DNA मराठी

Pune

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »

chandrashekhar bawankule on ajit pawar

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने गेल्या सात वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांच्या या गंभीर आरोपामुळे आता महायुती मधील घटक पक्ष भाजप देखील आक्रमक झाला असून अजित पवारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर आम्ही आरोप करायला सुरुवात केली तर त्यांच्या अडचणीत वाढ होईल असं प्रत्युत्तर दिल्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजितदादांनी जे मानलं खऱ्या अर्थाने त्यांनी भाजपवर टीकाटिपणी केली आहे, भारतीय जनता पार्टी बद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या. समन्वय समितीमध्ये असं ठरलं होतं की मित्र पक्षाचे मनभेद आणि मतभेद होणार नाहीत, अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला हव्या होत्या,परंतु जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाळलं नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलताना म्हणाले की, रवींद्र चव्हाण म्हणाले ती गोष्ट खरी आहे की मित्र पक्षात खडा पडेल असं विधान कोणी करू नये. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे निवडणूक लढण्यासाठी काहीही व्हिजन नसतं, तेव्हा लोक निगेटिव्ह बातम्या तयार करून किंवा भावनात्मक करून मतं घेण्याचा प्रयत्न करतात असं बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे विकास काम करू शकत नाही तसेच त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या जाहीरमान्यावर देखील भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासनाची व केलेला जाहीरनामा काहीच पूर्ण करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे, ते मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची काम केली, ते उद्धव ठाकरे करू शकत नाही असेही ते म्हणाले. मुंबईला सर्व जगातलं सुविधायुक्त शहर, भारतातला सर्वात विकसित शहर, मुंबईचा व्हिजन 2047 चा मॅप देवेंद्रजींनी केला आहे . उद्धव ठाकरे यांच्या कार्यकेळाचा अभ्यास जर केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, किती खोटारड्या घोषणा केल्या त्या लोकांना माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेला जाहीरनामा किंवा दिलेली आश्वासन, काहीच पूर्ण करणार नाही.

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: मित्र पक्षात मतभेद होणार नाही याची अजितदादांनी काळजी घ्यावी ; बावनकुळे स्पष्ट म्हणाले Read More »

oplus 16908288

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड 10 मधील भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव होत्या त्यांनी माघार घेतल्यामुळे चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या आधी भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे बिनविरोध झाले आहे. प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले होते. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले. विशेष म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections : भाजपसाठी आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा नगरसेवक बिनविरोध Read More »

ajit pawar

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे?

Ajit Pawar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी चर्चा फिस्कटली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक सकाळी बारामती हॉस्टेल मधून पोलीस संरक्षण,पोलीस ताफा काहीही न घेता एकटे निघाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके कुठे गेले याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामती हॉस्टेल मधून निघून जिजाई या त्यांच्या निवासस्थानी असण्याची शक्यता आहे. अजित पवार बारामती हॉस्टेल मधून ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्या मध्ये असल्याने अजित पवार देखील जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युतीसाठी अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली असून लवकरच युती बाबत निर्णय होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत एकत्र लढणार असून काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Ajit Pawar: पुण्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा; उपमुख्यमंत्री अजित पवार नेमके गेले कुठे? Read More »

rahul kalate

Rahul Kalate : शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे भाजपवासी

Rahul Kalate : राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मातब्बर नेते, महापालिकेतील माजी गटनेते व माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राहुल कलाटे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेवकांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला होता, परंतु कलाटे यांच्या प्रवेशाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “राहुल कलाटे यांच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया.” यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “शहरातील एक तरुण तडफदार नेतृत्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असताना मला आनंदच होत आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपा अबकी बार सव्वाशे पार होईल. या प्रवेशामुळे भाजपा पिंपरी चिंचवड शहराचे मजबुतीकरण होईल. राहुल कलाटे यांचे भाजपामध्ये स्वागत करतो.” पक्ष प्रवेशानंतर राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, कणखर व विकासाभिमुख नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देता येईल, या विश्वासातूनच हा निर्णय घेतला आहे. लोकांची कामे व्हायला पाहिजेत हीच माझी भूमिका राहिलेली असून, यासाठी मागील 20 वर्षांपासून मी संघर्ष करतोय. लोकांनी कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहे. आणि हाच विश्वास मी भाजपा नेतृत्वाकडे सोपवत आहे.” पुढे बोलताना कलाटे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या या शहराला देश-विदेशात ओळख मिळवून दिली आहे. मात्र, शहरात काही स्थानिक समस्या अद्यापही प्रलंबित आहेत. या सर्व समस्या सोडवून प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय्य हक्क मिळवून देणे आणि सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच माझे प्रमुख ध्येय आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी काम करत राहणार!” या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. राहुल कलाटे यांचा प्रशासकीय अनुभव, व्यापक जनाधार, संघटन कौशल्य आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची कार्यपद्धती यामुळे भाजपाला निश्चितच बळ मिळणार आहे. या प्रवेशामुळे भाजपा शत प्रतिशत कडे वाटचाल करेल असे बोलले जात आहे. शहरातील विरोधी गटातील सर्वात मोठा प्रमुख नेता व आक्रमक चेहरा भाजपामध्ये दाखल झाल्याने भाजपासाठी स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक व सकारात्मक बदल घडणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा शहरभर सुरू आहे.

Rahul Kalate : शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे भाजपवासी Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक ३६, ३७, आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र ३५, ४१, ४२, आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. परवानगीपेक्षा जादा उत्खनन ईटीएस मोजणीमध्ये ३ लाख ६३ हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, ९० हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे. निलंबित अधिकाऱ्यांची नावे गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.) दंड आणि महसूली कारवाई ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय चौकशी निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule: उत्खनन गैरव्यवहार प्रकरण, चार तहसीलदारांसह दहा जण निलंबित Read More »

sahyadri hospital

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल

Sahyadri Hospital Case : पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची 10 डिसेंबर रोजी तोडफोड केल्याची धक्कादाय घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कारवाई करत सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केली नाही, त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले होते. तर आता या प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम सकपाळ, गौरव सकपाळ, विश्वजीत कुमावत, कुणाल सकपाळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sahyadri Hospital Case : सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरण; सात जणांवर गुन्हा दाखल Read More »

pune crime

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त

Maharashtra Crime : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे 16 चाकी टँकर क्र. एमएच-12 वायबी-9186 मधून 39,800 लि. मद्यार्क व एमएच-12 युएम-9887 मधून 39,800 लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी 200 लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी 180 लि. मद्यार्क, 35 लिटर कॅन – 35 लि. मद्यार्क, 20 लिटर प्लास्टिक बादली – 20 लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(अ)(ई), 67, 81, 83, 90 व 103 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Maharashtra Crime: मद्यार्क चोरी प्रकरण, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

pune crime

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल

Pune News : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात देखील महिलांवर अत्याचारासारखे घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेने पुरुषावर गुंगी आणणारे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केल्या असल्याची घटना घडली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील 47 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणाची ओळख तुळजापूर येथे देवदर्शनादरम्यान आरोपी महिलेशी झाली. सुरुवातीला ‘भाऊ’ म्हणून तिने पीडित तरुणाच्या कुटुंबाशीही जवळीक वाढवली. पुढे वारंवार संपर्क साधत ती त्यांच्या घरात येऊन राहू लागली. घरात राहत असताना त्या महिलेकडून पीडिताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास विरोध केल्यानंतर पीडिताने तिला घर सोडण्यास सांगितले. नंतर माफी मागत ती महिलेला चंदगडसाठी निघाली मात्र बसस्थानकात आल्यानंतर सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला म्हणाली की मला वॉशरुमला जायचे आहे. तसेच मी उघड्यावर जात नाही म्हणत ती एका लॉजवर गेली आणि तरुणालाही आत बोलावून स्वतःला उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगत तुम्हाला मदत करेन तुमच्या मुलाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरीला लावले असे सांगत त्याच्यावर मानसिक दबाव टाकला मात्र तो रागाने निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा तिने पीडिताच्या पत्नीला फोन करून त्याला ‘काशी दर्शनासाठी भाऊ म्हणून’ सोबत घेऊन जाते असे सांगून त्याला 25 फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलावले. तक्रारीनुसार, कोथरूडमधील तिच्या घरी तरुणाला काहीतरी प्यायला दिले त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. विरोध केल्यावर धमकी देण्यात आली मी म्हणेल तसेच करायचे नाहीतर इथेच काहीतरी करेन असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे मला काशीला नेले त्यांनतर काशीत तीन दिवस बळजबरीने ठेवत शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडिताने केला आहे. पत्नीशी संपर्क झाल्यानंतर तिने या महिलेला फोनवर सुनावले, त्यानंतर काही दिवस फोन आला नाही मात्र त्यानंतर आरोपी महिलेकडून दोन लाख रुपयांची मागणी व फोटो व्हायरल करण्याची धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोथरूड परिसरात आणि शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल Read More »

