DNA मराठी

latest news

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल

Eknath Shinde: उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उबाठा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले. उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे. दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली.यात उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला. तर धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके आदी पदाधिकारी, तर धुळे शहरातील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, पुरुषोत्तम जाधव, शेखर दुधाने, धुळे ग्रामीण मधील संजय माळी, सुधाकर पाटील, किशोर माळी, किशोर देवरे, साक्री शहरातील महावीर जैन, नितीन गायकवाड, महेश खैरनार, हर्षल माळी तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले. त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल Read More »

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death: भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर Read More »

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले

Former PM Manmohan Singh Death : देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले Read More »

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन

Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन Read More »

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम

IND VS AUS 4th Test : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्सने कसोटीत डेब्यू केला आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्समध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याच्या 11व्या षटकात विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे पंच आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी प्रकरण शांत केले. 19 वर्षीय सलामीवीराच्या खांद्याला धक्का दिल्याने आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील 11 वे षटक टाकत होता. ज्यावर नवोदित सॅम कॉन्स्टासने चौकार आणि षटकार ठोकले. त्यानंतर 11व्या षटकाच्या मध्यावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या दिशेने जाताना दिसतो. याच व्हिडिओमध्ये विराट बॉल घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याची सॅम कॉन्स्टासशी टक्कर झाली. आयसीसीचे नियम काय सांगतात ते जाणून घ्याजर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) चे नियम पाहिले तर कलम 2.1 नुसार क्रिकेटपटू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला धक्का दिल्यास आयसीसी कारवाई करू शकते. या घटनेपूर्वीही क्रिकेटच्या इतिहासात अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आधीच्या घटना पाहिल्या तर कळेल की अशा प्रकरणांमध्ये सामन्यावर बंदी किंवा निलंबनासारखी शिक्षा दिली जात नाही. केवळ सामनाधिकारीच शिक्षा म्हणून सामना फी किंवा डिमेरिट पॉइंट देऊ शकतात.

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम Read More »

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट

Maharashtra News : एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्यांबाबतची स्थिती चिंताजनक आहे. अनेक वर्षांपासून उद्योजकांनी जागेची मागणी केली असतानाही त्यांना प्लॉट मिळत नाहीत. यामध्ये अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट होत आहे. अधिकारी आणि भूखंड माफियांच्या संगनमतामुळे काही निवडक लोकांना प्लॉट मिळत आहेत, तर इतरांना आर्थिक तडजोडीच्या आधारावरच जागा मिळवावी लागते. प्लॉट शिल्लक नसल्याच्या कारणाने वेबसाईट बंद ठेवली जाते, परंतु अचानक प्लॉटचा लिलाव होणे हे अनेक प्रश्न उपस्थित करते. उद्योग मंत्री लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर उद्योजकांच्या विकासाला मोठा धक्का बसू शकतो. एमआयडीसीमध्ये अधिकाऱ्यांचे वर्चस्व आणि भूखंड माफियांची कारस्थाने थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. उद्योजकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा या गोंधळामुळे उद्योग क्षेत्रात मोठा अडथळा येऊ शकतो. अहिल्यानगर एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्नअहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांच्या मुख्य समस्यांचा सारांश खालीलप्रमाणे आहे: उद्योग मंत्र्यांनी लक्ष द्यावेउद्योग मंत्र्यांनी अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून उद्योगांचा विकास होईल. समाधान काय?

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट Read More »

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली

Onions Price In Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव फक्त १० दिवसांत ३६ रुपये प्रति किलोवरून १७ रुपये २५ पैशांवर आले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काय आहे कारण?निर्यात शुल्क: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २०% निर्यात शुल्क हे या भावात मोठी घसरणीचे प्रमुख कारण आहे. यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली आहे आणि देशांतर्गत बाजारात आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. निवडणुका: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय कारणांसाठी कांद्याचे भाव वाढवण्यात आले होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर हे कृत्रिम वाढीव भाव टिकू शकले नाहीत. शेतकऱ्यांची स्थिती:नुकसान: शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी खूप खर्च येतो. मात्र, सध्या मिळत असलेले भाव या खर्चाच्याही खाली आहेत. यामुळे शेतकरी मोठे आर्थिक नुकसान सोसत आहेत. चिंता: भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना पुढील पिकासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडे मागणी: शेतकरी सरकारकडे या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. सरकार काय करू शकते?निर्यात शुल्क हटवा: सरकारने कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क हटवले तर कांद्याची निर्यात वाढेल आणि देशांतर्गत बाजारात भाव स्थिर राहू शकतात. खरेदी: सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यांना आधार देऊ शकते. प्रोत्साहन: सरकारने कांद्याच्या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन देऊन बाजारपेठेतील विविधता वाढवू शकते.काय करावे? एकत्र येऊन लढा: शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे आपली मागणी ठामपणे मांडावी. बदलाव: शेतकरी पिकांची विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. संगठन: शेतकरी संघटनांमध्ये जाऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. कांद्याच्या भावात मोठी घसरण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. सरकारने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

मोठी बातमी: जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आदेश प्रभावी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश २१ डिसेंबर २०२४ पासून ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, धारदार हत्यारे, दारुगोळा, स्फोटके किंवा अनुशासन बिघडवणाऱ्या वस्तू बाळगणे व पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. सवलती यांना लागू नाही बंदी: कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 📢 नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन

Rey Misterio Sr Passes Away: WWE स्टार रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रे मिस्टेरियो सीनियर हे WWE स्टार रे मिस्टेरियो जूनियरचे काका होते. रे मिस्टेरियो सीनियरने वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि Lucha Libre AAA वर्ल्ड वाइड यासह अनेक संस्थांसोबत टायटल जिंकले होते. रे मिस्टेरियो सीनियर यांनी द ग्रेट खली आणि जॉन सीनासारख्या अनेक दिग्गजांना टक्कर दिली होती.रे मिस्टेरियो सीनियरला पराभूत करणे या मोठ्या दिग्गजांसाठीही सोपे नव्हते. Lucha Libre AAA ने रे मिस्टेरियो सीनियर यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “आम्ही मिगेल एंजल लोपेझ डायस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो, ज्यांना रे मिस्टेरियो सीनियर म्हणून ओळखले जाते. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. आम्ही तुम्हाला सांगूया की रे मिस्टेरियो सीनियरच्या कुटुंबीयांनी 20 डिसेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. 2009 मध्ये WWE चा निरोप घेतलारे मिस्टेरियो सीनियरची WWE कुस्ती कारकीर्द प्रदीर्घ होती. तथापि, 2009 मध्ये, त्याने वयाच्या 51 व्या वर्षी WWE कुस्तीमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर, त्याचा भाचा रे मिस्टेरियो जूनियर WWE मध्ये त्याचा वारसा पुढे नेत आहे.

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन Read More »

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Police : शेवगाव पोलीसांनी मोठी कारवाई करत अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन आरोपीस 24 तासाचे आत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना 18 डिसेंबर रोजी दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करुन जि.सांगली, जि.बीड तसेच तिसरे पथक ता.पैठण हद्दीत रवाना केली. तपासाच्या सहाय्याने जि.बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहिती मिळाली की शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले आहे. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना तसेच अपहरित व्यक्तीस ताब्यात घेतले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सोमनाथ बाबुश्या जाधव (रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि.बीड) असं आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहोत.

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई Read More »