DNA मराठी

Maharashtra Politics

img 20251210 wa0004

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त

Mephedrone Drug Factory : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला आहे. बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याने “ऑपरेशन हिंटरलँड ब्रू” अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो इतक्या वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स (MD) जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी मेफेड्रोन ड्रग्सच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणारे उपकरणे जप्त केले आहेत. कारंजा (घाडगे) ठिकाण वर्धापासून सुमारे 75 किलोमीटर दूर आहे. या भागातील जंगलामध्ये बेकायदेशीररित्या ड्रग्सचा कारखाना चालविला जातोय अशी अत्यंत गोपनीय माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालय नागपूर येथील युनिटला समजली होती. त्या आधारेच DRI च्या पथकाने धाड टाकून हा कारखाना उद्धवस्त केला आहे. ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी या कारखान्यात एमडी ड्रग्स तयार करण्याचे काम सुरू होते. कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी)  जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 192 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत विदर्भातील ही सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारंजा (घाडगे) या तालुक्यातील एका निर्जन जंगल भागात मेफेड्रोनची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना समजली होती त्या आधारे  अधिकाऱ्यांनी या भागावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. हा संपूर्ण परिसर पूर्णतः अत्यंत घनदाट जंगलाने व्यापलेला आहे ज्यावेळी कारखान्यात एमडी ड्रग्सची निर्मिती  सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने तिथे छापा टाकला आणि तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. शिवाय 245 किलो कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करणार:- गृहराज्य मंत्री वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे या ठिकाणच्या जंगलात सुरू बेकायदेशीरपणे असलेली एमडी ड्रग्स तयार करण्याची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचलनालयाने उद्धवस्त केल्याचेनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता ते म्हणालेत की मी आज वर्धा जिल्हाचा दौरा करणार आहे आणि प्रकरणात दोषी असलेली असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त Read More »

nashik accident

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू

Nashik Accident : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यात रस्ते अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अपघातात अनेक जण जखमी होत आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात झाला घटना बसवंत पिंपळगाव येथे घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बसवंत पिंपळगाव येथून इनोव्हा. एम एच 15 बी एन झिरो 0555 या क्रमांकाचे चार चाकी वाहन वनी येथील नांदुरी गडावर दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरचा तोल गेल्याने कार 400 फूट दरीत कोसळून कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक हा गंभीर जखमी असून त्यास स्थानिक च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी वणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी येऊन रेस्क्यू ऑपरेशन करून वाहन चालकाला उपचारासाठी दाखल केले. घटनेचा अधिक तपास घटनेचा अधिक तपास वणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नांदुरी गाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहे.

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू Read More »

indigo airlines

IndiGo Airline वर संकट कायम; आज 400 उड्डाणे रद्द, जाणून घ्या ताजे अपडेट

IndiGo Airline : इंडिगो एअरलाइन्स वरील संकट दूर होताना दिसत नाही. आज देखील देशात 400 हून जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. देशात आज 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडिगो एअरलाइन्सची सलग चौथ्या दिवशीही विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे, शनिवारी देशभरातील अनेक प्रमुख विमानतळांवर मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करण्यात आली. उड्डाणे अचानक रद्द केली जात आहेत, तर काही तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांची स्थिती बिकट झाली आहे. अनेक विमानतळांवर परिस्थिती इतकी गर्दीची आहे की ती रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकासारखी आहे. अनेक विमानतळांवर शेकडो उड्डाणे रद्द दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, कोची आणि तिरुअनंतपुरमसह अनेक प्रमुख शहरांमधील विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणे रद्द करण्याचे काम सुरूच आहे. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे सकाळपासूनच विमानतळ टर्मिनल्स भरून गेले आहेत. 100 हून अधिक उड्डाणे रद्द शनिवारी, राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) येथे ५४ निर्गमन आणि ५२ आगमन, एकूण १०६ उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळ प्रशासनाने सेवा हळूहळू सामान्य होत असल्याचा दावा केला असला तरी, रात्री उशिरापर्यंत टर्मिनल्सवर मोठी गर्दी दिसून आली. अनेक प्रवासी त्यांच्या फ्लाइट्सच्या अपडेट्सची वाट पाहत असल्याचे दिसून आले, तर काहींना शेवटच्या क्षणी रद्द झाल्याचे कळले. 109 फ्लाइट्स उशिरा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही प्रवाशांच्या अडचणी वाढल्या. शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, १०९ इंडिगो फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये ५१ आगमन आणि ५८ निघणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश होता. विमानतळाबाहेरून आतपर्यंत लांब रांगा दिसून आल्या. अनेक प्रवाशांनी सांगितले की इंडिगोची ग्राहक सेवा प्रतिसाद देत नाही, ज्यामुळे तिकिटे रद्द करणे किंवा नवीन फ्लाइट्स बुक करणे कठीण झाले. हैदराबाद आणि पुण्यातही परिस्थिती गंभीर सकाळपर्यंत, हैदराबादच्या जीएमआर विमानतळावर इंडिगोची ६९ फ्लाइट्स रद्द करण्यात आली: २६ आगमन आणि ४३ प्रस्थान. दरम्यान, पुणे विमानतळावर एकूण ४२ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये १४ आगमन आणि २८ निघणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश आहे. एअरलाइनला क्रूची तीव्र कमतरता भासत आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत आहे. कंपनीने अद्याप सामान्य स्थितीत परतण्यासाठी विशिष्ट वेळापत्रक दिलेले नाही. चार दिवसांत 2000 हून अधिक उड्डाणे रद्द गेल्या चार दिवसांत इंडिगोने २००० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. सतत बदलणारे वेळापत्रक, लांब रांगा आणि प्रतीक्षा वेळ यामुळे प्रवाशांचा संताप वाढत आहे. एअरलाइनने प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती ऑनलाइन तपासण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे इंडिगोच्या सततच्या उड्डाणे रद्द करणे आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील नरेंद्र मिश्रा यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून या संकटावर स्वतःहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

IndiGo Airline वर संकट कायम; आज 400 उड्डाणे रद्द, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

img 20251206 wa0006

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा

Dancer Deepali Patil : नृत्यांगना दिपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे २०१६ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवारांसोबत होते. त्यानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. गायकवाड यांच्या पत्नीने नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली तरी संदिप गायकवाड यांचा भाजपात कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही. ते आजही राष्ट्रवादीतच आहेत. नगरपरिषद निवडणूकीत पराभव होणार हे स्पष्ट होताच रोहित पवारांनी भाजपला व आमच्या नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे, नृत्यांगणा दिपाली पाटील यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या आडून रोहित पवार हे घाणेरडे राजकारण करून जामखेडची बदनामी करू पाहत आहेत, ही बाब जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे. जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करणाऱ्या दिपाली पाटील या नृत्यांगनेने ४ डिसेंबर रोजी जामखेड येथील साई लाॅज येथे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली होती. ही घटना उजेडात येताच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेशी भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करताच भाजपने रोहित पवारांचीच पोलखोल केली आहे. जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले म्हणाले की, माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड यांनी २०१६ सालच्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग १० मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. जिंकली होती. त्यांच्या पत्नीही त्यावेळी प्रभाग ०७ मधून निवडून आल्या होत्या होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संदिप गायकवाड हे रोहित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदिप गायकवाड यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी गायकवाड यांनी रोहित पवारांचा जोरदार प्रचार केला होता. नुकत्याच पार पडलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत रोहित पवारांनी संदिप गायकवाड यांना उमेदवारी डावलल्याने गायकवाड यांच्या पत्नीने बंडखोरी करत ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र संदिप गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला नाही. एकाच कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या पक्षात सक्रीय असतात. एखाद्याने काही चुकीचं केलं तर त्याचा संबंध कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाशी जोडणे म्हणजे बालबुध्दी उपद्व्याप होय, हाच उद्योग सध्या रोहित पवारांकडून सुरू आहे असे म्हणत सभापती शरद कार्ले यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला. माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. रोहित पवार यांनीच शरद पवारांच्या उपस्थितीत गायकवाड यांचे पक्षात जोरदार स्वागत केले होते.भाजपवर टीका करण्यापूर्वी रोहित पवारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. संदीप गायकवाड प्रकरणी रोहित पवारांनी भाजपवर केलेले आरोप निरर्थक आणि बिनबुडाचे आहेत, या प्रकरणात रोहित पवार हे अडचणीत येणार असे दिसताच त्यांनी भाजपवर आरोप करून कांगावा करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक सत्य हेच आहे की, संदिप गायकवाड हेच त्यांच्या पक्षाचे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत दारूण पराभव होणार हे समजल्यामुळे रोहित पवारांनी भाजप व आमच्या नेत्याची बदनामी सुरू केली आहे, भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांनी हाती घेतलेले षडयंत्र जामखेडची जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद कार्ले यांनी दिला आहे. “नृत्यांगणा दिपाली पाटील मृत्युप्रकरणाची घटना अत्यंत दुर्दैवी असुन या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचाच अर्थात रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तो त्याच पक्षात सक्रीय आहे. त्याचा भाजपची कुठलाही संबंध नाही. नृत्यांगणा मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, या प्रकरणाच्या आडून भाजपला बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, जनता हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे.”

