DNA मराठी

ताज्या बातम्या

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा

Health Tips : टायफाइडमध्ये लोकांना तापाबरोबरच डोकं दुखी, छातीत जळजळ सारख्या समस्यांना सामोरी जावं लागतं. यामुळे या लेखात जाणून घ्या कश्या प्रकारे सुटका मिळवता येईल. टायफाइडच्या तापाला मियादी ताप म्हणजे अधून -मधून येणारा ताप देखील म्हणतात. टायफाइडचा ताप पचन तंत्राच्या आणि रक्तप्रवाहातील असलेल्या साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरिया मुळे होतो हा घाणपाणी आणि संक्रमित खाण्यामुळे आपल्या शरीरात शिरकाव करतो.  या आजारात संक्रमित झालेल्या माणसाचं शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहोचतो. टायफाइड पासून मुक्त होण्याचे काही घरघुती उपचार. टायफाइडची लक्षणे  ताप येतो भूक लागत नाही डोकं दुखणं थंडी जाणवते जास्त अशक्तपणा जाणवणं अतिसाराची समस्यां छातीत जळजळ होणं बद्धकोष्ठता होणं टायफाइड पासून मुक्त होण्यासाठी काही घरघुती उपचार  तुळस  तुळस आणि सूर्यमुखीच्या रसला काढून प्यायलानं आपणास फायदा होणार. या व्यतिरिक्त एका भांड्यात पाणी आणि थोडी तुळशीचे पान टाकून उकळवून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा असेच पिऊन घ्या. सफरचंदाचा रस सफरचंदाचा रस टायफाइडच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. या साठी आपण सफरचंदाच्या रसात आल्याचं रस मिसळून प्या. असे केल्यानं आपल्याला टायफाइडच्या तापापासून आराम मिळेल. लसूण लसूण अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट असण्यासह उष्ण प्रकृतीचा आहे. यासाठी साजूक तुपात 6 -7 पाकळ्या लसणाच्या तळून घ्या. यामध्ये सेंधव मीठ घालून खावं. लवंग लवंग देखील या आजारापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहे. या साठी आठ कप पाण्यात 6 ते 7 लवंगा टाकून उकळवून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर याचे सेवन दिवसभर करावं. असे केल्यानं टायफाइड मुळे आलेला अशक्तपणा देखील कमी होणार. मध मधात अँटिव्हायरल, अँटीबॅक्टीया, अँटीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावं. या मुळे आपणास आराम मिळेल.

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा Read More »

DNA Marathi News :  जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील

DNA Marathi News : महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व कर्ज वाटप सुरू आहे. पाथर्डी शहर येथे हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे व अभय काका आव्हाड यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अजय रक्ताटे, सुभाष बेर्डे, काशिनाथ लवांडे, विष्णुपंत अकोलकर, अंकुश चितळे,  प्रतिक खेडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, अधिकारी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद व महाविंग यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटांना आर्थिक व सक्षमीकरण केले जात आहे. मागील सरकारच्या काळात अशा पद्धतीचा उपक्रम का नाही घेता आला? यामध्ये टक्केवारी भेटणार नाही या आशेने विरोधक अशा पद्धतीचे उपक्रम राबवत नसतील.  याउलट फूड प्रोसेसिंग युनिटसाठी दहा टक्के रक्कम ही बचत गटांनी भरायची असते. पण ते त्यांना भरू देता आम्ही व्यक्तिगत खर्चातून प्रत्येक बचत गटाचे 40 हजार रुपये भरले आहेत, ही  दानत लागते असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले. महायुती सरकारच्या काळात महिला बचत गट सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी महिलांना वार्षिक नियोजन मधून 40 कोटी खर्च करून महिला बचत गटासाठी पैसे देण्यात येणार आहेत असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केले.  यावेळी त्यांनी केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की, आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. यानुसार केंद्र सरकार स्वतः नाफेड आणि केंद्रीय सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट करणार आहे. याबाबत करार करून केंद्र सरकारने दुसऱ्या शेजारील देशाला कांदा निर्यात कण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो तसाच आहे, मात्र कांदा हा निर्यात होणार याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की, काही माध्यमांद्वारे पूर्णतः गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण होऊन शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टला मंत्री समितीकडून मान्यता मिळाली आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी.  केंद्र सरकारद्वारे शेजारच्या देशांनी केलेल्या मागणीनुसार कांदा निर्यात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्या देशामध्येच उचित भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

DNA Marathi News :  जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा धक्का, सर्व 10 खासदार सोडणार पक्ष?

Lok Sabha Elections 2024 :  देशाच्या राजकारणाची एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी मोठा राजकीय खेळ होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावतींना मोठा धक्का बसू शकतो.  या माहितीनुसार, पक्षाचे सर्व 10 खासदार बसपा सोडण्याच्या तयारीत आहेत. यापैकी काही खासदार भारतीय जनता पक्ष तर काही सपा आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी राज्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसह आणखी काही नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी देशाच्या राजकारणात आणखी काय काय खेळ होणार हे पाहावे लागणार आहे.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा धक्का, सर्व 10 खासदार सोडणार पक्ष? Read More »

Hair Dryer: हेयर ड्रायर वापरत असाल तर ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या

Hair Dryer : केस कोरडे करावयाचे आहे मग उन्हात कोरडे कारणे हे चांगले पर्याय आहे. पण जर हवामान ढगाळी पावसाळी किंवा थंडीचे असेल केसांना कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो.  जर आपण नियिमतपणे ड्रायरचा वापर करता तर मग या पासून होणारे तोटे आणि खबरदारी बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. केसांना नवीन स्टाइल देण्यासाठी हेयर ड्रायर वापरतात पण ह्याच्या पासून होणारे तोटे देखील त्वरितच दिसून येतात.  हेयर ड्रायरचा अत्यधिक वापर केसांच्या नैसर्गिक सौंदर्याला काढून टाकतो. तर ह्याच्या दररोज वापर केल्याने केसांमध्ये कोंडा होणं, क्लिडेंट, निस्तेज आणि कोरडे होणं सारख्या समस्या वाढतात. या मुळे केस रुक्ष आणि निर्जीव होऊन तुटू लागतात.  या पासून तोटे होण्याचे एक कारण म्हणजे या मधून निघणारी उष्णता आहे जी केसांच्या मुळाला नुकसान देते आणि केसांना दोनतोंडी करते.  खबरदारी काय घ्यावयाची  हेयर ड्रायरचा वापर करताना हे लक्षात ठेवा की केसांपासून याची दुरी 6 ते 9 इंच असावी. असे केले नाही तर केसांमध्ये कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटू लागतील. ड्रायरचा वापर करण्याच्या पूर्वी केसांमध्ये नरिशमेंट सीरम लावावे, जेणे करून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांना काहीही नुकसान होऊ नये आणि केस मऊ व्हावे. आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेयर ड्रायरचा वापर करणे योग्य राहील. जसे की केस कुरळे आहे, रुक्ष आहे, मऊ आहेत किंवा रेशमी आहेत, त्यानुसार आपल्याला तापमान किंवा वेळेची आवश्यकता असेल. ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडीशनींग करणे विसरू नका. बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे न वापरल्यामुळे केस कोरडे होण्यासह गुंततात, या मुळे ते तुटतात. रुक्ष आणि कोरड्या केसांमध्ये शक्य असल्यास कमी ड्रायर वापरा किंवा कोल्ड ड्रायर वापरा कारण या मध्ये आयन असतात जे पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्या हवेत उष्णता कमी असते. जर आपल्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करणे आवश्यक आहे तर केसांना नियमितपणे तेल लावा, जेणे करून केसांना पुरेशे पोषण मिळेल. ड्रायरचा जास्त वापर केल्याने हे केसांमधील पोषण काढतो. केस बळकट आणि पोषित ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या आहारात आवळा, हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, दही इत्यादी समाविष्ट करावे जेणे करून केसांना पोषण मिळेल.

Hair Dryer: हेयर ड्रायर वापरत असाल तर ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या Read More »

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे

Sujay Vikhe News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवाल दिल झाले होते.  या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे.  या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास 50 हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने  कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे.  या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा  मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे,  हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार , धर्माजी आव्हाड आदी  उपस्थित होते. यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.  मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.  यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता अनेक जण केवळ फोटो काढण्या पुरते मागण्याचे निवेदन देतात. मात्र  विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केल्याचं खासदार विखे म्हणाले. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही  कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाची असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आम्ही प्रश्नांची मांडणी सरकारकडे केली आणि त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा आवर्जून खासदार सुजय विखे यांनी नमूद केले.  माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी  मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे Read More »

Ahmednagar News:  भिंगार येथे सकल मराठा  समाजाचे वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा

Ahmednagar News:  यावर्षी देखील भिंगार येथे सकल मराठा समाजाचे वतीने भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली.  या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा व तसेच उंट, घोडे,मावळे, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची रॅली विजय लाईन चौक ते वृंदावन मंगल कार्यालय पर्यंत काढण्यात आली होती येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होणार आहे यावेळी विविध मान्यवरांच्या सत्कार देखील करण्यात आले.  यावेळी राजेश काळे,संजय सपकाळ,संपत बेरड, शामराव वागस्कर,पंकज चव्हाण,गणेश सातकर, श्रीकांत शिरसागर, भूषण थोरात, अंकुश शिंदे, गणेश शिंदे, हर्षद काळे, अरुण चव्हाण, अमोल वागस्कर, कांता बोटे, अभिजीत सपकाळ, गणेश शिंदे,पंकज चव्हाण भूषण थोरात, मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्यावतीने लेझीम, जानपदक, ढोल पथक, मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मात्र सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

Ahmednagar News:  भिंगार येथे सकल मराठा  समाजाचे वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शोभा यात्रा Read More »

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी

Health Tips: आज अनेकजण वजन वाढल्यामुळे त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय देखील करतात मात्र त्यांना काहीच फायदा होत नाही. या लेखात आम्ही तुम्हाला आज लिंबू आणि गुळापासून वजन कमी करण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.  आम्ही तुम्हाला सांगतो लिंबू आणि गुळापासून बनवलेले पेय तुम्हाला वजन कमी करण्यास तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.  काही अतिरिक्त किलो वजन वाढवणे सोपे आहे मात्र तितकेच वजन कमी करणे कठीण आहे. अनेकांचे सध्याच्या काळात चांगलेच वजन वाढले आहे. खासकरून अनेकांची पोटाची चरबी वाढली आहे. दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते.  मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.  या लेखात तुम्हाला आम्ही साध्या गूळ-लिंबाच्या काढ्याबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी कऱण्यास मदत होईल.  या काढ्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गूळ आणि लिंबू. दोन्ही साहित्य प्रत्येक भारतीय घरात आढळते. लिंबू आणि गूळ दोन्हीचे शरीरासाठी भरपूर फायदे आहेत. तसेच हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.  कसे करते काम  गुळामुळे पाचनक्रिया वाढण्यास मदत होते ज्यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. यात प्रोटीन तसेच फायबरही असतात. ही पोषक तत्वे वजन घटवण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात.  लिंबूचा रस शरीराला डिटॉक्स करण्याचे तसेच वजन घटवण्यास मदत करतात. यात पॉलिफेनॉल अंटीऑक्सिडंटही असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे अंटीऑक्सिडंट शरीरातील चरबी वाढवणे रोखतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.  गूळ गोडासाठी साखरेसाठी एक चांगला पर्याय आहे. कारण यात कॅलरीज कमी असतात. तसेच गुळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. एकत्र गूळ आणि लिंबूचा काढा प्यायल्यास पचन आणि श्वसनतंत्र साफ करण्यास मदत करतात.  कसा बनवायचा काढा  एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा गुळाची पावडर मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि एक चमचा लिंबाचा रस टाका. पुन्हा मिश्रण चांगले ढवळा. वजन घटवण्यासाठी तुम्ही हे पेय दररोज उपाशी पोटी घेऊ शकता. 

Health Tips: लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय, पाहता पाहता वजन होईल कमी Read More »

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी घसरत आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिला आहे. येथे हवामान कसे असेल? IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.   सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोंदवला जाऊ शकतो. इथे मुसळधार पाऊस पडेल IMD नुसार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19-21 फेब्रुवारी दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आणि 20-22 फेब्रुवारी दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक वादळे अपेक्षित आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »

Maruti Swift मिळत आहे 2 लाखांपेक्षा कमी किमतीत! पहा ‘ही’ अप्रतिम ऑफर

Maruti Swift: अगदी कमी वेळेत सर्वात जास्त विक्री होऊन अनेक विक्रम मोडणारी मारुती सुझुकीची लोकप्रिय कार Maruti Swift तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता Maruti Swift 2 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. चला मग जाणून घेऊया या जबरदस्त ऑफरबद्दल सर्वकाही.  Maruti Swift इंजिन   मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे. कंपनीची ही कार 1197 cc इंजिनसह येते. जे 88.50 bhp ची कमाल पॉवर आणि 113 Nm चे पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह येणाऱ्या या कारमध्ये कंपनीने 22.56 किलोमीटर प्रति लिटर मायलेज दिले आहे. या कारमध्ये 268 लीटरची बूट स्पेस असून त्यात 37 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. Maruti Swift किंमत तसे, जर तुम्ही कंपनीची ही प्रीमियम हॅचबॅक बाजारातून खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 5.99 लाख ते 9.03 लाख रुपये खर्च करावे लागतील.  पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या वेबसाइटवर जाऊन कंपनीची ही कार खरेदी करु शकता.   Maruti Swift ऑफर   तुम्ही CarWale वेबसाइटवर मारुती स्विफ्टचे जुने मॉडेल तपासू शकता. या कारचे 2010 चे मॉडेल येथे विकले जात आहे. या कारने 79,100 किलोमीटर चालवले आहे आणि अतिशय चांगल्या स्थितीत ठेवले आहे.  सध्या या कारची किंमत 1.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 2011 मॉडेल मारुती स्विफ्ट CarWale वेबसाइटवरूनच खरेदी केली जाऊ शकते. ही कार उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यात आली असून ती 1,23,567 किलोमीटर चालवण्यात आली आहे. पेट्रोल इंजिनसह येणारी ही कार तुम्ही  2.06 लाख रुपये किमतीत घेऊ शकता.

Maruti Swift मिळत आहे 2 लाखांपेक्षा कमी किमतीत! पहा ‘ही’ अप्रतिम ऑफर Read More »

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली..

Sujay Vikhe :  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे अहमदनगर मार्केट कमिटीने शेतकरी आणि मार्केट कमिटीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते. नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.  यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्या कडून घेतली होती.   केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत 31 मार्च 2024 अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांग्लादेशातही 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली.. Read More »