DNA मराठी

ट्रेंडिंग

jalna rainfall subsidy scam

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल

Jalna Rainfall Subsidy Scam : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अंबड पोलीस ठाण्यात 28 जणांविरुद्ध बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी विलास कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी परस्पर हडप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तावेज तयार करून शासकीय निधीचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीसमोर आली आहे. तर दुसरीकडे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करणं बाकी आहे. प्रकरण काय? आरोपींनी 2022 ते 2024 दरम्यान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी राज्य सरकार कडून आलेला 24 कोटी 90 लाख 77 हजार रुपयांचा निधी बोगस खात्यात वळवून हडप केल्याचं चौकशी समितीच्या चौकशीत उघड झालंय. दरम्यान आरोपींवर गुन्हे दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे गणेश ऋषींदर मिसाळ कैलास शिवाजीराव घारे विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर बाळु लिंबाजी सानप पवनसिंग हिरालाल सुलाने शिवाजी श्रीधर ढालके कल्याणसिंग अमरसिंग बमनावत सुनिल रामकृष्ण सोरमारे मोहित दत्तात्रय गोषिक चंद्रकांत तुकाराम खिल्लारे रामेश्वर नाना जाधव डिगंबर गंगाराम कुरेवाड किरण रविंद्रकुमार जाधव रमेश लक्ष्मण कांबळे सुकन्या श्रीकृष्णा गवते कृष्णा दत्ता मुजगुले विजय हनुमंत जोगदंड निवास बाबुसिंग जाधव विनोद जयराम ठाकरे प्रविण भाऊसाहेब शिनगारे बप्पासाहेब रखमाजी भुसारे सुरज गोरख बिक्कड सुशिल दिनकर जाधव (सहायक महसूल अधिकारी) वैभव विश्वंभरराव आडगांवकर (नेटवर्क इंजिनियर) विजय निवृत्ती भांडवले (तत्कालिन संगणक परिचालक) रामेश्वर गणेश बारहाते (महसूल सेवक) आशिष प्रमोदकुमार पैठणकर (सहायक महसूल अधिकारी) दिनेश बेराड (सहायक महसूल अधिकारी)

Jalna Rainfall Subsidy Scam : मोठी बातमी! जालन्यातील बहूचर्चित अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल Read More »

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Maharashtra Government: तरुण-तरुणींसाठी इस्त्राईल देशात “गृह-आधारित आरोग्य सेवा कर्मचारी” म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे पाच हजार उमेदवारांना ही संधी मिळेल. इच्छुक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे. या नोकरीसाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात कौशल्य आणि अनुभव असणे महत्त्वाचे आहे. यासाठी भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त आणि किमान 990 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, नर्सिंग, फिजिओथेरपी, किंवा नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए (GDA), एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बीएससी नर्सिंग (B.Sc. Nursing), किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग (Post B.Sc. Nursing) याशिवाय, उमेदवाराला इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. या नोकरीसाठी दरमहा 1 लाख 61 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. निवड प्रक्रिया आणि सुविधा इस्त्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठीची निवड प्रक्रिया महाराष्ट्रातच पार पडेल. यासाठी नियुक्ती, आरोग्य तपासणी, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन आणि मदत दिली जाईल. तसेच, इस्त्राईलमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय विमा, राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. या संधीबद्दल अधिक माहिती https://maharashtrainternational.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असेही पंतम यांनी सांगितले.

Maharashtra Government: तरुणांनो इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : टाटा मेमोरिअल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तांबाटी (ता. खालापूर) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या रुग्णालयासाठी दिलेल्या १० हेक्टर जमिनीच्या भाडेपट्टा करारवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   रुग्णालयातील १०० खाटांपैकी १२ टक्के खाटा समाजातील गरीब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शासकीय कर्मचारी या गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. तसेच शासकीय योजनेनुसार कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत. रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा अटींसह या रुग्णालयाला मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. तर दुसरीकडे कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-२ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.  

Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगावर सवलतीच्या दरात उपचार होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

mbbs

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका

Maharashtra Government : महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निजी अनएडेड (Unaided) मेडिकल महाविद्यालयांमधील MBBS प्रवेशासाठी राखीव जागांचे प्रमाण 50 टक्क्यांवरून थेट 25 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या मुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहे. या मुळे आरक्षणातील कपातीमुळे एकूण 766 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी हुकणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याबाबत डॉ. सिद्धांत भारणे यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत म्हटले की, “हा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून हे एक नियोजित षडयंत्र असल्यचे बोलले आहे” राज्यातील विविध भागातील विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू केला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईसह अनेक शहरांमध्ये आंदोलने होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पूर्वी 50 टक्के आरक्षणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपला वाटा निश्चित करता येत होता. मात्र आता तो हिस्सा अर्ध्यावर आल्याने सामाजिक समतेच्या तत्त्वाला धक्का बसल्याची टीका होत आहे. आधीच महागडी फी व आर्थिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते, परंतु यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयाने आता राजकीय वादाला देखील तोंड फुटले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला असून, “शैक्षणिक संधी कमी करून सामाजिक न्यायाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका Read More »

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन

IMD Rain Alert – अहिल्यानगरसह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज १९ ऑगस्ट रोजी देखील नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. भिमा नदी (दौंड पूल) -३०४४ क्युसेक, सीना नदी (सीना धरण) २६९ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

IMD Rain Alert: आज नगर जिल्ह्यात धो धो पाऊस, हवामान खात्याचा यलो अलर्ट; नगरकरांना दक्षतेचे आवाहन Read More »

img 20250819 wa0001

Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल

Raghuji Bhosle Sword : 18व्या शतकातील प्रसिद्ध मराठा सेनानी रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर मुंबईत दाखल झाली आहे. तब्बल दोन शतकांनंतर या अमूल्य वारशाचा परतावा होत असून, मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेची ही तलवार पुन्हा एकदा लोकांसमोर येणार आहे. या तलवारीचे मुंबईत मोठ्या जल्लोषात व कलात्मक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विविध कलासंस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तलवारीसोबतच भोसले घराण्याच्या वारशाशी संबंधित दुर्मीळ वस्तूंचा समावेश होता. इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या मते, रघूजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा प्रभाव विदर्भापासून मध्य भारतापर्यंत विस्तारला. त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ही तलवार आजही मराठ्यांच्या शौर्याचा दुर्मिळ पुरावा मानली जाते. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक व्याख्याने आणि प्रदर्शन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, मराठा इतिहास रसिकांसाठी हा उपक्रम एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल Read More »

team india

Asia Cup 2025 : शुभमन-यशस्वी आऊट; आशिया कपमध्ये ‘या’ 2 खेळाडूंना मिळणार संधी

Asia Cup 2025 : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन गेल्या काही काळापासून सलामीवीरांची भूमिका उत्तम प्रकारे बजावत आहेत. त्यामुळे आशिया कपसाठी दोघांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना टी-20 संघात स्थान देऊ इच्छिते असा अंदाज वर्तवला जात होता. गिलला सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यासाठी त्याला टी-20 चा उपकर्णधार बनवले जाऊ शकते असेही वृत्त आहे. पण, ताज्या अहवालानुसार, या दोघांनाही आशिया कप 2025 मध्ये संधी मिळणार नाही. म्हणूनच गिल आणि जयस्वाल यांना संधी मिळणार नाही. स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, निवडकर्ते एक मोठा निर्णय घेणार आहेत आणि शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना आशिया कप 2025 संघाबाहेर ठेवणार आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर त्याच कोअर ग्रुपला कायम ठेवण्याची योजना आखत आहेत, ज्यांनी अलीकडेच गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. हे दोन्ही खेळाडू परत येऊ शकतात अहवालात असेही म्हटले आहे की निवडकर्ते श्रेयस अय्यर आणि जितेश शर्मा यांना आशिया कप संघात समाविष्ट करू इच्छितात. जितेश शर्माने आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी खूप चांगली कामगिरी केली. त्याने मोठे शॉट्स खेळून सर्वांना प्रभावित केले आणि संघाला पहिले विजेतेपद जिंकून देण्यात योगदान दिले. त्याच वेळी, श्रेयस अय्यरने त्याच्या पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून, दोघांनाही आतापर्यंत एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. श्रेयस अय्यरने डिसेंबर 2023 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर जितेश शर्माने जानेवारी 2024 मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

Asia Cup 2025 : शुभमन-यशस्वी आऊट; आशिया कपमध्ये ‘या’ 2 खेळाडूंना मिळणार संधी Read More »

chhagan bhujbal

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहे तर नाशिकमध्ये तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. तर आता नाशिक जिल्ह्यात एकच पक्षाचे 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना, आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे 7 आमदार असताना, पालकमंत्री पदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायला लावेल. असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच 7 आमदार एकच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. अजित पवार आणि सुनील तटकरेंशी मी बोलेन, एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो, तर 7 आमदारांसाठी पालकमंत्री पदासाठी शक्ती लावा. पालकमंत्री पद मिळाले, तर इच्छुक नाही तर नाही सर्व मंत्र्यांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचे झेंडावंदन जास्तीत जास्त मी केल आहे. 1991 पासून मी झेंडावंदन करतो आहे. त्यामुळे मला त्याचे काही दुःख नाही. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले Read More »

navnath ban

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल

Navnath Ban : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की “उबाठा गटाच्या 52 पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरे यांना महाजोकर करून घरी बसवले आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी.” ते पुढे म्हणाले की “देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही आणि तुमचा गटच आहे, हे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.” मुंबईतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नवनाथ बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. मातोश्री-2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत.” राऊतांच्या 2029 च्या कोकणातील भविष्यवाणीस उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले “2024 च्याच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमच्या गटाला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या आणि जनता तुम्हाला घरी बसवून आली. 2029 ची वाट पाहू नका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बुच लावतील.” नारायण राणे यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नवनाथ बन म्हणाले की, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरताना राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे. नारायण राणे यांच्या कर्तृत्वामुळे शिवसेना उभी राहिली आणि आज तुम्ही अस्तित्वात आहात. त्यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करावा.”

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल Read More »

ahul gandhi bharat yatra dna marathi

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ आजपासून सुरू | १ सप्टेंबरला पटण्यामध्ये महामेळावा

दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधून ‘वोटर अधिकार यात्रा’ ला सुरुवात केली आहे. या यात्रेचा उद्देश देशातील निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या ‘वोट चोरी’च्या आरोपांवरचे मुद्दे मांजाणते समोर मांडणे आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. १३०० किमी, २० जिल्ह्यांतून प्रवास हि यात्रा सुमारे १३०० किलोमीटर लांबीची ही यात्रा बिहारमधील २० जिल्ह्यांतून जाणार आहे. राहुल गांधी विविध ठिकाणी पायपीट करणार असून, ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या यात्रेसाठी जोरदार तयारी केली आहे. १ सप्टेंबरला पटण्यात महामेळावा यात्रेचा समारोप १ सप्टेंबर रोजी पटण्याच्या गांधी मैदानात होणार असून, तेथे मोठा जनसमुदाय जमण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी या सभेतून थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ‘वोट चोरी’ आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेच्या अभावावर कठोर भूमिका मांडणार आहेत. राजकीय पार्श्वभूमी विश्लेषकांचे मत आहे की, बिहारमधून सुरू झालेली ही यात्रा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरुण मतदार, शेतकरी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न मानला जातो. काँग्रेसची भूमिका पक्षाचे म्हणणे आहे की, लोकशाही प्रक्रियेचे रक्षण आणि मतदार हक्कांचे संरक्षण हीच या यात्रेची खरी ताकद आहे. कोणत्याही प्रकारे मताधिकार हिरावला जाणार नाही, हा संदेश काँग्रेस या मोहिमेद्वारे देत आहे.

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ आजपासून सुरू | १ सप्टेंबरला पटण्यामध्ये महामेळावा Read More »