img 20251122 wa0004

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल…

Pune News : स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये प्रामाणिक पणाची सुद्धा कमी नाही. कष्ट आणि प्रामाणिक पणाच्या तत्त्वांवर आयुष्य जगणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अशीच एक प्रामाणिकपणाची आणि पैशांचा लोभ नसणाऱ्या पुण्यातील कचरावेचक मंजू माने यांची कथेची पुण्यात जोरदार चर्चा आहे. सदाशिव पेठेत कचरा वेचत रोजची कष्टाची लढाई लढणाऱ्या अंजू माने यांचा प्रामाणिकपणा पाहून संपूर्ण परिसर थक्क झाला आहे. 20 नोव्हेंबरची सकाळ… साधारण सात वाजता अंजूताई नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा गोळा करत होत्या. त्याचवेळी रस्त्याकडेला एक बॅग पडलेली दिसली. ‘कशाची तरी औषधांची पिशवी असेल’ असा साधा अंदाज करून त्यांनी ती बॅग उचलून फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली. पण नंतर जे दिसलं ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकावी! बॅगेत औषधांसोबत तब्बल दहा लाख रुपये होते. त्या क्षणी पैशाचा लोभ न होता, ‘ही कोणाच्या तरी आयुष्यभराची कमाई असेल’ एवढाच विचार अंजूताईंच्या मनात आला. वीस वर्षांपासून या भागात कष्टाने काम करत असल्यामुळे त्यांना इथलं प्रत्येक घर ओळखीचं. त्यांनी लगेचच लोकांना विचारपूस सुरू केली. तेवढ्यात एक नागरिक अतिशय अस्वस्थ होऊन काहीतरी शोधताना दिसला. अंजूताईंनी त्याला बसवून आधी पाणी दिलं, शांत केलं… आणि त्यांची बॅग हरवली आहे का ते विचारलं. तोंडातून शब्दच फुटेना! खात्री पटल्यावर अंजूताईंनी ती बॅग त्याच्याकडे परत दिली पैशाचा एक नोटही कमी न करता. या प्रामाणिकपणामुळे त्या माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं आणि आसपासच्या नागरिकांच्या मनात अंजूताईंबद्दल प्रचंड आदर. लोकांनी स्वखुशीने साडी, थोडी रोख आणि भरभरून कौतुक देत त्यांचा सत्कार केला. अंजू माने यांची ही कृती म्हणजे खरा मानवीपणा कसा असतो याचं जिवंत उदाहरण. कष्टाची कामं करत असली तरी मन मात्र सोन्यासारखं हीच पुण्याची खरी शान. लाखो रुपयांची हाव मनात न ठेवता पैशांची बॅग परत करणाऱ्या अंजुमाने यांनी खरे लखमोलाची माणसं कशी असतात याच दर्शन घडवलं….

Pune News: कचरावेचक अंजुताईंना दहा लाख रुपयांची बॅग सापडली, पण अंजू ताईंचा प्रामाणिकपणा पाहून सॅल्यूट ठोकाल… Read More »