DNA मराठी

Ajit Pawar

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप

Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप Read More »

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही 20 हजार कोटी वरून वाढून 45 हजार 892 कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी 20 हजार कोटींची तूट दाखवलेली ती 26 हजार 536 कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज एकूण तूट 60 हजार कोटींपर्यंत जाईल. राजकोषीय तूट देखील 1 लाख 10 हजार कोटीवरून आज ती 1 लाख 36 हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अधिक्याचे बजेट करण्याची परंपरा या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे. त्याचा फटका सर्वांनाच विशेषता आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील योजनांवर होत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना सेव्हन हेवन सारख्या आहेत. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असेही यावेळी ते म्हणाले. शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाहीया अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनीशिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे ती बंद करण्याचा सरकारचा दृष्टिकोन दिसतोय अशी आमची शंका आहे. तसेच आनंदाचा शिधा यावर देखील भर देण्यात आलेला नाही. कारण आता निवडणुका नाहीत. त्यामुळे या योजनांची गरज फारशी राहिलेली नाही. अशी टीका त्यांनी यावेळी केली. निवडणुकीत केल्या गेलेल्या कुठल्याही घोषणेची पूर्तता या बजेटमध्ये केली गेलेली नाही. लाडकी बहीण योजनेचे अनुदान 1500 वरून 2100 होण्याची अपेक्षा होती पण तेही घडले नाही. 25 लाख रोजगार निर्माण करू अशी घोषणा केली होती प्रत्यक्षात फक्त 90 हजार रोजगार निर्मितीचे अर्थसंकल्पात नमूद केल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.

सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प सादर ; जयंत पाटलांचा हल्लाबोल Read More »

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदेंसोबत ‘कोल्ड वॉर’ सुरू? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadanvis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणता कोणता मुद्द्यावरून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याच मतभेदांमुळे दोघांमध्ये कोल्ड वॉर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्ड वॉरची चर्चा निराधार आहे. सरकार अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करत आहे. शिंदे गमतीने म्हणाले की, मतभेद नाहीत, फक्त शिंदेजी आणि मी खुर्च्या बदलल्या आहेत. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. संजय राऊत यांच्या मतभेदांच्या दाव्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आम्ही दोघांनीही आमच्या जागा बदलल्या आहेत आणि फक्त अजित पवारांकडेच एकच खुर्ची आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणाले की, जर तुम्ही तुमची खुर्ची वाचवू शकला नाही तर मी यात काय करू शकतो. संजय राऊत यांचे दावे फेटाळलेशिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील परिस्थिती कमकुवत असल्याचा दावा केला होता. त्यांनी पहाटे 4 वाजता अमित शहा यांची भेट घेतली आणि फडणवीस यांच्याबद्दल तक्रार केली. या आरोपांवर शिवसेनाप्रमुख म्हणाले की, काही लोकांच्या मनात रासायनिक असंतुलन असते. अमित शहा हे एनडीएचे नेते देखील आहेत आणि त्यांच्यासोबत एक औपचारिक बैठक झाली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात घेतलेले निर्णय थांबवण्याच्या चर्चाही निराधार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis : एकनाथ शिंदेंसोबत ‘कोल्ड वॉर’ सुरू? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण

Ladki Bahin Yojana : आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 मिळणार आहे. माहितीनुसार, अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. लाडकी बहिण योजनेचे हफ्त्यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे. मात्र आता सरकारकडूनलाडकी बहीण योजनेचे निर्षकाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींच्या संख्येत घट होत आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात हफ्ता जमा करण्यात आला होता तर जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात 2 कोटी 37 लाख महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली होती. निवडणुकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदाराकडे पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न होता. त्यामुळे या योजनेत भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांती रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण Read More »

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप

Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी,धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. पक्षांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,पक्षसंघटनेची बांधणी,त्यासाठीचे कार्यक्रम आणि पक्षासंदर्भात महत्त्वाच्या धोरणाची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare : संघटन बांधणी…धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा कोअर ग्रुप Read More »

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय?

Ajit Pawar: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेकगंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट नाकारली आहे. आमदार सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार होते मात्र अजित पवारांनी भेट नाकारली आहे. त्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माहितीनुसार, सुरेश धस या भेटीमध्ये 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते मात्र आज त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नाही. तर दुसरीकडे अजित पवार यांनी चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस चौकशीची मागणी करणार होते.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय? Read More »

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात

Dhananjay Munde: बीड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचे ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात असल्याचे देखील यावेळी बोलताना शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे यांनी रात्रीच भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी प्रदीर्घकाळ त्यांची चर्चा देखील झाली. एवढे बोलताना शास्त्री म्हणाले की खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे जाते वाट पसरवला जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे मात्र हा विषय किती तानायचा हा ज्याने त्याने ठरवावा. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले. समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत असं शास्त्री म्हणाले.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात Read More »

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »