DNA मराठी

ahmednagar news

sujay vikhe

Sujay Vikhe Patil: सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला

Sujay Vikhe Patil : अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये, असा स्पष्ट सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना दिला. सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आला. त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, अधिकारी काम करत नसतील, तर आंदोलन करा. तुम्ही सत्तेत असलात, महायुतीचे आमदार असलात तरी लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्यासोबत येईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, पूर्वी ज्या पद्धतीने काम चालत होते, ती कार्यपद्धती आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारायला लावू नयेत. जनतेला तुमची खुर्ची किंवा गाडी नको आहे, त्यांना वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक हवी आहे, असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून, महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांच्या मतांसाठी तत्त्वांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची असल्याचे सांगितले. पद मिळविण्यापेक्षा गरिबांचे प्रश्न सोडविणे हेच सर्वात मोठे कार्य आहे. समाजसेवा करणाऱ्यालाच जनता कायम साथ देते,असे सांगत पदाच्या राजकारणात न अडकता जनतेची कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. नेवासा तालुक्यातील रस्ते, जमीनविषयक वाद आणि महसूल प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकारी काम करत नसतील, तर लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नये. सत्ता नव्हे, तर जनता मोठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sujay Vikhe Patil: सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला Read More »

img 20260726 wa0003

Ahilyanagar Police: पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का?

