DNA मराठी

हायलाईट

homebound

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक

Oscar 2026 : नीरज घायवान यांचा “होमबाउंड” हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. याबाबत माहिती देताना चित्रपटाचे निर्माते करण जोहर भावूक झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “‘होमबाउंड’च्या प्रवासाबद्दल मी किती अभिमानी, उत्साहित आणि आनंदी आहे हे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नीरज, आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्करसाठी निवड होण्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास होता. संपूर्ण कलाकारांना प्रेम. “होमबाउंड” चित्रपटाची स्टोरी काय? “होमबाउंड” ही बालपणीचे मित्र शोएब (ईशान) आणि चंदन (विशाल) यांची कथा आहे, ज्यांची पोलिस दलात सामील होण्याची इच्छा त्यांच्या जीवनाला आणि निर्णयांना आकार देते. हा चित्रपट मैत्री, कर्तव्य आणि तरुण भारतीयांना तोंड द्यावे लागणारे सामाजिक दबाव या विषयांवर प्रकाश टाकतो आणि जान्हवी कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. कोणते चित्रपट नामांकित झाले ? 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पुढील फेरीच्या मतदानासाठी पंधरा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या यादीत अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट्स केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटिमेंटल व्हॅल्यूज”, पॅलेस्टाईनचा “पॅलेस्टाईन 36”, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सिरात”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.

Oscar 2026 साठी Homebound शॉर्टलिस्टेड; करण जोहर भावूक Read More »

cameron green

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय?

IPL Auction 2026: संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असलेल्या आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी मिनी लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनवर सर्वात जास्त बोली लागली आहे. त्याला केकेआरने तब्बल 25.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू बनला. तर तो परदेशी खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावरही पोहोचला. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? 25 कोटी बोली लागल्यानंतर ही ग्रीनला फक्त 18 कोटी रुपये मिळणार आहे. बीसीसीआयच्या एका नियमामुळे ग्रीनला 18 कोटी मिळणार आहे. कॅमेरॉन ग्रीनला फक्त 18 कोटी का मिळणार? कॅमेरॉन ग्रीनला 2026 च्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 18 कोटी मिळणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे “कमाल शुल्क नियम” नावाचा एक विशिष्ट आयपीएल नियम. या नियमानुसार, कोणत्याही परदेशी खेळाडूला मिनी-लिलावात जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते ती दोन गोष्टींपैकी कमी रक्कम आहे. त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? या नियमानुसार, पहिली, या हंगामासाठी सर्वाधिक रिटेन्शन स्लॅब 18 कोटी आहे. दुसरी, गेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली. ऋषभ पंत आयपीएल 2025 च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला, त्याला 27 कोटी मिळाले. या दोन्ही रकमेपैकी कमी रक्कम 18 कोटी आहे. त्यामुळे ग्रीनला 25.20 कोटी ऐवजी फक्त 18 कोटी दिले जातील. उर्वरित रक्कम बीसीसीआयच्या खेळाडू कल्याण निधीत जाईल. तर दुसरीकडे मिनी लिलावात ग्रीनसाठी संघांमध्ये तीव्र स्पर्धा झाली. कॅमेरॉन ग्रीनची सर्वोत्तम किंमत 2 कोटी ठेवण्यात आली होती. सुरुवातीला, बोली राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाली. पण राजस्थानने माघार घेतल्यावर, चेन्नईचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. शेवटी, कोलकाता जिंकला आणि त्याने या खेळाडूला मोठ्या रकमेत त्यांच्या संघात समाविष्ट केले. दुखापतीनंतर कॅमेरॉन ग्रीनचे पुनरागमन पाठीच्या दुखापतीतून कॅमेरॉन ग्रीन पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसला नाही. तो मेगा लिलावातही विकला गेला नाही. तरीही कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे केकेआरमधून आंद्रे रसेलची निवृत्ती, कारण त्याची जागा घेणारा एकमेव खेळाडू ग्रीन होता. ग्रीन बॅट आणि बॉल दोन्हीने महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो.

IPL Auction 2026 : Cameron Green साठी लागली 25.20 कोटींची बोली पण मिळणार फक्त 18 कोटी; कारण काय? Read More »

pradnya satav

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला

Pradnya Satav : राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी 29 महानगर पालिकांसाठी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्ष कामाला लागलं असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव काँग्रेसला रामराम करत पक्षाची साथ सोडणार आहे. आमदार प्रज्ञा सातव 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. आमदार प्रज्ञा सातव 2021 पासून काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या आमदार आहे. पक्षात सुरू असणाऱ्या गटबाजीच्या राजकारणामुळे प्रज्ञा सातव पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हिंगोलीचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारीपैकी एक मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pradnya Satav : काँग्रेसला मोठा धक्का, आमदार प्रज्ञा सातवांचा भाजप प्रवेश ठरला Read More »

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, दर महिने मिळणार 5550 रुपये; जाणून गुंतवणूकीबद्दल सर्वकाही

Post Office MIS Scheme: जर तुम्ही देखील भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या एका भन्नाट आणि फायदेशीर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा नाव आहे एमआयएस. या योजनेत तुम्हाला वारंवार गुंतवणूक करावी लागत नाही. एकदा तुम्ही गुंतवणूक केली की तुमचे मासिक उत्पन्न सुरू होते. पोस्ट ऑफिस या योजनेअंतर्गत 7.4 टक्के वार्षिक व्याज देते, जे थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यात ठेवू शकता किंवा गरज पडल्यास ते काढू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत फक्त 1000 मध्ये खाते उघडू शकता. एका खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाखांपर्यंत आहे, तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाखांपर्यंत आहे. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 लोक सामील होऊ शकतात. जर तुम्ही एकाच खात्यात 9 लाखांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षांसाठी दरमहा 5550 चे निश्चित व्याज मिळेल. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते आणि मासिक उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्रोत बनते. MIS योजना 5 वर्षांत परिपक्व होते. मुदतपूर्तीनंतर, तुमच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला दरमहा व्याज मिळतेच, परंतु तुमची मुख्य गुंतवणूक देखील सुरक्षित असते. एमआयएस योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे. निश्चित मासिक उत्पन्न उघडल्यानंतर लगेचच सुरू होते आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार निधी वापरू शकता. ही योजना सुरक्षित आणि नियमित उत्पन्न हवे असलेल्यांसाठी आदर्श आहे.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, दर महिने मिळणार 5550 रुपये; जाणून गुंतवणूकीबद्दल सर्वकाही Read More »

national herald

National Herald प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा; आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने दिला नकार

National Herald : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चालवत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची दखल घेण्यास नकार दिला आहे.तसेच न्यायालयाने म्हटले आहे की केंद्रीय एजन्सी त्यांची चौकशी सुरू ठेवू शकते. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश (पीसी कायदा) विशाल गोगणे यांनी असा निर्णय दिला की पीएमएलए अंतर्गत दाखल केलेली अंमलबजावणी संचालनालयाची तक्रार कायम ठेवण्यायोग्य नाही कारण हा खटला एफआयआरवर नाही तर खाजगी तक्रारीवर आधारित होता. न्यायालयाने असा निर्णय दिला की, “कलम 3 अंतर्गत परिभाषित केलेल्या आणि कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दंडनीय मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याशी संबंधित तपास आणि परिणामी खटला चालवण्याची तक्रार एफआयआर किंवा कायद्याच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या गुन्ह्याशिवाय कायम ठेवण्यायोग्य नाही.” ईडीला तपास सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयाने असेही निर्णय दिला की विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर आरोपींना या टप्प्यावर एफआयआरची प्रत मिळविण्याचा अधिकार नाही. तथापि, न्यायालयाने ईडीला या प्रकरणात पुढील तपास सुरू ठेवण्याची परवानगी दिली. आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही काँग्रेसने म्हटले आहे की, “आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही.” काँग्रेस पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाला सत्याचा विजय म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्षाने लिहिले आहे की, “सत्याचा विजय झाला आहे… मोदी सरकारच्या द्वेषपूर्ण आणि बेकायदेशीर कृती पूर्णपणे उघड झाल्या आहेत. माननीय न्यायालयाने यंग इंडियन प्रकरणात काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध – सोनिया गांधी आणि राहुल गांधी – ईडीच्या कृती बेकायदेशीर आणि द्वेषपूर्ण असल्याचे आढळले आहे. न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की ईडीला या प्रकरणात कोणतेही अधिकार क्षेत्र नाही आणि त्यांच्याकडे एफआयआर नाही, ज्याशिवाय खटला चालवता येत नाही.”

National Herald प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा; आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने दिला नकार Read More »

election

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी निवडणुका जाहीर; 15 मतदान अन् 16 जानेवारीला निकाल

Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून आचारसाहित लागू करण्यात आली असून महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर असून उमेदवारी अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 असणार आहे. तर उमेदवारांना 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून राज्यातील 29 महापालिकांचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. असा आहे निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – 23 डिसेंबर 2025 उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत – 30 डिसेंबर 2025 उमेदवारी अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025 उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – 2 जानेवारी 2026 उमेदवारांना चिन्ह वाटप – 3 जानेवारी 2026 मतदान – 15 जानेवारी 2026 मतमोजणी – 16 जानेवारी 2026

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी निवडणुका जाहीर; 15 मतदान अन् 16 जानेवारीला निकाल Read More »

maharashtra election comission

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम; निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

Maharashtra Election : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आज कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोग आज 4 वाजता पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकांची घोषणा करणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे मुंबईत आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. तर दुसरीकडे आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात महानगर पालिकांसाठी आचारसाहित लागू होणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीदरम्यान आरक्षणावरून झालेल्या घोटाळ्यावर देखील राज्य निवडणूक आयोग स्पष्टीकरण देऊ शकतो. राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर काही नगरपरिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पेक्षा जास्त गेल्याने राज्य निवडणूक आयोगाने 24 नगरपरिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Maharashtra Election: 29 महापालिकेसाठी आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम; निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद Read More »

uddhav thackeray and eknath shinde

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

Eknath Shinde on Uddhav Thackeray: नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला असून विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही असे सांगितले. काही जण अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ.. असे वागत आहेत..फक्त पर्यटनासाठी नागपुरात येतात, ते आले पण अधिवेशात एकही प्रश्न विचारला नाही, एकाही विषयावर सभागृहात बोलले नाहीत, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी ते किती जागरूक आहेत तेच यातून दिसून आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी निदान तेवढे उमेदवार निवडून यावे लागतात तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी करत त्यांनी माध्यमांमध्ये आदळ आपट केली, मात्र स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ठेवले होते याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला असे सांगितले. माझ्याविषयी असलेल्या मळमळ आणि जळजळ यातूनच हे आरोप होत असल्याचे आवर्जून नमूद केले. मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले, मुंबईतील ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा दिला, मुंबईला पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला, त्यातून 13 हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल पार्क मधील 25 हजार कर्मचाऱ्यांना 5 किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली, मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले, सिडकोचा घरांच्या किंमती कमी करून 10 टक्क्यांनी या किंमती कमी केल्या, 50 एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात 17 प्रकल्पांची निवड केली आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा असे अनेक निर्णय घेतले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 40 लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत असे सांगितले. या निर्णयाद्वारे 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या योजना सुरू करून आम्ही त्यांच्या चरणी ही योजनापुष्पे वाहिली आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र एवढी वर्षे मुंबईत ज्यांची सत्ता होती त्यांनी नक्की काय केले..? मुंबई तोडणार तोडणार एवढेच तुणतुणे कायम वाजवले. मिठी असो वा कोविड कुठेही डाका टाकायचे सोडले नाही. तिजोरीला वेटोळे घालून प्रत्येक कामात घोटाळे करण्याचे काम केले. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून स्वतःची तिजोरी भरणारा खरा रेहमान डकैत कोण आहे..? ते लोकांसमोर यायला हवे. अशा रेहमान डकैतना पाणी पाजणारी ‘धुरंधर’ महायुतीच असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde on Uddhav Thackeray: तिजोरीवर दरोडा टाकणारे ‘रेहमान डकैत’ कोण..? उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला Read More »

sbi loan interest rates cut

SBI Loan Interest Rates Cut : SBI आणि IOB ने व्याजदरात केली कपात, कर्जे होणार स्वस्त; ‘या’ दिवसापासून मिळणार फायदा

