DNA मराठी

DNA Marathi News

chandrkant patil

Chandrkant Patil on Ajit Pawar: मोफत प्रवासाची घोषणा फसवी; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट वार

Chandrkant Patil on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात पीएमपीएमएल आणि मेट्रोमध्ये मोफत प्रवास करण्याची केलेली घोषणा फसवी असून, ती राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात न घेता केली आहे. ही घोषणा स्वागताहार्य जरी असली तरी ती राज्य सरकारशिवाय अमलात येऊ शकत नाही. अजित पवार यांना एकट्याने ही घोषणा जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, बिहार निवडणुकीत काँग्रेसने अशा अनेक फसव्या घोषणा केल्या होत्या. मात्र, सरकारच येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात आल्या. अजित पवार यांनाही महापालिकेत आपली सत्ता येणार नसल्याचे माहीत असल्याने अशा घोषणा करण्यात येत आहेत. ‘ही योजना चांगली असली तरी तिची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती सरकारला हा एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे केवळ क्रेडिट घेण्यासाठी पवार यांनी आपल्या मित्र पक्षांना विश्वासात न घेता अशा घोषणा करू नये, पाटील म्हणाले. यापूर्वी 1999 ला अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. सरकार आल्यानंतर ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा बचाव त्यांनी केला होता. असाच प्रकार या घोषणेबाबतही होण्याची दाट शक्यता आहे,’ असा चिमटाही पाटील यांनी काढला. मुख्यमंत्रीपदाकडे संपूर्ण राज्याचे अधिकार असतात. केवळ एक बटण दाबून मोफत बस योजना लागू होऊ शकत नाही. महायुती हे तिघांचे सरकार असून कोणताही एक नेता स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या घोषणा करू शकत नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हमीपत्र जाहीर केले असून घोषणापत्रावरून त्यांचा प्रवास हमीपत्राकडे आला आहे, कारण अनेक घोषणा पूर्ण करणे त्यांना शक्य नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. मेट्रो आणि पीएमपीएमएल बसमध्ये मोफत प्रवास देण्याची घोषणा करताना त्यामागील प्रक्रिया, आर्थिक तरतूद आणि अंमलबजावणी याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून, पुण्याचा पालकमंत्री असताना बससेवेचा सुमारे एक हजार कोटी रुपयांचा तोटा होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. अद्याप एमएनजीएलचे 65 कोटी रुपये मनपाकडे थकीत असताना मोफत बस योजना कशी राबवणार? त्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता असून हा निर्णय महायुती सरकारला घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले. महिलांना उच्च शिक्षणासाठी 50 टक्के शुल्क माफीचा निर्णय घेण्यासाठी अजित पवार यांनी सहा महिने लावले होते. राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याची त्यांची भूमिका होती. अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर तो निर्णय घेण्यात आला. अशी भूमिका अजित पवार हे केवळ महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करत असलेल्या घोषणा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, असे ही पाटील म्हणाले. दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला अंतर्गत सर्व्हेनुसार सध्या 115 जागा मिळत असून भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हा आकडा 125 पर्यंत जाईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर पुण्यात भाजपचाच महापौर होईल आणि त्या पदासाठीची विविध प्रवर्गानुसार नावेही अंतिम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrkant Patil on Ajit Pawar: मोफत प्रवासाची घोषणा फसवी; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर थेट वार Read More »

mukesh ambani

Mukesh Ambani : जगातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब कोणत्या क्रमांकावर?

Mukesh Ambani : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणारे मुकेश अंबानी नेहमी सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत राहतात. कधी जिओमुळे तर कधी एखाद्या व्यावसायिक करारामुळे मुकेश अंबानी चर्चेत राहतात. मात्र आता मुकेश पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पाठीमागचे कारण म्हणजे नुकतंच जगातील 10 सर्वात श्रीमत कुटुंबीयांचे नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुकेश अंबानी यांचे अंबानी कुटुंब आठव्या स्थानावर आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने अहवाल सादर केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने जारी केलेल्या अहवालानुसार, जगातील दहा सर्वात श्रीमंत कुटुंबियांच्या यादीत अंबानी कुटुंब आठव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती $105.6 अब्ज इतकी आहे. तर या यादीत वॉल्टन   कुटुंब पहिल्या स्थानावर असून त्यांची संपत्ती $513.4 अब्ज इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अल नाहयान कुटुंब असून त्यांची संपत्ती $335.9 अब्ज इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अल सौद कुटुंब असून त्यांची संपत्ती $216.6 अब्ज इतकी आहे. चौथ्या क्रमांकावर अल थानी कुटुंब असून त्यांची संपत्ती $199.5 अब्ज इतकी आहे. तर पाचव्या क्रमांकावर हर्मेस कुटुंब असून त्यांची संपत्ती $184.5 अब्ज इतकी आहे. सहाव्या क्रमांकावर कोच कुटुंब असून त्यांची संपत्ती $150.5 अब्ज इतकी आहे. याच बरोबर सातव्या क्रमांकावर मार्स कुटुंब असून त्यांची संपत्ती $143.4 अब्ज इतकी आहे. तर आठव्या क्रमांकावर अंबानी कुटुंब असून त्यांची संपत्ती $105.6 अब्ज इतकी आहे. नवव्या क्रमांकावर वेर्थाइमर कुटुंब असून त्यांची संपत्ती $85.6 अब्ज इतकी आहे. तर दहाव्या क्रमांकावर थॉमसन कुटुंब असून त्यांची संपत्ती $82.1 अब्ज इतकी आहे. जगातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबे: 01.  वॉल्टन कुटुंब – $513.4 अब्ज 02.  अल नाहयान कुटुंब – $335.9 अब्ज 03.  अल सौद कुटुंब – $216.6 अब्ज 04. अल थानी कुटुंब – $199.5 अब्ज 05. हर्मेस कुटुंब – $184.5 अब्ज 06.  कोच कुटुंब – $150.5 अब्ज 07.  मार्स कुटुंब – $143.4 अब्ज 08.  अंबानी कुटुंब – $105.6 अब्ज 09.  वेर्थाइमर कुटुंब – $85.6 अब्ज 10. थॉमसन कुटुंब – $82.1 अब्ज

Mukesh Ambani : जगातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंबांच्या यादीत अंबानी कुटुंब कोणत्या क्रमांकावर? Read More »

ajit pawar

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Pune Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा पुणेकरांसमोर मांडला.  ‘अष्टसूत्री प्रगती’ (विकासाचे आठ स्तंभं) आणि ‘अष्टावधानि नेतृत्व’ (आठ दिशेचं सजग नेतृत्व) या तत्त्वांवर आधारित हा जाहीरनामा पुण्याच्या सुयोग्य आणि जबाबदार विकासाची दिशा दर्शवतो.   सहा महिन्यांचे सखोल सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद मोहिमेतून तयार झालेल्या या जाहीरनाम्याने पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास केला आहे. यामधून जनता घोषणेपेक्षा खात्रीशीर अंमलबजावणीची अपेक्षा ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ‘अष्टसूत्री–अष्टावधानि’ हा आराखडा अजितदादांच्या तीन दशकांच्या प्रशासकीय अनुभवावर आधारित आहे. सतत जागरूक राहणे, प्रशासनाचा सखोल अभ्यास आणि कामाचा शेवटपर्यंत पाठपुरावा ही त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. वेळेत निर्णय घेणे, नियोजन आणि शिस्तबद्ध काम आणि कामात विलंबाला शून्य सहनशीलता हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. अष्टसूत्री प्रगती – पुण्याच्या पुनर्बांधणीसाठी आठ स्तंभ दररोज पाणीपुरवठा: सर्व 41 प्रभागांमध्ये उच्च दाबाने नियोजित वेळापत्रकानुसार पाण्याचा पुरवठा, टँकरची आवश्यकता संपविणे, पाईपलाईन गळती पूर्णपणे बंद करणे आणि भामा–मुळा–मुठा प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे.   वाहतूककोंडीमुक्त, खड्डेमुक्त रस्ते: अपूर्ण लिंक रस्त्यांची जोडणी, मुख्य 150 किमी रस्त्यांचा दर्जा सुधारणे, एचसीएमटीआरची अंमलबजावणी, ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करणे आणि नव्याने समाविष्ट गावांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे.   स्वच्छतेचा विज्ञाननिष्ठ आराखडा: 100% कचरा वर्गीकरण आणि कंपोस्टिंग, अपयशी प्रकल्पांचं पुनरुज्जीवन, हरित सोसायट्यांना प्रोत्साहन आणि 2029 पर्यंत पुणे ‘स्वच्छ सर्वेक्षण’मधील अग्रगण्य तीन शहरांत समावेश करणे. हाय-टेक आरोग्य सेवा: 200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’, या नव्या रुग्णालयांची उभारणी, परवडणारी तपासणी सेवा (PPP पद्धतीने), टेलिमेडिसिनचा उपयोग आणि गरीब रुग्णांसाठी वाढीव आर्थिक सहाय्य.   प्रदूषणमुक्त, उत्तम हवामानयुक्त पुणे: पूर नियंत्रण, ड्रेनेज नियोजन, नाल्यांचे संरक्षण, हरित विस्तार, पर्यावरण सक्षमीकरण आणि हवामान बदलास सज्ज असा शाश्वत विकास आराखडा.   झोपडपट्टी पुनर्वसन व सुरक्षित पुनर्विकास: मूळ जागेवर पुनर्वसन, कायदेशीर धारकांना संरक्षण, पारदर्शी कारभार, उपजीविकेची हमी आणि जुन्या इमारतींच्या रहिवाशांच्या नेतृत्वात पुनर्विकास प्रक्रिया.   पुणेकरांसाठी जबाबदार प्रशासन निर्मिती: मोफत मेट्रो व बस प्रवास, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट, व्याजमुक्त स्वयंरोजगार कर्ज आणि तातडीची प्रतिसादक्षमता असलेलं प्रशासन.   पुणे मॉडेल शाळा: CBSE/ICSE दर्जानुसार 150 आधुनिक शाळा, प्रशिक्षित शिक्षक, विज्ञान- संगणक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा, मराठी माध्यमावर आधारलेली इंग्रजी शिक्षण पद्धती आणि पालकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार नसणार.  

Pune Election : ‘1 अलार्म, 5 काम’: गतिमान पुण्यासाठी राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध Read More »

mobile recharge

Mobile Recharge आता होणार महाग; वाढत्या महागाईत जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम?

Mobile Recharge : भारतातील मोबाइल टेलिकॉम कंपन्या आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयानुसार आता मोबाईल रिचार्जच्या दरात वाढ होणार आहे. 5G नेटवर्कच्या विस्तारामुळे आणि वाढत्या डेटा वापरामुळे, कंपन्यांच्या खर्चातही सतत बदल दिसून येत आहेत. जून 2026 पासून मोबाइल रिचार्ज योजना अधिक महाग होण्याची अपेक्षा आहे आणि दर सरासरी 15 टक्के किंवा त्याहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. टॅरिफ वाढ एका अहवालानुसार, मोबाइल दरांमध्ये संभाव्य वाढ सुधारित महसुलाशी जोडली जात आहे. जवळजवळ दोन वर्षांनंतर, दूरसंचार कंपन्या पुन्हा दर वाढवण्याची तयारी करत आहेत. असा अंदाज आहे की जून 2026 मध्ये मोबाइल रिचार्ज योजनांच्या किमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात, ज्यामुळे उद्योगाच्या महसुलात मोठी वाढ होईल. या मूल्यांकनातील डेटा आणि अंदाज आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या अहवालात सादर केले आहेत, जे या क्षेत्राच्या आर्थिक दृष्टिकोनाचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करते. महसुलावर परिणाम टॅरिफ वाढीचा थेट परिणाम मोबाइल एआरपीयू (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वर होण्याची शक्यता आहे. डेटा वापर, पोस्टपेड वापरकर्त्यांचा वाटा आणि प्रीमियम प्लॅनची मागणी वाढल्याने ARPU ला आधीच पाठिंबा मिळत आहे. परिणामी, शुल्कात वाढ आर्थिक वर्ष 2027 मध्ये या क्षेत्राच्या महसूल वाढीचा दर दुप्पट करू शकते. तथापि, उच्च किमतींमुळे नवीन ग्राहक जोडण्यावर मर्यादा येण्याची अपेक्षा आहे. तथापि, विद्यमान ग्राहकांकडून मिळणारा सुधारित महसूल हा एक प्रमुख घटक राहील. कंपन्यांचा खर्च वाढलेली गुंतवणूक आणि सुधारित रोख प्रवाह कंपन्यांचे नफा मजबूत करू शकतो. क्षेत्राच्या अंदाजानुसार पुढील काही वर्षांत नेटवर्क गुंतवणूक पातळी संतुलित राहील असे गृहीत धरले जाते. हे थेट कंपनीच्या महसुलात रूपांतरित होऊ शकते. या कारणास्तव, मोबाईल रिचार्जच्या किमतींमध्ये तीव्र वाढ आता उद्योगासाठी एक आवश्यक पाऊल म्हणून पाहिली जात आहे.

Mobile Recharge आता होणार महाग; वाढत्या महागाईत जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम? Read More »

bank fd

Bank FD : गुंतवणुकीची सुवर्णसंधी; ‘या’ पाच बँका देत आहेत 5 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज

Bank FD : जर तुम्ही 2026 च्या पहिल्याच महिन्यात बँकेत गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला देशातील पाच मोठ्या बँकांमधील 5 वर्षांच्या एफडीवरील व्याजदरांची संपूर्ण माहिती देणार आहोत. तुम्ही आयकर कलम 80सी अंतर्गत पाच वर्षांच्या एफडीवरील कर सवलतीसाठी पात्र देखील होऊ शकता. जुन्या कर प्रणालीनुसार, तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करून 1.50 लाख रुपयांपर्यंत कर कपात करू शकता. SBI चे 5 वर्षांचे एफडी दर: सामान्य ग्राहक: 6.05% प्रतिवर्ष ज्येष्ठ नागरिक: 7.05% प्रतिवर्ष PNB चे 5 वर्षांचे एफडी दर: सामान्य ग्राहक: 6.00% प्रतिवर्ष ज्येष्ठ नागरिक: 6.80% प्रतिवर्ष BOB चे 5 वर्षांचे एफडी दर: सामान्य ग्राहक: 6.00% प्रतिवर्ष ज्येष्ठ नागरिक: 7.00% प्रतिवर्ष HDFC बँकचे 5 वर्षांचे एफडी दर: सामान्य ग्राहक: 6.15% प्रतिवर्ष ज्येष्ठ नागरिक: 6.65% प्रतिवर्ष ICICI बँकचे 5 वर्षांचे एफडी दर: सामान्य ग्राहक: 6.60% प्रतिवर्ष ज्येष्ठ नागरिक: 7.10% प्रतिवर्ष एफडी करताना या गोष्टी लक्षात ठेवा बहुतेक बँका त्यांच्या गुंतवणूकदारांना एफडी गुंतवणूक पर्याय देतात. पण तुमच्यासाठी सर्वोत्तम एफडी कोणती हे तुम्हाला कसे कळेल? तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळणाऱ्या कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी. तुमच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर अवलंबून, तुम्ही योग्य एफडी कालावधी निवडू शकता. तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोत्तम व्याजदर देणारे एफडी तुम्ही निवडावेत. जेव्हा एफडी व्याजदर वाढण्याची अपेक्षा असते, तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या परिपक्वता असलेल्या अनेक एफडीमध्ये गुंतवणूक करून एफडीची शिडी तयार करू शकता आणि दीर्घकालीन एफडी व्याजदराची सरासरी काढू शकता.

Bank FD : गुंतवणुकीची सुवर्णसंधी; ‘या’ पाच बँका देत आहेत 5 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज Read More »

delhi high court on abortion

Delhi High Court on Abortion : गर्भपातसाठी पत्नीची घेणार निर्णय; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Delhi High Court on Abortion : दिल्ली उच्च न्यायालयाने महिलांना गर्भपातासाठी पतीची संमती घेणे अनिवार्य नाही असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. हा निर्णय एका महिलेच्या बाबतीत आला जो तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि 14 आठवड्यांची गर्भधारणा गर्भपात करू इच्छित होती. न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी दबाव आणता येत नाही. असे करणे तिच्या शरीरावरील आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन आहे. न्यायालयाने मान्य केले की यामुळे महिलेचा मानसिक त्रास वाढतो. विशेषतः जेव्हा वैवाहिक संबंधात संघर्ष असतो तेव्हा महिलेचा स्वतःचा निर्णय सर्वोपरि असतो. उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 312 लागू होत नाही कारण महिलेने तिचा अधिकार वापरला आहे. कायदा काय म्हणतो? न्यायालयाने गर्भपात कायदा (MTP Law) चा उल्लेख केला. या कायद्यात कुठेही पतीची संमती आवश्यक नाही. गर्भपात केल्याबद्दल खटल्याला सामोरे जाण्यापासून रोखणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला महिलेने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर केली, ज्यामध्ये असे म्हटले होते की गर्भपातासाठी निर्णय घेण्यात महिलेचा स्वावलंबन सर्वात महत्त्वाचा आहे. हा निर्णय महिलांच्या वैयक्तिक हक्कांना बळकटी देतो. पोटगी प्रकरणात दिलासा तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने पोटगीशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणातही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की ठोस पुराव्याशिवाय पत्नी कमावते किंवा स्वतःचे पालनपोषण करण्यास सक्षम आहे असे गृहीत धरणे चुकीचे आहे. केवळ पतीच्या दाव्यावर पत्नीला स्वावलंबी मानले जाऊ शकत नाही. या प्रकरणात, महिलेने फक्त 11 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. अंतरिम पोटगी ठरवताना गृहीतके नव्हे तर पुराव्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Delhi High Court on Abortion : गर्भपातसाठी पत्नीची घेणार निर्णय; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय Read More »

akshay kumar

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’

Akshay Kumar : ‘भूत बंगला’ ही या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र येत आहेत . पहिल्या पोस्टरच्या लाँचपासूनच उत्सुकता प्रचंड वाढली होती, त्यातच आलेल्या इंटरेस्टिंग मोशन पोस्टरमुळे चित्रपटाविषयीचा बज आणखी वाढला. आता अखेर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली असून ही मच-अवेटेड हॉरर-कॉमेडी 15 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. आज झालेल्या या मोठ्या घोषणेमुळे उत्साह आणखी वाढला आहे ‘भूत बंगला’ अधिकृतरीत्या 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीज डेट जाहीर होताच प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा परफेक्ट मिलाप तोही या जॉनरमधील उस्ताद प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीसोबत म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्या सिनेमॅटिक जादूची पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. रिलीज डेटची घोषणा करताना मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले— “बंगल्या मधून एक बातमी आली आहे! 15 मे 2026 ला उघडेल दरवाजा थिएटर्समध्ये भेटूया #BhoothBangla” ‘भूत बंगला’ला एक कंप्लीट एंटरटेनर बनवणारा सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. यात अक्षय कुमार, तब्बू, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी आणि वामिका गब्बी यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे काही भाग राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे शूट करण्यात आले आहेत, ज्यामुळे कथेला एक जबरदस्त व्हिज्युअल टच मिळतो. अनेक वर्षांनंतर प्रियदर्शन यांच्या चित्रपटात ही पॉवरहाऊस टीम एकत्र दिसणार असल्याने मनोरंजनाचा डोस प्रचंड असणार यात शंका नाही. याआधीही या टीमने अनेक क्लासिक कॉमेडी चित्रपट दिले आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’चे निर्मितीकार्य शोभा कपूर, एकता आर. कपूर आणि अक्षय कुमार यांच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ या बॅनरखाली झाले आहे. फारा शेख आणि वेदांत बाली सहनिर्माते आहेत. कथा आकाश ए. कौशिक यांनी लिहिली असून स्क्रीनप्ले रोहन शंकर, अभिलाष नायर आणि प्रियदर्शन यांनी तयार केला आहे. डायलॉग्स रोहन शंकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे.

Akshay Kumar चाहत्यांना देणार धक्का; ‘या’ दिवशी रिलीज होणार हॉरर कॉमेडी ‘भूत बंगला’ Read More »

sanjay shirsat

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते कार्यकर्ते याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे होते. मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटे विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले. त्यामुळेच आज कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत आहेत. “जैसी करणी, वैसी भरणी” हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले आहे. जे “शेर आया, शेर आया” म्हणत होते, त्याच इम्तियाज जलीलला आज पळावे लागत आहे. “जनता मेरे साथ है” म्हणणारा आज शेपूट घालून पळत आहे, आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. इम्तियाज जलीलने जे केले, त्याची किंमत त्याला मोजावी लागत आहे. पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही. ज्यांनी दगडफेक केली किंवा हल्ला केला, त्यांना पोलिसांनी पकडून का मारले याची चौकशी केली पाहिजे. “माझे कोणी वाकडे करू शकत नाही, ओवेसी माझ्यासोबत आहे,” अशी जी इम्तियाज जलीलची मस्ती होती, त्याचे उत्तर आज त्याला मिळाले आहे. ओवेसी भडक भाषण करून मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र त्याला उत्तर कार्यकर्त्यांनी आधीच दिले आहे.

Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील खोटारडा आणि ब्लॅकमेलर; संजय शिरसाट स्पष्ट बोलले Read More »

mns

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक

BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. “हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे. नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक Read More »

img 20260107 wa0041

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन

Pune Crime : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉज मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज मराठे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली पोलिस दलात तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या 25 वर्षाचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती. पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले आणि त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन Read More »