DNA मराठी

DNA Marathi News

1000007394

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

Maharashtra Election: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवार घोषणा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. नुकतंच भाजपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने पुन्हा एकदा शेवंगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना संधी दिली आहे. पक्षाने सलग तिसऱ्यांदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे या मतदारसंघातून आता गोकुळ दौंड अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा आमदार मोनिका राजळे यांना निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा नगरच्या राजकारणात वर्तवण्यात येत आहे. शेवंगाव-पाथर्डी मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी सत्तास्थानात असल्याचा आरोप पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी दौंड तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून गोकुळ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वाशीत केले आहे. या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती. आ. मोनिक राजळे या 2014 आणि 2019 ला सलगपणे निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना यंदा बसू शकतो अशी चर्चा केवळ नागरिकांतच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यां अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारसंघात दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच दौंड यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धारच केला आहे. मतदार संघ समस्यांनी ग्रासलाशेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली असून जनतेला आता बदल हवा असून याच मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचे देखील दौंड म्हणाले.

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार? Read More »

1000006685

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

Maharashtra News: काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा खुलासा केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे एफ.आय.आर. स्वरूपात समोर आल्यानंतर मोरजकरांचे मराठा समाजाला दिलेले आव्हान संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांच्या विरोधात स्थानिक मराठा समाजाने आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत कुर्ल्यातील मोक्याच्या परिसरात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे बॅनर झळकवले. ज्यामुळे मोरजकरांच्या विरोधात असलेला प्रचंड रोष आणि माध्यमांतून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर मराठा समाज धगधगताना दिसला.   संभाजी ब्रिगेड संघटना ही ठाकरेंच्या शिवसेनेसह युतीत आहे, परंतु मराठा समाजाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा आणि माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे. स्थानिक मराठा समाजासह इतर मराठा संघटनांनी बॅनरबाजीकरून आपला विरोध या आधीचं मोठ्या प्रमाणात दर्शवला आहे, मात्र जर मोरजकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर या सर्व मराठा संघटना आणि संपूर्ण मराठा समाज मोरजकर विरोधात आंदोलनात शामिल होतील आणि यावेळी बॅनरबाजीतूनच नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करतील. असे कुर्ल्यातील वातावरण आहे.  ठाकरेंची शिवसेना ही कुर्ल्यामध्ये अत्यंत प्रभावशाली दिसून येत आहे परंतु कुर्ल्यातील स्थानिक मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटनेने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर विरोधात दिलेली हाक ही ठाकरेंच्या शिवसेनेला बॅक फूटला टाकणारी आहे. मराठा समाजाने प्रविणा मोरजकर विरोधात दिलेला आंदोलनाचा इशारा हा आगामी कुर्ल्यातील निवडणुकीचे वारे बदलू शकतो.

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा Read More »

1000005247

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे अहमदनगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली. त्यामुळे संदीप कोतकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा नगरच्या राजकारणात होत आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात मोठा जल्लोष करण्यात आला. माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे. कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्याकडील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे संदीप कोतकर महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहावे लागेल.

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण Read More »

IMG 20241019 WA0013

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Ahmednagar Collector Office

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Rain

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

Rain Alert:  गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागात मंगळवारी अधूनमधून पाऊस झाला. हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्पष्ट, कमी दाबाच्या क्षेत्रात बदलले असून त्याचे नैराश्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देखभालीमुळे चेन्नईतील भुयारी मार्गांमध्ये पाणी साचले नसून पडलेली झाडे तातडीने हटवण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आंध्रमध्ये मुसळधार पाऊस, चक्रीवादळाची भीती दुसरीकडे, आंध्र प्रदेशसह अनेक दक्षिणेकडील राज्यांमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातील दबाव चक्री वादळात बदलला आहे, जो 10 किमी / तासाच्या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. हे चेन्नईपासून 440 किमी, पुडुचेरीपासून 460 किमी आणि नेल्लोरपासून 530 किमी अंतरावर आहे. उद्या सकाळपर्यंत हे वादळ पुद्दुचेरी आणि नेल्लोरच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि रायलसीमा येथे काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर 40-60 किमी/ताशी वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कर्नाटकात मुसळधार पाऊस, बचाव पथके सज्ज त्याचवेळी, मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर, बेंगळुरूमध्ये आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात बेंगळुरू शहरात 66.1 मिमी पाऊस झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. बंगळुरू शहरी जिल्ह्यातील शाळा बुधवारी बंद राहतील, तर अनेक माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि कर्नाटक राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सुमारे 60 कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. “कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी आम्ही आणखी 40 कर्मचारी पुन्हा तैनात करत आहोत,” असं ते म्हणाले. 

Rain Alert : सावध रहा.. ‘या’ भागात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस Read More »

IMG 20241016 WA0000

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत कारवाई विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त् केला आहे.  पोलीस अधिक्षक  राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे , व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे  विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर एक सुझुकी कंपनीची कॅरी गाडीत एक अनोळखी इसम हा देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती.  पो.नि किरण शिंदे , यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ व पोकों/आनंद मैड यांना सदरची बातमी सांगून कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितल्याने लागलीच पोना/गोकुळ इंगावले यांनी दोन खाजगी पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून सदरची माहिती सांगून कारवाई करणेकामी सोबत येण्यास कळविल्याने खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचुन विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री करणारा इसम  शैलेंद्र सुखदेव बोरगे (वय-52 वर्षे रा. सोनेवाडी ता.जि. अहिल्यानगर) यास सुझुकी कंपनीची कारसह ताब्यात घेतले. आरोपीकडून 5,00,000 रुपये किमंतीची सुझुकी कंपनीची कार व 2,75,460 रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु असा एकुण 7,75,460 रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  पोकों संदिप शिरसाठ यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीगोंदा  दारुबंदी का.क.65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहे.

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त Read More »

Eknath Shinde

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा

Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे.   सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे.  या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत. कोण होणार MLC? मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोटा निश्चित झाला आहे. भाजपला 3, शिवसेना शिंदे यांना 2 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील हे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उद्धव सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित 2020 च्या सुरुवातीला, तत्कालीन उद्धव सरकारने 12 एमएलसीचे नामनिर्देशन करण्याची फाइल राज्यपालांकडे पाठवली होती, ही फाईल तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी परत केली होती. त्यावर उद्धव गटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यावर सुनावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने 14 ऑक्टोबर रोजी 7 आमदारांच्या फायली राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्या होत्या. ज्याला राज्यपालांनी मान्यता दिली. शपथ कधी होईल राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देतील.

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »

Baba Siddique

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी धर्मराजबाबत तपासात मोठा खुलासा, अनेक चर्चांना उधान

Baba Siddiqui Murder : राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी गोळ्या घालून हत्या झाल्याने संपूर्ण देशात एकच खडबड उडाली आहे.  विरोधक राज्य सरकारवर कायदा व सुव्यवस्था च्या प्रश्नावर सोडतात टीका करत आहे तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे. पोलीसांनी या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.   मुंबई पोलिसांनी आरोपी धर्मराज कश्यपची हाडांची चाचणी केली, ज्यामध्ये तो अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई पोलिसांनी गुरमेल बलजीत सिंग (23, रा. हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (19, रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती, तर गोळीबाराच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेला एक आरोपी पळून गेला होता. आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयात हजर केले, जेथे धर्मराज कश्यपच्या वकिलाने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी एका न्यायालयाने कश्यपच्या हाडांच्या जतन चाचणीचे आदेश दिले, ज्यामुळे तो अल्पवयीन नसल्याचे सिद्ध झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले असता 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी उशिरा घडलेल्या या घटनेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 28 वर्षीय प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक केली. निर्मल नगर गोळीबार प्रकरणात सहभागी असलेल्या शुभम लोणकरचा तो भाऊ आहे.   मुंबई पोलिसांनी पुण्यातील एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे, ज्याने आपल्या भावासह बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तीन कथित शूटरपैकी दोघांना हे काम दिले होते. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रवीण लोणकर असे आहे, ज्याचे पोलिसांनी सहकारस्थान म्हणून वर्णन केले आहे आणि ते त्याचा भाऊ शुभम लोणकरचा शोध घेत असल्याचे सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे भागातील खेर नगर येथील आमदार आणि त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी 15 टीम तयार केल्या आहेत, जे महाराष्ट्राबाहेर गेले आहेत आणि नेमबाजांना कोणी रसद पुरवली हे शोधण्यासाठी तपास करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी धर्मराजबाबत तपासात मोठा खुलासा, अनेक चर्चांना उधान Read More »

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : … नाहीतर बांगलादेशसारखी अवस्था होणार, हिंदूंनी संघटित राहावे, विजयादशमीच्या निमित्ताने भागवतांचा संदेश

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विजयादशमी सणानिमित्त आरएसएस मुख्यालयमध्ये शस्त्रपूजन करून हिंदूंना संघटित व्हायचे आवाहन केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  मोहन भागवत यांनी संदेशात बांगलादेशपासून पाकिस्तानपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता हिंदूंना संघटित व्हावे लागेल. इस्रायल-हमास युद्धालाही त्यांनी चिंतेचे कारण म्हटले आहे. भागवत म्हणाले, लोकांच्या राष्ट्रीय चारित्र्यामुळेच देश महान बनतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने हे वर्ष महत्त्वाचे आहे. इस्रायल-हमास युद्ध चिंतेचे कारण आहे. गेल्या काही वर्षांत भारताची विश्वासार्हता वाढल्याने जगात भारत अधिक मजबूत आणि आदरणीय बनला आहे, असे प्रत्येकाला वाटते.  संघप्रमुख म्हणाले की, बांगलादेशमध्ये भारताला धोका असल्याचा संदेश पसरवला जात आहे. भारताकडून धोका असेल तर पाकिस्तानला सोबत घ्यावे, अशी चर्चा बांगलादेशात सुरू आहे. कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, ती भारताला रोखू शकते. तर भारताने बांगलादेशच्या स्थापनेसाठी सर्व काही केले. ही चर्चा कोण आयोजित करत आहे? बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार बांगलादेशातील दंगलींमुळे हिंदू समाजावर जे अत्याचार होत होते, ते पुन्हा पुन्हा एकत्र आले आणि ते वाचले. हिंदू समाजाने संघटित राहिले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे. अत्याचार सहन करणे ही दुर्बलता आहे. आपली अवस्था बांगलादेशसारखी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं देखील यावेळी ते म्हणाले.  तसेच कोलकाता येथील डॉक्टरांसोबत झालेल्या क्रूरतेचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, कोलकाता आरजी कार हॉस्पिटलमध्ये जे घडले ती लाजीरवाणी  घटना आहे.

Mohan Bhagwat : … नाहीतर बांगलादेशसारखी अवस्था होणार, हिंदूंनी संघटित राहावे, विजयादशमीच्या निमित्ताने भागवतांचा संदेश Read More »