DNA मराठी

ताज्या बातम्या

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »

abhijeet bichukale

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका

Abhijeet Bichukale : राज्यात आज 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान सुरू असून निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरून पांघरून घेऊन मुक्कामाला जावा भाजप काहीही करू शकतं असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय असं माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले. मतदानाच्या काही तासांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 24 नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करून पुढे ढकलले होते मात्र 03 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका Read More »

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

indian government

Indian Government on Pan Masala: सिगारेट अन् पान मसाले आता महाग होणार; सरकार आणणार संसदेत नवीन विधेयक

Indian Government on Pan Masala: आजपासून संसदेचा हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून भारत सरकार सोमवारी लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर करण्याची तयारी करत आहे जी जीएसटी भरपाई उपकर रद्द केल्यानंतर नवीन कराने बदलेल. या बदलाचा प्राथमिक उद्देश म्हणजे तंबाखू, पान मसाला आणि इतर हानिकारक वस्तूंवरील कर दर समान राहतील याची खात्री करणे. या विधेयकांमुळे या उत्पादनांवरील कर वाढण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सोमवारी संसदेत केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 आणि आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करतील. जीएसटीमुळे राज्यांना झालेल्या महसुली नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे. या विधेयकांद्वारे, तंबाखू उत्पादने आणि पान मसाल्यावरील कर रचना राखण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून सरकारी तिजोरीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 अंतर्गत, सिगारेटसारख्या तंबाखू उत्पादनांवर आता उत्पादन शुल्क आकारले जाईल, जे जीएसटी भरपाई उपकराची जागा घेईल. यामुळे तंबाखू उद्योगावरील करांचे दर वाढू शकतात, परंतु त्यामुळे तंबाखू उत्पादनांपासून मिळणारे सरकारी उत्पन्न स्थिर होण्यास मदत होईल. पान मसाल्यावरील नवीन कर आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 चा उद्देश पान मसाल्यासारख्या उत्पादनांवरील जीएसटी भरपाई उपकर नवीन उपकराने बदलणे आहे. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य खर्च पूर्ण करण्यासाठी निधी उभारणे आहे. हे विधेयक पान मसाल्या आणि इतर पाप वस्तूंवरील कर संरचना स्थिर करेल, ज्यामुळे या उत्पादनांवरील वाढीव कराच्या परिणामातून सरकारला नियमित महसूल मिळेल. जीएसटी भरपाई उपकराची मुदत आणि परिणाम जीएसटी लागू झाल्यानंतर, जीएसटीमुळे झालेल्या महसूल नुकसानाची भरपाई करण्यासाठी 1 जुलै 2017 रोजी भरपाई उपकर लागू करण्यात आला. हा उपकर 30 जून 2022 पर्यंत सुरू राहणार होता, परंतु नंतर तो 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आला. या कालावधीत, केंद्र सरकारने कोविड-19 दरम्यान झालेल्या जीएसटी नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्यांकडून कर्ज घेतले आणि तो परतफेड करण्यासाठी हा उपकर लावण्यात आला. आता, डिसेंबर 2025 पर्यंत हे कर्ज परतफेड झाल्यावर, भरपाई उपकर रद्द केला जाईल. तंबाखू आणि पान मसाल्यावरील कर रचनेत बदल भरपाई उपकराची मुदत संपली असली तरी, तंबाखू आणि पान मसाल्यासारख्या उत्पादनांवर कर प्रभाव स्थिर राहील. 3 सप्टेंबर 2025 रोजी, जीएसटी कौन्सिलने निर्णय घेतला की कर्जाची परतफेड होईपर्यंत तंबाखू आणि पान मसाल्यावरील भरपाई उपकर सुरू राहील. यानंतर, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 आणि आरोग्य सुरक्षा ते राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 या उत्पादनांवरील कर दरांमध्ये कोणतीही कपात होणार नाही याची खात्री करेल.

Indian Government on Pan Masala: सिगारेट अन् पान मसाले आता महाग होणार; सरकार आणणार संसदेत नवीन विधेयक Read More »

virat kohli

Virat Kohli on Test Cricket: मी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळणार; कोहलीने दिला अफवांना पूर्णविराम!

Virat Kohli on Test Cricket: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने शानदार कामगिरी करत 52 वा एकदिवसीय शतक झळकावले आहे. विराटने 120 चेंडूत 135 धावा केल्या  ज्यामध्ये 11 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. त्याच्या शतकामुळे भारताला 8 बाद 349 धावांपर्यंत मजल मारता आली=तर दक्षिण आफ्रिका 332 धावांवर गारद झाली. भारत 17 धावांनी विजयी झाला आणि कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. फक्त एकाच फॉरमॅट खेळणार सामन्यानंतर कोहलीने स्पष्ट केले की तो फक्त एकाच स्वरूपात खेळत राहील.  भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला आणि यानंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता कोहलीने या अफवांना फेटाळून लावत म्हटले की तो नेहमीच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. कोहलीने स्पष्ट केले की त्याचा खेळ नेहमीच मानसिक राहिला आहे.  सामन्यात उतरताना  तो फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करतो आणि परिस्थितीनुसार आपला डाव जुळवून घेतो. कोहलीने अनुभव आणि मानसिक सतर्कता ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. खेळात तंदुरुस्ती आणि तयारीचे महत्त्व कोहली म्हणाला की त्याची तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी त्याच्या क्रिकेट जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो सामन्यांपूर्वी स्वतःचे दृश्यमान करून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करतो.   या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. विराट कोहलीच्या 135 धावांव्यतिरिक्त, रोहित शर्माने 57 आणि कर्णधार केएल राहुलने 60 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 32 धावा केल्या. मॅथ्यू ब्रिएट्झकेच्या 72 धावा, मार्को जॅन्सेन (39 चेंडू) च्या 70 धावा, तीन षटकार आणि आठ चौकारांसह आणि कॉर्बिन बॉश (51 चेंडू) च्या 67 धावा आणि पाच षटकारांसह, दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 332 धावांवर आटोपला आणि सामना 17 धावांनी गमावला.

Virat Kohli on Test Cricket: मी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळणार; कोहलीने दिला अफवांना पूर्णविराम! Read More »

telangana missing family

Buldhana News : अखेर ‘त्या’ बेपत्ता दाम्पत्याची कार तिसऱ्या दिवशी विहिरीत आढळली!

Buldhana News : तेलंगणा राज्यातून जळगात खान्देशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा तिसऱ्या दिवशी अखेर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत त्यांच्या कारसह मृतदेह २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगणातील सीतापूरममधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू, पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ या कारने डोकलखेडा येथील लग्न सोहळ्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाले होते. सायंकाळी ६:३० वाजता त्यांचा नातेवाईकांशी शेवटचा संपर्क झाला, मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाइकांत चिंता वाढली. पाटील दाम्पत्य लग्नस्थळी न पोहोचल्याने त्यांच्या महामार्गावरील विविध गावांत चौकशी करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३१ वाजता त्यांनी बाळापूर टोलनाका पार केल्याचे स्पष्ट झाले, तर शेवटचे ‘लोकेशन’ नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आढळले. त्यानंतर नांदुरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व पोलिसांनी चौकशी सुरु केली. नांदुरा-मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करूनही २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही. परिणामी, विविध चर्चांना ऊत आले होते. अखेर सायनलच्या सुमारास वडनेर उड्डाणपुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत चारचाकीसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच वरिष्ठ अधिका-यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यांनतर 3 क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ओम साई फाउंडेशनच्या कार्यकत्यांना विहिरीत उतरवून सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रथमदर्शनी महामार्गालगत ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी वळण आहे व रस्त्याच्या बाजूलाच १० फुटांवर ती विहीर आहे. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन विहिरीत पडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, हा घातपात आहे का? या बाजूनेही पोलिस तपास करीत आहेत.

Buldhana News : अखेर ‘त्या’ बेपत्ता दाम्पत्याची कार तिसऱ्या दिवशी विहिरीत आढळली! Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Tapovan Tree Case: साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन देऊ नका; तपोवन प्रकरणात राज ठाकरेंचा सरकारला इशारा

Raj Thackeray on Tapovan Tree Case: नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून आता मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे साधू- महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. यासाठी या परिसरातील 1800 झाडे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्थानिक नागरिकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तर आता या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे. साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करुन उद्योगपतींच्या घशात घालण्याता सरकारचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच!

Raj Thackeray on Tapovan Tree Case: साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन देऊ नका; तपोवन प्रकरणात राज ठाकरेंचा सरकारला इशारा Read More »

ashish shelar

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन

Ashish Shelar : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) युवा पुरस्कार नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025). सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन Read More »

rajesh agarwal

Rajesh Agarwal : राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; ‘या’ दिवशी स्वीकारणार पदभार

Rajesh Agarwal : सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर हे आहे. त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिम विषयामध्ये बी.टेक केले आहे. राजेश अग्रवाल यांनी सेवाकाळात सहायक जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला येथे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे उप विशेष आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, भारत निवडणूक आयुक्त कार्यालयात संचालक, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, इंटर्नल एक्स्चेंज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय मुंबई येथे कृषी आणि मत्स्यव्यवसाय विभागात सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात सचिव (अतिरिक्त कार्यभार), वित्त विभागात सचिव, सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), वित्त विभागात लेखा व कोषागारे विभागात सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार, वित्त विभागात सचिव (लेखा व कोषागारे)(व्यय – अतिरिक्त कार्यभार), केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण), पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागात सचिव, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागात सचिव, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

Rajesh Agarwal : राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव; ‘या’ दिवशी स्वीकारणार पदभार Read More »

pune crime

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Crime : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे 16 चाकी टँकर क्र. एमएच-12 वायबी-9186 मधून 39,800 लि. मद्यार्क व एमएच-12 युएम-9887 मधून 39,800 लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी 200 लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी 180 लि. मद्यार्क, 35 लिटर कॅन – 35 लि. मद्यार्क, 20 लिटर प्लास्टिक बादली – 20 लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(अ)(ई), 67, 81, 83, 90 व 103 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »