DNA मराठी

Maharashtra

जाती-धर्माचे राजकारण नको अन्यथा होईल वाईट परिणाम

Maharashtra Politics: महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्यात सध्या जाती आणि धर्माच्या मुद्द्यांवर राजकारण केले जात आहे. हे राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता, राज्याच्या विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रांवर खोलवर परिणाम घडवते आहे. याचा सर्वाधिक फटका तरुणाईपासून ते शेतकरी व उद्योजकांपर्यंत सर्वच स्तरांवर बसत आहे. तरुण-तरुणींवर परिणामसध्याच्या सामाजिक वातावरणात तरुण पिढी अधिक गोंधळलेली आणि असमंजस झाली आहे. जातीधर्मावर आधारित विचारसरणीमुळे एकत्रित विकासाच्या संधी कमी होतात. शिक्षण, नोकरी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये गट-तट तयार होतात, जे वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीच्या आड येतात.त्यातून जातीय भेदभावाची बीजे तरुण मनात पेरली जातात आणि द्वेषाचे वातावरण तयार होते. काही तरुण आपल्या योग्य दिशा आणि उद्दिष्ट विसरून राजकारणात गुंततात, आणि त्यांचे खरे सामर्थ्य दुर्लक्षित राहते. परिणामी, मानसिक तणाव, नैराश्य आणि असुरक्षिततेची भावना त्यांच्यात वाढीस लागते. शेती व्यवसायावर परिणामशेतकरी हा समाजाचा कणा मानला जातो. मात्र जातीधर्मावर केंद्रित राजकारणामुळे शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या दुर्लक्षित राहतात. सरकारचे आणि धोरणकर्त्यांचे लक्ष जातीय वादाकडे वळल्यामुळे शेतीसंबंधी महत्त्वाचे निर्णय लांबणीवर पडतात.त्यातच शेतकऱ्यांमध्ये गटबाजी निर्माण होते आणि पारंपरिक एकजूट कमी होते. सहकारी संस्था, बाजार समित्या अशा ठिकाणीही जातीय राजकारण शिरकाव करते, ज्यामुळे शेती व्यवस्थेत पारदर्शकतेचा अभाव जाणवतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सुधारणा यांकडेही दुर्लक्ष होऊन शेती मागे पडते. उद्योग व व्यवसाय क्षेत्रावर परिणामराजकीय अस्थिरतेचा आणि सामाजिक तणावाचा थेट परिणाम उद्योगधंद्यांवर होतो. जातीय तणावामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कचरतात. त्यामुळे उद्योगांना स्थिरता लाभत नाही. शांतता व सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे नवउद्योजकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत नाही.यामुळे तरुणांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा कमी होते. रोजगाराच्या संधी कमी होतात आणि बेरोजगारी वाढते. ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील विश्वासाला तडा जातो आणि व्यापारावर प्रतिकूल परिणाम होतो. जात-धर्मावर आधारित राजकारणामुळे समाजातील समतोल बिघडतो आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक अवघड होते. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण, शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. शिक्षण, रोजगार, शेती आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून विकासाभिमुख विचारसरणीला चालना देणे हे काळाचे मागणे आहे. जाती-धर्माच्या भिंती पुसून एकजुटीने पुढे जाणे हाच खरा महाराष्ट्राचा मार्ग आहे.

जाती-धर्माचे राजकारण नको अन्यथा होईल वाईट परिणाम Read More »

हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना आर. एन. सोनार राज्याध्यक्ष आणि डी.एस.पवार, राज्य सरचिटणीस यांचे नेतृत्वाखाली 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि त्या अंतर्गत असलेले प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचे 22 नोव्हेंबर 2019 चे शासन परिपत्रकावरील 6 वर्षांपूर्वी स्थगित झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे निर्णय तात्काळ थांबविण्यात यावे, बायोमेट्रिक फेस रीडिंगचे अंमलबजावणीस अडचणी येत असल्याने आणि शासनाने तशी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने त्यावरील कार्यवाही त्वरित स्थगित करण्यात यावी या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आले या मागण्या लवकरच मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा आंदोलनकत्यांनी दिला आहे. यावेळी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, कैलास ढगे, प्रसाद टकले, अरुण लांडे, गणेश महाजन, संजय नरवडे, सुनील मुंगसे, नितीन नेवासकर, वैभव चेन्नूर,अर्जुन वाघमोडे, संजय सावंत, संजय राहींज, तसेच महिला प्रतिनिधी शोभा अहिरवाडी, अश्विनी गायकवाड, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, अशोक मासाळ यांसह संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन Read More »

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक!

Salman Khan: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि शाहरुख खानच्या टायगर वर्सेस पठान या चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांना होती मात्र आतापर्यंत या प्रोजेक्टवर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती सलमान खानने एका पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे त्याचे अनेक चाहते नाराज झाले आहे. मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या सिकंदर चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती दिली. सलमानची बिग बजेट फिल्म ठप्पएका मोठ्या फिल्मसाठी अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता. मात्र, बजेट खूपच वाढल्यामुळे निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट तूर्तास थांबवला आहे. “एक काळ होता जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत होतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत,” असे सलमान म्हणाला. “टायगर वर्सेस पठान” वर काम नाही!सलमान खानने आणखी एक मोठा खुलासा केला की टायगर वर्सेस पठान हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे. “आता तरी यावर कोणाचेही लक्ष नाही,” असे स्पष्ट करत त्याने चाहत्यांच्या आशेला तात्पुरता ब्रेक दिला. तर दुसरीकडे “अंदाज अपना अपना 2” साठी आमिरसोबत काम करण्यास आपण एक्साइटेड आहोत असं सलमान म्हणाला. सलमान आणि आमिर खान अंदाज अपना अपना 2साठी एकत्र येणार का, या प्रश्नावर तो म्हणाला, “हो, आम्ही दोघेही खूप उत्साहित आहोत. राजकुमार संतोषी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते काहीतरी भन्नाटच करणार.” “बजरंगी भाईजान 2” शक्य, पण कधी?बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल विचारले असता सलमान म्हणाला, “हो, हे होऊ शकते. कबीर खान यावर काम करत आहे.” मात्र, त्याने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

‘भाईजान’ च्या चाहत्यांना धक्का, “टायगर वर्सेस पठान” सह बिग बजेट सिनेमाला ब्रेक! Read More »

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करा, सभागृहात विजय वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar: संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी. अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली आहे. अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती करावी. असं देखील या वेळी विजय वडेट्टीवार म्हणाले. विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाके आहेत. यातील ही चाक म्हणजे विरोधी पक्षनेता आहे. हे चाक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी असे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही. असे आम्ही पाहिले नाही. त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. अधिवेशनाचे अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची खाली ठेवून कामकाज होऊ नये. अध्यक्षांना अधिकार आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असा मुद्दा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला विधानसभेचे अध्यक्ष यांनी यावेळी सभागृहातील कामकाज हे नियमानुसार चालणार तसेच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असे आश्वासन दिले.

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करा, सभागृहात विजय वडेट्टीवारांची मागणी Read More »

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Maharashtra News: नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे, ही बाब केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर पोलीस व्यवस्थेसाठीही मोठी आव्हाने निर्माण करत आहे. या परिसरात टोळी युद्धाची घटना वाढत आहेत, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. अवैध धंद्यांचे परिणामनगर एमआयडीसी हा औद्योगिक क्षेत्र असून, येथे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांमध्ये अवैध दारू विक्री, सावकारी आणि इतर गैरकायदेशीर कारवाया समाविष्ट आहेत. यामुळे या परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे आणि टोळी युद्धाच्या घटना घडत आहेत. या टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक पोलिसांची भूमिकास्थानिक पोलिसांची भूमिका या संदर्भात संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. पोलिसांकडून योग्य प्रमाणात कारवाई न झाल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या असताना, त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सामाजिक परिणामया अवैध धंद्यांमुळे स्थानिक समाजावरही वाईट परिणाम होत आहेत. अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याने त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे आणि समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय केले नाही तर भविष्यात ही समस्या आणखी वाढू शकते. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असल्याचे सांगितले. “पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने ही समस्या वाढत आहे. आम्ही अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत, पण काहीच बदल होत नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अल्पवयीन मुलांचा वापर होऊ नये म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या समस्येवर उपाय केल्याशिवाय समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबणार नाही.

