DNA मराठी

ahmednagar news

IMG 20240327 WA0006

Ahmednagar News : श्रीपद्म शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत बालमटाकळी केंद्रात प्रथम…..!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित “मिशन आरंभ २०२४” उपक्रमांतर्गत दि. १० मार्च रोजी आयोजित केलेल्या इयत्ता-चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दि. २० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धात्मक स्वरूपाच्या अभ्यासाची तयारी ग्रामीण भागातील मुलांनी प्राथमिक स्तरापासूनच सुरू करावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडजळगाव येथील श्रीपद्म प्रविण शिंदे ( इयत्ता चौथी ) याने या परीक्षेत ३०० पैकी २५२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून त्याने तालुकास्तरावर आठवा तर बालमटाकळी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.  त्याचबरोबर अमृता पांडुरंग पाटील, श्रावणी जगदीश तहकीक, साईराज प्रभाकर तहकीक, स्वरा वैजिनाथ नागरे, शिवराज बाळासाहेब तहकीक, शिवानी राजेंद्र जाधव अशी एकूण सात विद्यार्थी संबंधित परीक्षेत पात्र ठरले आहेत. मुलांच्या गुणवत्ता विकासात शाळेचे आदर्श वर्ग शिक्षक प्रविण शंकर शिंदे त्याचप्रमाणे सहकारी आदर्श शिक्षिका श्रीमती राजगुरू भारती भाऊसाहेब, श्रीमती तनपुरे संतोषी शामराव व श्रीमती गर्जे मंगल देवराव यांचे मोलाचे असे मार्गदर्शन व योगदान लाभले.  शालेय भौतिक विकास त्याचबरोबर विद्यार्थी गुणवत्ता विकास कामी शेवगावचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर, केंद्रप्रमुख काळु भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Ahmednagar News : श्रीपद्म शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत बालमटाकळी केंद्रात प्रथम…..! Read More »

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण

Uddhav Thackeray : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.  यातच आता उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोभाटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल केला होता. बोभटे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. एजन्सीच्या एका सूत्राने सोमवारी संध्याकाळी याची पुष्टी केली. बोभाटे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की या जोडप्याने 2.58 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या उत्पन्नाच्या उघड स्त्रोतांपेक्षा 36 टक्क्यांनी जास्त आहे. बोभटे यांनी यापूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर काम केले आहे. सीबीआय प्रकरणानुसार, बोभटे यांनी 2014 ते 2023 या कालावधीत विमा कंपनीत काम केले. या काळात त्यांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे.  बोभटे यांची संपत्ती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि जंगम आणि जंगम मालमत्तांच्या स्वरूपात आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे यांना समोरासमोर विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे एजन्सीचे म्हणणे आहे. आज उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्याआधी ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांच्या सहकाऱ्याला समन्स बजावल्याने चिंता वाढली आहे. बोभटे यांच्या बँक खात्यातही अनियमितता झाल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.  सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी असे दिसते की दिनेश बोभटे यांनी कर्मचारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यातून संपत्ती कमावली. त्याची संपत्ती दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा कितीतरी जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोभटे यांना अनेक मुदत ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि निधी मिळाला होता. मित्र आणि मुलाकडून आर्थिक मदतीच्या नावावर त्यांनी ही रक्कम घेतली होती. यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांच्या खात्यात अनेक प्रकारची रक्कम जमा करण्यात आली होती, ज्याबद्दल दाम्पत्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  सीबीआयच्या तपासादरम्यान, ईडीने फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण Read More »

MVA 1

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक

Maharashtra News : राज्याच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सायंकाळी 5 वाजता जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (26 मार्च) उद्धव गटाच्या 15 किंवा 16 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्याआधी या बैठकीत ज्या जागांवर दोन गटात वाद आहे, त्यावर चर्चा होणार आहे.  तर दुसरीकडे 2014 आणि 2019 ची परिस्थिती आता राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाला काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेस पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. अशा स्थितीत ठाकरे सेनेने जास्त जागांची अपेक्षा करू नये. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सेना अतिआत्मविश्वासात आहे. ठाकरे आणि पवार यांनी युतीकडे अधिक जागांची मागणी केली असली तरी बुलढाणा आणि वर्धासारख्या जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत. शिवसेनेची कट्टर हिंदू व्होट बँक (यूबीटी) त्यांच्याकडे जाईल की नाही, अशी काँग्रेसला चिंता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका कधी होणार? लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक Read More »

IMG 20240323 WA0008

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका

Shrirampur News : श्रीरामपूर शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत कत्तली करीता बाधुन ठेवलेल्या 7 गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करून तब्बल 4 लाख 50 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2024 रोजी पोनि, नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की, वार्ड क्र 2 मध्ये पाण्याच्या टाकीजवळ श्रीरामपूर येथे गोवंशीय जनावरे हे कत्तल करण्यासाठी आणली आहे. या माहितीवरून नितीन देशमुख यांनी सदर ठिकाणी तात्काळ तपास पथकास पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना गोवंशीय जातीचे जनावरे मिळून आले.   या प्रकरणात तपास करत पोलिसांनी शहारुख हसन कुरेशी विरोधात  श्रीरामपूर शहर पो.स्टे. मध्ये  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे मुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9, सह महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 (च) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.   दाखल गुन्हाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शफिक शेख हे करीत आहेत. 

Shrirampur News : ‘या’ भागात पोलिसांची मोठी कारवाई, 7 गोवंशीय जनावरांची सुटका Read More »

IMG 20240323 WA0002

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे

Ahmednagar News:  लोकनेत्या पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले.  पंकजा मुंडे यांचे काल रात्रीच आगमन झाले असून त्यांनी बुऱ्हानगर येथील शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला.  यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शविले. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यांनतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे Read More »

IMG 20240322 WA0003

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना   मिळाली होती.  मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तिसरी कारवाई  साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात   छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट Read More »

Raj Thackeray

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ 

Maharashtra Politics : गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगमी लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत शामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   सध्या महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र तरीही देखील भाजपला राज ठाकरेंच्या मनसेची गरज का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंची ही प्रतिमा भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी जुळते. चुलतभाऊ उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज यांनी मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर टोलवरून एकनाथ शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी असूनही भाजपला मनसेची गरज का? भाजपला एकच आमदार असलेल्या पक्षासोबत युती का करायची आहे? विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असले तरी तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न सुटत नसताना भाजप मनसेला बरोबर घेण्यास उत्सुक आहे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ठाकरे ब्रँड’. मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’ गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना 3-3 जागा मिळाल्या. मात्र यानंतर भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. तीनपैकी दोन खासदारांनी शिवसेनेची (एकनाथ शिंदे) बाजू घेतली. पण पक्षाचे नाव आणि त्याचे चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे आजही मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत आहेत.  उद्धव यांचा पराभव करण्यासाठी भाजपला ‘ठाकरे ब्रँड’ हवा आहे. राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईशिवाय ठाणे आणि नाशिकमध्येही चांगला पाठिंबा आहे. ‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे शिवसेनेच्या मूळ मतदारांचा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.  मुंबई, ठाण्यासह राज्यातील कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मोठा समर्थन दिसून येत आहे. सहानुभूतीच्या जोरावर ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत विजयी होऊ शकतात आणि याचा फायदा त्यांना आगामी बीएमसी निवडणुका आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा ढाल म्हणून वापर करायचा आहे. मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हिंदुत्वाचा मुद्दा बनवून शिंदे सेना आणि भाजप उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत, तर उद्धव प्रत्युत्तरात भ्रष्टाचार, कुशासन, मराठी अस्मिता, उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरेंनी दिली तर भाजपसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.  कारण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘नेता’ बनलेल्या राज ठाकरेंना महाराष्ट्राचा धर्म, मराठी अस्मिता यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावीपणे मुकाबला कसा करायचा हे चांगलंच माहीत आहे. राज्यात आपला पाया भक्कम करणाऱ्या मराठी माणसाचा मुद्दा मनसेने सुरुवातीलाच उचलून धरला होता. विचारधारांची लढाई काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडून दिल्याचे सांगत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत.  दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून मनसे आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वत:ला सादर करत आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास त्यांना विचारसरणीची अडचण येणार नाही. उलट राजबाबत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मार्ग अवलंबत असल्याचा मेसेज मतदारांमध्ये देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ  Read More »

