DNA मराठी

latest news

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.    बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे.  या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर … Read More »

Today Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणुन घ्या नवीन किंमत

Today Gold Price: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याने आता देशातील बाजारात सोन्याचे भाव कमी होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम 64,940 रुपयांवर उपलब्ध आहे.   काय होती अर्थमंत्र्यांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली होती. सध्याचे कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणण्याबाबत ते बोलले. बेसिक कस्टम ड्युटी 10% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आली आहे, तर त्यासोबत लागू करण्यात आलेला कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) देखील 5% वरून 1% करण्यात आला आहे. या घोषणेनंतर लगेचच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती घसरल्या. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 4,000 रुपयांनी घसरून 72,838 रुपयांवरून 69,500 रुपयांवर आली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमतही 88,995 रुपये प्रति किलोवरून घसरून 84,275 रुपये झाली. दिल्ली सराफा बाजारातही भाव कमी झाले सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव बुधवारी 64,940 रुपयांवर पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 70,850 रुपयांवर उपलब्ध आहे. दिल्ली सराफा बाजारात 22 कॅरेट सोने 65,090 रुपये आणि 24 कॅरेट सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. चेन्नई-मुंबईसह इतर शहरांतील किमती चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,490 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 64,940 रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,850 रुपये आहे. वडोदरा आणि अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 64,990 रुपये मोजावे लागतात, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 70,900 रुपये मोजावे लागतात. गुंतवणूक करण्याची संधी  सोन्याच्या दरातील ही घसरण काही काळच राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव अजूनही वाढत आहेत. भू-राजकीय मुद्द्यांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम भारतातही सोन्याच्या किमतीवर होईल. अशा परिस्थितीत, सध्याची कपात ही कमाईसाठी या सोन्यात   गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

Today Gold Price: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव घसरला, जाणुन घ्या नवीन किंमत Read More »

Noida Crime News : ‘तो’ वारंवार बायकोला मेसेज करायचा, नवऱ्याला कळलं अन्….

Noida Crime News:  गुरुवारी ग्रेटर नोएडाच्या बदलपूर भागात एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खडबड उडाली.  घराच्या शेजारी राहणारा पत्नीला वारंवार मेसेज करत असल्याने नवऱ्याने त्या व्यक्तीवर अनेक वेळा चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. माहितीनुसार, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.  पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शाब्दिक वादानंतर आरोपी संजयने सोनूवर धारदार वस्तूने वार केला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू त्याच्या कारमध्ये असताना वाद सुरू झाला आणि हाणामारी झाली. दुपारच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बदलापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संजयला ताब्यात घेण्यात आले तर सोनूला रुग्णालयात नेण्यात आले. चौकशीत संजयने सोनूवर हल्ला केल्याची कबुली दिली. सोनू अनेक दिवसांपासून सतत मेसेज पाठवून पत्नीला त्रास देत असल्याचा आरोप त्याने केला. या अधिकाऱ्याने सांगितले की, छळाचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नसला तरी पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

Noida Crime News : ‘तो’ वारंवार बायकोला मेसेज करायचा, नवऱ्याला कळलं अन्…. Read More »

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे

Ahmednagar News: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. यापैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. मात्र यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला.  शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा   विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.  लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून होते, लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तर महायुतीला धक्का बसला होता. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  तांबे नेमकं काय म्हणाले? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल. पाटलांचा पराभव हा शरद पवारांना धक्का जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. मात्र निवडणुकीच्या निकालात ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली.

Ahmednagar News: ते मार्गदर्शक होते, जयंत पाटलांचा पराभव मनाला वेदना देणारा…, सत्यजित तांबे Read More »

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा

Maharashtra News: तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी गेल्या सात वर्षापासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथील वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनूस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते. हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेले आहेत. पंढरीच्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून पंगत दिली जाते.  कुटुंब प्रमुख माजी सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे अध्यक्ष युनूस टेंगे हे एक माजी सैनिक आहेत. त्यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई हीच एक सैनिकाची शिकवण असते, भारत माता ही एकच जात आणि एकच धर्म आहे. याचा आदर्श एका माजी सैनिकांनी समाजाला या माध्यमातून दिला आहे.  माजी सैनिक युनिस टेंगे मुस्लिम समाजाचे आहेत त्यांच्या घरी गेल्या सात वर्षापासून ही दिंडी मुक्कामी असते त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतात. पूजा अर्चा करून त्यांच्या समवेत हरिनामाच्या गजरात विलीन होतात यापेक्षा दुसरी देशसेवा कोणतीच नसल्याचे ते म्हणाले.

Maharashtra News : मुस्लिम कुटुंबाच्या घरी पंढरीच्या वारकऱ्यांचा मुक्काम, दिंडीचे स्वागत व वारकऱ्यांची सेवा Read More »

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला

Ahmednagar News: लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अहमदनगर महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने पंकज जावळे फेटाळला. अटकपूर्व अर्जावर न्यायालयात पाच दिवस सुनावणी झाली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन फेटाळून आहे.  अहमदनगर शहरातील बांधकाम व्यवसायाकडे आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.  या प्रकरणांमध्ये जामिनसाठी जावळे यांनी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आयुक्त पंकज जावळे यांचा जामीन नाकारला आहे.  दरम्यान जावळे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्याच काम सुरू आहे.

Ahmednagar News: आयक्त पंकज जावळेंच्या अडचणीत वाढ…कोर्टाने जामीन फेटाळला Read More »

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण

Zika Virus:  राज्यात हळूहळू झिका वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत झिकाचे 15 रुग्ण आढळून आले आहे.  त्यामध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश आहे. तीन नवीन रुग्ण आढळल्याने मंगळवारी पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली. तिन्ही बाधित महिला गर्भवती असून त्या जिल्ह्यातील पाषाण परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय 23 आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा अहवाल 5 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर 8 जुलै रोजी 18 वर्षांच्या 28 आठवड्यांच्या गर्भवती महिलेमध्ये संसर्गाची पुष्टी झाली. तिसरा केस, 23 आठवड्यांची गरोदर असलेल्या 19 वर्षीय महिलेची 8 जुलै रोजी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना सांधेदुखी आणि सौम्य ताप होता. 20 जूनपासून, पुणे महानगरपालिकेने (PMC) झिका विषाणूची 15 प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यात नऊ गर्भवती महिलांचा समावेश आहे. जर गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली असेल तर त्यांच्या नवजात बालकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या समस्या, ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा अनेक समस्या नवजात बालकांमध्ये उद्भवू शकतात. मेंदूच्या असामान्य विकासामुळे अनेक प्रकरणांमध्ये बाळाचे डोके खूपच लहान असते. देशात झिकाची अद्याप कोणतीही लस नाही. झिका   प्रामुख्याने संक्रमित एडिस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा संसर्ग गंभीर नसला तरी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास तो गर्भासाठी धोकादायक ठरू शकतो. झिका  लैंगिक संभोगातूनही पसरू शकतो. याशिवाय, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, झिका संक्रमित रक्ताच्या संक्रमणाने देखील पसरतो.

Zika Virus: सावधान, ‘या’ शहरात वाढत आहे झिकाचा धोका, समोर आले 15 रुग्ण Read More »

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी

Accident News:  देशात दररोज अपघताच्या घटना घडत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशामधील शाहडोल जिल्ह्यातील बुधर पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर येथे कोळसा भरलेल्या ट्रेलरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला धडक दिली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जणांना गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. बुधर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय जयस्वाल यांनी सांगितले की, अनुपपूर येथून कोळसा भरून ट्रेलर शहडोलकडे जात होता. दरम्यान, लालपूरजवळील क्रशरजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने ऑटोला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. 4 जणांची प्रकृती गंभीर असताना पोलिसांनी त्यांना त्यांच्याच वाहनातून वैद्यकीय महाविद्यालयात नेले, तेथे 4 पैकी 2 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर 2 जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. बिट्टू, रिया, रोशनी आणि ममता अशी या भीषण रस्ता अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की ऑटो शहडोलहून धनपुरीच्या दिशेने जात होता, ज्यामध्ये 35 वर्षीय नेमचंद वडील हरिशंकर, 40 वर्षीय रोशनी पती मज्जू साकेत, 30 वर्षीय कुंज बिहारी त्रिपाठी, सर्व धनपुरी येथील रहिवासी आणि इतर वाहनात होते. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कागदपत्रांशिवाय कोळसा वाहतूक सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कोळसा भरला होता, जो अनुपपूर येथील रामनगर येथून भरून रेवा येथे जात होता. मात्र, ट्रकची झडती घेतली असता कोळशाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अपघातानंतर बुरहार येथील कोळसा व्यापारी घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर कोळसा व्यापारी वाहतुकीशी संबंधित कागदपत्रे तयार करण्यासाठी तातडीने खाणीवर पोहोचले होते, असेही सांगण्यात येत आहे.

Accident News: भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी Read More »