DNA मराठी

DNA Marathi News

IMG 20240102 WA0004

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 07 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  फिर्यादी ऋषिकेश देविदास लगड यांनी त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तुर 27 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचा तपास करताना पोनि. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी याने व त्याचे साथीदाराने केला असून आता ते हा शेतमाल विक्रीकरीता पारनेर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने जामगांव ते पारनेर जाणारे रोडवर जामगांव घाट या ठिकाणी सापळा रचुनवैभव उर्फ बाल्या सुरेश औटी, अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश अजिनाथ गोलवड, किरण संजय बर्डे आणि साहील नामदेव माळी या आरोपींना अटक केली आहे.   पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या कब्जामधून 96,000 रुपये किमतीची 12 क्विंटल पांढरी तुर, 30,000 रुपये किमतीची 6 क्विंटल सोयाबीन व 8,00,000 रुपये किमतीची टाटा कंपनीची इंट्रा गाडी असा एकुण 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.   ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना बेलवंडी पोलीस ठाणेमध्ये  भादवि कलम 379, 342 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Ahmednagar News: शेतमाल चोरी करणाऱ्या 07 आरोपींना अटक, 9,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त Read More »

Hit And Run Law

Hit And Run Law : पेट्रोल पंपांवर अचानक वाढली गर्दी! माल वाहतूकीवर परिणाम; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Hit And Run Law : केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत हिट ॲन्ड रन केस प्रकरणी 10 वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर अनेक वाहन चालकांनी या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्रक चालकांनी आंदोलन केल्याने पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची कमतरता होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  यामुळे अनेक नागरिक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत आहे. अशीच काही स्थिती अहमदनगर शहरात देखील निर्माण झाली आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.   हिट ॲन्ड रन कायदा  केंद्र सरकारने या कायद्याअंतर्गत आता दहा वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपयांचा दंड अशी तरतूद केली आहे. हा कायदा चालकांविरुद्ध असल्याची प्रतिक्रिया अनेक वाहन चालक देत आहे.  या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर अपघात करुन तिथून पण काढलं तर त्या व्यक्तीला दहा वर्षाची शिक्षा आणि 07 लाख रुपयांचा दंड होऊ शकते. मात्र जर अपघात करणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले तर त्या व्यक्तीची शिक्षा कमी होऊ शकते. यामुळे सध्या या कायद्याविरोधात आंदोलन होत आहे.  आपल्या देशात एका अंदाजानुसार 95 लाख ट्रक आहे मात्र या नवीन कायदा विरोधात सोमवारपासून तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त ट्रक रस्त्यावर धावत नाही.

Hit And Run Law : पेट्रोल पंपांवर अचानक वाढली गर्दी! माल वाहतूकीवर परिणाम; जाणून घ्या नेमकं प्रकरण Read More »

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज मिडक येथील एका कारखान्यात काल रात्री भीषण आग लागली.  या अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला. व्हॅलुज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हातमोजे तयार करणाऱ्या सनशाईन एंटरप्रायजेसने मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.  आग इतकी तीव्र होती की संपूर्ण कंपनी उध्वस्त झाली. अग्निशामक ब्रिगेडला आग विझवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या आगीमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की फॅक्टरीला वाळूज मिडीसी क्षेत्रात आग लागली. रात्री आग लागली तेव्हा कंपनी बंद झाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक वाहने घटनास्थळी पाठविली गेली. परंतु जेव्हा बचाव कर्मचारी अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा सर्व काही संपले. असे सांगितले जात आहे की मृतदेह जाळले गेले नाहीत, म्हणून प्रारंभिक अंदाज असा आहे की धुरामुळे कामगार गुदमरल्यासारखे मरण पावले असते. पोलिस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले, रात्री 1. 15 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज मिडीसी भागात कंट्रोल रूममध्ये कंट्रोल रूमची नोंद झाली. रात्री पोलिस एसीपी घटनास्थळी पोहोचले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती उघडकीस येईल. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मृत मुश्ताक शेख (वय 65), कौशर शेख (वय 32), इक्बाल शेख (वय 18), काकांजी (वय 55), रियाझभाई (वय 32), मार्गम शेख (वय 33 वर्षे वय 33 वर्षे) ) घडले. तथापि, मृत व्यक्ती तिथे अडकला की झोपला होता हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी पोहोचली. ज्या ठिकाणी हे लोक अडकले होते तो रस्ता पूर्णपणे ज्वालांमध्ये गुंतला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आग विझविली, परंतु धूर आणि उष्णता इतकी जास्त होती की ते त्वरित वर जाऊ शकले नाहीत. यानंतर शीतकरण ऑपरेशन झाले. यानंतर, ते काळजीपूर्वक वरच्या मजल्यावर पोहोचला. जिथे त्यांना खोलीत हृदय -विखुरलेले दृश्य पाहिले. त्या खोलीत सहा लोक मरण पावले होते. त्यात एक कुत्रा देखील होता.  अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग कारखान्याच्या आसपास होती आणि हे लोक पहिल्या मजल्याच्या आत अडकले होते.  अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, आग का लागली याची अद्याप माहिती मिळाली नाही, पुढील तपास चालू आहे.

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! कारखान्याला भीषण आग, सहा मजुरांचा मृत्यू Read More »

Screenshot 2024 01 01 16 31 38 05 6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

Balasaheb Borate : अहमदनगर शहरांमधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या विशेष प्रयत्नतुन व विकास निधीतून प्रभागाचा कायापालट करण्यात आला आहे.  24 तास जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा एकमेव नेतृत्व म्हणून नगर शहरात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ख्याती आहे. आज कापड बाजारातील भाऊराव पाटील शाळा ते मयूर कंपाऊंड रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला.  यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, विशाल वालकर, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष्य श्याम देडगावकर , सचिव किरण व्होरा , संभव काठेड , आदित्य गांधी,   मयूर फिरोदीया  , राहुल मुथा,  कृष्णा  गांधी , भागवान रायसिंगणी , लंके सर, संजय चोपडा  , देवेंद्र भाटेजा, फारूक रंगरेज, मुन्ना चुडीवाला तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Balasaheb Borate : नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नांना यश, रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ Read More »

IMG 20240101 WA0005

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…!

Maharashtra News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे फड सुरू आहे. “बिनधास्त या आणि खेळा’ या धर्तीवर काही घरात तर ठिक- ठिकाणी दिवसाढवळ्या, रात्रंदिवस जुगार सुरु असल्याकारणाने गावात अशांतता निर्माण झाली असून व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होत असल्याने घराघरात अशांतता पसरली आहे.  तसेच दादागिरी करुन पैशांची मागणी करणे, सट्टा, पत्ता, जुगार खेळण्यासाठी घरातील संसारपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच एवढ्यावरच न थांबता घरातील महिलांच्या अंगावरील दागदागिने सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून किंवा गहाण ठेवून तसेच शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य विकून व्यसनपूर्ती करत असून या भागातील सुरू असलेले जुगार व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन बोधेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले आहे.  अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे  की, बोधेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यामुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोधेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या भागातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गावातील 17 ते 24 वर्षातील तरुण मुलांची वर्दळ वाढलेली आहे, पत्ते खेळायला तरुण मुलांची गर्दी व्हायला पाहिजे म्हणून दारू, मटण, सिगारेट इत्यादी सह अन्य आमिषे दिले जात आहे.  अवैध सुरू असलेल्या जुगार व्यवसायामुळे या भागातील गुन्हेगारी देखील बोकाळत चालली आहे. त्यामुळे बोधेगाव परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे भविष्य खराब करण्याचे काम अवैध जुगार व्यवसाय चालवणाऱ्याकडून या भागात सुरू असून सर्वसामान्यांचे संसार वाचविण्यासाठी जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करावी  तसेच पोलिसांकडून यावर कारवाई न झाल्यास जुगाराच्या अड्ड्यावर महिला मोर्चा नेऊन तो बंद पाडू अशी मागणी बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना ईमेलद्वारे दिले लेखी निवेदनद्वारे केली आहे.

Maharashtra News: अवैध जुगार व्यवसाय बंद करा अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन…! Read More »

IMG 20240101 WA0003

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे.  या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्याकरिता संदीप मिटके यांनी कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून माहिती दिली.   त्यांनी तहसील कार्यालय  येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.  तसेच मनोज चंद्रकांत गिरमे (वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव) अल्ताफ बाबू शेख ( वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.  आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Ahmednagar News: अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त Read More »

IMG 20231230 WA0013

Eknath Shinde:  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहिमेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती

Eknath Shinde: हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुंबईतील अशाच प्रकारच्या मोहिमांच्या यशाने प्रेरित होऊन सखोल स्वच्छता अभियान (Deep Clean Drive) हा उपक्रम सुरू केला आहे.  28 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेली ही मोहीम पुढील तीन महिन्यांत संपूर्ण दुहेरी शहरांमध्ये उलगडण्यासाठी नियोजित केलेल्या सर्वसमावेशक स्वच्छता मालिकेची सुरुवात दर्शवते. दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी नवघर हनुमान मंदिरा जवळील परिसराच्या स्वच्छतेच्या उद्घाटन मोहिमेत सक्रियपणे सहभागी झालेल्या मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आमदार प्रताप सरनाईक आणि मा. आमदार गीता जैन यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवत शहराप्रती सामूहिक बांधिलकीवर जोर दिला.  सखोल स्वच्छता अभियान या मोहिमेचे उद्दिष्ट रस्ते आणि पदपथावरील धूळ दूर करण्याचा आहे. या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि प्रेरणाचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 22 पथके अथकपणे काम करताना दिसली. हे अनेक शुक्रवारच्या मोहिमांपैकी पहिले चिन्हांकित आहे, ज्या दरम्यान नियुक्त वॉर्डांमध्ये रस्ते, दुभाजक, फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. बस स्टॉप वरील, भिंतींवरील बिले आणि स्टिकर्स काढून टाकणे, तसेच शहरातील रेड स्पॉट्स संबोधित केल्याने एकूणच स्वच्छतेच्या प्रयत्नांना हातभार लागला.  मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करत मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी हनुमान मंदिर, इंद्रलोक नाका आणि गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांचा सहभाग आणि क्यूआर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरणावर भर दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांनी सर्व स्तरावर कौतुक केले. मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी येथे अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे प्रदर्शन केले, शहर स्वच्छतेच्या तांत्रिक प्रगतीसाठी वचनबद्धतेचे प्रदर्शन करण्यात आले. मा. मुख्यमंत्री यांनी नागरिकांशी संवाद साधला, उपक्रमातील त्यांची भूमिका मान्य करून स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.  मिरा भाईंदर महानगरपालिका ही गती कायम ठेवण्यास उत्सुक आहे, आगामी मोहिमेद्वारे तेथील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मिरा भाईंदर महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहणार असून नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन मा. आयुक्त संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या वतीने करण्यात येत आहे.  तसेच कार्यक्रमास प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सामाजिक संस्था व नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल मा. आयुक्त यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

Eknath Shinde:  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहिमेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती Read More »

IMG 20231230 WA0005

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा

Ahmednagar News: टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 30 डिसेंबर 2023  महाराष्ट्र बॉडी बिल्डर मान्यतेने अहमदनगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डींग आयोजित टिपू सुलतान श्री शरीर सौष्ठ्य स्पर्धा भरवणारे सय्यद शहा फैजल (शानु), सोहेल शेख व सर्व आयोजकां विरोधात हिंदु धर्माचे आराध्य दैवत गणपती यांचे श्री हे नाव भारतावरती इस्मामिक राज्य आणण्याच्या हेतुने लाखों हिंदुंचे कतलेआम करणाऱ्या व हजारो हिंदु मंदिरे पाडणाऱ्या, हिंदू महिलांवरती बलात्कार करणाऱ्या टिपु सुलतान या इस्लामिक जिहादी आक्रमंताचे नाव जोडुन हिंदु धार्मियांची भावना दुखावुन तसेच रहदारीला अडथळा निर्माण करुन शहरातील पोलिसांच्या दप्तरी नोंद असलेले अति संवेदनशील आशा टॉकीज परिसर ज्या भागातुन कुठल्याही हिंदुंच्या मिरवणुक, मोर्चे काढण्यासाठी पोलिसांचे परवानगीसाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागते.  अशा ठिकाणी ही स्पर्धा भरवुन शहरामध्ये धार्मित तेढ निर्माण करण्याचे ठळक उद्देश दिसून येते.  यामधील सय्यद शहा फैजल (शानु) हा अनेक प्रकारच्या हिंदु मुस्लिम वादामध्ये आरोपी आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हे कारस्थान करुन शहर व राज्यासह देशात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  त्यामुळे पोलिसांनी अतिशीघ्र संबंधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत व हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकारणी कठोर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे.

