DNA मराठी

Maharashtra crime

crime

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव

Dhavalpuri Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आलेले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून चालणार नाही ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे आणि आंधळ्या श्रद्धेच्या धोकादायक परिणामांचे गंभीर उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा ही संत विचार, नैतिकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांवर उभी आहे. मात्र, याच परंपरेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्या व्यक्तीकडून असा अमानुष प्रकार घडल्याचा आरोप होणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा आरोप असून, पीडितेला धमक्या देत गप्प ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, यापूर्वीही त्याच व्यक्तीवर बलात्कारासंदर्भातील गुन्हे दाखल झाले होते. एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली असली, तरी दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येते. यामुळे प्रश्न केवळ एका आरोपीपुरता मर्यादित राहत नाही तर समाज आणि व्यवस्थेने अशा संकेतांकडे वेळेत गांभीर्याने पाहिले का, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. भारतीय समाजात धार्मिक व्यक्तींना सहजपणे नैतिक श्रेष्ठत्व बहाल केले जाते. ‘महाराज’, ‘बाबा’, ‘कीर्तनकार’ अशा पदव्या अनेकदा प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच नष्ट करतात. परिणामी, पीडितांना आवाज उठवणे अधिक कठीण होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा पुसली गेली की सत्तेचा गैरवापर सुरू होतो. ढवळपुरी प्रकरण हे त्याचेच उदाहरण मानावे लागेल. या घटनेत पीडित मुलीने अनेक वर्षे भीतीपोटी मौन बाळगल्याचे दिसते. हे मौन समाजाच्या अपयशाचे प्रतीक आहे. कुटुंब, शाळा, ग्रामव्यवस्था आणि स्थानिक समाजरचना या सर्व स्तरांवर मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्याची भीती निर्माण होते, तेव्हा न्यायव्यवस्था उशिरा का होईना, हस्तक्षेप करते पण तोपर्यंत मोठी हानी झालेली असते. या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पहिली म्हणजे, धार्मिक किंवा सामाजिक प्रतिष्ठा ही कायद्यापेक्षा मोठी नाही, हा संदेश ठामपणे पोहोचणे आवश्यक आहे. दुसरी म्हणजे, अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे केलेले आवाहन ही सकारात्मक बाब असली, तरी समाजानेही पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे तितकेच आवश्यक आहे. वारकरी संप्रदाय हा संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या विचारांनी घडलेला आहे. करुणा, संयम आणि सत्य यांची शिकवण देणारा. त्यामुळे अशा घटनांमुळे संप्रदाय नव्हे, तर त्याच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्ती उघडकीस येतात, हे समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, काही व्यक्तींच्या कृत्यामुळे संपूर्ण परंपरेवर संशयाची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. ढवळपुरी प्रकरण हे केवळ गुन्हेगारी बातमी नाही; ते समाजाला स्वतःकडे पाहण्यास भाग पाडणारे आरसे आहे. श्रद्धा ठेवावी, पण प्रश्न विचारण्याची क्षमता गमावू नये हाच या घटनेतून घ्यायचा सर्वात मोठा धडा आहे.

Dhavalpuri Case : ढवळपुरी प्रकरण; श्रद्धेच्या आवरणामागचे भयावह वास्तव Read More »

img 20260312 wa0003

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या

Pune Crime : पुण्यातील कॅम्प परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, किरकोळ वादावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली असून 2 आरोपींचा शोध घेत आहे. फैसल खान असं मयत तरुणाचं नाव आहे. तर बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोली, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज शेख आणि मयत फैसल खान दोघे मित्र होते. शहबाज शेख याची मयत फैसल खान याने थटटा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शहबाज याने मयताचे कानाखाली चापट मारली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद वाढला. यानंतर शहबाज शेख व त्याच्या बाकीदारांनी धारधार चाकुने मयत फैसल खान याच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली. सध्या या प्रकरणात दोन आरोपी फरार असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे पुण्यात दिवसेंदिवसे गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे. हत्या, चोरी सारखे गुन्हे दररोज दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Pune Crime : पुणे हादरले! किरकोळ वादातून मारहाण अन् तरुणाची हत्या Read More »

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime: चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५ आरोपींनी दारूच्या नशेत पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ८ मार्च रोजी सायंकाळी डिग्रस फाटा येथे त्यानंतर रात्रीच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत घडली. सायंकाळी ५ राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे १० ते १२ जण दारुच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला लाकडी दांडी व लाथा बूक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला. त्यावेळी त्यांनी आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री ११.३० वाजे दरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पून्हा विनाकारण शिवीगाळ केली. तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडु वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे, सर्व रा. बुरुडगाव, ता. जि. अहील्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी ११ इसम अशा एकुण १५ जणांवर गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११९ (१), ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने आरोपी खंडु काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले. तर इतर आरोपी पसार झाले. तसेच आरोपींचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

Ahilyanagar Crime: धक्कादायक, नगर जिल्ह्यात चक्क पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल Read More »

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण

Maharashtra Crime : अभियांत्रिकी महाविद्यालयातील सी सी टीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड का बदलला असे विचारले म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्याने मुलासह मोठ्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार लोणीकंदमध्ये घडला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रामचंद्र भूमकर ( वय ५८) व त्यांचा मुलगा सिद्धांत ( वय २५ ) ( दोघेही रा. लोणीकंद ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मोठे भाऊ उद्धव रामचंद्र भूमकर ( वय ६५, रा. लोणीकंद ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर कुटुंबीयांचे रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे महाविद्यालय आहे. उद्धव भूमकर हे त्या संस्थेचे खजिनदार आहेत. तर शंकर भूमकर हे संचालक असून माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. बकोरी रोडवर हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सी सी टीव्ही चा पासवर्ड सिद्धांत याने बदलला. तसेच सर्व आर्थिक व्यवहार शंकर व त्यांचा मुलगा बघतात. त्याबाबत उद्धव यांना काही कळू देत नाहीत. त्याबाबत विचारणा केली की दोघे शिवीगाळ करायचे. कॉलेजच्या काही महत्वाच्या फाईल जागी दिसल्या नाही. लोणीकंद येथील घरी उध्दव यांनी पासवर्ड व फाईल बद्दल शंकर यांना विचारले असता. दोघा बाप लेकांनी उद्धव यांना तू आम्हाला विचारणारा कोण म्हणून शिवीगाळ करीत आधी लाथा बुक्याने व नंतर कोणत्या तरी कठीण वस्तुने खाली पाडून मारहाण केली. उद्धव यांच्या पुतण्याने व पत्नीने त्यांची सोडवणूक केली. यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसात त्यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

Maharashtra Crime : धक्कादायक, लोणीकंद मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांकडून मोठ्या भावाला मारहाण Read More »

img 20260219 wa0008

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक

Ahilyanagar Police : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत गांजाची वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 132 किलो गांजा असा एकूण 25 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत गणेश अंकुश कराड (वय 32), सुखदेव शिवनाथ कदम (वय -30, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), यांच्या विरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले. सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम. एच. 14 जी. एच.2330 ही मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी कबाडी यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघाले. मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना बातमीतील नमुद स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसली तेव्हा बातमीतील हकिगतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पीओ गाडी थांबवुन गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम बसलेले दिसुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश अंकुश कराड वय – 32 वर्षे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर, 2) सुखदेव शिवनाथ कदम वय -30 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि/ विजय झंजाड यांनी बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये 04 गोण्या मिळुन आले. नमुद इसमांना गोण्या बाबत विचारपुस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपीतांचे ताब्यातुन 18,18,000/-रु कि.चा 132.84 किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, 25,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 7,00,000/-रु कि.चा एक स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असा एकुण 25,43,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/800 भाऊसाहेब राजु काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र. नं. 60/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20(ब)ii(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक Read More »

police

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर एम.आय.डी.सी मधील उद्योजकाकडुन दर महिन्याला खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी 9.30 च्या सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांनी बेकायदेशीरपणे कंपनीमध्ये प्रवेश करुन, कंपनीचे मॅनेजर प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करुन काम बंद करण्यास लावून काम चालु करायेच असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला व तुझ्या मालकाला जिवे ठार मारुन टाकु असे म्हणुन खंडणी मागुन मॅनेजर प्रकाश कोकाटे यांचेकडुन दमदाटी करुन वीस हजर रुपयेची खंडणी घेतली. तसेच त्यांनी सर्व कामगारांना बोलवुन त्यांचे अखिल भारतीय कामगार संघटनेस मान्यता देणेबाबत चिथावणी दिली होती. त्यानंतर निंबळक एम.आय.डी.सी येथील कंपनीचे उद्योजकांनी सदर घटनेबाबत सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेवुन संबंधीत इसमाविरुध्द कारवाई करणे बाबत निवेदन दिले होते. तसेच ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजकांना कोणी त्रास देत असले, तर त्यांना कायद्याने ठोकुन काढा ” असे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या वेळी सूचना दिली होती. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी निंबळक एम.आय.डी.सी. येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि.या कंपनीकडुन दमदाटी करुन खंडणी घेतलेल्या अखिल भारतीय कामगार सेनेचे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व त्याचे इतर 4 अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल करणे बाबत आदेश दिल्याने वरील आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला आहे. त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे रा.एम.आय.डी.सी.,अहिल्यानगर याला ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे. आरोपी नामे भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे याचेविरुध्द अनेक गुन्हे दाखल आहेत.   जो कोणी एम.आय.डी.सी मधील कंपनीचे उद्योजक व कामगारांना त्रास देईल, अशा इसमांविरुध्द तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दयावी. कंपनी उद्योजकांना अशा प्रकारे त्रास देणाऱ्या इसमांविरुध्द कठोर कारवाई करुन कंपनी उद्योजकांना संरक्षण देण्यात येईल असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एम.आय.डी.सी मधील सर्व कंपनी उद्योजक व कामगारांना पोलिसांनी केले आहे.

Ahilyanagar Crime : पोलिसांची मोठी कारवाई; MIDC उद्योजकाकडून खंडणी मागणाऱ्याला अटक Read More »

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा

Ahilyanagar News: पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून, चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन-पे अ‍ॅपचा गैरवापर करुन नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा घातला आहे. या घटनेत आरोपीने तब्बल २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन-पे अ‍ॅप सक्रिय होते.५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने फोन-पे अ‍ॅपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले आहे. यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीष गावंड, बाळासाहेब सोलास व बिकास बेहेरा आदींच्या खात्यांवर विविध टप्प्यांत मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. एकूण २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा Read More »

kotla

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी

Kotla Crime : नगर शहरातील कोठला परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री गोळीबाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज चेंबर समोर बुधवारी (ता. 11) रात्री सव्वाअकरा वाजता गोळीबार झाला. यात अबरार मुख्तार शेख हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यदने, अबरारवर गोळीबार केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोठला परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kotla Crime : धक्कादायक, कोठला परिसरात गोळीबार; एक युवक जखमी Read More »

job

Dharashiv News : आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी बनावट नियुक्ती आदेशांचा पर्दाफाश

Dharashiv News : आरोग्य सेवक (पुरुष) या पदासाठी बनावट नियुक्ती आदेश देऊन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून,यासंदर्भात एका वृत्तपत्रात दिनांक ०४.०२.२०२६ रोजी बातमी प्रसिद्ध झाली आहे.या प्रकरणात अज्ञात व्यक्तीने आरोग्य विभागाच्या खोट्या लेटरपॅडचा वापर करून, संगणकाच्या सहाय्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या खोट्या व बनावट सह्या एडिट केल्या आहेत. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या स्वाक्षरीचे असल्याचे भासवून जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे रिक्त पदावर रुपये २९,२०० ते ९२,३०० या वेतनश्रेणीत नियुक्ती आदेश दिल्याचे दिसून आले आहे. या बनावट आदेशांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसारित झाले आहे.जिल्हा परिषद,धाराशिव अंतर्गत सरळसेवा पदभरती सन-२०२३ साठी जाहिरात क्र. १/२०२३ दिनांक ०५.०८.२०२३ च्या अनुषंगाने विविध संवर्गातील एकूण ४५३ पदे सरळसेवा पदभरतीसाठी प्रस्तावित करण्यात आली होती.यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के व आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी IBPS,मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीअंती अंतिम निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या व एनआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उमेदवारांना आवाहन केले आहे की, अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या आदेशांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ जिल्हा परिषद व एनआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात आलेली असून,त्याचे आवलोकन करावे.कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. तसेच अधिक माहितीसाठी आरोग्य विभाग,जिल्हा परिषद,धाराशिव या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.आरोग्य विभाग अशा प्रकारच्या फसवणूक प्रकरणाचे समर्थन करीत नाही.या फसवणुकीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असण्याची दाट शक्यता असून,त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाची नाहक बदनामी झाली आहे. तरी या प्रकरणाची सविस्तर पोलिस चौकशी करून उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी,असे निवेदन आरोग्य विभागाकडून पोलीस अधीक्षक,धाराशिव यांना देण्यात आले आहे.

Dharashiv News : आरोग्य सेवक (पुरुष) पदासाठी बनावट नियुक्ती आदेशांचा पर्दाफाश Read More »

bunty jahagirdar

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबार ; बंटी जहागीरदारचा मृत्यू

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान जर्मन हॉस्पिटल जवळ दोन अज्ञात हल्लेखोराकडून हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. तीन ते चार गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान दुपारी झालेल्या गोळीबारानंतर जखमी जहागीरदार यांना तातडीने कामगार हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात असता त्यावेळी त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव हॉस्पिटल परिसरात जमला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना पुढील उपचाराकरिता नगर येथील हॉस्पिटल मध्ये पाठवले हे. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी जहागिरदार यांच्यावर गोळीबार केला.गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी आरडाओरड केल्याने हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. गोळीबाराची माहिती कळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींच्या शोधासाठी नाकेबंदी केली असून गोळीबाराच्या घटनेने श्रीरामपूर पुन्हा एकदा हादरले आहे. श्रीरामपूर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , परिस्थितीवर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

Bunty Jahagirdar : श्रीरामपूर शहरात भर दिवसा गोळीबार ; बंटी जहागीरदारचा मृत्यू Read More »