Ahilyanagar Police : “साहेब… माझी मुलगी सापडेल ना?” हा प्रश्न एखादी आई किंवा वडील विचारतात, तेव्हा तो केवळ एक प्रश्न नसतो; तो त्यांच्या उरात धडधडणाऱ्या भीतीचा आक्रोश असतो. त्या एका वाक्यामध्ये असहाय्यता असते, वेदना असते, आशा असते आणि आपल्या लेकराला पुन्हा एकदा मिठी मारण्याची तळमळ असते. मुलगी घरातून बाहेर पडते आणि परत येत नाही, तेव्हा एका घरातील भिंतीही निःशब्द होतात. आईचा घास अडकतो, वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते, भावंडांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवते. प्रत्येक फोनची रिंग हृदयाचा ठोका चुकवते आणि प्रत्येक दार ठोठावल्याचा आवाज आशेचा किरण वाटतो. अशा वेळी त्या कुटुंबाची पहिली धाव असते ती पोलीस ठाण्याकडे. कारण त्यांना विश्वास असतो की, आता त्यांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभी राहील. पण इथेच एक प्रश्न समाजाच्या मनात पुन्हा पुन्हा उभा राहतो पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? हा प्रश्न कोणावर आरोप करण्यासाठी नाही. हा प्रश्न एका आईच्या अश्रूंनी विचारला आहे. हा प्रश्न त्या वडिलांच्या काळजीने विचारला आहे, जे रात्रभर रस्त्यावर मुलीचा फोटो घेऊन भटकत असतात. हा प्रश्न त्या समाजाने विचारला आहे, ज्याला आजही प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. हरवलेल्या मुलीची तक्रार म्हणजे केवळ कागदावरची एक नोंद नसते. त्या तक्रारीच्या मागे अनेक शक्यता दडलेल्या असतात. कदाचित ती सुरक्षित असेल, कदाचित एखाद्या संकटात अडकली असेल, कदाचित कोणाच्या फसवणुकीची बळी ठरली असेल. म्हणूनच अशा प्रत्येक तक्रारीकडे वेळेशी स्पर्धा करत पाहणे आवश्यक असते. तपासशास्त्र सांगते की, सुरुवातीचे काही तास हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात. त्या वेळेत घेतलेला एक योग्य निर्णय एखाद्या मुलीचे आयुष्य वाचवू शकतो. आपल्या पोलीस दलात अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणारे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. अनेकांनी जीव धोक्यात घालून हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले आहे. अशा अधिकाऱ्यांचा समाजाला अभिमान आहे. त्यामुळे हा लेख संपूर्ण पोलीस दलावर टीका करण्यासाठी नाही. परंतु काही कुटुंबांनी व्यक्त केलेले अनुभव दुर्लक्षित करूनही चालणार नाहीत. काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित तातडी जाणवत नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करतात. ही भावना खरी असो किंवा गैरसमजुतीतून निर्माण झालेली असो, तिचे निराकरण करणे आवश्यक आहे. कारण नागरिकांचा विश्वास टिकवणे ही कोणत्याही यंत्रणेची सर्वात मोठी जबाबदारी असते. पोलीस अधीक्षक महोदय, आपण संपूर्ण जिल्ह्याचे प्रमुख आहात. आपल्या एका सूचनेमुळे प्रत्येक पोलीस ठाण्याची कार्यपद्धती बदलू शकते. प्रत्येक अधिकाऱ्याला हे सांगता येऊ शकते की, हरवलेल्या मुलीची तक्रार ही इतर कोणत्याही नियमित प्रकरणासारखी नसते. ती एका कुटुंबाच्या अस्तित्वाशी जोडलेली असते. अशा तक्रारीला प्राधान्य देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर मानवी कर्तव्य आहे. आज आपल्या हातात अत्याधुनिक साधने आहेत. शहरागणिक सीसीटीव्हीचे जाळे उभे राहिले आहे. मोबाईल लोकेशन, डिजिटल ट्रॅकिंग, सोशल मीडिया अलर्ट, तांत्रिक विश्लेषण अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. परंतु या सर्व साधनांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वेळेवर घेतलेला निर्णय. तक्रार दाखल होताच शोधकार्य सुरू झाले, माहितीचे जाळे सक्रिय झाले, विविध पथके सज्ज झाली आणि कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवला गेला, तर अनेक संकटे टाळता येऊ शकतात. या प्रश्नाकडे समाजानेही जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. मुली हरवल्यानंतर अफवा पसरवणे, सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती शेअर करणे किंवा कुटुंबीयांवरच संशय घेणे, हे अत्यंत अमानुष आहे. अशा वेळी समाजाने शोधकार्यात सहकार्य करणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि कुटुंबाला मानसिक आधार देणे अधिक आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षेवर आपण अनेक चर्चा करतो. व्याख्याने होतात, मोहिमा राबवल्या जातात, घोषणाही केल्या जातात. परंतु या सर्वांचा खरा अर्थ तेव्हाच आहे, जेव्हा एखादी आई पोलीस ठाण्यात येऊन “माझी मुलगी हरवली आहे” असे म्हणते आणि तिला पहिल्याच क्षणी विश्वास दिला जातो “काळजी करू नका, आम्ही तातडीने शोध सुरू करतो.” हे चार शब्द त्या कुटुंबासाठी औषधापेक्षाही मोठा आधार ठरू शकतात. पोलीस अधीक्षक महोदय, आपण जिल्ह्यात संवेदनशील प्रशासनाची ओळख निर्माण करू शकता. प्रत्येक पोलीस ठाण्यात हरवलेल्या मुलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र आणि तातडीची कार्यपद्धती असावी. प्रत्येक अधिकाऱ्याला याबाबत नियमित प्रशिक्षण मिळावे. प्रत्येक तक्रारीचा वेळोवेळी आढावा घेतला जावा. कुटुंबीयांना तपासाची माहिती दिली जावी. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी जनतेचा विश्वास अनेक पटींनी वाढवू शकतात. हा लेख टीका करण्यासाठी लिहिलेला नाही. हा लेख एका आईच्या डोळ्यांतून गळालेल्या अश्रूंनी लिहिला आहे. हा लेख त्या वडिलांच्या वेदनेने लिहिला आहे, जे प्रत्येक अनोळखी चेहऱ्यात आपल्या मुलीचा चेहरा शोधत असतात. हा लेख त्या भावंडांच्या शांततेने लिहिला आहे, ज्यांच्या घरात हसण्याचे आवाज अचानक बंद होतात. प्रशासनाची खरी ताकद गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यात नसते; तर संकट येताच तत्परतेने उभे राहण्यात असते. प्रत्येक हरवलेल्या मुलीकडे एका फाईलप्रमाणे नव्हे, तर एका जिवंत आयुष्याप्रमाणे पाहिले गेले पाहिजे. कारण आकडेवारीत एक संख्या कमी-जास्त होऊ शकते, पण एका कुटुंबासाठी त्यांची मुलगी ही संपूर्ण जग असते. म्हणूनच शेवटी पुन्हा एकदा तोच प्रश्न पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? जर उत्तर “नाही” असेल, तर प्रत्येक हरवलेल्या मुलीची तक्रार ही सर्वोच्च प्राधान्याची ठरली पाहिजे. प्रत्येक मिनिट मोलाचे मानले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला विश्वास दिला पाहिजे की, व्यवस्था त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. कारण प्रत्येक हरवलेल्या मुलीमागे केवळ एक प्रकरण नसते; तर एका आईचा जीव, एका वडिलांचा श्वास, भावंडांचे बालपण आणि एका कुटुंबाचे संपूर्ण विश्व दडलेले असते. त्या विश्वाला पुन्हा उजाळा देण्याची जबाबदारी ही केवळ एका विभागाची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. आणि त्या जबाबदारीची सुरुवात होते ती संवेदनशीलतेपासून.

Ahilyanagar Police: पोलीस अधीक्षक महोदय, संवेदनशीलतेची अपेक्षा चुकीची आहे का? Read More »

cjp protest

CJP Protest : जंतर मंतरवर लाठीचार्ज; कॉक्रोज पार्टीच्या मोर्च्यात नेमकं काय घडलं?

CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतर येथे संसद मार्चसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सोमवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी निष्पक्ष चौकशी, जबाबदारांवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करत होते. आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून काहींना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, वारंवार होणाऱ्या परीक्षा गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हस्तक्षेप करावा लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यार्थी संघटनांनी सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा देशभर आंदोलनाचा विस्तार केला जाईल, असा इशारा दिला आहे.

CJP Protest : जंतर मंतरवर लाठीचार्ज; कॉक्रोज पार्टीच्या मोर्च्यात नेमकं काय घडलं? Read More »

rain

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात १८ व १९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत ३,४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास किंवा धरणांमधून पाणी सोडल्यास भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे वा नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. धरण व नदी परिसरात जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढू नयेत. मेघगर्जना होताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडांखाली, मोकळ्या मैदानात, टॉवर, ध्वजाचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण वा विद्युत रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर राहावे. विजा चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. तसेच ट्रॅक्टर, शेतीची अवजारे व दुचाकींपासून दूर राहावे. जाहिरात फलक कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी फलकांच्या आजूबाजूला थांबू नये. विजा चमकत असताना उघड्यावर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवावे, जेणेकरून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जावे. तसेच घाट रस्त्याने प्रवास करणे टाळावे. जुनाट वा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज व पाऊस यांपासून स्वतःचे तसेच जनावरांचे रक्षण करावे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी, तहसील कार्यालयाशी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Maharashtra Rain Alert: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ Read More »

tukaram munde

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून जोरदार कारवाया सुरू केल्या आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यातच नगर शहरात देखील मुंढे हे एक्शन मॉडमध्ये दिसून आले आहे. शहरातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हॉटेलवर कारवाई करत थेट हॉटेलच्या परवाना निलंबित करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने अस्वच्छतेचा ठपका ठेवत नगर पुणे रस्त्यावरील प्रसिद्ध ‘हॉटेल संगम’ आणि ‘हॉटेल सत्कार’ या हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक आदेशानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. शहरात सध्या अन्न सुरक्षा मोहिमेअंर्तगत विविध आस्थापनांची तपासणी सुरू असून, या हॉटेल्समध्ये अत्यंत अस्वच्छता आढळल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने ही कायदेशीर कारवाई केली आहे. आयुक्त मुंडे यांनी पदभार स्विकारल्यापासून राज्यभरात अवैध गुटखा, दूध भेसळ आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेवर कारवाईचा धडाका लावला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे अहिल्यानगरमधील इतर हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Tukaram Munde: मुंढेचा दणका; अहिल्यानगरमधील ‘हॉटेल संगम’ चा परवाना रद्द Read More »

siya goyal

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Siya Goyal : लोहगड किल्ल्यावरून ढकलून २५ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेत २० वर्षीय सिया गोयल आणि २२ वर्षीय चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून ढकलून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. केतन आणि सिया यांचा विवाह याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाने आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सांकेतिक शब्द आणि संकेतांचा वापर आढळून आल्याने त्या संभाषणांचा अर्थ उलगडण्यासाठी तसेच तपास पुढे नेण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, बचाव पक्षाने या मागणीला विरोध करत, तपासासाठी पोलिसांना यापूर्वीच पुरेसा कालावधी मिळाल्याने पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Siya Goyal :पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरण : सिया गोयल व चेतन चौधरी यांना 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी Read More »

marathi actresshigh profile sex racket case

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत

Marathi Actress: गिरगावातील हाय-प्रोफाईल देहव्यापार रॅकेट प्रकरणात आता नवीन खुलासा झाल्याने एकच खळबळ उडाली आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने गिरगावातील एका आलिशान हॉटेलवर छापा टाकत या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका केली आहे. तर या प्रकरणातील प्रमुख संशयित मेकअप आर्टिस्टला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये पाठविण्यात आले होते. व्यवहार निश्चित झाल्याची खात्री होताच पथकाने तातडीने छापा टाकून दोन्ही महिलांची सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी मेकअप आर्टिस्टने मनोरंजन क्षेत्रातील ओळखींचा गैरवापर करून महिलांना या रॅकेटमध्ये ओढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून, दुसरी अभिनेत्री हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये लहान भूमिका करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, रॅकेटचे इतर सदस्य, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका याचाही तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marathi Actress : हाय-प्रोफाईल देहव्यापार प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत Read More »

Accident Photo

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार

Ahilyanagar Bus Accident: शेंडी-पोखर्डी परिसरातील घटना लग्न समारंभाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातल्याची घटना अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. खरवंडी येथील लग्न समारंभ आटोपून पुण्यातील स्वारगेटकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा शेंडी-पोखर्डी परिसरात भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी प्रवास सुरू असताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. लग्न समारंभाचा आनंद एका क्षणात भीती आणि गोंधळात बदलला. बसमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी मदत केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपघातानंतर लक्झरी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता का, की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ जखमी प्रवाशांना तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली. महामार्गावर अपघातानंतर तत्काळ मदत आणि आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध होण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून, फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Ahilyanagar Bus Accident: लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडींच्या लक्झरी बसचा भीषण अपघात; चालक फरार Read More »

vivek kolhe

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली

Sujay Vikhe: अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे हे देखील इच्छुक होते मात्र त्यांनी त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार मनाचे असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो अशा शब्दात विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले. अहिल्यानगर शहरातील सहकार सभागृह येथे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी कोल्हे यांना विलंब झाला यावेळी त्यांनी नगर मनमाडच्या रस्त्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर एकच सभागृहात अशा पिकला. यावेळी बोलताना विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच मला विधानपरिषदेवरती संधी मिळाली. आज जिल्ह्याला 19 आमदार मिळाले असल्याने आता जनतेच्या अपेक्षा देखील वाढलेले आहेत. आज आजूबाजूक जवळ पुणे, नाशिक आणि संभाजीनगर हे जिल्हे विकसित झाले आहे. आज भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेल्या आईला नगर जिल्ह्याला देखील आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे असं कोल्हे म्हणाले. आमचे सहकारी जिल्ह्याचे माजी खासदार सुजय विखे कार्यक्रमाला नाही आहे मात्र मी माध्यमांमध्ये ऐकले की त्यांनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा उदार असे दिलदार व्यक्तिमत्व सुजय विखे यांचे देखील आभार मी या निमित्ताने मानतो असे यावेळी कोल्हे म्हणाले. लोकशाहीमध्ये प्रत्येक पद त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पद असेल अगदी पंतप्रधान पद असेल हे प्रत्येक पद हे महत्त्वाचे आहे यामुळे प्रत्येकाने त्या पदाचा सन्मान हा केला पाहिजे ठेवला गेला पाहिजे कारण आपण ज्या पदासाठी उभे राहतो त्या पदाची दुसऱ्याला देखील आकांक्षा असते, अपेक्षा असते असे सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केल्याने यांचा रोख नेमका कोणावर होता याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Sujay Vikhe: सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली Read More »

maharashtra epstein files

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

Maharashtra Epstein Files : प्रत्येक व्यक्तिरेखा कलाकाराला नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची संधी देत असते. अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत आपल्या कलागुणांना वाव दिला आहे. आता त्या आणखी एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भूकंप निर्माण करणाऱ्या घटनांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही दिसणार आहेत. यात दीपाली सय्यद मुख्य भूमिका साकारत आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे करीत आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत दिग्दर्शन करीत आहेत. सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. ‘आता सगळं उघड होणार…!’ असे म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यामधील दीपाली सय्यद यांचा लूक पाहताक्षणी लक्ष वेधून घेतो. त्यांची व्यक्तिरेखा या सिनेमात अतिशय महत्वाची असून या रुपात पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या रुपात दीपाली यांच्या अभिनयाचा कस लागणार आहे. दीपाली सय्यद यांच्यासह फर्स्ट लूक मध्ये अभिनेते उदय टिकेकर यांचा समावेश आहे. दीपाली सय्यद या व्यक्तीरेखेला अचूक न्याय देऊ शकतील याची खात्री असल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. हा सिनेमा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींमधील एक अतिशय महत्त्वाचे प्रकरण जगासमोर आणणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या सिनेमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घनवट या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.., अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत Read More »