DNA मराठी

ट्रेंडिंग

team india

Asia Cup 2025 जसप्रीत बुमराह खेळणार; ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा

Asia Cup 2025 : इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेत भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. तर आता आशिया कप 2025 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. अहवालानुसार, जसप्रीत बुमराह देखील या स्पर्धेत खेळणार आहे आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी संघ निवडू शकते. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या हे पहिल्या पाचमध्ये मजबूत खेळाडू असल्याने निवड समिती या संघात फारसे बदल करू इच्छित नाही हे समजते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “अभिषेक शर्मा हा गेल्या आयसीसी रँकिंगमध्ये जगातील नंबर वन टी-20 फलंदाज आहे. संजू सॅमसनने गेल्या हंगामात फलंदाजी आणि यष्टीरक्षक दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे निर्णय घेणे कठीण होईल परंतु सध्याचा फॉर्म पाहता (कसोटीत जरी), शुभमनला दुर्लक्षित करता येणार नाही. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. निवडकर्त्यांसाठी समस्या अशी आहे की टॉप ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. जुरेल आणि जितेश यांच्यात स्पर्धा असेल टॉप ऑर्डरमध्ये इतके खेळाडू असल्याने, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांना स्थान मिळणे खूप कठीण जाईल. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक लोकेश राहुल, मधल्या फळीत फलंदाजी करत नसल्याने त्याचा विचार केला जाण्याची शक्यता नाही. सॅमसनची पहिली यष्टीरक्षक म्हणून निवड होणे जवळजवळ निश्चित असले तरी, दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा असेल. जुरेल गेल्या टी-20 मालिकेचा भाग होता तर जितेशने आयपीएलमध्ये आरसीबीच्या विजयी मोहिमेत प्रभावी कामगिरी केली. त्याने फिनिशरची भूमिकाही खूप चांगली बजावली. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून भारताची पहिली पसंती आहे, तर इंग्लंड मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डी वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. तसेच शिवम दुबे यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर हे संघातील इतर दोन फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असतील.

Asia Cup 2025 जसप्रीत बुमराह खेळणार; ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा Read More »

Supreme Court On Bihar SIR: आज सर्वोच्च न्यायालयात Bihar एसआयआरवर महत्वाची सुनावणी, 65 लाख मतदारांवर होणार निर्णय?

Supreme Court On Bihar SIR: बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) च्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आज 12 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांचे खंडपीठा समोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी यापूर्वी 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता आणि निवडणूक आयोगाला हे काम पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतु असे असूनही, मतदार यादीतून लाखो नावे वगळण्याचा मुद्दा वादांनी वेढला आहे. निवडणूक सुधारणांशी संबंधित संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे ज्यामध्ये दावा केला आहे की या प्रक्रियेअंतर्गत, बिहारमधील सुमारे 65 लाख मतदारांची नावे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, प्रक्रिया नियमांनुसार उत्तरात निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी प्रकाशित करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. याशिवाय, आयोगाने स्पष्ट केले आहे की प्रारूप यादी सर्व राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्यात नसेल, तर त्याला आपला आक्षेप नोंदवण्याचा आणि संबंधित कागदपत्र सादर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आयोगाचा पलटवार, याचिका दिशाभूल करणाऱ्या निवडणूक आयोगाने याचिका फेटाळण्याची मागणी करताना याचिकाकर्त्यांना दंड ठोठावण्याची विनंतीही न्यायालयाला केली आहे. आयोगाचा आरोप आहे की या याचिका न्यायालयाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न आहेत आणि त्या गांभीर्याने घेऊ नयेत. आयोगाने असाही युक्तिवाद केला की याचिकाकर्ते मतदारांच्या नावांची यादी वगळण्याची योग्य मागणी करू शकत नाहीत कारण अशी कोणतीही प्रक्रिया कायदेशीररित्या बंधनकारक नाही. लोकशाही प्रक्रियेत उद्भवणारे प्रश्न बिहारमधील मतदार यादीशी संबंधित या वादामुळे केवळ निवडणुकीच्या राजकारणालाच नव्हे तर घटनात्मक आणि कायदेशीर चर्चांनाही जन्म मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत, एसआयआरची प्रक्रिया पारदर्शक आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकते की त्यात खरोखरच व्यापक सुधारणांची आवश्यकता आहे. हे प्रकरण केवळ बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात लोकशाही प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत एक महत्त्वाचे उदाहरण बनू शकते.

Supreme Court On Bihar SIR: आज सर्वोच्च न्यायालयात Bihar एसआयआरवर महत्वाची सुनावणी, 65 लाख मतदारांवर होणार निर्णय? Read More »

img 20250811 wa0006

Pratap Sarnaik : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik : शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BS-VI या श्रेणीतील असणारं आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यँत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य शासनाने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असुन या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याच मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये – जीपीएस – सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन – अग्निशमन अलार्म प्रणाली – दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा – ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर – पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे – स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी – गाडीच्या छतावर शाळेचे नाव

Pratap Sarnaik : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा Read More »

stock market scam the shadow of stock market scam and allegations of bribery

Stock market scam – शेअर मार्केट घोटाळा आणि ‘लाचखोरी’च्या आरोपांचे सावट

Stock market scam – अहिल्यानगर – शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेअर मार्केट घोटाळा ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर सामाजिक आणि नैतिक पातळीवरचा गंभीर विश्वासघात आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या कथित घोटाळ्याने शेकडो कुटुंबे उध्वस्त केली. बँकेतील ठेवी, सोनं, जमिनी, विवाह व शिक्षणासाठी साठवलेले पैसे – सगळे पैसे काढून नागरिकांनी लोभाच्या आमिषाखाली आपलं भविष्यच पणाला लावलं. मोठ्या व्याजाचे स्वप्न दाखवून आरोपींनी केवळ पैशांचा नव्हे, तर लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतला. व्यापारी पेठा सुमारे २५ टक्क्यांनी ठप्प झाल्या, स्थानिक अर्थव्यवस्थेला जबर धक्का बसला. शासन व प्रशासनाकडे वारंवार धाव घेतल्यानंतरच गुन्हा नोंदवला गेला. परंतु, गुन्हा नोंदवल्यानंतरच एक नवा वाद पेटला – एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने, एका पोलिसाने ऑनलाइन एक कोटी रुपयांची लाच घेतल्याची चर्चा जोर धरू लागली. हे आरोप सत्य-असत्य असले तरी, अशा चर्चेमुळे लोकांचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होतो. फसवणूक प्रकरणात न्याय मिळेल, अशी जी आशा नागरिकांनी ठेवली, ती अशा आरोपांमुळे अशा संपत चाली आहे. या प्रकरणातील खरे गुन्हेगार कोण, प्रशासनातील कोण कोण यात सामील होते, आणि लाचखोरीच्या चर्चेमागचं सत्य काय – हे सर्व तपासून पारदर्शकतेने जनतेसमोर मांडणं हे शासन आणि पोलीस यंत्रणेचं कर्तव्य आहे. अन्यथा, ‘गुन्हेगारांना संरक्षण’ अशी जनमानसातील भावना आणखी बळावेल. लोकांच्या मेहनतीचा पैसा आणि भावनांचा गैरवापर करून आर्थिक ‘सुनामी’ घडवणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षा आणि भावी काळात अशा प्रकारांना आळा घालणारी व्यवस्था उभी करणं हा एकमेव उपाय आहे. कायदा आणि प्रशासनातील विश्वास पुनर्स्थापित करणं आजची अत्यावश्यक गरज आहे.

Stock market scam – शेअर मार्केट घोटाळा आणि ‘लाचखोरी’च्या आरोपांचे सावट Read More »

eat more vegetables fruits and whole grains

जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम

मुंबई – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या तणावामुळे महाराष्ट्रात असंतुलित आहार ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. फास्ट फूड, प्रोसेस्ड पॅकेट खाण्याचे पदार्थ आणि जास्त तेलकट-गोड पदार्थ यांच्या खाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य विभागाने नागरिकांना “जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा” असा सल्ला देत एक व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे जागृती करून जमत नाही तर आपण स्वत होऊन काही कर्तनही तोपर्यंत काही होत नसते. का आवश्यक आहे भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य? तज्ज्ञांच्या मते, हंगामी भाज्या व फळे यामध्ये विटामिन, मिनरल्स, फायबर मोठ्या प्रमाणात असते, जे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील सूज कमी करते. संपूर्ण धान्य – जसे की गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राउन राईस – यात ‘कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स’ आणि भरपूर फायबर असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवते व जास्त वेळ पोट भरल्याची भावना देते. महाराष्ट्रातील आहाराची चिंता नाशिक, पुणे, कोल्हापूर,मुंबई, अहिल्यानगर, नागपूरसारख्या शहरांत फास्ट फूड संस्कृती झपाट्याने वाढते आहे. ग्रामीण भागातसुद्धा पॅकेट नाश्ता, गोड पेये आणि पॉलिश केलेले तांदूळ यांचा वापर वाढतोय. परिणामी, पारंपरिक पौष्टिक अन्न – उदा. ज्वारीची भाकरी, भाजी, डाळ, ताक – हळूहळू आहारातून गायब होत आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन सरकारची भूमिका आरोग्य मंत्रालयाने शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत स्तरावर ‘आरोग्यदायी आहार’ जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यामध्ये पाककला स्पर्धा, आरोग्य शिबिरे, तसेच ‘संतुलित आहार’ विषयक कार्यशाळा आयोजित करण्याची तयारी आहे. विश्लेषण आहारातील बदल हा फक्त वैयक्तिक सवय नसून सार्वजनिक आरोग्य धोरणाचा भाग असावा लागेल. महाराष्ट्राला कुपोषणापासून स्थूलतेकडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य आपल्या ताटात नसेल, तर उद्या रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागतील.

जास्तीत जास्त भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य खा; संतुलित आहारासाठी तज्ज्ञांची जनजागृती मोहीम Read More »

import duty hike hits maharashtra hard exports decline industry and agriculture in crisis

आयात शुल्क वाढीचा महाराष्ट्रावर तगडा फटका; निर्यात घटली, उद्योग-शेती संकटात

मुंबई – आयात शुल्क वाढ, निर्यात घट, कोल्हापूर हळद, नाशिक बेदाणे, इचलकरंजी कापड उद्योग, विदर्भ कापूस… या सगळ्या नावांच्या मागे आता एकच सत्य लपलेलं आहे – महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. केंद्र सरकारच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयामुळे राज्यातील प्रमुख निर्यात वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता गमवावी लागत आहे. व्यापारी संघटनांच्या मते, निर्यातदार आता विदेशी बाजारपेठ गमावण्याच्या भीतीने आहे. कोल्हापूर-सांगलीतील हळद उत्पादक, नाशिकमधील बेदाणे व द्राक्ष शेतकरी, इचलकरंजीतील पॉवरलूम उद्योग आणि विदर्भातील कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. वाढीव शुल्कामुळे विदेशी खरेदीदार करार रद्द करत आहेत, तर अनेकांनी नवीन ऑर्डर देणे थांबवले आहे. तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार आणि निर्यात महसूल या तिन्ही गोष्टींवर या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारने केंद्राशी तातडीने चर्चा करून आयात शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली नाही, तर राज्याच्या अर्थचक्राला दीर्घकालीन धक्का बसू शकतो. विश्लेषण : मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा घोषणा करताना जागतिक व्यापारातील ‘किंमत स्पर्धा’ या मूलभूत सत्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आयात शुल्क वाढ म्हणजे संरक्षणवादाचा मार्ग, पण तोच मार्ग महाराष्ट्रातील शेतकरी, निर्यातदार आणि उद्योगपतींच्या कडू अनुभवाचा कारणीभूत ठरत असेल, तर धोरणकर्त्यांनी आरशात पाहायला हवं.

आयात शुल्क वाढीचा महाराष्ट्रावर तगडा फटका; निर्यात घटली, उद्योग-शेती संकटात Read More »

sawedi land case – missing records, fake signatures, yet rush to sell

सावेडी जमीन प्रकरण – गायब नोंदी, बनावट सह्या, तरीही विक्रीची घाई…

अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam – सावेडीतील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरण चौकशीच्या टप्प्यात असतानाच विक्रीची घाई सुरू असल्याने महसूल प्रशासन आणि निबंधन यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तीन गंभीर प्रश्न प्रशासनासमोर कायम आहेत – गायब झालेल्या नोंदी सापडणार का? बनावट सह्या सिद्ध होणार का? आणि अखेर हा व्यवहार कायदेशीर ठरणार का? १९९१ च्या खरेदीखताच्या आधारे २४ एप्रिल २०२५ रोजी खरेदीदार पारसमल मश्रिमल शहा यांनी नोंद घेण्याचा अर्ज दाखल केला. चार दिवसांत फेरफार नोंद घेऊन १७ मे २०२५ रोजी तत्कालीन मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी ती मंजूर केली. त्यानंतर तक्रारदार सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि प्रकरण मंडल अधिकाऱ्यांच्या चौकशीत गेले. चौकशीत शहा यांचे जनरल कुलमुखत्यारपत्रधारक गणेश शिवराम पाचरणे यांनी सुरुवातीला खुलासा देण्यास नकार दिला, मात्र अप्पर तहसीलदारांकडे सुनावणीदरम्यान अचानक “चूक दुरुस्ती लेख” सादर केला. हा दस्त आधीपासून अस्तित्वात असतानाही सुरुवातीला त्याचा उल्लेख न होणे, संशयाला अधिक वाव देणारे ठरले आहे. याशिवाय, १९९१ च्या मूळ खरेदीखतातील एका साक्षीदाराने “सही माझी नाही” असा दावा केला, तर १९९२ च्या चूक दुरुस्ती लेखातील दुसऱ्या साक्षीदारानेही “मी कधी सहीच केलेली नाही” असे स्पष्ट सांगितले. म्हणजेच, दोन्ही दस्तऐवजांवरील सह्यांच्या वैधतेवरच मोठा प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, सह दुय्यम निबंधक वर्ग २, अहिल्यानगर क्र.१ (दक्षिण) कार्यालयातील तपासणीत दस्त क्र. ४३०/१९९१ संदर्भात फक्त ‘खंड क्र. १९६’ उपलब्ध झाला आहे. सुची क्र. २, अंगठा-पुस्तक, डे बुक, पावती पुस्तक यांसारखी मूलभूत नोंदवही अद्याप सापडलेली नाही. त्या हरवल्या, लपवण्यात आल्या की कधी तयारच झाल्या नाहीत, हे अजूनही अज्ञात आहे. मात्र, इतक्या गंभीर विसंगती व चौकशी सुरू असतानाही संबंधित जमिनीची विक्री सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल विभाग व निबंधन यंत्रणेसमोर हे मोठे आव्हान असून, चौकशी आणि निर्णयाआधी विक्री थांबवणे हा त्यांचा कस लागणारा कसोटीचा क्षण ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की – गायब नोंदी शोधल्या जातात का, बनावट सह्यांचे रहस्य उलगडते का, आणि अखेर हा व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसतो का? की सर्व प्रश्न अनुत्तरित राहून पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याला मोकळा रस्ता मिळणार? इथे मी तुमच्यासाठी धारदार, पॉइंट-बाय-पॉइंट स्वरूपात बातमी तयार केली आहे — वाचकाला थेट धक्का देणारी आणि शंका निर्माण करणारी: जमीन व्यवहाराचा गूढ – प्रश्नच प्रश्न!

सावेडी जमीन प्रकरण – गायब नोंदी, बनावट सह्या, तरीही विक्रीची घाई… Read More »

aditi tatkare

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नसल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिण योजनेला यशस्वी वर्षपूर्ती होत आहे. सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांना आम्ही या योजनेचा लाभ देत आहोत. दोन दिवसांपूर्वीच जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक योजना ही दरवर्षी एक प्रक्रियेतून जात असते. पात्रतेचे काही नियम या योजनेसाठी आहेत.माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काही डेटा आम्हाला दिला आहे.त्यांनी दिलेल्या डेटानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू राहणार, अपात्र असणाऱ्यांचा लाभ कमी होईल. 2100 रुपये देण्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री व  दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ योग्य वेळी घेईल. मात्र आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत. ही योजना बंद होणार नाही. असं माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी पिंक रीक्षा ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापुरात 700 पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना रिक्षा वाटप केले जात आहे. यावर्षी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी 400 पिंक रिक्षाचे उद्दिष्ट असल्याचीही माहिती दिली.

Aditi Tatkare : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मंत्री आदिती तटकरेंची ग्वाही Read More »

img 20250809 wa0001

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व”

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती. पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो? या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे. आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते. हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत. म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व” Read More »

Asia Cup 2025: भारताला धक्का, ‘हा’ खेळाडू आशिया कपमधून अन् वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून बाहेर

Asia Cup 2025 : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आशिया कप 2025 मध्ये दिसणार नाही. तसेच तो ऑक्टोबर महिन्यात वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील खेळताना दिसणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जाईल. त्यानंतर काही दिवसांनीच भारताला वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची घरच्या कसोटी मालिका खेळायची आहे, जी 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. पंतच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला नवीन रणनीती बनवावी लागेल. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये दुखापत मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतला हा धक्का बसला, जेव्हा क्रिस वोक्सचा यॉर्कर त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला लागला. त्यावेळी पंत फलंदाजी करत होता आणि दुखापत इतकी गंभीर होती की त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले. स्कॅनमध्ये पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आणि डॉक्टरांनी किमान सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर दुखापतीमुळे पंत अंतिम सामन्यात म्हणजेच ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात भारताने इंग्लंडला रोमहर्षक पद्धतीने सहा धावांनी पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2- 2असा केला. वृत्तानुसार, पंतची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही. भारताची आशिया कप मोहीम भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची शक्यता आहे. भारताला पाकिस्तान, यूएई आणि ओमानसह ग्रुप ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल, जेणेकरून आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी करता येईल.

Asia Cup 2025: भारताला धक्का, ‘हा’ खेळाडू आशिया कपमधून अन् वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून बाहेर Read More »