Ahmednagar News : टिपु सुलतानच्या नावापुढे श्री नाव जोडल्याने हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवरती कारवाई करा Read More »

Manoj Jarange

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुढील महिन्यात ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन करणार आहे.  जरांगे येथील शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहोचले. दरम्यान, मुंबईत आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास मुंबईतच आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. तसेच सकल मराठा समाजाने आंदोलनस्थळी येऊन मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती जरांगे यांनी केली आहे. मराठा आंदोलन रद्द होणार नाही पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने दुफळीत पडू नये. सर्वांनी एकत्र यावे. हा गरीब मराठ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. जरांगे पुढे म्हणाले की, मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात मैदान लागणार आहे, त्यासाठी तयारी सुरू आहे.  मराठ्यांचा मुंबईत आंदोलनाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. 3 कोटी मराठे मुंबईवर हल्ला करणार! तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक मुंबईत येतील, असा दावा त्यांनी केला. मुंबई दौरा रद्द होणार नाही. 20 जानेवारीपर्यंत हा मोर्चा मुंबईकडे निघणार आहे.  मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील सर्व मैदाने लागतील. आता मैदान देण्याची जबाबदारी सरकारची आहे. थांबवले तर फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करतील मनोज जरांगे यांनी इशारा दिला की, “20 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने मराठा मुंबईत येणार असून सरकारने त्यांची वाहने रोखल्यास थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच आंदोलन करू.  आमची वाहने बंद पडली तर आम्ही आमचे सामान कसे नेणार? मुंबईत राहण्यासाठी तंबू, दैनंदिन जीवनातील गोष्टी हव्या आहेत, ज्या आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉलीने मुंबईत आणू. आम्ही ते दगडांनी भरून आणणार नाही…” मराठा समाजाला आवाहन करताना जरांगे म्हणाले की, सरकार आमच्यावर कारवाई करेल… त्यामुळे मराठ्यांनी आपली वाहने जप्त होतील, अशी भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्यक्षात मराठा मोर्चादरम्यान लाखो वाहने शहरात येणे अपेक्षित आहे. गेल्या महिन्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी नऊ दिवसांचे बेमुदत उपोषण संपवले. तेव्हा राज्य सरकारने दोन महिन्यात समाजाला आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही योग्य ती पावले न उचलल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता.  दोन महिन्यांत मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मुंबईवर मोठा मोर्चा काढणार असल्याचे जरंगे यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातील मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. या मागणीबाबत जरंगे यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केल्यानंतर आंदोलनाला नवी गती मिळाली.  मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरात हिंसाचारही उसळला, अनेक आमदार आणि नेत्यांची घरे, कार्यालये आणि सरकारी मालमत्तांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली.  मात्र, मुंबईत येणाऱ्या मराठा मोर्चासाठी पोलिसांनी कंबर कसली असून मराठा समाजातील प्रमुख चेहऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Manoj Jarange : ‘तीन कोटी मराठे मुंबईकडे कूच करतील, थांबवलं तर…’,मनोज जरांगे यांचा इशारा Read More »

IMG 20231230 WA0003

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बोधेगांव व खाटीक गल्ली शेवगांव येथे गोवंश जनावराची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना 90,200 रुपये किमतीचे मुद्देमालासह अटक केली आहे. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना  जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.  या आदेशानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव,उमाकांत गावडे यांचे पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले. नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अंमलदार हे शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना खाटीक गल्ली, शेवगांव व बोधेगांव, ता. शेवगांव या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत करत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दिनांक 28/12/2023 व दिनांक 29/12/2023 रोजी छापे टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagar News: गोमांस विक्री करणारे 06 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »