DNA मराठी

हायलाईट

pratap sarnaik

Pratap Sarnaik: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द

Pratap Sarnaik: मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री यांनी विधानपरिषदेत केली. विधानपरिषदेत नियम ९३ अंतर्गत सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वे २०२० नुसार महाराष्ट्रात ई-बाईक (दुचाकी) टॅक्सी वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली असून राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार “ महाराष्ट्र ई-बाईक-टॅक्सी नियम, २०२४ ” अधिसूचित करण्यात आले असून या नियमांनुसार बाईक टॅक्सी शंभर टक्के इलेक्ट्रिक असणे बंधनकारक आहे. तसेच सर्व अटी व नियमांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना ठराविक कालावधी देण्यात आला आहे.या प्रक्रियेनुसार उबर इंडिया सिस्टिम्स प्रा. लि., रोपेडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात ३० दिवसांसाठी तात्पुरता परवाना (Provisional Licence) देण्यात आला होता. या कालावधीत सर्व आवश्यक अटींची पूर्तता करून अंतिम परवाना घेणे अपेक्षित होते.मात्र काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न करता बेकायदा वाहतूक सुरू केल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी बाईक टॅक्सी चालकांकडून अपघात व महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना परिवहन विभागाने नोटिसा बजावल्या असून काही प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना बेकायदा बाईक टॅक्सी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पथकांमार्फत तपासणी करून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत १३० दुचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे ३३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा नियमानुसार आणि सुरक्षित पद्धतीनेच सुरू राहील यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pratap Sarnaik: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द Read More »

ayatollah mojtaba khamenei

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणची कमांड आता अयातुल्ला मोज्तबा खमेनीकडे; इस्रायलवर डागले पहिले क्षेपणास्त्र

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र अयातुल्ला मोजतबा खमेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर लगेचच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ल्यांचा पहिला टप्पा सुरू केला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या सरकारी प्रसारक, IRIB ने घोषणा केली की अयातुल्ला सय्यद मोजतबा खमेनी यांच्या नेतृत्वाखाली व्यापलेल्या प्रदेशांवर क्षेपणास्त्रांचा पहिला टप्पा डागण्यात आला आहे. इस्रायलने जारी केलेली धमकी काही काळापूर्वी, इस्रायली सैन्याने X वर एक पर्शियन संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये असा इशारा देण्यात आला होता की अली खमेनी यांच्या कोणत्याही संभाव्य उत्तराधिकारीचा पाठलाग केला जाईल. इस्रायलने स्पष्टपणे सांगितले होते की, जो कोणी नवीन सर्वोच्च नेते बनण्याचा प्रयत्न करेल किंवा नियुक्ती प्रक्रियेत सहभागी असेल त्याला लक्ष्य केले जाईल. इराणची धार्मिक संस्था, तज्ज्ञांची सभा, पुढील सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार असताना हे विधान आले. अमेरिका युरेनियमवर विशेष कारवाईची योजना ? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणचे युरेनियम जप्त करण्यासाठी विशेष लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. तीन राजनयिक अधिकाऱ्यांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्स असे सूचित करतात की या योजनेअंतर्गत, अमेरिका इराणमध्ये जमिनीवर विशेष सैन्य तैनात करू शकते, ज्यांचे प्राथमिक उद्दिष्ट बॉम्ब-ग्रेड समृद्ध युरेनियमवर नियंत्रण मिळवणे असेल. तीन सदस्यीय समितीने कमांड स्वीकारली अयातुल्ला अली खमेनी यांनी ३७ वर्षे इराणवर राज्य केले आणि २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यात ते मारले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर, एका आठवड्यासाठीही कोणताही नवीन नेता निवडला गेला नाही, ज्यामुळे तीन सदस्यीय समितीने देशाची सूत्रे हाती घेतली. या विलंबामुळे काही इराणी गटांमध्ये असंतोष वाढत आहे.

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणची कमांड आता अयातुल्ला मोज्तबा खमेनीकडे; इस्रायलवर डागले पहिले क्षेपणास्त्र Read More »

team india

T20 World Cup विजयानंतर, बीसीसीआयची मोठी घोषणा: टीम इंडियाच्या जर्सीवर आता…

T20 World Cup: टी-२० विश्वचषक विजयानंतर, टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल करण्यात आला. आता बीसीसीआयच्या लोगोवर तीन स्टार दिसतील. पूर्वी, जर्सीवर दोन स्टार होते, जे भारताच्या मागील दोन विश्वचषक विजयांचे प्रतिनिधित्व करतात. या वर्षी, जर्सीवर तिसरा स्टार जोडण्यात आला. बीसीसीआयने याची घोषणा करणारा एक व्हिडिओ जारी केला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात, भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून त्यांचा तिसरा टी-२० विश्वचषक विजेता ठरला. प्रथम फलंदाजी करताना, भारताने ५ बाद २५५ धावा केल्या, जो विश्वचषक अंतिम सामन्यातील विक्रमी धावसंख्या आहे. संजू सॅमसनच्या स्फोटक कामगिरीने भारतीय डावाचा पाया रचला. त्याने फक्त ४६ चेंडूत ८९ धावा केल्या, ज्यामध्ये पाच षटकार आणि आठ चौकारांचा समावेश होता आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. सलामीवीर अभिषेक शर्मा (५२) आणि इशान किशन (५४) यांनीही प्रभावी अर्धशतके झळकावली. शिवम दुबेच्या स्फोटक फलंदाजीने (८ चेंडूत २६*) शेवटच्या षटकांमध्ये भारताला २५० धावांच्या पुढे नेले. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाही आणि १९ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार बळी घेतले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. अक्षर पटेलनेही तीन बळी घेत न्यूझीलंडच्या आशा धुळीस मिळवल्या. या विजयासह, भारत टी२० विश्वचषक विजेतेपद राखणारा पहिला संघ बनला. त्यांनी घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणारा पहिला देश होण्याचा मानही मिळवला. २००७ आणि २०२४ मधील विजयानंतर हे तिसरे विजेतेपद आता भारतीय जर्सीवर तिसरा स्टार म्हणून चमकत आहे.

T20 World Cup विजयानंतर, बीसीसीआयची मोठी घोषणा: टीम इंडियाच्या जर्सीवर आता… Read More »

team india

IND vs NZ: भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’! फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव

IND vs NZ : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताने टी 20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांच्या धमाकेदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने 255 धावांचा मोठा आकडा उभारला. प्रत्युत्तरादाखल, किवीज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. अभिषेक आणि संजूची आक्रमक फलंदाजी भारतीय सलामीवीरांनी किवी कर्णधार मिशेल सँटनरचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले. अभिषेक शर्माने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला आणि केवळ 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 21 चेंडूत 52 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या जाण्यानंतर, संजू सॅमसनने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारत संघाची जबाबदारी घेतली. पॉवरप्लेच्या सहा षटकांत भारताने एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या होत्या. सॅमसन आणि किशनची स्फोटक कामगिरी संजू सॅमसनने स्पर्धेत आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि सलग तिसरा अर्धशतक झळकावला. त्याने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि अखेर 89 धावा केल्या. त्याला इशान किशनने 23 चेंडूत 54 धावा केल्या. कर्णधार सूर्या नाबाद राहिला आणि हार्दिकने 18 धावा केल्या, तरी शिवम दुबेने अखेर फक्त आठ चेंडूत 26 धावा करून संघाचा धावसंख्या 255 पर्यंत नेली. तर दुसरीकडे 256 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. संघाने तिसऱ्या षटकात त्यांची पहिली विकेट गमावली. सलामीवीर फिल अॅलन फक्त नऊ धावा करू शकला, तर रचिन रवींद्र फक्त एका धावेवर बाद झाला. ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन देखील दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये किवी संघावर इतका दबाव आणला की ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. सेफर्टने 26 चेंडूत 52 धावांची खेळी किवी संघाकडून टिम सेफर्टने 26 चेंडूत 52 धावांची जलद खेळी केली, परंतु दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणतीही साथ मिळाली नाही. जसप्रीत बुमराहने आपल्या धारदार गोलंदाजीने किवी फलंदाजीला धक्का दिला. बुमराहने एकूण चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, तर फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनेही उत्कृष्ट कामगिरी करत तीन विकेट्स घेतल्या. किवी संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि 19 षटकांत पूर्णपणे बाद झाला. भारताचे ऐतिहासिक वर्चस्व संपूर्ण किवी संघ 19 षटकांत फक्त 159 धावांतच गुंडाळला गेला. या विजयासह, भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.

IND vs NZ: भारत तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड चॅम्पियन’! फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव Read More »

eknath shinde

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

Eknath Shinde : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दारुण पराभव करत तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत या ऐतिहासिक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे. अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाला ९६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. या विजयानंतर आनंद व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघाने आज दाखवलेली जिद्द आणि सांघिक खेळ वाखाणण्याजोगा आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून फायनलमध्ये मिळवलेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यशाने देशात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होत आहे. कर्णधार आणि सर्व खेळाडूंचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde : न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता; एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले?

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं झालेल्या अपघाती निधनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना भेटणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि इतर नेत्यांना भेटणार. अजित पवार यांचा घातपातच झाला असे आमचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे 2023 ला डावोसला जाताना विमान पाण्यात आले असते, त्यावेळी अपघात झाला असता, याच व्हिएसआर कंपनीचे विमान होते, इराण इराक ने हे वाटले असते तर विमान पाडले असते. दादांच्या अपघातबाबत कायम लढत राहणार DGCA चे सस्टेटमेंट सीआयडीकडे आले नाही असे म्हणत आहेसीआयडी बाबत काही पद्धत चुकीची पद्धत आहे. मराठी अधिकाऱ्याला अजित पवार यांच्या विमान अपघात तपास द्यावा, बिहार मध्ये सुशांत सिंग प्रकरणात तपासात अधिकारी बदलल्यानंतर लगेच तपास झाला होता, व्हि के सिंग बोलू नये यासाठी माहिती होते, व्हि के सिंग प्लॅनिंग सांगू शकतो,त्याला वाचवले जाते. अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पंतप्रधान यांना जाऊन परवा भेटणार असल्याची माहिती आहे. असं रोहित पवार म्हणाले. माध्यमांशी बोलताना पुढे रोहित पवार म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी झाली पाहिजे त्याचा तपास केला जाईल. सगळ्याची वेगवेगळी स्टाईल असेल, काकी आणि पार्थ पदामुळे बोलत नाही, जय राजकरणात नसल्यामुळे बोलत आहे. आम्ही सत्तेत असतो आम्ही सत्तेला लाथ मारली असती असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले? Read More »

harshvardhan sapkal dna

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र २०४७ ची कल्पना व १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षात भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यावरील कर्ज व कर्जाची हमी मिळून १२ लाख कोटींच्या आसपास बोजा आहे. कर्जाच्या हप्त्यापोटी ६५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे व प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात प्रचंड तफावत आहे. गेल्या अर्थससंकल्पात अनुसुचित जातींच्या योजनांसाठी २२ हजार ६५८ कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात ६ हजार २०० कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या योजनांवर अर्थसंकल्पात मोठ मोठे आकडे जाहीर केले जातात पण प्रत्यक्षात ते खर्च केले जात नाहीत. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यासमोर सर्वात मोठे संकट बेरोजगारीचे असताना अर्थसंल्पात केवळ ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या मेगा भरतीचा भाजपा सरकारचा इतिहास पाहता ही सुद्धा एक फसवी घोषणाच वाटते. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे सांगितले असले तरी २१०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा फसवणूक केली आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फडणवीस सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाखो शेतकरी आजही कर्जमाफीच्या लाभापासून वंचितच आहेत, हे पाहता आजच्या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरु नये. लबाडाचे आवताण जेवल्याशिवाय खरे नाही असे या सरकारचे वागणे आहे. शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केलेल्या आहेत पण अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारापुढे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याचीच भिती जास्त आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अर्थसंकल्पातील घोषणा पुरेशा नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही राज्याचे सिंचन क्षेत्र ५६ लाख हेक्टरवरून कमी होऊन ३९ लाख हेक्टरपर्यंत आले आहे. सिंचनासोबतच पेरणीयोग्य क्षेत्रातही घट झाली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर हे अदानी व अंबानी यांच्या हितासाठी आहे, यातून सामान्य जनतेला काही फायदा होणार नाही. सरकारचे सौरउर्जा धोरणही फसवे आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर दिलासा नाही तर प्रति युनिट २६ पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. स्मार्टमीटरमुळे अगोदरच वीजबिलात प्रचंड वाढ झालेली आहे. दावोसमधून २०२२ ते २०२५ पर्यंत ५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा करण्यात आला पण आर्थिक पाहणी अहवालानुसार तर राज्यात फक्त ६ लाख कोटी रुपयांचीच गुंतवणूक आलेली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले; हर्षवर्धन सपकाळ सरकारवर भडकले Read More »

Vijay Wadettiwar 1

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका

Vijay Wadettiwar: विधानसभेत सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा होता, यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीका विधानसभेचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी टोला लगावला. या अर्थसंकल्पातील मुख्य त्रुटींवर बोट ठेवताना विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प संपूर्ण महाराष्ट्राचा नसून केवळ मुंबई आणि MMR क्षेत्रासाठी असल्यासारखा वाटतो. पुणे, ठाणे आणि मुंबईतील प्रकल्पांवरच सर्व भर देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी, विशेषतः नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यांसाठी या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. सिंचन, शिक्षण आणि आरोग्य याबाबत स्पष्टता नाही, अस वडेट्टीवार म्हणाले. २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसने सत्ता सोडली, तेव्हा राज्यावर २ लाख ९० हजार कोटींचे कर्ज होते, पण आज हे कर्ज वाढले आहे.हे सरकार महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटत आहे. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर असून आर्थिक ताळमेळ पूर्णपणे कोलमडला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा याही वेळी करण्यात आलेली नाही. मागील वर्षीच्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप कागदावरच असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. या अर्थसंकल्पातून केवळ कंत्राटदार आणि उद्योगपतींची भरभराट होणार आहे. प्रचंड कमिशन खाऊन सरकार स्वतःला मजबूत करत आहे,असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारच्या या धोरणावर उपरोधिक टिप्पणी करताना वडेट्टीवार म्हणाले, तुम्हारी बातों में ऐसे उलझे की सच समझ ना आया, चमकते विज्ञापनों में मेरा पिछड़ा गाँव नजर ना आया!

Vijay Wadettiwar: हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य 2047 मध्ये होईल विजय वडेट्टीवारांची सडकून टीका Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare :   अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा अर्थसंकल्प – सुनिल तटकरे

Sunil Tatkare :  यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. बळीराजाला कर्जमाफी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, सामाजिक लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प, उद्योग आणि रोजगारासह जागतिक शिक्षणांच्या संधी देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे अजितदादांच्या महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा दृढ संकल्प आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. देशात विविध क्षेत्रात अव्वलस्थानी असणाऱ्या महाराष्ट्राला जगाच्या स्पर्धेत आधुनिक आणि विकसित महाराष्ट्र म्हणून ओळख देणारा अर्थसंकल्प म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याकडे पाहतो आहे. २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डाॅलर करण्याचा निर्धार आणि आत्मविश्वास या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आला आहे ही महाराष्ट्राच्या जमेची बाजू आहे. सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांना स्वर्गीय अजितदादांच्या अनुपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. पण, अजितदादांच्या संकल्पनेतील आणि करड्या आर्थिक शिस्तीसह महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेणाऱ्या त्यांच्या दृष्टीकोनाची छाप या अर्थसंकल्पात उमटली असल्याचे समाधान आहे. या अर्थसंकल्पाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनिल तटकरे यांनी धन्यवाद दिले आहेत.

Sunil Tatkare :   अजितदादांना समर्पित करून दादांना अभिप्रेत असणारा अर्थसंकल्प – सुनिल तटकरे Read More »

team india

IND vs ENG : जबरदस्त सामना अन् भारताचा फायनलमध्ये प्रवेश; इंग्लंडचा 7 धावांनी पराभव

IND vs ENG : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडला ७ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. 8 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या आक्रमक ८९ धावांच्या खेळी आणि इतर फलंदाजांच्या योगदानामुळे भारताने २५३ धावांचा भक्कम आकडा गाठला. इंग्लंडने पाठलाग करताना दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय गोलंदाजांच्या शानदार पुनरागमनामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताची दमदार सुरुवात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने पॉवरप्लेमध्ये एक बाद ६७ धावा केल्या. संजू सॅमसनने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर सलग चौकार आणि षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. अभिषेक शर्मा ९ धावांवर बाद झाला, परंतु सॅमसन आणि इशान किशनने दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. सॅमसनने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनची स्फोटक कामगिरी संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावा केल्या, ज्यामध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. इशान किशनने १८ चेंडूत ३९ धावा केल्या. शिवम दुबेने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. हार्दिक पंड्याने शेवटी झटपट धावा केल्या. इंग्लंडच्या विल जॅक्स आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन बळी घेतले, पण संघाला रोखू शकले नाहीत. इंग्लंडची डळमळीत सुरुवात २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने तीन विकेट गमावल्या आणि तो बॅकफूटवर पडला. फिल सॉल्टने ५, हॅरी ब्रूकने ७ आणि टॉम बँटनने १७ धावा केल्या. विल जॅक्सने ३५ धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंगने सुरुवातीचे फटके मारले, तर जसप्रीत बुमराहने महत्त्वाचे बळी घेतले. रोमांचक पॉवरप्ले पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात इंग्लंडने १३ धावा केल्या, परंतु हार्दिक पंड्याने फिल सॉल्टला झटका देऊन त्यांना ब्रेकथ्रू मिळवून दिला. अर्शदीप सिंग आणि बुमराह यांनी दबाव आणणे सुरूच ठेवले. वरुण चक्रवर्तीच्या षटकात जेकब बेथेलने तीन षटकार मारले, परंतु त्याच षटकात जोस बटलर बाद झाला. सहा षटकात तीन विकेट गमावल्यानंतर इंग्लंडला संघर्ष करावा लागला. शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजी शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी धावा मर्यादित केल्या आणि विकेट घेतल्या. इंग्लंडला फक्त २४६ धावा करता आल्या. भारताने सात धावांनी विजय मिळवला.

IND vs ENG : जबरदस्त सामना अन् भारताचा फायनलमध्ये प्रवेश; इंग्लंडचा 7 धावांनी पराभव Read More »