DNA मराठी

ahmednagar news

Ahmednagar News : “गाढवाला गुळाची चव कशी कळणार” लंकेवर दिलीप भालसिंग यांचा घणाघात!

Ahmednagar News: निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहमदनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे.  लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की,  ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला. सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेले हे कार्य कोणाच्याही डोळ्यात खुपण्याची गरज नाही. असा घणाघात भाजप नेते दिलीप भालसिंग यांनी केला.  प्रभु रामाच्या आगमनाने अवघा भारत प्रफुल्लीत झाला असताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील कोणत्याही घटकातील नागरिकाला आपल्या आर्थिक अडचणीमुळे हा आनंद साजरा करण्यास अडचण येऊ नये यासाठी हा उपक्रम राबविला.त्यात पारनेरच्या आमदाराच्या बुडाला आग लागण्याचे कोणतेही कारण नाही. अशा सनसनाटी शव्दात  दिलीप भालसिंग यांनी लंकेचा समाचार घेतला. त्याच बरोबर पाच वर्षे  ‘आपला माणूस’म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे.  लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला देऊन उपकृत करावे असा टोला देखील लगावला. विखेंनी साखर आणि डाळ वाटून धार्मिक कार्यात हातभार लावला त्यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेची गरज नाही. त्यासाठी ते स्वत: सक्षम आहेत. सामाजिक बांधिलकी ही काय असते हे विखे पाटील परिवाराकडून लंकेनी शिकावे असा सल्ला सु्द्धा भालसिंग यांनी दिला.   गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे. त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही.हे खंडणीखोर आपला माणूस असल्याचा टेंबा मिरवणाऱ्याला काय कळणार? मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या निलेश लंके यांना काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.   विखेंनी तरी डाळ साखर वाटून लोकांचा आंनद गोड केला. पण तुम्ही सुपा एमआयडीसीतील व्यापाऱ्यांचे  खिसे कापून त्यांना दरिद्री बनवले आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याआधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे  तपासून घ्यावे असा सल्ला दिलीप भालसिंग यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

Ahmednagar News : “गाढवाला गुळाची चव कशी कळणार” लंकेवर दिलीप भालसिंग यांचा घणाघात! Read More »

Sujay Vikhe: भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर, विखेंना जबरदस्त रिस्पॉन्स

Sujay Vikhe: डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन  करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी  आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने कामोठे नगरी दुमदुमली होती. सर्वत्र सुजय विखे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. मोठ्या थाटामाटात कामोठे पुलापासून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर सहभागी झाले होते.  सदर सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुजय विखे पाटील यांच्या स्वरूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम मध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीने सुजय विखे पाटील येणाऱ्या काळात नेतृत्व करतील, असा विश्वास व्यक्त केला.  तर विजय औटी यांनी व्हिजन असलेला नेता जनतेला मिळणार असून, विखे पाटील कुटुंबीयांनी मागील 50 वर्षांपासून जनतेची सेवा केली असून डॉ. सुजय विखे पाटील, ही परंपरा अखंड चालवत आहेत. यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या चौथ्या पिढीला सत्तेत बसविले आहे. विरोधकांवर ताशरे ओढताना औटी यांनी सुपा midc च्या मध्ये स्थानिकांना डावलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पारनेर मधील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  या दहशतिला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरंग लागणार असून, त्यांच्या व्हिजनमुळे येणाऱ्या काळात स्थलांतरणाला आळा बसणार असून स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात काम मिळेल, मागील पाच वर्षांच्या त्यांच्या विकास कामामुळे  जनतेचा नेता म्हणून डॉ. सुजय विखे पाटील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत सदरची निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असून येणाऱ्या काळात फक्त विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पारनेर,अहिल्यानगर, आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Sujay Vikhe: भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर, विखेंना जबरदस्त रिस्पॉन्स Read More »

Maharashtra News: दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा, 96 हजारांचा मुददेमाल उध्वस्त

Maharashtra News:- अकोला  जिल्ह्य़ातील व बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या  उरळ पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई पोलीस स्टेशन उरळ हवदीतील ग्राम डोंगरगाव शिवार मन नदी पात्रात मोहा हातभटटी गावठी दारू वरती रेड करून एकूण ९६००० रू.चा मुददेमाल नाश करण्यात आला. ०७ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम डोंगरगाव येथील मन नदी पात्रामध्ये काही इसम मोह हातभटटी गावठी दारू काढत असल्याची माहीती मिळाल्यावरून आम्ही पोलीस. स्टॉप व पंच सह गावठी हातभटटीची दारू काढणारे इसमांवर रेड केली असता आरोपी नामे १) दादाराव सुलताने, २) गजानन पाखरे दोन्ही (रा. ग्राम डोंगरगाव) यांना पोलीसांची चाहुल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.  घटनास्थळाची पाहणी केली असता ४५ डब्बे (डब्यात) एकूण ६७५ लिटर सड़वा मोहामाद किं. अं. ६७५००/-रू.व १५ लिटर गावठी मोहा दारू किं.अं. १५००/-रु. अशा एकूण ६९,०००/-रु. चा मिळुन आला. त्यानंतर ३) आरोपी नामें नारायण पांडे रा. डोंगरगाव याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर ०६, डब्बे डब्यात एकूण ९० लिटर सडवा मोहामाच किं. अं. ९०००/-रु.व २० लिटर मोहा गावठी दारू कि.अं. २०००/-रू.असा एकूण ११,०००/-रू.वा मुददेमाल मिळून आला. ४) आरोपी नामे संतोष मेहेंगे रा. घुई ता. शेगांव जि. बुलढाणा याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर १० डबे डब्यात एकुण १५० लिटर सहवा मोहा माच किं. अं.१५,०००/-रू.य १० लिटर मोहा गावठी दारू किं. अं. १००० रू.. असा एकूण १६,०००/-रू. वा मुददेमाल मिळून आला. सदरचा मुददेमाल नाशवंत असल्याने घटनास्थळीच नाश करण्यात आला. आज रोजी ग्राम डोंगरगाव शिवारातील मन नदीचे पात्रात गावठी हातभटटी दारूवर केलेल्या ०३ कारवाईमध्ये एकुण ९६,०००/-रु.चा मुददेमाल घटनास्थळावर नाश करून नमुद आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेले आहेत. सदरची कार्यवाही ही  पोलीस अधिक्षक बच्चन सिंह साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे साहेब, सहायक पोलीस अधिक्षक  गोकुल राज जी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले. ए. एस. आय. राजभाउ बचे, पो. हया. विकास वैधकार, पो. शि. निखिल माळी सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली.

Maharashtra News: दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा, 96 हजारांचा मुददेमाल उध्वस्त Read More »

Ahmednagar News: नगर जिल्‍ह्यातील 67 हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान

Ahmednagar News: राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतकऱ्यांनाच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत.  राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांनाच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात अडथळे निर्माण होत होते. दूग्‍ध व्‍यवसाय व पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने अनुदानासाठी लावण्‍यात आलेल्‍या अटी आणि नियमांमध्‍ये शिथीलता केल्‍यामुळे अनुदान शेतकऱ्यांनाच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात मोठी मदत झाली. जिल्‍ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असल्‍याची माहीती विभागाच्‍या वतीने देण्‍यात आली.  अकोले तालुक्‍यातील २ हजार ७२५ शेतकऱ्यांना १५ कोटी २४ लाख ९६ हजार, संगमनेर तालुक्‍यातील १७ हजार ११९ शेतक-यांना १२ कोटी १० लाख ६३ हजार, कोपरगाव तालुक्‍यातील ७ हजार ९२ शेतकऱ्यांना ५ कोटी १६ लाख १२ हजार, राहाता तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतक-यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार, श्रीरामपूर तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार, नगर तालुक्‍यातील २ हजार १३८ शेतक-यांना २१ कोटी ५५ लाख ७ हजार, नेवासा तालुक्‍यातील ४ हजार ६८ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पारनेरमध्‍ये ५ हजार ८१४ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पाथर्डी तालुक्‍यातील २७८ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख ३४ हजार, राहुरी तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार एवढे अनुदान प्राप्‍त झाले आहे.   जिल्‍ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्‍ह्यातील दूध संघाना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतकऱ्यांची माहीती विभागाने संकलित केली असून, हे दूध उत्‍पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नयेत म्‍हणून, त्‍यांनाही अनुदनाचा लाभ मिळाला आहे. अशा शेतक-यांची संख्‍या ही २९ हजार ४४१ असून, या शेतकऱ्यांना ५ कोटी २३ लाख ६६ हजार ९१५ रुपयांचे अनुदान मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नये यासाठी विभागाने १५ एप्रिल पर्यंत मुदत वाढविली असल्‍याचेही विभागाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

Ahmednagar News: नगर जिल्‍ह्यातील 67 हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान Read More »

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल

Nilesh Lanke News : गेली पन्नास,साठ वर्षे आमच्याकडे जिल्ह्याची सत्ता असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगतात.या काळात त्यांनी केलेले असे एक काम दाखवावे की जे पंचवीस वर्षे जनतेच्या लक्षात राहिले आहे.त्यांच्याकडे मंत्रीपदे होती, आहेत.पण एकही मोठा प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणला नाही.त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण नगर जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले.असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रावर केला.  स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, जि.प.चे मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  लंके म्हणाले, तुमच्या तालुक्याला खासदार धार्जिण नाही असे भाषणातून सांगण्यात येते. ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही ते कृतघ्न असतील. परंतू नीलेश लंके हा माणूस असा आहे की एखाद्याने एकदा मदत केली तर मी त्याला आयुष्यभर विसरत नाही. त्याला शंभरवेळा मदत केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आपल्या संकटात ज्यांनी मदत केली त्यांना मदत करण्याची भावना मनात असली पाहिजे.  विखेंना ज्यांनी मदत केली, त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांनी त्यांना नगर शहर दाखविले. निवडणूकीनंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही आम्ही कोण ?असा सवाल लंके यांनी  केला.    राजकारणात जिरवाजिरवी करण्यापेक्षा मी कामाला महत्व देणारा माणूस आहे.तुम्ही म्हणाल खरोखर माणूस भेटला आपल्याला. त्यांच्याकडे कामापेक्षा जिरवाजिरवीला जास्त महत्व असते. मागच्या निवडणूकीत त्यांनी मोठ मोठ्या गप्पा केल्या. सहा महिन्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. ते प्रचाराला गेल्यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडून मते मागतील.  खासदारांनीही कामाचा लेखाजोखा मांंडणे अपेक्षीत असताना अपयश झाकून ठेवण्यासाठी डाळ आणि साखर वाटप करण्याची आयडीया त्यांनी शोधून काढल्याचे लंके म्हणाले.  नादी लावणारांना  घरी पाठविण्याची वेळ  पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. शेतकऱ्याचा जोड धंदा असलेल्या दुधाला २२,२३ रूपयांचा भाव मिळतो आहे. पालकमंत्री दुग्धविकास मंत्री आहेत ते दुधाला भाव का वाढून देत नाहीत ? ते म्हणाले, ५ रूपये अनुदान देऊ. कागद गोळा केले, शेतकऱ्यांना नादी लावले अनुदान मात्र मिळालेच नाही. हे लोक नादी लावणारे असून त्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.  रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर नाव बदलेल नगर-पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केले ते उपोषणही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या उपोषणानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले. १३ तारीख होऊ द्या, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर मी माझे नाव बदलून ठेवील. आभाळ फाटलंय, कोणतीच यंत्रणा शिवू शकणार नाही ! पूर्वी निवडणूकीच्या प्रचारासाठी एखादा नेता येणार असेल तर हातापाया पडून लोक जमा करावे लागत असत. इथे उलटे झाले आहे. दोन, दोन, तीन, तीन तास लोक वाट पाहत आहेत. जिल्हयात असे भासविले जाते की यंत्रणा, यंत्रणेचा याला फोन, त्याला फोन. कसली यंत्रणा ? यंत्रणा फिंत्रणा काही नाही ! आभाळ फाटल्यावर कोणीही रोखू शकत नाही. फाटलेले आभाळ शिवायला जगात कोणतीही यंत्रणा नाही असे लंके यांनी सांगितले.

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल Read More »

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe On Congress:  काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील  बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा पडखर समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. क्रॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल सुद्धा डॉ. विखे यांनी विचारला आहे. अनेक दशक देशात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती  मिळत आहेत. मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.  जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ मोठी विकास कामे झाली आहेत. यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त करत केवळ विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे घराघरात मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पोहचवा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे Read More »

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे

Sujay Vikhe News :- अहमदनगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे.  सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूथ कमिटी सभेत केले.   डॉ. सुजय विखे पाटील हे  विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून  त्यांनी आपल्या  प्रचाराचा सपाटा लावला आहे. गावोवावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी मतदार संघातील  सर्व तालुकास्तरावरील बूथ कमिटीच्या बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे घेणे, घटक पक्षांच्या सभा घेण्याचे काम ते साध्य करत आहेत. अशीच बूथ कमिटीची बैठक खरवंडी कासार येथे शुक्रवारी बोलावण्यात आली होती.  यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आधाडीवर निशाणा साधताना  तीन वर्षांच्या काळात तालुक्याला एक रुपयांचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला. तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन निधी दिला आहे. यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही. म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. या सभेला आमदार मोनिका राजळे यांच्यासह मालेवाडी संघ, मिडसंघ, मुंगूसवाड, ढगेवाडी, काठेवाडी,बिडसंगावी,धाकनवाडी, दैत्य नांदूर, भारजवाडी,तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे Read More »

Maharashtra Politics: रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले,गुंडाराजला पाठबळ देणारा…

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहेत. जसे स्व.अनिलभैय्या राठोड मोबाईल आमदार होते, तसे लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील. निलेश लंके रीलवर लोकप्रिय आहेत. कोविड काळात त्यांनी रियल मध्ये नुसते पारनेरच नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली. गोरगरिबांच्या अश्रू पुसण्याच काम केल.  रीलवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की नगरकरांना गुंडाराजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी लंके यांच्यावर रिल वरून टीका करणाऱ्या शहराच्या आमदारांचे नाव न घेता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.  शेतकरी, व्यापारी, उद्योजक, तरुण, महिला अशा विविध घटकांचे सक्षमपणे प्रश्न मांडणारा खासदार लंके यांच्या रूपाने जनता निवडून देणार आहे. प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करून घरोघरी जात प्रचार करत शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळून काम करण्याचे आवाहन यावेळी किरण काळे यांनी कार्यकर्त्यांना केले.  इंग्रजी वरून खिजवणाऱ्यांवर टीका  भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांनी लंके यांना इंग्रजीतून बोलून दाखवावे, आपण निवडणुकीचा अर्जच भरणार नाही, असे वक्तव्य नगर शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते. त्याचा समाचार घेताना काळे म्हणाले, तुम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकले. मोठ्या घरात जन्माला आले. तुमचा जन्म कारखानदार, सत्ता, मंत्रीपद असणाऱ्या घरात झाला. सोन्याचा आयता चमचा तुम्हाला जन्मापासून तुम्हाला तोंडात मिळाला आहे. पण आमचे लंके सामान्य कुटुंबातले आहेत.  वडील शिक्षक, आई शेतकरी असणाऱ्या गरिबाचं लेकरू आहे. काँग्रेस नेते तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे देखील शिक्षण अल्प होतं. त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. मात्र त्यांनी विकासाच व्हिजन ठेवून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. विरोधी उमेदवारांना हे माहीत नाही असे दिसते की संसदेत मराठीतून देखील जनतेचे प्रश्न मांडता येतात. खा.ओमराजे निंबाळकर मराठीतच बोलतात. इंग्रजी वरून लंकेना खिजवण्याचं काम करणाऱ्यांना आता जनताच ईव्हीएमच्या माध्यमातून योग्य मतदान करत खिजवण्याच काम करेल, असा टोला काळे यांनी यावेळी लागला.  शेतकरी अडचणीत म्हणून बाजारपेठ डबघाईला  शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन देऊन देखील भाजप सरकारने पूर्ण केलं नाही. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. नगर दक्षिण देखील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या खिशात पैसेच नाहीत. नगर शहराची बाजारपेठ ही शहरासह आसपासच्या तालुक्यांतील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी ग्राहकांवर अवलंबून आहे. शेतकरीच अडचणीत असल्यामुळे बाजारपेठ देखील डबघाईला आली आहे. इन्कम टॅक्स कलम ४३ मध्ये दुरुस्ती करत ४५ दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण करण्याची अट व्यापाऱ्यांना भाजप सरकारने घातली आहे. अन्यथा ते उत्पन्न म्हणून त्यावर कर लावण्याची तरतूद केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वेळच्या निवडणुकीत व्यापारी देखील भरघोस मते देऊन त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी निलेश लंकेना विजयी करतील असा दावा यावेळी किरण काळेंनी केला.  प्रभाग निहाय बैठकांचे नियोजन  काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रभागातील प्रत्येक भागात, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घ्या. त्यांना बूथ पर्यंत मतदानासाठी येण्या करिता प्रवृत्त करा. प्रत्येकाला मतदान करण्यासाठी जागृत करा. महाविकास आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय साधा. माजी मंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी काळेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.  ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, सांस्कृतिक विभागा शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे आदींनी मनोगत व्यक्त केले. महिला काँग्रेस, विद्यार्थी, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक, ओबीसी आघाडी, डॉक्टर, वकील सेल, सांस्कृतिक विभाग, कामगार आघाडी, साफसफाई कामगार विभाग, असंघटित व स्वयंरोजगार आघाडी यासह विविध फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहराच्या सावेडी, केडगाव उपनगर भिंगार, मध्य शहरसह विविध भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Maharashtra Politics: रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले,गुंडाराजला पाठबळ देणारा… Read More »

Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.  महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे.  या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात सौ. अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.  राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे.  शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.  शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.  या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी Read More »

Married Tips: महिला मंडळ, लग्नासाठी तयार होताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बिघडेल लुक

