DNA मराठी

Maratha Reservation

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध

Gondia News :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे.  त्यातच सोमवार 30 सप्टेंबर रोजी आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विशाल आक्रोश मोर्चा काढून विरोध दर्शवला. तर आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे राज्य शासनापुढे आता मोठे पेच निर्माण झाले आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.  असे असतानाच आता आदिवासी समाजकडूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे.  या अनुषंगाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्क कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आदिवासी हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध Read More »

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत. त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.   गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर   बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या  दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्… Read More »

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भयंकर चर्चेत असलेला आणि १४ जून पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या टीम ने आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या लेखणी मधून आणि निर्मिती मधून राज्याच्या पुढे येतोय अस देखील गोवर्धन दोलताडे बोलले , मला या चित्रपटातून एक रुपया देखील कमविणे हा माझा हेतू नाही , उलट मला आनंद होईल की ह्या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय , सर्वांनी जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकत मिळावी  या अनुषंगाने महाराष्ट्रा मधील करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा , त्याचबरोबर ह्या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे पण तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट राज्यभर हाऊसफुल होतोय , भरभरून शो वाढत आहेत , प्रेक्षकांन कडून चित्रपटाची जास्त प्रमाणात मागणी देखील होत आहे असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे बोलले , संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल अस वाटते , त्यांच बरोबर या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत , या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल यांचं गोष्टी साठी बनवलेला आहे असं अभिनेता रोहन पाटील यांनी मत व्यक्त केलं , यावेळी पत्रकार परिषद ला सह निर्माते रामदास एकनाथ मेदगे , जान्हवी मनोज तांबे , विठ्ठल अर्जुन पचपिंड , नितीन लोहोकरे व सर्वच चित्रपटाची टीम उपस्थित होती , चित्रपटाचा संपूर्ण नफा समाजा साठी जाहीर केला जातोय हा खूप धडाडीचा  निर्णय वाटतो , त्यामुळे चित्रपटाची जास्तच चर्चा वाढत चालली आहे असं दिसत आहे.

Manoj Jarange Patil: “संघर्षयोद्धा” चित्रपटाचा 100% पूर्ण नफा हा मराठा समाजाला  निर्माते गोवर्धन दोलताडे यांची मोठी घोषणा Read More »

Maharashtra News: पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल

Maharashtra News: सहकार चळवळीच्या माध्‍यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच  या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्‍या उत्‍कर्षा करीता त्‍यांनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्‍याचे काम येणा-या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ४४ व्‍या पुण्‍यतिथी निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या प्रागणात असलेल्‍या पद्मश्री विखे पाटील यांच्‍या  पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन, अभिवादन केले. याप्रसंगी फौंडेशनच्‍या विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्‍यापक उपस्थित होते.  सहकार चळवळीचे बिज रोवून पद्मश्रींनी समाजातील नाहीरे वर्गाला ख-याअर्थाने आधार निर्माण करुन दिला. सहकार चळवळ ही शेतक-यांच्‍या असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्‍या परिवर्तनात निर्माण केलेले स्‍थान खुप महत्‍वपूर्ण आहे. सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्‍यसथा ही ग्रामीण भागातील मुलांच्‍या उत्‍कर्षासाठी महत्‍वपूर्ण ठरली. इंग्रजी माध्‍यमांचे शिक्षण सुरु झाल्‍यामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्‍या कानाकाप-यात आपले यश सिध्‍द करुन दाखवित आहेत. हीच सहकार चळवळीची यशस्‍वीता असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.  सहकार चळवळीपुढे अनेकांनी आव्‍हानं निर्माण करण्‍याचे प्रयत्‍न केले. पण लोकांच्‍या विश्‍वासामुळे ही चळवळ कोणीही मोडू शकले नाही. उलट या सहकार चळवळीचा आलेख उंचावत गेला. आज देशात सहकार मंत्रालय स्‍थापन होणे ही मोठी उपलब्‍धी सहकार चळवळीसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या स‍ंकल्‍पनेतून सुरु झालेले सहकार मंत्रालय केंद्रीय मंत्री अमित शाह नेतृत्‍वाखाली गतीने पुढे जात आहे.  सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून होत असलेल्‍या निर्णयांचा लाभ गावातील प्राथमिक सोसायट्यांपासून ते सहकारी बॅंकींग आणि कारखानदारीपर्यंत सर्वच सहकारी संस्‍थान होत  असल्‍याचे त्‍यांनी नमुद केले.

Maharashtra News: पद्मश्रींच्‍या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल Read More »

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू

Manoj Jarange Patil :  मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेने राज्यभरात मराठा आंदोलकही आक्रमक होत आहेत. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्याच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र, मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. मनोज जरांगे बॅकफूटवर? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अपशब्द वापरले. यानंतर त्यांचे सहकारी मंचावर आले आणि त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोज जरांगे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अंतरवली सराईत पत्रकारांशी बोलत असताना जरांगे अचानक आक्रमक झाले. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मुंबईतील फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्याला भेट देण्याचे त्यांनी ठरवले आणि लगेच निघाले.  नंतर रात्री जवळच्या भांबेरी गावात मुक्काम करून सकाळी पुन्हा मुंबईला जाण्याचा बेत होता, मात्र प्रशासनाने लादलेल्या विविध निर्बंधांमुळे मनोज जरांगे यांनी आपला निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत परतले आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून त्यांना परत येण्याची विनंती केली आहे. अंबड तालुक्यात हिंसाचार जालना – घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात सोमवारी सकाळी आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्याचा आरोप आहे. बस अंबडहून रामसगावकडे जात होती. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस थांबवून तोडफोड केल्यानंतर ती पेटवून दिली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यात संचारबंदी लागू कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सरकारी कार्यालये, शाळा, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, दूध वितरण, प्रसारमाध्यमे आणि रुग्णालये यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. एसटी बससेवा बंद मनोज जरांगे यांच्या हालचाली पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसेसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे. इंटरनेट डाऊन मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारा अध्यादेश काढला.

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण,इंटरनेट बंद! ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू Read More »