SBI Loan Interest Rates Cut : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज व्याजदरात कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच रेपो दरात 25 बेसिस पॉइंट कपात केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. नवीन दर 15 डिसेंबर 2025 पासून लागू होतील, ज्यामुळे विद्यमान आणि नवीन कर्जदारांना फायदा होईल. SBI व्यतिरिक्त, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) या सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका बँकेने देखील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. नुकतंच RBI ने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या वर्षी चौथ्यांदा आपला धोरणात्मक व्याजदर, रेपो दर 25 बेसिस पॉइंटने कमी केला. त्यानंतर लगेचच, SBI ने आपल्या कर्ज दरात कपात करण्याची घोषणा केली. बँकेने म्हटले आहे की ती RBI च्या निर्णयाचा संपूर्ण फायदा आपल्या ग्राहकांना देत आहे. EBLR 25 बेसिस पॉइंट्सनी कमी वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एसबीआयने त्यांचा एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड रेट (EBLR) 25 बेसिस पॉइंट्सनी कमी केला आहे. या कपातीनंतर, EBLR 7.90 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. ज्या ग्राहकांचे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर किरकोळ कर्जे EBLR शी जोडलेली आहेत त्यांचे EMI कमी होतील. नवीन कर्जदारांनाही कमी व्याजदर मिळतील. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) देखील 5 बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. ही कपात सर्व कालावधींना लागू होईल. सुधारित दरांनुसार, एक वर्षाचा MCLR आता 8.75 टक्क्यांवरून 8.70 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, इतर कालावधीसाठी कर्जे देखील 5 बेसिस पॉइंट्सने स्वस्त झाली आहेत. ज्या ग्राहकांचे कर्ज MCLR शी जोडलेले आहे त्यांच्या मासिक हप्त्यांमध्येही कपात होईल. बेस रेट आणि BPLR देखील कमी SBI ने बेस रेट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) देखील कमी केला आहे. बँकेने बेस रेट/बीपीएलआर 10 टक्क्यांवरून 9.90 टक्के केला आहे. हा नवीन दर 15 डिसेंबर 2025 पासून लागू होईल. याचा जुन्या कर्ज खात्यांवरही सकारात्मक परिणाम होईल. मुदत ठेवींवर मर्यादित परिणाम कर्ज स्वस्त केले असले तरी, ठेवींच्या दरांमध्ये लक्षणीय बदल करण्यात आलेले नाहीत. एसबीआयने 2 वर्षांपेक्षा कमी आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5 बेसिस पॉइंट्सने कमी करून 6.40 टक्के केला आहे. इतर कालावधीसाठी एफडी दर अपरिवर्तित राहिले आहेत. यावरून असे दिसून येते की बँकेवर ठेवी वाढवण्याचा दबाव आहे. ‘अमृत वर्षा’ योजनेवरील व्याजदर कमी एसबीआयच्या विशेष एफडी योजनेवरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे, ‘444 दिवस अमृत वर्षा’ या योजनेचा व्याजदरही कमी करण्यात आला आहे. या योजनेचा व्याजदर 6.60 टक्क्यांवरून 6.45 टक्के करण्यात आला आहे. हा नवीन दर 15 डिसेंबरपासून लागू होईल. आयओबीने कर्जदरही कमी केले एसबीआय व्यतिरिक्त, इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) ने देखील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने त्यांचा बाह्य बेंचमार्क कर्जदर, रेपो-लिंक्ड कर्जदर (आरएलएलआर) 25 बेस पॉइंट्सने कमी केला आहे. त्यानंतर हा दर 8.35 टक्क्यांवरून 8.10 टक्क्यांवर आला आहे. एमसीएलआरमध्येही 5 बेस पॉइंट्सने कपात आयओबीच्या मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समितीने (एएलसीओ) 3 महिने ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 5 बेस पॉइंट्सने कपात करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे बँकेकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे कर्ज स्वस्त होतील. ग्राहकांना थेट फायदा या दर कपातीमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा ईएमआय कमी होईल. यामुळे त्यांचे ओझे कमी होईल आणि कर्ज मिळवणे सोपे होईल. शिवाय, एमएसएमई आणि कॉर्पोरेट ग्राहकांनाही कमी व्याजदराने कर्ज मिळेल, ज्यामुळे त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण होतील आणि व्यवसायाला चालना मिळेल.

SBI Loan Interest Rates Cut : SBI आणि IOB ने व्याजदरात केली कपात, कर्जे होणार स्वस्त; ‘या’ दिवसापासून मिळणार फायदा Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक ३६, ३७, आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र ३५, ४१, ४२, आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. परवानगीपेक्षा जादा उत्खनन ईटीएस मोजणीमध्ये ३ लाख ६३ हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, ९० हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे. निलंबित अधिकाऱ्यांची नावे गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.) दंड आणि महसूली कारवाई ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय चौकशी निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित Read More »