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद Read More »

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत

Ravindra Dhangekar : हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नकली आवाजातील व्हिडिओ करण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तर कोणी कुठे गेले नसते, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी शिवसेना उपनेते डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामातून त्यांनी ओळख निर्माण केली. ते 25 वर्ष नगरसेवक होते. त्यापैकी शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने आता लोकांना कळेल धंगेकर कोण, असे शिंदे म्हणाले. तुमचा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांना 4 लाख 60 हजार मते मिळाली. यातून तुमचे काम आणि लोकप्रियता दिसून येते, अशा शब्दांत शिंदे यांनी धंगेकर यांचे कौतुक केले.   उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला लोकांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर जे घडलं त्याची देशाने नाही तर जगातील 33 देशांनी दखल घेतली. एक सामान्य कार्यकर्ता काय करु शकतो हे जगाने पाहिले. शिवसेनेकडून 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याला बळ देणारे आपण आहोत कपडे सांभाळणारे नाहीत, असे शिंदे म्हणाले. खुर्चीसाठी 2019 मध्ये ज्यांनी मोह केला त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला. आपल्याला खुर्चीचा मोह नाही महाराष्ट्राला पुढे न्यायचे हा एकच ध्यास आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालाय असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या नकली आवाजातील व्हिडिओ दाखवण्यात आला. बाळासाहेबांचे जुन्या रेकॉर्ड्स जपून ठेवल्या आहेत असे ते सांगतात पण नकली लोक नकलीच कामे करणार असा टोला त्यांनी यावेळी उबाठावर लगावला. याऐवजी बाळासाहेबांचे विचार जपले असते तर फायदा झाला असता, कोणी कुठे गेले नसते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.   धंगेकर म्ङणाले की, शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्राने पाहिले. कॉमन मॅन म्हणून शिंदे यांनी काम केले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करु, अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. धंगेकर यांच्यासमवेत सुरेश जैन, बाळासाहेब आंबरे,  प्रणव धंगेकर, गोपाळ आगरकर, मिलिंद अहेर, अजित ढोकरे, रवींद्र खेडेकर, संजय पासोलकर, सतीश ढगे, राजू नाणेकर आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.  यामुळे पुण्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे.

काँग्रेसला धक्का, माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत Read More »

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले. शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाहीया अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनीशिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल Read More »

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक

Satyajeet Tambe : संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे. आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे सोयीचे नसून, अनेक गावांतील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना शहर ओलांडून पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुकला जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावाला सभागृहात तीव्र विरोध केला आहे. “जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित करणे, हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. प्रस्तावावर नागरिकांची नाराजीसंगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने जनतेच्या सोयीसुविधांचा विचार न करता हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक Read More »

Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी होणार डॉ. पंकज आशिया, राज्य सरकारची घोषणा

Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंकज आशिया सिद्धाराम सालीमठ यांची जागा घेणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तेव्हापासून नगरची जागा रिक्त होती. आता राज्य सरकारने यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याच बरोबर राज्य सरकारने आणखी 7 आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. गेल्या महिन्यात देखील राज्य सरकारे 21 पेक्षा जास्त आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्यामध्ये सिद्धाराम सालीमठ यांच्या देखील नावाचा समावेश होता. तर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने 8 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी होणार डॉ. पंकज आशिया, राज्य सरकारची घोषणा Read More »

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्टोक अन् शिंदेंना इशारा, भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते!

Bhaskar Jadhav : 03 मार्चपासून महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात विरोधकांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विरोधकांकडून विरोधीपक्ष नेतेसाठी पुरेशी संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती मात्र आता या पदावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात येणार आहे. तर विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेसाठी काँग्रेस दावा करणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गट विधानसभा सदस्यांची बैठक पार पाडली. याबैठकीत विरोधी पक्ष नेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार आमदारांनी ठाकरे यांना दिले होते. त्याप्रमाणे आज ठाकरे शिवसेनेतून विधानसभा अध्यक्षांना भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोण आहे भास्कर जाधव?भास्कर जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत एंट्री केली. जाधव सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधिमंडळ कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव त्याना आहे. 2009 ते 2014 कालावधीत ते राज्यमंत्री पद भूषविले होते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या आक्रमकतेचा फायदा पक्षाला होऊ शकतो. शिवसेना फुटीनंतर  झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेला कोकणात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. कोकणात सर्व जागा ठाकरे शिवसेनाच्या हातून गेल्यानंतर गुहागर मधील जागा भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आपल्यकडे राखण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले आहे. उद्धव ठाकरे यांची खेळीकोकण विभागातून एकमेव निवडून आलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद देऊन ठाकरे शिवसेना नवीन डाव टाकला आहे. कोकणात शिंदे शिवसेनेला शह देणे,आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणत कोकणी मतदार आहे, त्यातल्या त्यात पूर्व मुंबईत कोकणी मतदार  आपल्यकडे वाळविण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी उचललेले पाऊल बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्टोक अन् शिंदेंना इशारा, भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते! Read More »