DNA मराठी

Ajit Pawar news

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असं या वेळी अजित पवार म्हणाले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले. पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

सांगलीत चार माजी आमदारांचा प्रवेश अन् भेदभाव करणार नाही , अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar: आपला महाराष्ट्र हा महापुरूषांचा आहे. त्यांच्या विचारांवरच आपल्याला चालायचे आहे असे सांगतानाच मला जे पटते ते काम मी करतो. मी ज्याला शब्द दिला त्याचे काम कधी अपूर्ण ठेवले नाही. आज पक्षात तुम्ही प्रवेश केलात मात्र माझ्याकडून कधी भेदभाव होणार नाही अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. आज एमसीए लॉन्ज वानखेडे स्टेडियम मुंबई येथे सांगली, बीड, यवतमाळ येथील विविध पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सभासद नोंदणीसाठी काम करा असे आवाहन करतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही लागतील. तीन वर्षे निवडणूका झालेल्या नाहीत. त्याचे कारण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. लवकरच निर्णय व्हावा असा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. निवडणूक झाली तर अनेक घटकातील लोकांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. लवकरात लवकर निवडणूका झाल्या तर नव्या चेहऱ्यांना व अनुभवी लोकांना संधी मिळू शकते असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतानाच माणसाशी नातं जोडणारा आणि शेतकर्‍यांशी नाळ जोडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून प्रत्येकांनी पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे असे सांगतानाच सर्वसामान्यांच्या पाठीशी पक्ष ठाम उभा राहिल असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील आठवणी सांगताना अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा ही जोडी सर्वसामान्यांच्या मनावर कशी कोरली गेली होती हे सांगितले. जात-पात धर्म याला फाटा देत आणि जातीय सलोखा राखत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार आपल्या देशाचे काम सुरू आहे. या संविधानावरच आपला देश चालत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी स्पष्ट केले. सांगलीसह इतर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा पक्षात झालेला प्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा – सुनिल तटकरे सांगली हा जिल्हा विचारवंतांचा असून या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा पक्षात होत असलेला पक्षप्रवेश आम्हाला ताकद आणि शक्ती देणारा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ घडली आणि मोठ्या प्रमाणावर वाढलीही अशा जिल्ह्याच्या पाठीमागे सरकारची ताकद उभी राहिली पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच सांगलीच्या एका वेगळ्याच पॅटर्नची ओळख आहे. मात्र आता आपल्याला सांगलीचा नवा पॅटर्न उभा करायचा असून तो तुम्ही उभा कराल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. सांगली, बीड जिल्ह्यातील प्रदीर्घ अनुभव असलेले राजकीय शिलेदार आज आपल्या पक्षात येत आहेत याचा आनंदही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली, बीड, ठाणे जिल्ह्यातील कल्याण – डोंबिवली, यवतमाळमधील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. सांगली जिल्हयातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौंडा रविपाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संग्राम जगताप, युवा मोर्चाचे ग्रामीण माजी अध्यक्ष अनिल सर्जेराव पाटील, निलेश येसगुडे, प्रमोद सावंत, निवृत्ती शिंदे आदींसह शिराळा, खानापूर, पलूस, इस्लामपूर, जत, तासगावमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. याशिवाय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रमेश आडसकर, अंकुश इंगळे, भारत पिंगळे, सुनिल शिनगारे, निलकंठ भोसले, काकडे गुरुजी, संभाजी इंगळे, लक्ष्मीकांत लाड, केज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, गटनेते हरुण इनामदार, नगरसेवक अजहर इनामदार, राजू इनामदार, रेश्मा इनामदार, आशाताई कराड आदींसह असंख्य विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. याशिवाय कल्याण – डोंबिवलीतील प्रतिक वालिलकर, जय जेपाल, पवन वालिलकर, शालिक पाटील, सचिन पाटील, आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सना मलिक, आमदार विजयसिंह पंडित, आमदार इद्रीस नायकवडी, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार संजय दौंड, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह सांगली, बीड, यवतमाळ, कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगलीत चार माजी आमदारांचा प्रवेश अन् भेदभाव करणार नाही , अजित पवार असं का म्हणाले? Read More »

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर

Ram Sutar: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील त्यांच्या प्रेमाचे, आदराचे प्रतिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम सुतार यांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील या दीपस्तंभाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

मोठी बातमी! राम सुतारांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर Read More »

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ajit Pawar: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. दरम्यान ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.

MPSC च्या तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र Read More »

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण

Ladki Bahin Yojana : आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 मिळणार आहे. माहितीनुसार, अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार आहे. लाडकी बहिण योजनेचे हफ्त्यासाठी अर्थ विभागाकडून 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला आहे. मात्र आता सरकारकडूनलाडकी बहीण योजनेचे निर्षकाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींच्या संख्येत घट होत आहे. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात हफ्ता जमा करण्यात आला होता तर जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ देण्यात आला. तर फेब्रुवारी महिन्यात 2 कोटी 37 लाख महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली होती. निवडणुकीपूर्वी या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला मतदाराकडे पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न होता. त्यामुळे या योजनेत भरुन घेऊन लाभार्थींची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला. यामुळं पडताळणी न करता अर्ज भरुन घेतले गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली. राज्य सरकारनं जवळपास सहा हप्त्यांती रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली. राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली.

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 पण बहिणींची संख्या घटणार, ‘हे’ आहे कारण Read More »

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी…

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा अजित पवार यांना पक्षात घेणार का? यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज याबाबत स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे.  माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याच्या संभाव्य प्रवेशाचा निर्णय सामूहिक असेल. मात्र, अजित पवार यांना पुन्हा यायचे असेल तर त्यांना पक्षात सामावून घेणार का, याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला. वैयक्तिक पातळीवर निर्णय घेता येत नाही पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी-सपामध्ये अजित पवारांना स्थान आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शरद पवार म्हणाले, वैयक्तिक पातळीवर असे निर्णय घेता येत नाहीत. संकटकाळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आधी विचारले जाईल. अजित पवार यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि जुलै 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही घेतले होते.  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चारपैकी तीन जागा गमावल्यानंतर अजित पवारांच्या गटात खळबळ माजली आहे. शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दणक्यानंतर महायुती सरकारला नवनवीन योजना सुरू करून ‘भाई-भगिनी’च्या हिताचा विचार करणे भाग पडले.  पत्रकारांशी बोलताना पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करत राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यात ‘माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ‘लाडका भाऊ’ या योजनेअंतर्गत रोजगार प्रशिक्षण आणि मानधन देण्याची तयारी आहे. आता बंधुभगिनींच्या हिताकडे लक्ष द्या पवार म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी अनेकवेळा मिळाली, पण त्यांच्या अर्थसंकल्पात बहीण-भावांसाठीच्या अशा योजना कधीच दिसल्या नाहीत. बंधू-भगिनींच्या हिताकडे लक्ष दिले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे, मात्र ही जादू केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे आहे,  मतदारांनी हुशारीने मतदान केल्यास बहीण, भाऊ आणि इतर सर्वांच्या लक्षात राहील.असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला.

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी… Read More »

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात  

Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना धक्का देत गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. यानंतर लंके म्हणाले, आता आपण साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करणार आहोत.   नीलेश लंके म्हणाले, “मी नेहमीच शरद पवारांच्या विचारसरणीचे पालन केले आहे. 2019 मध्ये माझा निवडणूक प्रचार त्यांनीच सुरू केला होता. त्यांची विचारधारा आणि पक्ष मी कधीही सोडला नाही.” राष्ट्रवादी काँग्रेस (पुणे) शहर कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, मी साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करेन, असे ते म्हणाले.   शरद पवार म्हणाले, “लंके हे कष्टाळू आहेत आणि त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची पसंती होती. त्यांनी अलीकडेच काही निर्णय घेतले असतील, पण ते त्यांच्या मतदारांप्रती प्रामाणिक आहेत आणि पुढेही राहतील. जनतेसाठी काम करण्यासाठी. त्यांना काही मदत लागली तर आम्ही त्यांना जनहितासाठी मार्गदर्शन करू.” आदल्या दिवशी अजित पवार म्हणाले होते की, लंके यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा विचार करावा. लंके यांनी पक्ष सोडल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लंके हे राष्ट्रवादीचे (एसपी) लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. ते म्हणाले, “लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. कोविड महामारीच्या काळात केलेल्या कामामुळे ते शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहेत.  शरद पवार यांच्या विचारधारेवर त्यांचा नेहमीच विश्वास होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते शरद पवार साहेबांचा फोटो  वापरत राहतील आणि आता औपचारिकपणे NCP (SP) चा भाग आहेत.

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात   Read More »

Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय! ‘त्या’ प्रकरणात शरद पवारांनी दिले आव्हान

Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून अधिकृतपणे मान्यता दिल्यानंतर आता शरद पवार यांनी मोठा निर्णय घेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे जाणुन घ्या, निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या नव्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे नाव राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार झाले.  निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांची संख्या 81 आहे. त्यापैकी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थनार्थ 57 आमदारांची शपथपत्रे सादर केली, तर शरद पवार यांच्याकडे केवळ 28 प्रतिज्ञापत्रे होती. हे पाहता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला आमदारांचा बहुमताचा पाठिंबा आहे आणि तोच खरा राष्ट्रवादी असल्याचा दावा करू शकतो, असा निष्कर्ष आयोगाने काढला. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक विभागातील बहुमत चाचणीसाठीचा अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने त्यामागचे कारण दिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी, त्याचे सदस्य आणि त्यांच्या निवडणुकांचा तपशील कोणताही मूलभूत आधार नसलेला आहे. उल्लेखनीय आहे की, अजित पवार यांच्या बाजूने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून 2014 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती अशी माहिती आहे.  त्यानंतर पाच वर्षांनंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी (MVA) च्या माध्यमातून राज्य सरकारचा भाग बनली. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील MVA सरकार जून 2022 मध्ये पडले. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंडखोरी झाली आणि पक्ष दोन गटात विभागला गेला. यानंतर शिंदे भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या राजकीय गोंधळानंतर वर्षभरानंतर, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली, जेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरीचा बिगुल वाजवला. त्यानंतर अजित पवार पक्षाच्या आठ आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले.  अजित पवार सध्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार त्यांच्या गटात आहेत.

Sharad Pawar : राष्ट्रवादी कोणाची? सुप्रीम कोर्टात होणार निर्णय! ‘त्या’ प्रकरणात शरद पवारांनी दिले आव्हान Read More »