DNA मराठी

latest news

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते,  अमोल बबन डोंगरे,हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे.   सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू Read More »

Israel Air strike on Syria: इस्रायलचा पुन्हा सीरियावर हवाई हल्ला,  12 जणांचा मृत्यू

Israel Air strike on Syria: पुन्हा एकदा इस्रायलने पहाटे सीरियावर हवाई हल्ला केला. सीरियातील अलेप्पो शहरात झालेल्या या हवाई हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, आत्तापर्यंत ज्यांचे मृतदेह सापडले आहेत त्यांची ही आकडेवारी आहे. संख्या आणखी वाढू शकते. वृत्तानुसार, इस्रायलने या हल्ल्यात उत्तर सीरियातील अलेप्पोमधील हैयान शहरातील एका तांब्याच्या कारखान्याला लक्ष्य केले आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटनच्या विरोधी युद्ध निरीक्षण सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने दावा केला आहे की हल्ल्यात इराण समर्थक मिलिशियाचे किमान 12 सैनिक मारले गेले. इस्रायलने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही वेधशाळेच्या म्हणण्यानुसार, हयान शहर सीरियन आणि परदेशी लोकांच्या बनलेल्या इराणी समर्थक गटांचे नियंत्रण आहे. तथापि, इस्रायलने या हल्ल्याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. त्याच वेळी, या अहवालात असे म्हटले आहे की सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सीरियामध्ये शेकडो हल्ले केले आहेत. ज्यामध्ये इराण समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी संघटना, इराणी प्रॉक्सी आणि इराणी लढवय्यांना शस्त्रे पुरवणारी संघटना इस्रायलचे लक्ष्य आहे.  अलेप्पो हे राज्य इस्रायलच्या सीरियाच्या विरुद्ध बाजूस आहे आणि ते इस्रायलच्या मागील हल्ल्यांपेक्षा वाईट आहे.

Israel Air strike on Syria: इस्रायलचा पुन्हा सीरियावर हवाई हल्ला,  12 जणांचा मृत्यू Read More »

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले

Maharashtra News: राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते, यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले.  गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना १० तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावडेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, येथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावडे यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.  अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्यास काँग्रेसचा विरोध.. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा डाव भाजपाने रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही. मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही. संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापी यशस्वी होणार नाही. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश खपवून घेणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, माजी खासदार हुसेन दलवाई, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले Read More »

Vastu Tips: महिला मंडळ, ‘या’ गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर येणार आर्थिक अडचण

Vastu Tips:  तुम्हाला हे माहितीच असेल की वास्तुशास्त्रात दिशांना किती महत्व देण्यात आले आहे. यामुळेच त्याचे नियम देखील स्पष्ट करण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित दिशा असते, जर ती योग्य दिशेने ठेवली तर घरात समृद्धी येते. स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हीही स्वयंपाकघरात या चुका करत असाल तर काळजी घ्या कारण त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.  स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुटलेली भांडी ठेवू नका वास्तूनुसार तुटलेली किंवा रिकामी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच तुटलेल्या भांड्यांचा ग्रहांच्या स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे तुटलेली भांडी घरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा घर असो किंवा स्वयंपाकघर, ते नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेवू नका. स्वयंपाकघरातील कचरा दररोज फेकून द्या आणि स्वच्छ ठेवा. घरात किंवा स्वयंपाकघरात धुळीमुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मी कोपते. तुटलेले नळ दुरुस्त करा नळातून टपकणारे पाणी वास्तूमध्ये अशुभ मानले जाते. तुमच्या स्वयंपाकघरातील नळातून पाणी टपकत राहिल्यास ते त्वरित दुरुस्त करा. वास्तविक, नळातून टपकणारे पाणी हे पैशाच्या अपव्ययाचे प्रतीक आहे. यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकटही येऊ शकते. अन्न कचरा अन्नाची नासाडी करणे हे अशुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे जेवढे अन्न लागेल तेवढेच शिजवावे आणि अन्नाची विनाकारण वाया घालवू नये.

Vastu Tips: महिला मंडळ, ‘या’ गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर येणार आर्थिक अडचण Read More »

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Vikhe Patil News:  प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या  तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचकरा करीता स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्‍त समजल्या नंतर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देवून, मृत जवानांच्या कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी स्वत: पालकमंत्री विखे पाटील, मा.आ.वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. यासर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिका-यांनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस पथकाने शोकधून आणि बंदूकीची सलामी देवून मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जवानाचे नातेबाईक आणि त्याच्या सहका-यांना भावना आवरणे अवघड झाले होते. यासर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला. यासर्व जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्‍यात येणार असल्‍याची माहीती ना.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना अत्‍यंत दुर्दैवी असून, सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पाण्‍यामध्‍ये बुडालेल्‍या  अन्‍य दोन व्‍यक्तिंचा तपास करण्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येत असून, धरणातून पाण्‍याचा प्रवाहही आता बंद करण्‍यात आला आहे. याच कारणासाठी युवकांनी केलेल्‍या रस्‍ता रोको आंदोलनासही मंत्री ना.विखे पाटील यांनी भेट दिली. घटना घडल्‍यानंतर पाण्‍याचा प्रवाह कमी करण्‍याच्‍या सुचना आपण यापुर्वीच दिल्‍या होत्‍या परंतू आंदोलकांच्‍या  भावना लक्षात घेवून संपूर्ण प्रवाहच बंद करण्‍याच्‍या सुचना जलसंपदा विभागाला त्‍यांनी दिल्‍या.

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती Read More »

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा

Ahmednagar News: येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून उपाययोजना करण्यात यावी यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्तांना बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदन दिला आहे.  या निवेदनात म्हटले आहे की, थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होणार आहे, मात्र अद्याप महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे, पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये झालेले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे कुणाल भंडारी यांनी केली आहे.   उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करुन पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत बांधकाम व्यवसायिकांनी त्यावरती बांधकाम करुन अतिक्रमण केल्याने अनेकांच्या घरी गेल्या काही वर्षांपासून पाणी घुसण्याचे प्रकार समोर येत आहे. यामुळे यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच ठिकाणचे पथदिवे बंद असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ठिकाणी आत्ताच तयार केलेल्या नवीन रस्त्यांवर खड्‌डे झाले आहे.  खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने खड्‌ड्यात जाऊन पाणी उडल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाह होतात. त्यामुळे सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच या साचलेल्या पाण्यांमध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे व त्यामुळे डेंगु, मलेरिआ चिकन गुणिया सारखे गंभीर आजार नागरिकांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे.  तसेच शहरातील प्रभाग अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व मोबाईल नंबरची माहिती वृत्तपत्रातुन प्रसिध्द करावी आणि पावसाळ्यापुर्वीच्या सर्व उपाययोजना त्वरीत पुर्ण करण्यात याव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदना मार्फत देण्यात आला आहे.

Ahmednagar News: पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटाव अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन, कुणाल भंडारींचा इशारा Read More »

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरामध्ये असणाऱ्या शांतीधाम मंदिर परिसरात घणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. मात्र तरी देखील महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.  शांतीधाम मंदिर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीकडे महापालिकेकडून कुठलेही कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिक आणि शांतीधाम मंदिरच्या ट्रस्टकडून अहमदनगर महापालिकेला वारंवार तक्रार देण्यात आली आहे मात्र तरी देखील अहमदनगर महापालिकेकडून कुठलेही कारवाई होताना दिसत नाही.  या परिसरात वाढत असणाऱ्या घाणीमुळे आजारांचा धोका वाढत चालला आहे. यामुळे महापालिकेने कारवाई करीत परिसर स्वच्छ करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Ahmednagar News: मुकुंदनगरमधील शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, अनेकांचे आरोग्य धोक्यात मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष Read More »

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला

Ajit Pawar News : स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता असा टोला उपुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी निलेश लंके यांना लावला.   जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या  निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.  कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्‍यात आलेल्‍या जाहिर सभेत उपमुख्‍यमंत्री पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे, बाळासाहेब नाहटा, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले पाटील, मंगलदास बांगल, बाळासाहेब शिंदे याच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून राज्याचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करताना नगर माझे आजोळ असून येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न केले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासोबत चांगले सुर जुळले असून सध्याचे महायुती सरकार हे गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशात पंतप्रप्रधान मोदींनी मागील १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर देशात पुन्हा एनडीए आणि राज्यात महायुती सरकार येणार आहे. यामुळे इतरांनी कितीही प्रतत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी सांगितले.  महायुती सरकार आणि जलसंपदा विभागाच्या मार्फत नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता  निशाणा साधला. ते म्हणाले ८० वर्षाच्या पुढे इतरांना संधी दिली पाहिजे, पण  आमचे जेष्ठ रिटायर होतच नाही.  यामुळे आम्ही काय करायचे असे सांगत आपली खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार यांना धारेवर धरले, आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला अशा शब्‍दात त्‍यांनी महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराचा समाचार घेतला.  राज्यात सुजय विखे यांच्या पंजोबांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि अख्या महाराष्ट्राला याचा फायदा झाला आहे. त्यांचा नातू तरूण, तडफदार नेता डॉ. सुजय विखे पाटील हे लोकांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडतील यामुळे त्यांना येत्या १३ मे रोजी अनु. क्र. ३ चे कमळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देवून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहायता करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला Read More »

Ahmednagar News: ‘तो’ वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरेंना मान्‍य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Ahmednagar News: विराधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्याबाबत केलेले वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे यांना मान्‍य आहे का असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कसाब च्‍या कुटूंबाच्‍या पालन पोषणाची जबाबदारी वडेट्टीवारांनी घ्‍यावी असा टोलाही त्‍यांनी लगावला.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्‍या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून पुढील चार दिवस जागृकतेने काम करण्‍याचे आवाहन केले. तसेच मतदाना पर्यंतच्‍या नियोजनाच्‍या सुचनाही त्‍यांनी दिल्‍या. याप्रसंगी खा.संजय काका पाटील, मा.आ.आशिष देशमुख, मा.खा.विकास महात्‍मे, आ.मोनीका राजळे, जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्‍यक्ष अभय अगरकर यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते.  आपल्‍या भाषण आ.बावनकुळे म्‍हणाले की, यंदाची लोकसभेची निवडणूक ही २०४७ पर्यंतच्‍या विकसीत भारतासाठीची निवडणूक आहे. आपले प्रत्‍येक मत हे देशामध्‍ये तीन कोटी लखपती दीदी बनविणार आहे. चार लोकांना घर देणार आहे, सुर्य घर निर्माण करणार आहे. आणि १३ तारखेची निवडणूक वन नेशन वन इलेक्‍शन आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्‍यासाठी सुध्‍दा खुप महत्‍वपूर्ण आहे. त्‍यामुळे या निवडाणूकीत देशातील पुर्ण जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नगर येथे येवून प्रधानमंत्र्यांनी आपल्‍याला नमस्‍कार केला असल्‍याने विकसीत भारताच्‍या मतदानाची अहुती शंभर टक्‍के मतदान घडवून आपण द्यावी असे आवाहन त्‍यांनी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपाचे संकल्‍प पत्र प्रत्‍येक घरी जावून द्यावे असे सुचित करुन, प्रधानमंत्री समर्पित भावनेने देशासाठी काम करीत आहेत. मागील दहा वर्षे दिवाळीचा सण सुध्‍दा सैनिकांसोबत जावून ते साजरा करतात. कोव्‍हीड सं‍कटातही देशातील नागरीकांची त्‍यांनी सेवा केली. मात्र दुसरीकडे देशावर संकट आणि  आपत्ती आली की, राहुल गांधी परदेशात पळून जातात. अशी टिका करुन, कॉंग्रेसचे नेते आता अफजल कसाबची बाजू घेवून बोलू लागले आहेत. वडेट्टीवर यांनी केलेले वक्‍तव्‍य हा शहीद झालेल्‍या जवानांचा अपमान आहे.  एवढेच जर वडेट्टीवारांना पाकीस्‍तानचे  प्रेम असेल तर त्‍यांनी कसाबच्‍या  कुटूंबियांचे पालन पोषण करण्‍याची जबाबदारी घ्‍यावी असा टोला लगावून त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याबाबत शरद पवार आणि उध्‍दव ठाकरे अद्यापही बोलायला तयार नाहीत उध्‍दव ठाकरे मुख्‍यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधीमंडळात आले. त्‍यांनी हातात कधी पेन घेतल्‍याचा आपण पाहीले नाही. कोव्‍हीड संकटातही फेसबुकवर दिसणारे उध्‍दव ठाकरे गरम पाणी पेऊन झोपून घ्‍या असा सल्‍ला जनतेला देत होते. दुसरीकडे मात्र मोदीजींनी केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद देवून खा.सुजय विखे पाटील आणि आपल्‍या सारखे कार्यकर्ते लोकांसाठी सेवा करीत होते. परंतू त्‍याचे प्रदर्शन आम्‍ही कधी केले नाही.  डॉ.सुजय विखे पाटील यांचा विजय हा मोदीजींचा विजय आहे. देशाच्‍या  विकास प्रक्रीयेला साथ देण्‍यासाठीच अजीत पवारही आता या महायुतीत सहभागी झाले आहेत. विकसीत भारताच्‍या सं‍कल्‍पनेला प्रत्‍येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍याने पुढील चार दिवस मोदीजींचा पाठबळ देण्‍यासाठी द्यावे असे आवाहन तयांनी शेवटी केले. याप्रसंगी दिलीप भालसिंग, अभय आगरकर यांची भाषण झाली.

Ahmednagar News: ‘तो’ वक्‍तव्‍य शरद पवार आणि उध्‍दव ठाकरेंना मान्‍य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल Read More »

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध

Ahmednagar News: न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्राथना केली.    नगर मधील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील ॲड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावे, कायद्याचे रक्षण करणारे आणि ज्याच्या खांद्यावर जनतेला न्याय देण्याची जबाबदारी  असणाऱ्यांवर अशा प्रकारे होणारे हल्ले हे चिंताजनक असून सदर घटनेचा जाहिरपणे निषेध करत असल्याचे खा. सुजय विखे यांनी सांगितले.  तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.अॅड अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य असून ते लवकरच बरे होऊन आपले काम नियमित करतील असा विश्वास   खा. सुजय विखे  यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News:  ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखेंकडून निषेध Read More »