Farmer

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये

PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राबवत आहे.  या योजनेअंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात.  ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे आणि जे भारताचे नागरिक आहेत त्यांना हा लाभ उपलब्ध आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी हस्तांतरणाद्वारे पाठवले जातात.आतापर्यंत 16वा हप्ता जाहीर झाला होता आणि आता 17वा हप्ता जारी होणार आहे.   17 वा हप्ता कधी येणार? पीएम योजनेच्या नियमांनुसार, पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो.  दुसऱ्या शब्दांत, आता 17 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान जारी केला जाईल. एप्रिल ते जून दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्याने आणि आचारसंहिता लागू असल्याने पुढील हप्ता जून महिन्यात पाठवला जाण्याची शक्यता आहे, कारण निकाल 4 जूनला जाहीर होणार असला तरी अद्याप अधिकृतपणे पुष्टी करणे बाकी आहे. या शेतकऱ्यांना  लाभ मिळणार    या हप्त्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केले आहे आणि जमीन पडताळणी eKYC सह केली आहे. eKYC करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रात किंवा बँकेत देखील जाऊ शकता. यासाठी, तुम्हाला eKYC फॉर्म भरावा लागेल आणि तो कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि नंतर तुमचे eKYC केले जाईल. पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. eKYC कसे करावे? पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि फार्मर कॉर्नर अंतर्गत ‘ई-केवायसी’ पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक द्या, हा OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल, तो सबमिट करा. ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला देखील भेट देऊ शकता. येथे जाऊन तुम्ही OTP आधारित eKYC करून घेऊ शकता. जर तुम्हाला पोर्टल किंवा CSC केंद्राद्वारे ई-केवायसी करता येत नसेल, तर तुम्ही बँकेत जाऊनही हे काम करून घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला eKYC फॉर्म भरावा लागेल आणि तो कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल, त्यानंतर तुमचे बायोमेट्रिक केले जाईल आणि नंतर तुमचे eKYC केले जाईल. यादीत तुमचे नाव तपासा सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (https://pmkisan.gov.in/) आणि पोर्टलवर दर्शविणारी आपली स्थिती जाणून घ्या हा पर्याय निवडा. येथे तुमचा नोंदणी क्रमांक टाका, तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर, तुम्हाला तुमची स्थिती कळेल. तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. लाभार्थी यादी डाऊनलोड करून, तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे हे तुम्ही पाहू शकता.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो, ‘ही’ 3 महत्त्वाची कामे पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 2 हजार रुपये Read More »

Police

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या

Pune News: पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घेटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सच्या लोभापोटी पत्नीने पतीची हत्या केली. महिलेने प्रियकरासह हा गुन्हा केला. आरोपीने पीडितेच्या डोक्यावर हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केली. पिंपरी-चिंचवड शहरात एका महिलेने लष्करात काम करणाऱ्या प्रियकरासह पतीची हत्या केली. ही घटना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या 1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सवर पत्नीचा डोळा होता. दोघेही ते पैसे आपापसात वाटून घेणार होते. राहुल सुदाम गाडेकर (36) असे आरोपी महिलेच्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी राहुलची पत्नी सुप्रिया गाडेकर आणि तिचा प्रियकर सुरेश पाटोळे आणि त्याचा साथीदार रोहिदास सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.  आरोपी सुरेश हा भारतीय लष्करात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत राहुल गाडेकर यांची पत्नी सुप्रिया ही संगमनेर तालुक्यातील निमगाव पंगा येथे गेल्या दोन वर्षांपासून लॅब चालवत होती.  तिथे ती लष्करात कार्यरत असलेल्या सुरेशच्या प्रेमात पडली. हा प्रकार पती राहुलला समजल्यानंतर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत होती. यानंतर सुप्रियाने प्रियकराच्या मदतीने पतीला मार्गावरून दूर करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच सुरेश पाटोळे सुट्टीवर घरी आले होते, तेव्हा त्यांनी राहुलला मारण्यासाठी दोन लोखंडी हातोडे खरेदी केले होते. त्याचवेळी राहुल गाडेकर यांनी एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याची माहिती पत्नी सुप्रियाला होती. राहुलच्या मृत्यूनंतर ती सुरेश आणि त्याच्या साथीदाराला काही पैसे देणार होती. राहुल गाडेकर चाकण येथील एका कंपनीत कामावर जात असताना आरोपी सुरेश व रोहिदास यांनी पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. राहुलचा खून केल्यानंतर आरोपी सुरेश नोकरीवर रुजू झाला. रोहिदास चिंचपूर गावात आपल्या घरी गेला. मात्र तपासादरम्यान पोलिसांना पत्नीवर संशय आला आणि चौकशीत सत्य बाहेर आले. आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Pune News:  डोक्यावर हातोड्याने वार.. 01 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने केली पतीची हत्या Read More »

MP Sujay Vikhe

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्र इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५५.५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले.  आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली असून येणाऱ्या काळात सर्वांनाच आपल्या जवळील उपकेंद्रात उपचार घेणे शक्य होईल असे मत खासदार विखे पाटील यांनी मांडले.  तसेच त्यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्दिले, आमदार राम शिंदे व आमदार बबनदादा पाचपुते, यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Ahmednagar News:  प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »