DNA मराठी

BJP

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप

Rohit Pawar: राज्यातील राजकारणात एक मोठा खळबळजनक प्रकार समोर आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पवार हे गोरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते. मात्र आता त्यांनी गोरे यांच्या कथित गैरकारभाराची सविस्तर माहिती देत त्यांच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मातंग समाजाला न्याय मिळण्यात अडथळारोहित पवार यांनी सांगितले की, “मी सुरुवातीपासून महिलेला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, मंत्री गोऱ्हे हे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन दबाव आणण्याचे काम करत आहेत.” पवार यांनी असा धक्कादायक आरोप केला की, गोरे यांनी त्यांच्या भागातील कॉलेजला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजातील मृत व्यक्तीचे खोटे आधार कार्ड तयार करून त्याला जिवंत दाखवले. या मृत व्यक्तीचे नाव पिराजी भिसे असून, त्यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. भिसे यांच्या कुटुंबाने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. खोट्या सहीने जमीन हडप करण्याचा आरोप“पिराजी भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. भिसे हे अंगठा लावत असताना त्यांच्या नावावर तोतयाने सही केली. ही गंभीर फसवणूक असून यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचाही भंग होतो. एवढ्या गंभीर प्रकारानंतरही गोरे यांना जामीन मिळाला,” असा आरोप पवार यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या न्यायाधीशाने गोरे यांना जामीन दिला, त्यांना उच्च न्यायालयाने डिमोट केल्याचेही पवार यांनी सांगितले. कोरोना काळातील योजनांचा गैरवापरया प्रकरणात आणखी गंभीर बाब उघड करत रोहित पवार म्हणाले, “गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा फोटो वापरून कॉलेज रजिस्टरसाठी कागदपत्रे तयार केली. कोविड काळात सामान्य माणूस बाहेर फिरू शकत नव्हता. याच काळाचा फायदा घेत गोरे यांनी आपल्या फायद्यासाठी कॉलेज रजिस्टर केलं.” तसेच “मायनी मेडिकलमध्ये 3 कोटी 25 लाख रुपयांची अनियमितता झाली असून, हे मेडिकल देशमुख कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली होती,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला. गोरे यांना मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावाया संपूर्ण प्रकरणात गोरे यांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीचा पाठिंबा असल्याचा दावा करत रोहित पवार म्हणाले, “देवा भाऊ त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणूनच ते वाचत आहेत. पण पाठीशी कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही न्यायासाठी लढत राहू.” तसेच या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता यावी आणि सत्य बाहेर यावे, यासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. राजकीय वर्तुळात खळबळया आरोपांमुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या वळणावर जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी केलेले आरोप जर खरे ठरले, तर गोऱ्हे यांच्यासह संबंधितांवर मोठी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जयकुमार गोरे यांच्याकडून मातंग समाजाच्या न्यायात अडथळा, रोहित पवारांचा आरोप Read More »

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी

Vijay Wadettiwar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली. परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशीही टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी Read More »

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप

Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप Read More »

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल

Vijay Wadettiwar : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादार वर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळा देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासात नाही तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी ही नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अस महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, कारवाई करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल Read More »

वाल्मिक कराडला फाशी द्या, शिंदे शिवसेनेचे मुंबईत आंदोलन

Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड याला फाशी द्या, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले. संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. शिवसेनेने वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली.   शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे शिवसेना महिला आघाडीकडून वाल्मिक कराडविरोधात आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. वाल्मिक कराड ही प्रवृत्ती आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमधून या हत्याकांडाची भीषणता दिसून आली. अशा गोष्टी महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाण आहे. वाल्मिक कराडला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्यभरात शिवसेना रान उठवेल, असे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या.

वाल्मिक कराडला फाशी द्या, शिंदे शिवसेनेचे मुंबईत आंदोलन Read More »

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदेंसोबत ‘कोल्ड वॉर’ सुरू? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadanvis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणता कोणता मुद्द्यावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याच मतभेदांमुळे दोघांमध्ये कोल्ड वॉर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्ड वॉरची चर्चा निराधार आहे. सरकार अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करत आहे. शिंदे गमतीने म्हणाले की, मतभेद नाहीत, फक्त शिंदेजी आणि मी खुर्च्या बदलल्या आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. संजय राऊत यांच्या मतभेदांच्या दाव्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आम्ही दोघांनीही आमच्या जागा बदलल्या आहेत आणि फक्त अजित पवारांकडेच एकच खुर्ची आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणाले की, जर तुम्ही तुमची खुर्ची वाचवू शकला नाही तर मी यात काय करू शकतो. संजय राऊत यांचे दावे फेटाळलेशिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील परिस्थिती कमकुवत असल्याचा दावा केला होता. त्यांनी पहाटे 4 वाजता अमित शहा यांची भेट घेतली आणि फडणवीस यांच्याबद्दल तक्रार केली. या आरोपांवर शिवसेनाप्रमुख म्हणाले की, काही लोकांच्या मनात रासायनिक असंतुलन असते. अमित शहा हे एनडीएचे नेते देखील आहेत आणि त्यांच्यासोबत एक औपचारिक बैठक झाली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात घेतलेले निर्णय थांबवण्याच्या चर्चाही निराधार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदेंसोबत ‘कोल्ड वॉर’ सुरू? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

…म्हणून शक्ती कायदा लागू करत नाही, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्याने पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकारावरून आता विरोधकांनी सरकारवर चारही बाजूने टीकेला सुरुवात केली आहे. यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून शक्ती कायदा आणत नसल्याची टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणात पीडितेला लवकर न्याय मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकारने आणलेले शक्ती विधेयक राष्ट्रपतींनी मंजूर केले नाही त्यामुळे हा कायदा अस्तित्वात येणार नाही. आम्ही गेले अडीच वर्ष मागणी करतोय या कायद्याची अंमलबजावणी करावी पण या कायद्याबाबत महायुती सरकारने काहीच हालचाल केली नाही. विशेष म्हणजे महायुती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अस असताना महायुती सरकारची ही भूमिका खेदजनक आहे. महाविकास आघाडीला श्रेय मिळू नये म्हणून विधेयक अजून मंजूर करण्यात आलेला नाही का ? महिलांशी संबंधित प्रश्नांवर राजकारण करण्याची संधी महायुती सरकारने सोडली नाहीं. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

…म्हणून शक्ती कायदा लागू करत नाही, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल Read More »

UP Crime : पत्नी प्रियकरासोबत शेतात… पती संतापला अन् पुढं घडलं असं काही…

UP Crime : सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माहितीनुसार, खानपूर परिसरातील एका गावात एका पतीने आपल्या पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गोळ्या झाडल्या. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियकराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी गेल्या वर्षी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. याचा राग आल्याने पतीने दोघांवर गोळीबार केला. संपूर्ण प्रकरण काय?बुलंदशहरमधील औरंगाबाद पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात, नरेशची पत्नी सावित्री गेल्या वर्षी तिच्या पतीला सोडून त्याच गावातील सरजीतसोबत निघून गेली होती. सोमवारी, सावित्री तिचा प्रियकर सरजीतसोबत तिच्या मुलाला हायस्कूलच्या परीक्षेला बसण्यासाठी खानपूर पोलिस स्टेशन हद्दीतील खिदरपूर गावात गेली होती. एसएसपी श्लोक कुमार म्हणाले की, मुलाला सोडल्यानंतर दोघेही काही अंतरावर असलेल्या शेतात बसले. यादरम्यान, सावित्रीचा पती नरेशने दोघांवरही गोळीबार केला. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे महिलेचा मृत्यू झाला. त्याने सांगितले की सरजीतवर उपचार सुरू आहेत. त्यांनी सांगितले की ते घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

UP Crime : पत्नी प्रियकरासोबत शेतात… पती संतापला अन् पुढं घडलं असं काही… Read More »

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार

Gyanesh Kumar : देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा हवाला दिला आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. ते 19 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. त्यांच्या जागी डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्ञानेश कुमार कोण आहेत?ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. याआधी त्यांनी गृह मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांची गणना एक अनुभवी आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून केली जाते. राहुल गांधींनी व्यक्त केली असहमतीराहुल गांधी यांनी या नियुक्तीबाबत असहमती व्यक्त करत सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालय 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, त्यामुळे सरकारने ही बैठक पुढे ढकलायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज पडू नये म्हणून सरकारने जाणीवपूर्वक ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, 2023 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?काँग्रेसचा आरोप आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती असावी. परंतु, नवीन कायद्यात सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले, ज्यामुळे सरकारला बहुमत मिळाले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “जर नियुक्तीची प्रक्रिया केवळ कार्यकारी मंडळ (सरकार) द्वारे असेल, तर त्यामुळे आयोग पक्षपाती होईल आणि निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.” निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात ?विरोधकांचा दावा आहे की सरकारने असा निवडणूक आयुक्त नियुक्त केला आहे जो कधीही सरकारच्या विरोधात जाणार नाही. ते म्हणतात की जर ही निवड प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर त्याचा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि निष्पक्षतेवर दीर्घकालीन परिणाम होईल.

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार Read More »

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय?

Ajit Pawar: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेकगंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट नाकारली आहे. आमदार सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार होते मात्र अजित पवारांनी भेट नाकारली आहे. त्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माहितीनुसार, सुरेश धस या भेटीमध्ये 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते मात्र आज त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नाही. तर दुसरीकडे अजित पवार यांनी चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस चौकशीची मागणी करणार होते.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय? Read More »