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा Read More »

school close

School Closed: दहावीच्या परीक्षेपूर्वी राज्यात शिक्षक आक्रमक; 25 हजार शाळा बंद, नेमकं कारण काय?

School Closed : राज्यात आज जवळपास 25 हजार शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वी खाजगी, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी निषेध करत आहेत. आज मराठवाडा भागातील अनेक शाळा पूर्णपणे बंद होत्या. या बंदमुळे सुमारे 18000 शाळांमधील वर्गांवर परिणाम झाला. शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? शिक्षक संघटनेने शिक्षक समायोजनाचा पुनर्विचार, टीईटीची आवश्यकता रद्द करणे, ऑनलाइन आणि शैक्षणिक नसलेल्या कामाचा भार कमी करणे, जुन्या शिक्षण योजना लागू करणे आणि कंत्राटी पद्धत बंद करणे यासारख्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे. निषेधाबाबत सरकारचा कडक इशारा 5 डिसेंबर रोजी शैक्षणिक उपक्रम कोणत्याही प्रकारे विस्कळीत होऊ नयेत असे सरकारने स्पष्ट केले आहे. शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि आंदोलनात सहभागी असलेल्यांना एक दिवसाचा पगार कपातीचा सामना करावा लागेल. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्ह्यांतील शिक्षण अधिकाऱ्यांना आणि मुंबई महानगरपालिकेला शाळा पुन्हा सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. शिक्षकांमध्ये असंतोष सरकारने वेतन कपातीचा आदेश जारी केल्यानंतर शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे. महानगर शिक्षक संघटनेने म्हटले आहे की एक दिवसाचा पगार कपात हा त्यांच्या हक्कांवर हल्ला आहे आणि या निषेधाला पाठिंबा देईल. सरकार आणि शिक्षकांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निषेध सुरूच राहील. या परिस्थितीत, सरकार आणि शिक्षक संघटनांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

School Closed: दहावीच्या परीक्षेपूर्वी राज्यात शिक्षक आक्रमक; 25 हजार शाळा बंद, नेमकं कारण काय? Read More »

maharashtra election comission

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा

Maharashtra Election : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध  घेऊन योग्य ती दक्षात घ्यावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी सांगितले. काकाणी यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा Read More »

bhaskar jadhav

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार मात्र यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या तारखेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे गृहीत धरून चालू शकतो याचा हे उदाहरण म्हणजे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आज कामकाजा सल्लागार समितीची मीटिंग झाली. यामध्ये हिवाळी अधिवेशना संदर्भात चर्चा झाली. 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर अशी तारीख दिली होती. दोन आठवड्याच्या ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. तिने नाही तर निदान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी घ्या  पण सरकारने मान्य केले नाही आणि अधिवेशन 14 तारखेला ठरलं. सत्ताधारी पक्ष संख्येने भरपूर आहे. परंतु विरोधकांच्या पक्षांना सामोर जाण्याचे त्यांच्या धाडस नाही. सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधी पक्षाच्या भडीमरा पुढे आणि त्यांच्या प्रश्नांपुढे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवत गेला तयार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष जाहीर करावा असा आग्रह आम्ही त्यांना करत आहोत असं माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी कोणावरही नाराज नाही मी कुठेही नाराज नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   तर दुसरीकडे  मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषित करतात आणि काल दुपारी सांगतात मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. या लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि स्वायत्त संस्था हे नावाला असलेले निवडणूक आयोग करत आहे. हे आयोग आयोग फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारे झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगावर केली.

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल Read More »

abhijeet bichukale

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका

Abhijeet Bichukale : राज्यात आज 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान सुरू असून निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या 21 तारखेच्या मतमोजणीवर जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष पक्षीय उमेदवारांना विनंती आहे निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरून पांघरून घेऊन मुक्कामाला जावा भाजप काहीही करू शकतं असं शरद पवारांनी सांगितलं होतं ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेला आहे तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय असं माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाले. मतदानाच्या काही तासांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील 24 नगरपरिषदेच्या निवडणुका रद्द करून पुढे ढकलले होते मात्र 03 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाचा परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.

Abhijeet Bichukale : अंथरुण पांघरुण घेऊन मतपेटी जवळ जाऊन झोपा, भाजपच षडयंत्र असेल; अभिजीत बिचकुलेंची टीका Read More »

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

ashish shelar

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन

Ashish Shelar : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे. ज्येष्ठ पुरस्कार नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025) युवा पुरस्कार नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025). सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

Ashish Shelar : राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, आशिष शेलार यांच्याकडून पुरस्कार प्राप्त कलाकरांचे अभिनंदन Read More »