DNA मराठी

Maharashtra

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस

Kajal Guru : नगर शहरामध्ये बोगस तृतीयपंथी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी लूटमार करून दमदाटी करत असल्याची घटना काही दिवसापासून घडत असून याबाबतची माहिती नागरिकांनी तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांना दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन काजल गुरु यांनी सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणले होते. यामध्ये सदरची व्यक्ती ही बोगस प्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कडून तसेच शहरातील सोने व्यापाऱ्यांकडून तसेच काही उद्योजकांकडून पैशांची लूटमार करून दमदाटी करत होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरिकांची लूटमार देखील सदर व्यक्ती करत होती. त्यामुळे या व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदरचा व्यक्ती हा तृतीयपंथी नसून माणूस आहे. या व्यक्तीमुळे तृतीयपंथी समाज हा बदनाम होऊ नये म्हणून सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. तर दुसरीकडे अशा प्रकारे कोणाची फसवणूक होत असेल तर तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस Read More »

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती

Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुढील एका वर्षासाठी शिंदे यांनी शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.: रवींद्र धंगेकर, माजी आमदार

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती Read More »

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या

Pratap Sarnaik : मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑन लाईन बदल्या करण्यात आल्या. व संदर्भात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, ऑनलाइन बदल्या करतांना अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाऊन घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑन लाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑन लाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी. असे ते म्हणाले.तसेच यावेळी गतवर्षी राबविलेल्या ऑन लाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या Read More »

जर हृदयविकाराचा झटका आला तर घाबरू नका, ‘या’ 7 टिप्स फॉलो करा

Heart Attack : गेल्या काही वर्षांपासून देशात हृदयविकार एक गंभीर आजार बनत आहे. कोणत्याही वयोगटातील लोकांना आता हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. जिम, शाळा किंवा कामात व्यस्त असतानाही लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कधीकधी लोक एकटे असतानाही हृदयविकाराचा झटका येतो. जर एखादी व्यक्ती घरी एकटी असेल किंवा एकटी राहत असेल आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे? अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या वेळी एकटे राहणारे लोक स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात हे जाणून घ्या. हृदयविकाराची लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. आजकाल, हृदयविकाराचा कौटुंबिक हिस्ट्री, चुकीची जीवनशैली, धूम्रपान, ताणतणाव, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुणांसह अनेक लोकांना हृदयविकाराचा धोका असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा पहिल्या तासात औषध घेतल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. छातीत अस्वस्थता – हे दाब, घट्टपणा किंवा जडपणासारखे वाटू शकते. कधीकधी असे वाटते की कोणीतरी तुमच्या छातीवर बसले आहे. वेदना – ही वेदना हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात पसरू शकते. श्वास घेण्यास त्रास – तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. थंड घाम येणे – कोणत्याही कारणाशिवाय अचानक घाम येणे हे देखील एक धोक्याचे लक्षण आहे. चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे – अचानक अशक्त होणे किंवा खूप थकवा जाणवणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. अचानक हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे? हृदयविकाराची लक्षणे ओळखा. ताबडतोब आपत्कालीन सेवांना कॉल करा. शांत राहा आणि खोलवर श्वास घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे कपडे पूर्णपणे सैल करा. अजिबात हालचाल करू नका आणि एकाच ठिकाणी शांतपणे बसा. जर हृदयाचे ठोके जलद असतील तर खोल श्वास घ्या आणि जोरात खोकला. ज्याला खोकला सीपीआर म्हणतात जो हृदयाचे ठोके सामान्य करण्यास मदत करतो. जोपर्यंत कोणी मदत करायला येत नाही तोपर्यंत काहीही खाऊ किंवा पिऊ नका. हृदयविकाराचा झटका प्रथमोपचार छातीत जळजळ होणे, असामान्य ठिकाणी वेदना होणे, सतत उलट्या होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. जर पहिला ईसीजी आणि रक्त तपासणी सामान्य असेल तर डॉक्टर 1-3 तासांनी ती पुन्हा करण्यास सांगतील. जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या जीवाला धोका असू शकतो. धूम्रपान करू नका आणि तंबाखू सेवन करू नका

जर हृदयविकाराचा झटका आला तर घाबरू नका, ‘या’ 7 टिप्स फॉलो करा Read More »

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Double-decker Bus Fire : गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी सकाळी एका डबल डेकर बसला भीषण आग लागली, ज्यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मोहनलालगंजजवळील किसान पथावर हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला जात होती आणि त्यात 60 हून अधिक प्रवासी होते. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक बस धुराने भरली तेव्हा सर्वांना जाग आली. आग लागल्यानंतर चालक आणि कंडक्टर बसमधून उड्या मारून पळून गेले. आपत्कालीन गेट उघडला नाही त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही म्हणून अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. आगीची परिस्थिती आणि बचाव कार्य बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे लोक मदतीला आले. मात्र आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा 1 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी तासन्तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास सुरू केला. आगीचे कारण एका प्रवाशाने सांगितले की, गिअरजवळील ठिणगीमुळे आग लागली. आगीमुळे बस अवघ्या 10 मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली. दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, आग लागल्यानंतर बसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याने त्याच्या पत्नीला उठवले आणि दोघेही बसमधून बाहेर पडले.

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना

Devendra Fadanvis: रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ ही सर्वंकष योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे राज्यातील रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेत प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिकेमध्ये पुर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण 31 फिरती पथके सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस/व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी, वाहनचालक व काळजीवाहक अशी चार जणांची टीम असणार असून बसमध्ये GPS ट्रॅकिंग व CCTV कॅमेरा देखील असणार आहे. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्यानुसार त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल. मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीत, शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरण, पोषण आहार, औषधोपचार, स्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांत गुंतवले जाणार आहे. या योजनेंतर्गत दरमहा किमान 20% मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत संस्थांना त्रैमासिक निधी वितरीत केला जाणार आहे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला जाणार आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक योजना Read More »

सरन्यायाधीशांपासून ते 33 न्यायाधीशांपर्यंत, सर्वांनी जाहीर केली संपत्ती, जाणून घ्या सर्वकाही

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व 33 विद्यमान न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक करून देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने पारदर्शकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. आता सर्व न्यायाधीशांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक मालमत्तेची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. न्यायाधीशांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती शेअर केली आहे, ज्यामध्ये फ्लॅट, घरे, शेती जमीन, वडिलोपार्जित मालमत्ता, बँक खाती, दागिने आणि शेअर्स यासारख्या मालमत्तांचा समावेश आहे. न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची संपत्ती सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे दक्षिण दिल्लीत 3 बेडरूमचा फ्लॅट आहे. याशिवाय, दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये 4 बेडरूमचा फ्लॅट आहे ज्यामध्ये दोन पार्किंग स्पेस देखील आहेत. गुरुग्राममधील एका फ्लॅटमध्ये त्यांचा 56 टक्के वाटा आहे. याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथील वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांचा वाटा आहे. सरन्यायाधीशांनी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या मालमत्तेसह त्यांचे बँक खाते, भविष्य निर्वाह निधी, शेअर्स आणि सोने यांची माहिती सार्वजनिक केली आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांची संपत्ती 14 मे पासून भारताचे पुढचे सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनीही त्यांच्या मालमत्तेची माहिती शेअर केली आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथे त्यांचे घर आणि शेतीची जमीन आहे, जी त्यांना त्यांच्या दिवंगत वडिलांकडून वारशाने मिळाली आहे. याशिवाय, त्यांचे मुंबईतील वांद्रे आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये फ्लॅट आणि नागपूरमध्ये शेती जमीन आहे. न्यायमूर्ती गवई यांनी त्यांचे बँक खाते, सोने आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता देखील जाहीर केली आहे.

सरन्यायाधीशांपासून ते 33 न्यायाधीशांपर्यंत, सर्वांनी जाहीर केली संपत्ती, जाणून घ्या सर्वकाही Read More »

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले

Nitesh Rane: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशाचा संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान मोदी आहेत आणि यावी ठोस उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पुण्यात हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला असून जिहादी प्रवृत्तीला प्रत्युत्तर दिले जाईल असं देखील ते म्हणाले. तसेच हिंदूंनी सत्तेत बसवले असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे. असेही यावेळी ते म्हणाले. मत्स्य खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली असून या बैठकीत गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुण्यात मोठे मत्स्यालय सुरू करण्याची योजना असून यासाठी हडपसरमध्ये जागा उपलब्ध करण्यात येणार असं देखील ते म्हणाले. तर दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या असून सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशी कबुली देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.

पाकिस्तानला उत्तर देऊ, पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम; नितेश राणे स्पष्टच बोलले Read More »

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, ‘या’ वेबसाइडवर पाहता येणार निकाल

12th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. 5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1) https://results.digilocker.gov.in 2) https://mahahsscboard.in 3) http://hscresult.mkcl.org 4) https://results.targetpublications.org 5) https://results.navneet.com 6) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams 7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results 8) https://www.indiatoday.in/education-today/results आणि 9) https://www.aajtak.in/education/board-exam-results परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, ‘या’ वेबसाइडवर पाहता येणार निकाल Read More »

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Ajit Pawar: माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे आज निधन झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणकाका जगताप यांच्याबद्दल सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, “माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली Read More »