी नाही. कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या तत्त्वांवर आयुष्य जगणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अशीच एक प्रामाणिकपणाची आणि पैशांचा लोभ नसणाऱ्या पुण्यातील कचरावेचक मंजू माने यांची कथेची पुण्यात जोरदार चर्चा आहे. सदाशिव पेठेत कचरा वेचत रोजची कष्टाची लढाई लढणाऱ्या अंजू माने यांचा प्रामाणिकपणा पाहून संपूर्ण परिसर थक्क झाला आहे. 20 नोव्हेंबरची सकाळ… साधारण सात वाजता अंजूताई नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा गोळा करत होत्या. त्याचवेळी रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली. ‘कशाची तरी औषधांची पिशवी असेल’ असा साधा अंदाज करून त्यांनी ती बॅग उचलून फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली. पण नंतर जे दिसलं ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकावी! बॅगेत औषधांसोबत तब्बल दहा लाख रुपये होते. त्या क्षणी पैशाचा लोभ न होता, ‘ही कोणाच्या तरी आयुष्यभराची कमाई असेल’ एवढाच विचार अंजूताईंच्या मनात आला. वीस वर्षांपासून या भागात कष्टाने काम करत असल्यामुळे त्यांना इथलं प्रत्येक घर ओळखीचं. त्यांनी लगेचच लोकांना विचारपूस सुरू केली. तेवढ्यात एक नागरिक अतिशय अस्वस्थ होऊन काहीतरी शोधताना दिसला. अंजूताईंनी त्याला बसवून आधी पाणी दिलं, शांत केलं… आणि त्यांची बॅग हरवली आहे का ते विचारलं. तोंडातून शब्दच फुटेना! खात्री पटल्यावर अंजूताईंनी ती बॅग त्याच्याकडे परत दिली पैशाचा एक नोटही कमी न करता. या प्रामाणिकपणामुळे त्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं आणि आसपासच्या नागरिकांच्या मनात अंजूताईंबद्दल प्रचंड आदर. लोकांनी स्वखुशीने साडी, थोडी रोख आणि भरभरून कौतुक देत त्यांचा सत्कार केला. अंजू माने यांची ही कृती म्हणजे खरा मानवीपणा कसा असतो याचं जिवंत उदाहरण. कष्टाची कामं करत असली तरी मन मात्र सोन्यासारखं हीच पुण्याची खरी शान. लाखो रुपयांची हाव मनात न ठेवता पैशांची बॅग परत करणाऱ्या अंजुमाने यांनी खरे लखमोलाची माणसं कशी असतात याच दर्शन घडवलं….

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल… Read More »

pankaj ashiya

Pankaj Ashiya : घरवापरगुती गॅसचा व्यावसायिक रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Pankaj Ashiya : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले , घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित एलपीजीचा हॉटेल, ढाबे यांसारख्या व्यावसायिक ठिकाणी अवैध वापर होत असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे आणि शासनाच्या निधीचे मोठे नुकसानही होते आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर तात्काळ ठोस कारवाई करण्यात यावी. अवैध रिफिलिंग आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करून तिचे परवाने रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. घरगुती गॅसच्या अवैध व्यापारात सहभागी किंवा गैरव्यवहार करणाऱ्या गॅस एजन्सींना देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र तातडीने रद्द करावे. तसेच पेट्रोलियम अधिनियमांतर्गत एजन्सीची साठवणूक आणि विक्रीची परवानगीही तत्काळ रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन काट्यावर तपासून घ्यावे तसेच लिकेज डिटेक्टरद्वारे गॅस गळतीची खात्री करून घ्यावी. अवैध रिफिलिंगमुळे गॅस गळतीची आणि मोठ्या अपघातांची शक्यता असते. त्यामुळे आपले गॅस सिलेंडर इतरांना देऊ नयेत आणि घरगुती सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी अजिबात वापरू नयेत. घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास ती संबंधित कंपनीच्या सेल्स अधिकारी किंवा नोडल अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

Pankaj Ashiya : घरवापरगुती गॅसचा व्यावसायिक रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश Read More »

sunny deol upcoming project

Sunny Deol Upcoming Project : 28 वर्षांनंतर एकत्र दिसणार सनी देओल आणि अक्षय खन्ना, ‘या’ प्रोजेक्टसाठी चर्चा

Sunny Deol Upcoming Project : बॉलिवूड स्टार सनी देओल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आपल्या आगामी चित्रपटांमुळे तो यंदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दलच्या अपडेट्स एकामागून एक येत आहेत, ज्यामुळे त्याचे चाहते चित्रपटांसाठी उत्सुक आहेत. तर आता सनी देओलचे नाव एका ओटीटी थ्रिलरशी जोडले जात आहे. असे वृत्त आहे की सनी देओल आणि अक्षय खन्ना हे 28 वर्षांनी पुन्हा एकत्र येत आहेत, एका चित्रपटात नाही तर एका हाय-ऑक्टेन ओटीटी थ्रिलरमध्ये. सनी आणि अक्षय खन्ना पुन्हा एकत्र काम करणार अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आहे, एका चित्रपटामुळे नाही तर एका ओटीटी प्रोजेक्टमुळे. सनी देओल त्याच्या आगामी ओटीटी थ्रिलरसह धमाल करणार आहे. फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, या वेब सिरीजमध्ये सनी देओल बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्नासोबत दिसणार आहे. या प्रोजेक्टच्या शूटिंगची तयारी मुंबईत सुरू झाली आहे. या मालिकेत अक्षय खन्ना आणि सनी देओलसोबत अभिनेत्री संजीदा शेख देखील दिसणार आहे. हा प्रोजेक्ट सिद्धार्थ पी. मल्होत्रा ​​दिग्दर्शित करत आहेत. तर दुसरीकडे सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्यातील या ओटीटी प्रोजेक्टबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी प्रसिद्ध झालेली नाही. निर्माते त्याची घोषणा कधी करतात हे पाहणे बाकी आहे. सनी देओल या चित्रपटांमध्ये दिसणार अभिनेता सनी देओल या ओटीटी प्रोजेक्टव्यतिरिक्त इतर चित्रपटांद्वारे मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. सनी देओलच्या आगामी चित्रपटांमध्ये बॉर्डर 2, लाहोर 1947 आणि रामायण यासारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, अक्षय खन्ना त्याच्या आगामी चित्रपट ‘धुरंधर’ द्वारे खळबळ उडवण्यास सज्ज आहे. अभिनेता रणवीर सिंग देखील अक्षय खन्नासोबत एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Sunny Deol Upcoming Project : 28 वर्षांनंतर एकत्र दिसणार सनी देओल आणि अक्षय खन्ना, ‘या’ प्रोजेक्टसाठी चर्चा Read More »

anagar nagar panchayat

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले

Anagar Nagar Panchayat : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी अनगर नगरपंचायत आता बिनविरोध झाली आहे. मात्र राजकारण काही थांबताना दिसत नाही. अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही अशी टीका उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांनी केली आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जल्लोष साजरा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिला होता मात्र त्यानंतर जाहीर माफी देखील मागितली होती. तर आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक उमेश पाटील यांनी बाळराजे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवारांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही, सार्वजनिक जीवनात निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं त्यामुळे निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर आता अशा पोकळ चॅलेंज करू नका. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली म्हणून बाळराजे पाटील नाचतोय मात्र ही नगरपंचायत कोणी दिली..? त्यावेळेस अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करा, अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी अजित पवारांकडे बाळराजे गेला होता. ज्या वेळेला यांच्या बँकेकडे पैसे नव्हते, त्यावेळेला अजित पवार यांच्याकडे राजन पाटील आणि बाळराजे पाटील हे भीक मागत गेले होते अशी टीका उमेश पाटील यांनी केली. तर दुसरीकडे आज अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे अर्ज माघार घेणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे होत्या. मात्र त्यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती त्यामुळे मी आक्षेप घेतला त्याचबरोबर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरला असला, तरी मी निवडणुकीतून माघार घेणार आहे आम्ही राजन पाटलांचीच माणसं आहोत, त्यांच्या विचारानेच काम करतो. अर्ज माघारी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Anagar Nagar Panchayat : अजित पवारांना चॅलेंज करावं, एवढी बाळराजेची लायकी नाही; उमेश पाटील भडकले Read More »

girish mahajan

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी चक्र फिरवली पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध

Girish Mahajan : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच भाजपाचे सहा नगरसेवकदेखील बिनविरोध निवडून आले आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले तीनही अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून साधना महाजन यांनी, तर महाविकास आघाडीकडून रूपाली ललवाणी, प्रतिभा झाल्टे आणि सरिता बोरसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत राज्यातील एकूण तीन नगरपालिकांमध्ये भाजपचे तीन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडणून आले आहे.

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी चक्र फिरवली पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध Read More »

winter

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान

​Ahilyanagar Winter Alert: राज्यातील अनेक भागात आता थंडीची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी तापमान अचानक घसरल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिह्यात सध्या 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान नोंदवले जात असून येणाऱ्या काळात तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ​या गोष्टी लक्षात ठेवा: ​पुरेसे उबदार कपडे वापरा (मफलर, कानटोपी, मोजे). ​ थंडीत शक्यतो घरातच थांबा आणि प्रवास टाळा. ​शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम पेये आणि व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्या. वृद्ध, लहान मुले आणि पाळीव प्राणी यांची विशेष काळजी घ्या. त्वचेचा रंग बदलणे, बधीर होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. ​आपत्कालीन परिस्थितीत: नजिकचे आरोग्यकेंद्र किंवा 108 या क्रमांकावर संपर्क करावा.

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान Read More »

img 20251120 wa0007

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी

Vikhe Patil – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची वाटचाल सांगताना काही नावे अनिवार्यपणे उच्चारावी लागतात. त्यांमध्ये सर्वात प्रखर ठसा उमटवलेले नाव म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. सहकार म्हणजे केवळ आर्थिक संघटना नव्हे, तो ग्रामीण समाजाचा विकासमार्ग आहे, ही भूमिका ज्या व्यक्तींनी आपल्या कामाने सिद्ध केली त्यापैकी अग्रगण्य व्यक्तिमत्त्व हेच. आज, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव मिळाला आहे, तेव्हा हा प्रवास केवळ एका घराण्याचा नाही. तर महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व, सहकार आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या सातत्याचा दस्तऐवज ठरतो. पहिली पायाभरणी- विठ्ठलराव विखे पाटील यांचे राष्ट्रपतींकडून झालेले पहिले गौरव 1950 च्या दशकात भारत स्वराज्याच्या पहिल्या श्वासांसोबत पुढे जात असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अस्थिर होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मध्यस्थांची पकड होती, कर्जपुरवठ्याची व्यवस्था बळकट नव्हती. त्याच काळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपच बदलले. हे केवळ एका उद्योगाची कथा नव्हती ही होती शेतकऱ्याला उद्योगाचा ‘हिस्सेदार’ बनवण्याची नवचेतना. त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पद्मश्री देऊन गौरवताना सहकार चळवळीच्या मूलभूत मूल्यांना मान्यता दिली. आजही हा पुरस्कार केवळ सन्मान नसून भारतीय सहकाराच्या क्रांतिकारी युगाची सुरुवात मानला जातो. नवी वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रीय योगदान सहकाराच्या घराण्यात जन्मलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारण, शिक्षण आणि सहकार या त्रिसूत्रीला वेगळा आयाम दिला. सहकार क्षेत्राचा विस्तार, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांची प्रमुख कामगिरी. 2010 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दिलेला पद्मभूषण हा पुरस्कार राज्य आणि केंद्राच्या धोरणनिर्मितीत त्यांच्या प्रभावी योगदानाची दखल होता. हेही लक्षात घ्यावे लागेल की बाळासाहेब विखे यांचे कार्य केवळ सहकारपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रामीण समाजातील सामाजिक भान आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा एक नमुना म्हणून ते राष्ट्रीय नेतृत्वात स्वीकारले गेले. समकालीन परंपरा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलव्यवस्थापन आजच्या महाराष्ट्रात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. हवामानबदल, वाढती मागणी, सिंचनातील असमानता आणि जलसंपत्तीचे अव्यवस्थापन यांमधून मार्ग शोधताना परिणामकारक प्रशासन, वैज्ञानिक धोरणे आणि जलसाक्षरता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. 2024 मध्ये केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेला “बेस्ट स्टेट कॅटेगरी” राष्ट्रीय पुरस्कार हा या व्यापक बदलांचा सरकारी शिक्का आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा पुरस्कार व्यक्तीगत कामगिरीचा नसून संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरावा आहे, आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वातील धोरणात्मक स्थिरतेचे प्रतीकही. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या — महाराष्ट्राची सहकार परंपरा जगाच्या नकाशावर एका घराण्याच्या तीन पिढ्यांना राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणे, हे अपवादात्मक आहे. पण या सन्मानांमागे घराणेशाही नसून सातत्यपूर्ण समाजकार्य, सहकार विचारांची परंपरा आणि ग्रामीण विकासाचे अधिष्ठान आहे. डॉ. विठ्ठलराव – सहकाराची क्रांती बाळासाहेब – सहकार + शिक्षण + राजकीय नेतृत्व राधाकृष्ण – आधुनिक प्रशासन, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित धोरण ही परंपरा एका घराण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजशास्त्राचा आराखडा ठरते. विखे पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या हे सिद्ध करतात की विकास हा योगायोग नसतो तो दृष्टिकोन, कष्ट आणि मूल्ये यांची सलग परंपरा असते. आज जेव्हा महाराष्ट्र जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान मिळवतो, तेव्हा या परंपरेची बाजू अजूनही मजबूत असल्याचे दिसते. राजकीय मतभेद असोत वा सहकारातील नवनवे आव्हान महाराष्ट्राची ग्रामीण परिवर्तनाची गाथा लिहिताना विखे पाटील कुटुंबाचा उल्लेख अपरिहार्य राहणार आहे. सन्मान ही केवळ मानाची पाऊलवाट नाही तर ग्रामीण भागाचा आत्मविश्वास वाढवणारी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी, हीच आजच्या संपादकीयाची मुळ भूमिका.

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी Read More »

oplus 16908288

Maharashtra Government : मोठी बातमी! राज्यात आयएएस बदल्यांची फेरबदल; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

Maharashtra Government: राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आयएएस अधिकाऱ्यांचा फेरबदल जाहीर केला आहे. प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी तसेच महत्त्वाच्या विभागांना नवे नेतृत्व देण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध वजनदार पदांवर बदली करण्यात आली आहे. शासनाने जारी केलेले आदेश तत्काळ लागू झाले असून, आगामी काळात अनेक धोरणात्मक निर्णयांवर या फेरबदलाचा परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या अधिकाऱ्यास कोणती नवी जबाबदारी? राहुल रंजन माहीवाल यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे येथे नियुक्ती झाली आहे. प्रकाश खापले, जे आयुक्त – मृदा व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते, त्यांची बदली करून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबई येथे नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. मंजिरी मनोळकर , ज्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे या पदावर होत्या, त्यांची बदली करून त्यांना आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे या महत्त्वाच्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्रिगुण कुलकर्णी , उपमहानिदेशक – यशदा, पुणे, यांना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंजली रमेश , मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद, हिंगोली, यांची बदली करत त्यांना आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे नेमण्यात आले आहे. या फेरबदलामुळे प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आपल्या नवीन पदांची सूत्रे स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maharashtra Government : मोठी बातमी! राज्यात आयएएस बदल्यांची फेरबदल; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या Read More »