DNA मराठी

latest update

IMG 20240505 WA0002

Ram Shinde : येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी एकत्र; मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही!

Ram Shinde : “माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्‍या मध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत,” अशी ग्‍वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांनी  आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.  लोकसभा निवडणूक प्रचाराच्‍या निमित्‍ताने शहरातील जामवाडी, तपनेश्‍वर, मुख्‍य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे नागरीकांच्‍या भेटी घेवून संवाद साधला. केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांची माहीती देवून महायुतीच्‍या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्‍याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आ.राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. चुंभळी येथील कार्यक्रम सुरु होताच, उपस्थितांनी आ.राम शिंदे यांच्‍यावर होत असलेल्‍या अन्‍यायाचा प्रश्‍न उपस्थित केला. आ.शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्‍यांनी  हा विषय संपविला. याच विषयाचा उल्‍लेख करुन, मंत्री ना. विखे पाटील यांनीही चुंभळी येथील श्री.मस्कोबा महाराजांच्‍या देवस्‍थानाचा उल्‍लेख करुन, आमच्‍या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुध्‍दा म्‍हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, “आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवु नये.”

Ram Shinde : येणाऱ्या सर्वच निवडणुकांसाठी एकत्र; मंत्री विखे पाटील आणि आ. शिंदेची ग्वाही! Read More »

IMG 20240505 WA0000

Ahmednagar Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम केले

Ahmednagar Lok Sabha Election: भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संविधानाचा खरा सन्‍मान भारतीय जनता पक्षाच्‍या सरकारमध्‍येच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्‍याय देणा-या योजना सुरु करुन वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे मोठे काम केले आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्‍याची माहीती लहुजी सेनेचे प्रदेशाध्‍यक्ष कैलास खंदारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे तसेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  नगर येथे महायुतीचे उमदेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ खंदारे यांनी विविध भागांमध्‍ये दौरा करुन, मतदारांशी संवाद साधला. त्‍यानंतर निवडणूक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी लहुजी सेनेची भूमिका स्‍पष्‍ट केली. महायुतीच्‍या उमेदवाराला लहुजी सेनेचे पुर्ण समर्थन असून, महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍यासाठी लहुजी सेनेने सुध्‍दा जबाबदारी स्विकारली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  ज्‍या कॉंग्रेस पक्षाने या पुर्वी ७० ते ८० वेळा घटनेमध्‍ये बदल केला, त्‍यामुळे भाजपावर आरोप करण्‍याचा त्‍यांना कोणताही आधिकार नाही. संविधानाचा खरा सन्‍मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळातच होवू शकला असे स्‍पष्‍ट करुन, लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या  निवासस्‍थाला राष्‍ट्रीय स्‍मारकाचा दर्जा देण्‍याचा निर्णय, इंदु मिल येथील डॉ.आंबेडकरांचे स्‍मारक तसेच वस्‍ताद लहुजींच्‍या स्‍मारका करीता ५ गुंठे जमीन आणि निधीची उपलब्‍धता करुन, देण्‍याच महत्‍वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेने महायुती सरकारच्‍या निर्णयांचे स्‍वागत केले आहे.  लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूतीवर लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते सक्रीयेपणे प्रचारात सहभागी झाले असून, युतीचे सर्व उमेदवार विजयी करण्‍यासाठी प्रयत्‍न करीत असल्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष कैलास खंदारे यांनी सांगितले.

Ahmednagar Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम केले Read More »

IMG 20240224 WA0002

Ahmednagar News: जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला

Ahmednagar News: मागील पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विविध मंत्रालयाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून  विकास कामांना गती दिली.अडीच वर्षाचा कोव्हीड कालावधी सोडला तर मतदार संघातील प्रत्येक माणसाच्या हितासाठी आपण काम करीत राहीलो. जनतेसाठी केलेल्या कामाचे पाठबळ निश्चित मिळेल असा विश्वास  महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यातील संवाद सभेत बोलत होते. महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी  तालुक्यात ठिकठिकाणी संवाद सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. विखे यांच्यासह जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिकाताई राजळे, दिनकरराव पालवे, एकनाथ हटकर, विजय गवळे, साहेबराव गोळे, महादेव कुटे, तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.  या वेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील पाच वर्षात मी जिल्ह्यातील विविध प्रश्नांची उकल केली असून रस्ते, पाणी, उद्योग विकास, पर्यटन, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे, कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र तथा राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील गावागावात विकासकामांसाठी निधीची पुर्तता केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी काम केले आहे.मला जिल्ह्याच्या विकासासाठी काय करावे लागणार याची जाण आहे.  येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरूणांच्या हाताला काम देणे, शिक्षणसाठी सुविधा उभ्या करणे, अत्याधुनिक  आरोग्य सुविधा निर्माण, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे अशी विविध कामे करण्याचा आपला मानस त्यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला गाढा विश्वास असून नगरकरांच्या हितासाठी त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  शिवाजीराव कर्डीले यांनी सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी खासदार यांच्या कार्याचा गौरव करत, वांभोरी चाळीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. तसेच येणाऱ्या काळात खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने वांभोरी चाळीच्या पाईपलाइनच्या  नुतनिकरणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.  तर आमदार मोनिकाताई राजळे यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात दिलेल्या कामांची आश्वासने पुर्ण केली आहेत. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील हे सत्तेत असणे आवश्यक आहेत. यामुळे येत्या १३ मे ला नगर जिल्ह्यातील एक सुशिक्षित आणि सामान्य नागरिकांची कळकळ असलेला खासदार आपल्याला पाठवायचा आहे. यामुळे कमळाचे बटन दाबून त्यांना भरगोस मतांनी विजयी करा असे त्यांनी सांगितले.  

Ahmednagar News: जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला Read More »

Vikhe And Lanke

Maharashtra News: आमदार असताना शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले? सुजय विखेंचा परखड सवाल

Maharashtra News:  महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी कितीवेळा  विधानभवना बाहेर आंदोलने केली असा परखड सवाल त्यांनी विचारला.  महायुतीच्या वतीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ संवादसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.  डॉ. सुजय विखे आता पर्यंत कुणावरही टिका न करता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या आपल्या विकास कामाच्या जोरावर आपल्या प्रचाराची दिशा ठेवली होती. मात्र सातत्याने विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करत निवडणुकीचे वातावरण गढुळ केल्याने त्यांना चोख उत्तर त्यांनी या सभेतून दिले आहे. डॉ. विखे म्हणाले की, विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. त्यांची भाषणे काढून बघा त्यात एकही विकासाचा मुद्दा नाही, तुमच्या मुलांना उज्वल भवितव्य देण्याची एकही घोषणा नाही. कांदा प्रश्नावर आजतयागत त्यांनी कधीही आवाज उठवला नाही. त्यांनी केवळ खासदारकीच्या तिकीटासाठी राजीनामा दिला. हाच राजीनामा त्यांनी जर दुधाच्या प्रश्नावर, कांद्याच्या प्रश्नावर दिला असता तर आम्ही त्यांचा सत्कार केला असता असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.   केवळ लोकांची सहानभूती मिळविण्यासाठी नौटंकी करण्याचे काम त्यांनी चालवले आहे. जनतेला आता त्यांचे सर्व कारणामे माहित पडले असून येत्या १३ मे रोजी जनता त्यांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

Maharashtra News: आमदार असताना शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले? सुजय विखेंचा परखड सवाल Read More »

Screenshot 2024 04 13 14 32 39 70 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

PM Modi: पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील

PM Modi: देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  येत्या ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर जिल्ह्यात येणार आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीचा मेळावा सुरू असताना महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रचार सभांची गती वाढवली आहे. महायुतीच्यावतीने शेवगांव तालुक्यातील घोटन येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले याच्यासह, नरोडे काका, अंबादास कळमकर, संजय कोळगे, बबन भुसारी आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी आणि भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. विखे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाचा गतीमान विकास केला आहे. अनेक योजनांच्या मार्फत त्यांनी तळागळातील लोकांचा विकास करून दाखविला असून ३० कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून मुक्त केले. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली आहे. यामुळे देशा परदेशातून अनेक नामांकित कंपन्या भारतात गुंतवणुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंरराष्ट्रीय संबंध मजबूत केले. यामुळे आज जगात भारताचा डंका वाजत आहे. येणाऱ्या काळात विकसीत भारताचे स्वप्न त्यांनी देशाला दिले आहे. यामुळे मोदींच्या हमीवर देशातील नागरिकांचा विश्वास असल्याने तिसऱ्यांदा त्यांनाच पंतप्रधान पदावर बसविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुमचे प्रत्येक मत हे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. यामुळे विचारपुर्वक मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.  आमदार चंद्रशेखर घुले यांनी सुद्धा कार्यकत्यांना संबोधित केले, आ. घुले यांनी सांगितले की, देशाला कणखर नेतृत्व देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशात कुठलाही पर्याय नाही. यामुळे महायुतीचा उमेदवाराला विजयी करणे आवश्यक आहे. खा. डॉ. सुजय विखे ह्यांनी मागील पाच वर्षात आपले कर्तव्य सिद्ध केले आहे. यामुळे नगरच्या विकासासाठी ते पंतप्रधान मोदींच्या टीम मध्ये आवश्यक आहे. यामुळे येत्या १३ मे रोजी कमळाचे बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

PM Modi: पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240503 WA0002

Ahmednagar News: अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे : धनश्री विखे पाटील

Ahmednagar News: नगर शहर वासियांचा अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न खा. डॉ‌. सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे. केंद्र सरकारची अमृत पाणी योजना रखडली होती मात्र पाठपुरावा करून योजना पूर्ण केली आणि नगरकरांना पूर्ण दाबाने पाणी दिले. सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे.  आपल्या सर्वांना लोकसभेमध्ये सुशिक्षित खासदार म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाठवायचे आहे. नगर जिल्ह्यामध्ये तीन एमआयडीसी मंजूर झाल्या असून या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती होईल.वयोश्री योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत लाभ मिळाला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाची जाहिरात केली नाही असे प्रतिपादन धनश्री विखे पाटील यांनी केले.    नगर दक्षिण लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना नालेगाव येथील श्री देवांग पंच कोष्टी समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला असून यावेळी ॲड.धनंजय जाधव,अजय चितळे,सोनाली चितळे, उदय अनभुले, गणेश शिंदे, प्रफुल्ल लाटणे, अशोक फलके, रुपेश मोकोटे, सागर दळवे, सुभाष पाखले, संजय भंडारी, संतोष टेके, नितेश वराडे,उमेश टेके, गणेश लाटणे, रविंद्र टकले, सुरेंद्र असलकर, गणेश कांबळे, विजय खटावकर,पूजा दळवे, सुप्रिया पाखले, रुपाली मुकोटे, जयश्री लाटणे, सुनीता टेके, उज्वला टकले, सीमा लोटके,अंबिका टेके आदी उपस्थित होते.   लोकसभा निवडणूक ही देशाच्या विकासासाठी असून या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी निवडून जाणे गरजेचे आहे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षांमध्ये विकासाच्या योजनांबरोबरच सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक या विषयावर चांगले काम केले आहेत. त्यांची अभ्यासू खा. म्हणून लोकसभेमध्ये ओळख आहे. त्यामुळेच शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. नागरिकांचे उड्डाणपुलाचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले यासाठी श्री.  देवांगपंच कोष्टी समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे अशी माहिती कोष्टी समाजाच्या वतीने दिली.  खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहर सुरक्षित राहावे यासाठी विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. कोरोना काळामध्ये केलेल्या कामाची खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहिरात केली नाही मात्र ते आज आपल्याला कामाच्या माध्यमातून सर्वत्र दिसत आहेत असे मत अजय चितळे यांनी व्यक्त केले.

Ahmednagar News: अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे : धनश्री विखे पाटील Read More »

Vikhe And Lanke

शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आणि MIM जास्त जागा लढवत आहे: विनायक देशमुख

Maharashtra News:  संपूर्ण राज्‍यात राष्‍ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केवळ १० उमेदवार उभे केले असून, निवडून किती येतील हे त्यांनाच माहीत आहे.  अहिल्‍यानगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्‍यांच्‍या पक्षाच्‍या अध्‍यक्षांसमोर पण संसद बंद पाडण्याची करत असलेली भाषा म्‍हणजे एक प्रकारचा विनोदच असल्‍याची टिका भाजपा नेते विनायक देशमुख यांनी केली.  अहिल्‍यानगर लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी नगर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग, अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे यांच्‍यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलतांना विनायक देशमुख म्हणाले, १९९२ च्या लोकसभा निवडणुकी पासून निवडणू प्रक्रियेत सहभागी असून, परंतू मागील ३२ वर्षात झाला नाही इतका प्रचाराचा स्तर खालावलेला असून, थापा मारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे की काय?, असा प्रश्‍न  पडतो. नगर दक्षिण लोकसभेचे राष्‍ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे उमेदवारांना तर “संसद म्हणजे ग्रामपंचायत वाटायला लागली असून, गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर थापा मारणे एक वेळ समजू शकते. परंतु लोकसभेच्या २५ लाख मतदारांना थापा मारणे हे अत्यंत दुर्दैवी असल्‍याचे ते म्‍हणाले.  लोकसभेची निवडणूक सुरू होताच शरद पवार गटाच्‍या उमेदवाराने जाहीर केले की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले होते. परंतू मला काँग्रेसचा ३५ वर्षांचा अनुभव असल्यामुळे या बातमीचे मला जरा आश्चर्यच वाटले. पण असेही वाटले की कदाचित सदर उमेदवाराची राहुल गांधी यांच्‍या बरोबर  मैत्रीचे नाते असू शकते. या कारणाने राहुल गांधी कदाचित येतील. त्यानंतर काही दिवसांनी याच उमेदवाराचे वक्तव्य आले की, वाहतुकीला त्रास होईल म्हणून मीच राहुल गांधींना येऊ नका असे म्‍हणालो असून, मागील ३० ते ३५ वर्षांच्या राजकारणात नगरच्या जनतेला एवढा बालिशपणा प्रथमच अनुभवायला मिळाला आहे.  पुढील काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचा) उमेदवार अजूनही मोठमोठ्या थापा मारण्याची शक्यता असून, जनतेने त्यांना स्पष्टपणे विचारायला हवे कि आपण संपुर्ण देशात  केवळ दहाच जागा लढवित असून, मग तुमच्या या थापा कशा खऱ्या होतील?. शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आणि एम.आय.एम. हे पक्ष जास्त जागा लढवीत असून, मग तुम्ही दिलेली आश्वासने कशी पूर्ण करणार असा प्रश्‍न श्री.देशमुख यांनी उपस्थित केला.  मतदारांनी अशा भुलथापांना बळी न पडता आपल्‍या ग्रामपंचायतीचा सरपंच निवडायचं नसून देशाचा पंतप्रधान निवडायचा असल्‍याचे भान ठेवावे आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी  कमळा समोरील बटन दाबुन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करावे करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केली आहे.

शरद पवार गटापेक्षा वंचित बहुजन आघाडी आणि MIM जास्त जागा लढवत आहे: विनायक देशमुख Read More »

IMG 20240421 WA0005

Ahmednagar News: आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

Ahmednagar News:  कोविड संकट ही संधी मानून देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. प्रत्‍येक सामान्‍य माणसाला घराजवळच आरोग्‍य सुविधांचा लाभ मिळण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेला प्रत्‍येक निर्णय आज कृतीत उतरल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  इंडियन मेडीकल असोशिएशन, निमा यांच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सर्व डॉक्‍टर्स, फार्मासिस्‍ट, पॅथोलॉजिस्‍ट यांच्‍याशी संवाद साधला. खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप, भाजपाचे अध्‍यक्ष अभय अगरकर, विनायक देशमुख, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलींद पोळ, सेक्रेटरी सचिन पंडुळे, डॉ.रविंद्र साताळकर, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.प्रकाश कांकरीया, केमीस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष दत्‍ता काडळकर, लॅब असोसिएशनचे अध्‍यक्ष निनाद आकोलकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.  केंद्र आणि राज्‍य सरकारने आरोग्‍य विषयक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. आयुष्‍यमान भारत योजनेचा मोठा दिलासा मिळाला असून, राज्‍य सरकारनेही महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना आता नव्‍या बदलाच्‍या स्‍वरुपात सुरु केली आहे. यामध्‍ये येणा-या त्रृटी दुर केल्‍या जातील. कोव्‍हीड नंतर आरोग्‍य सुविधा अधिक परिपुर्ण कशा होतील यासाठीच मोठी गुंतवणूक आता करण्‍यात येत असून, देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतर पहिल्‍यांदाच आरोग्‍य सेवेला विकासाच्‍या प्रक्रीयेशीजोडण्‍याचे महत्‍वपूर्ण काम मागील दहा वर्षात झाले असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेमध्‍ये सुध्‍दा आरोग्‍य सुविधेला प्राधान्‍यक्रम आहेच, या बरोबरीनेच जिल्‍ह्यामध्‍ये रोजगार निर्मितीही औद्योगिक आणि पर्यटन विकासातून होवू शकते यासाठी आता जिल्‍ह्याचा विकास आराखडाही तयार करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला साहित्‍य, कला, संस्‍कृतीचा मोठा वारसा आहे, त्‍या दृष्‍टीन नॅशनल स्‍कुल ऑफ ड्रामाच्‍या धर्तीवर एखादी शाखा सुरु करतानाच शहरातील वाडीया पार्कला अंतरराष्‍ट्रीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न होईल अशी ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

Ahmednagar News: आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला Read More »

IMG 20240502 WA0006

Maharashtra News : राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात

Maharashtra News : राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात असा संदेश महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला. ६५ व्‍या स्‍थापना दिवसाच्‍या निमित्‍ताने पोलिस परेड मैदानावर ध्‍वजवंदनाचा सोहळा संपन्‍न झाला.  याप्रसंगी जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍यकार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्‍त पंकज जावळे यांच्‍यासह जेष्‍ठ नागरीक आणि विविध क्षेत्रातील मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी पोलिस पथकाच्‍या संचलनाची पाहाणी करुन, मानवंदना स्विकारली.  याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, महाराष्‍ट्राने नेहमीच सर्व जाती, धर्म, पंथ यांना सामावून घेत एकसंघपणे वाटचाल केली आहे. राज्‍याच्‍या भूमीने स्‍वातंत्र्य संग्रामातही मोठे योगदान दिले. सामाजिक क्रांतीच्‍या विचाराने नेहमीच एकतेचा विचार घेवून वाटचाल करणा-या राज्‍याने संत विचारांचे अधिष्‍ठान कायम ठेवले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  राज्‍याची अर्थव्‍यवस्‍था कृषि आणि सहकारावर अवलंबुन आहे. यामुळे सामाजिक परिवर्तनात मोठी क्रांती झाली. स्‍व.यशवंतराव चव्‍हाण यांनी महाराष्‍ट्राला विकासाचा मंगल कलश आणतांना सर्वांना समान संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या. त्‍यानुसार राज्‍याची वाटचाल सुरु असल्‍याचे ना.विखे पाटील म्‍हणाले.

Maharashtra News : राज्‍याला पुन्‍हा प्रगतीच्‍या दिशेने नेण्‍याचा संकल्‍प करुयात Read More »

IMG 20240430 WA0004

Maharashtra News:  देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज

Maharashtra News: देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि नरेंद्र मोदी हेच त्याला पर्याय आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी केले आहे.  ते नगर तालूक्यातील महायुतीच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कामाबद्दल मतदारांना माहिती दिली. तालूक्यातील येथे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मेळाव्याचे इमामपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समिती संचालक मधुकर मगर दत्ता तापकीरे धर्मनाथ आव्हाड ख वि संघ व्हा चेअरमन डॉ मिनीनाथ दुसुंगे संचालक डॉ राजेंद्र ससे आदेश भगत सुरेश वारूळे उपस्थित होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने देशात मागील १० वर्षात विविध विकास कामे करून देशाला प्रगतीच्या पथावर आणले आहे. शेतकरी, कष्टकरी, तरूण, महिला आणि विद्यार्थांसाठी विविध योजना  राबविल्या आहेत. यामुळे देशातील प्रत्येक घटकाचा विकास झाला. यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदींच्या हातात देश अधीक बळकट आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  महायुतीचा उमेदवार हा प्रतिमोदी असून तुमचे मत हे सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे. म्हणून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केली. खा.सुजय विखे पाटील यांनी आपल्या खासदारीच्या काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी मतदारांना दिली. येणाऱ्या काळात अहिल्यानगच्या विकासासाठी एक तरूण आणि महत्वाकांक्षी खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले.   आपल्या भाषणात खा. सुजय विखे म्हणाले की, विखे कुटुंबाने विकास हेच ध्येय ठेऊन नगरसाठी काम केले आहे. माझ्या पाच वर्षाच्या छोटाशा काळात मला जितके शक्य झाले, तितकी विकास कामे केली आहेत आणि ती कामे आज नगर मध्ये दिसतात. येणाऱ्या काळातही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी मिळवून विका कामे केली जातील. त्यात पायाभूत सेवा सुविधांपासून अत्याधुनिक सेवांचा समावेश आहे.  नगरमधील विविध प्रश्न येणाऱ्या काळात संसदेत मांडून त्याचे समाधान केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Maharashtra News:  देशाला एका कणखर नेतृत्वाची गरज Read More »