Married Tips : देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. यातच जर तुमच्या बहीणीचे अथवा एखाद्या बेस्ट फ्रेंडचं लग्न ठरलं असेल तर या काळात तुम्हाला लग्नाची मौजमजा लुटण्याती संधी नक्कीच मिळेल.  अशा वेळी एखाद्या खास लग्नासाठी तयार होताना या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा नाहीतर तुमचा पूर्ण लुकच खराब होऊ शकतो. कारण बऱ्याचदा लग्नकार्यात फॅशनबाबत केलेल्या या चुका महागात पडतात. यासाठी जाणून घ्या लग्नकार्यासाठी तयार होताना आमंत्रितांनी कोणत्या चुका करू नयेत. पांढरे अथवा काळे कपडे घालणे  बऱ्याच लोकांना पांढरा आणि काळा रंग खूप आवडत असतो. त्यामुळे कुठेही जाताना ते याच रंगाचे कपडे निवडतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या लग्नाला जाणार असता तेव्हा पांढरा अथवा काळा रंगाचे कपडे मुळीच परिधान करू नये. कारण लग्नकार्यात पांढरा आणि काळा रंग शोभून दिसत नाही.  काळा रंग शुभ कार्यासाठी वर्ज्य असल्यामुळे तो वापरू नये आणि पांढरा रंग हा खूपच फिकट असतो त्यामध्ये तुमचे फोटो चांगले येत नाहीत. यासाठी लग्नकार्यात जाताना लाल, पिवळा, हिरवा असे पारंपरिक आणि गडद रंग निवडा. एकाच रंगाचा पूर्ण आऊटफिट वापरणे  जर तुम्हाला लग्नात उठून दिसायचं असेल तर एकाच रंगसंगतीचा आऊटफिट वापरू नका. तुमच्या ड्रेस अथवा साडीमध्ये कॉम्बिनेशन असायला हवं. कारण  त्यामुळे तुमचा आऊटफिट उठावदार दिसतो. रंगसंगती ही कोणत्याही आऊटफिटमध्ये खूप महत्त्वाची असते. त्यामुळे तुमच्या आऊटफिटचे रंग जाणिवपूर्वक निवडा. एकाच रंगाचा पूर्ण सूट वापरल्यामुळे तुमच्या उंची आणि व्यक्तिमत्वामध्ये उठावदारपणा दिसत नाही. यासाठीच वेडिंग आऊटफिट निरनिराळ्या रंगाच्या रंगसंगतीत तयार केले जातात.  डेनिमचे आऊटफिट घालणे  काही  लोकांचे डेनिमवर विशेष प्रेम असतं. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात त्यांना डेनिम लुक करणं आवडू शकतं. मात्र एक लक्षात ठेवा तुम्हाला जीन्स अथवा डेनिम आऊटफिट्स कितीही आरामदायक वाटत असले तरी ते लग्नकार्यात वापरू नयेत. कारण वेडिंग फंक्शनसाठी तुम्ही गडद रंगाचे, एथनिक लुक असलेले कपडे घातले तर ते नक्कीच शोभून दिसतं. त्यामुळे लग्नकार्यात कपडे आरामदायक असण्यासोबत शोभून दिसतील असेच निवडावे. हेव्ही गोल्ड ज्वैलरी वापरणे  लग्नकार्य म्हटलं की दागदागिन्यांची हौस ही आलीच. मैत्रीण अथवा बहीणीच्या लग्नात तुम्ही साडी, लेंगा वापरणार असाल तर दागदागिने त्यावर सूट होतील असेच निवडा. सोन्याची ज्वैलरी कितीही मौल्यवान असली तरी ती प्रत्येक आऊटफिटवर चांगली दिसेल असं नाही. त्यामुळे तुमचे आऊटफिट कसे आहेत त्यानुसार तुमची ज्वैलरी निवडा. शिवाय जर गळ्यात हेव्ही नेकलेस असेल तर इतर ज्वैलरी कमी घाला ज्यामुळे तो नेकपीस उठून दिसू शकेल.  अती सैल अथवा अती घट्ट कपडे  कोणत्याही लग्नासाठी तयार होताना आधी तुम्ही कपडे तुमच्या फिटिंगचे आहेत का याची ट्रायल घ्यायला हवी. कारण तुमचे वजन नेहमी कमी जास्त होत असते. अशा वेळी त्यानुसार साडीवरचे ब्लाऊज अथवा लेंग्याचं फिटिंग कमी जास्त करणं गरजेचं आहे. लग्नात अती ढगळ अथवा अती घट्ट कपडे घातल्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो.

Married Tips: महिला मंडळ, लग्नासाठी तयार होताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बिघडेल लुक Read More »