DNA मराठी

शेती

img 20251015 wa0014

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी, वाहतूक मुकादम कामगार युनियनने ऊसतोड मजुरांच्या प्रलंबित विमा व मजुरीतील फरकाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे. युनियनचे गहिनीनाथ थोरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई यांना पाठवलेल्या निवेदनात या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १४ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. युनायटेड इन्शुरन्स कंपनीमार्फत २००३ पासून उसतोड कामगारांसाठी विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत सुरू होता आणि त्यातून राज्यभरातील हजारो कामगारांना जवळपास १४०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, २०२२ नंतर शासनाने साखर कारखान्यांकडून प्रती टन १० रुपये दराने विमा कपात केली असून, सुमारे १७८ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु ही रक्कम विमा कंपनीकडे जमा न झाल्याने कामगारांना एकही लाभ मिळालेला नाही, असा गंभीर आरोप युनियनने केला आहे. तसेच, ४ सप्टेंबर २०२४ रोजी उसतोड मजुरीत ३४ टक्के वाढ जाहीर करण्यात आली होती, मात्र अद्याप या वाढीचा फरक कामगारांना मिळालेला नाही. शासनाने विमा व मजुरी फरकाचा प्रश्न तातडीने सोडवून कामगारांचे देणे द्यावे, अशी मागणी युनियनने केली आहे. याबाबत शासन, विमा कंपनी आणि साखर संघाच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संप अपरिहार्य होईल, असा इशारा थोरे पाटील यांनी दिला आहे. या संपामुळे ऊस तोडणी हंगाम ठप्प होण्याची शक्यता असून, सरकारने हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही तर साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहू शकते, असा इशारा युनियनने दिला आहे.

Ahilyanagar News : उसतोड मजुरांना विमा व भाववाढ फरक द्या; अन्यथा 14 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा Read More »

oplus 16908288

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही काही भागात वातावरणात आर्द्रता आणि ढगाळपणा राहील त्यामुळे अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात 18 ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच उघड्यावर ठेवलेले धान, भुसा किंवा जनावरांचे खाद्य झाकून ठेवावे आणि हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: शेतकऱ्यांनो काळजी घ्या; राज्यात पुन्हा वादळी पावसाची शक्यता Read More »

rain alert

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert : तीन – चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू होता. तर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४ ऑक्टोबर रोजी वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका   पुणे, नाशिक,अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.   सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,०३८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६,३१० क्युसेक, जायकवाडी धरणातून २८,२९६ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १,३५६ क्यूसेक,ओझर बंधारा २,७५७ क्युसेक, मुळा धरणातून ३,००० क्युसेक, घोड धरणातून ४,००० क्युसेक, सीना धरणातून ३,३९३ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ५०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,२२० क्युसेक, खैरी धरण येथून ५१९ क्सुसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या  केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

IMD Rain Alert : नगरकरांनो जिल्ह्यात आज धो धो पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

raj thackeray

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत

Raj Thackeray: राज्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने पिके वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरत आहे. तर दुसरीकडे सरकारमधील अनेक मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत परिस्थिती जाणून घेत आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील रविवारपासून मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे. मनसेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे या दौऱ्यात लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर काही जिल्ह्यात जाणार आहे. तर दुसरीकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बीज बियाणे आणि खते मनसेकडून दिली जाणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण रविवारपासून मदत घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार. लातूर, नांदेड, सोलापूर, धाराशिव आणि इतर भागातही मनसेची मदत पोहोचवली जाणार. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली बी-बीयाने आणि खते मनसेकडून दिली जाणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Raj Thackeray: रविवारपासून राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; पूरग्रस्त शेतकऱ्यांना करणार मदत Read More »

rain

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर

Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भाग आधीच पूरसदृश परिस्थितीने त्रस्त आहेत, ज्यामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मदत आणि बचाव कार्य तीव्र केले जात आहे, तर स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मृत्यू राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, नाशिक जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू घर कोसळून झाला आहे. धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत, महाराष्ट्रात 11,800 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मराठवाड्याला सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले, ज्यामुळे पैठण परिसरातील सुमारे 7000 लोकांना बाहेर काढण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर हर्सूल सर्कलमध्ये विक्रमी 196 मिमी पावसाची नोंद झाली, तर बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी गावातील एका मंदिरात अडकलेल्या 12 जणांना वाचवले. नांदेडमधून सुमारे 970 लोकांना बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरात सोळा एनडीआरएफ पथके आधीच तैनात आहेत, तर पुण्यात दोन अतिरिक्त पथके सज्ज आहेत. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने, मुख्य लक्ष संवेदनशील भागातील लोकसंख्येला बाहेर काढण्यावर असले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मुसळधार पाऊस किती काळ सुरू राहील? आयएमडीने मंगळवारपर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानंतर, संपूर्ण आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रवाशांना पाणी साचलेले रस्ते टाळण्याचा, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा आणि गर्दीच्या वेळी ट्रेन अपडेट्स तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर Read More »

maharashtra rain

Maharashtra Rain Alert : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा टाहो

Maharashtra Rain Alert: जालना जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या सोयाबीन, मका, कपाशी या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हे पूर्ण पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नुकसानीची पाहणी काल महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्या आदेशावरून अधिकारी जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेत शिवारात आले असता, या अधिकाऱ्यांसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने गुडघ्या इतक्याला पाण्यात बुडालेल्या सोयाबीनच्या शेतात बसून या अधिकाऱ्यांसमोर टाहो फोडला आहे व अधिकाऱ्यांना व सरकार आम्हाला वाचवा कारण आमचे पूर्ण पीके पाण्यात बुडाली आहे, कर्ज काढून आम्ही हे खरिपाचे पिके पेरणी केली आता काढणीला आली होती. मात्र, पूर्ण पिके गेली आहे, असा टाहो या शेतकऱ्याने फोडला. तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे. फक्त फसवे आश्वासन देऊ नका कृषी मंत्री काल आले व गेले त्यांनी ठोस भूमिका घेत तात्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा किंवा आदेश द्यायची होती. मात्र, तसे न करता त्यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत पंचनामे करण्याचे आदेश दिले असे म्हणत कृषीमंत्र्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण पीक पाण्यात बुडाली आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशावरून आले असून आम्ही रितसर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहोत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Maharashtra Rain Alert : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा टाहो Read More »

raj thackeray

Raj Thackeray: ओला दुष्काळ जाहीर करा अन् मदत द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Raj Thackeray: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी विरोधक करत आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी या पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे… त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा. १) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल. २) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे. ३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा. ४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं. ५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच. सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं. आपला राज ठाकरे

Raj Thackeray: ओला दुष्काळ जाहीर करा अन् मदत द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता

Devendra Fadnavis: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात, तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरित केले जाते. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे जीआर काढण्यात येत आहेत. मदतकार्य कुठेही थांबलेले नाही . मृत्यू, जनावरांचे नुकसान, घरांचे नुकसान यांसारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली असून, निधीची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. धुळे, जळगाव, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत मदतकार्य धाराशिव, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याची व्यवस्था सरकारने केली आहे. पूरामुळे जमिनी खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल. केंद्राकडे प्रस्ताव, पण राज्य मागे हटणार नाही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. पण राज्याने तातडीने मदत देणे प्रारंभ केले आहे. केंद्राची मदत मिळेलच, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे. सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सज्ज हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री करणार अतिवृष्टीचा भागाचा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरस्थितीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता Read More »

rain

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका

Rain Alert: जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. बचावकार्याची ठळक माहिती अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले. मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका Read More »

rain

Ahilyanagar Rain Alert: नगर जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

Ahilyanagar Rain Alert: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २३ आणि २४ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १०,१९८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, ओझर बंधारा ४,२९९ क्युसेक, मुळा धरणातून ५,००० क्युसेक, घोड धरणातून ३,००० क्युसेक, सीना धरणातून ११,५६० क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ३०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,६०० क्युसेक, खैरी धरण येथून ९,६१३ इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ahilyanagar Rain Alert: नगर जिल्ह्यात 24 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट अन् मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »