DNA मराठी

ahmednagar news

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक

Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. जयदीप आपटेने तयार केलेला पुतळा उद्घाटनानंतर आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीनंतर 26 ऑगस्ट रोजी कोसळला, त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती. या प्रकरणात मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पाटील यांना गेल्या आठवड्यात कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. या घटनेतील आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण देरकर म्हणाले, आमच्या सरकारवर टीका करणाऱ्यांनी आता तोंड बंद करावे. जयदीप आपटेला अटक करण्यासाठी पोलिसांना थोडा वेळ लागला हे खरे आहे. अटकेचे श्रेय आम्ही घेत नसून पोलिसांनी त्यांचे काम केले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj :  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी फरार शिल्पकार जयदीप आपटेला अटक Read More »

Ahmednagar News : ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Ahmednagar News: रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. अजहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करत आहे. मंगळवारी (दि.3 सप्टेंबर) रात्री 12 वाजल्याच्या दरम्यान सय्यद हे जुने बस स्थानक येथे उभे असताना, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह आले होते. वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करुन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनाही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली. मात्र महेश शिंदे मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय व काय बोलतोय? याचे देखील भान नव्हते. जे दिसेल त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरु केल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरात त्यांच्या हैदोसामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काही पोलीसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे. दारु पिऊन ड्युटीवर येणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दशहत पसरविणे हे पोलीस खात्याला बदनामीकारक व निषेधार्ह बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मद्यधुंद पोलीस अधिकारीचे तात्काळ निलंबन करुन त्यांची बदली करण्याची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Ahmednagar News : ‘त्या’ पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन Read More »

Russia And Ukraine: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, 51 जणांचा मृत्यू

Russia And Ukraine:  रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनच्या मध्यवर्ती शहर पोल्टावा येथे मंगळवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात किमान 50 लोक ठार आणि 271 जखमी झाले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अनेक तरुणांचे मृतदेह धूळ आणि ढिगाऱ्यात झाकलेले दिसत होते, त्यांच्या मागे एका मोठ्या इमारतीचा खराब झालेला भाग दिसत होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले की, ‘या हल्ल्यासाठी रशियाला निश्चितपणे जबाबदार धरले जाईल.’ त्यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले आणि या हल्ल्यात मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या इमारतीचे नुकसान झाल्याचे सांगितले. लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत संध्याकाळी आपल्या व्हिडिओ पत्त्यात, झेलेन्स्की यांनी मृतांची संख्या 51 वर ठेवली. तो म्हणाला, ‘उध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक आहेत. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पोल्टावा प्रादेशिक गव्हर्नर फिलिप प्रोनिन यांनी सांगितले की ढिगाऱ्याखाली अजूनही 15 लोक असू शकतात. कीवला मोठा धक्का या हल्ल्यात अनेक लष्करी जवान मारले गेल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे. सशस्त्र दलातील किती बळी गेले हे त्यांनी सांगितले नाही, परंतु हा हल्ला कीवसाठी एक मोठा धक्का होता कारण तो रशियाला रोखण्यासाठी आपली संख्या मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वापरली परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर – जे प्रक्षेपित केल्याच्या काही मिनिटांत शेकडो किलोमीटर दूर लक्ष्यांवर मारा करते – याचा अर्थ असा होतो की हवाई हल्ल्याचे सायरन वाजल्यानंतर पीडितांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळाला. रशियाने हल्ले तीव्र केले “संस्थेची इमारत अंशतः नष्ट झाली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले,” असे संरक्षण मंत्रालयाने टेलिग्रामवर सांगितले. युद्ध सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत.

Russia And Ukraine: रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, 51 जणांचा मृत्यू Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.  अहिल्‍यानगर हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पुर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते.  केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पुर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल Read More »

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Haryana Jind Accident: हरियाणात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहे. माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. हरियाणातील जिंद येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. जिंद येथे ट्रकने पुढे जात असलेल्या टाटा मॅजिकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील कुरुक्षेत्रातील मार्चखेडी गावातील लोक राजस्थानमधील गोगामेडी येथे जात होते. टाटा कारमध्ये एकूण 15 जण प्रवास करत होते. हे लोक सोमवारी संध्याकाळी घरून निघाले होते. यावेळी टाटा एस नरवाना येथील बिधराना गावाजवळून जात असताना हिस्सार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील बिधराना ते सिमला या गावादरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. टक्कर झाल्यानंतर टाटा-एस खड्ड्यात उलटली आणि मध्यरात्री एकच गोंधळ उडाला. या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमींना मदत केली. त्यानंतर नरवाना पोलिसांनी घटनास्थळी 7 रुग्णवाहिका पाठवून त्यांना नरवाना येथील शासकीय रुग्णालयात नेले. येथे 7 जणांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमींना अग्रोहा येथे रेफर करण्यात आले आहे.

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी Read More »

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ

Nitesh Rane :  गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत असणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी  नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नितेश राणे यांच्या नेतृत्वात 1 सप्टेंबर रोजी शहरात महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राणे यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं तर त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री पोलिसांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  काय म्हणाले होते नितेश राणे  रामगिरी महाराज काही चुकीचं बोलले नाही, त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर मस्जिदमध्ये घुसून मारू, तुमची जीभ जाग्यावर ठेवणार नाही, आम्ही 90% आहोत तुम्ही दहा टक्के आत तुमची बांगलादेशासारखी अवस्था करू, तुम्ही जर जास्त वळवळ केली तर तेवढ्या संख्येने बाहेर पडून तुम्हाला किड्या मकोड्यासारखे तुम्ही मराल , आपण दोन किलोमीटर चालत आलो, तुम्ही बाजूला बघितलं का कसे हातभर फाटून आत बसले होते,  या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकरण काय महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबरबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते, राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध आंदोलने झाले होती. तर 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Nitesh Rane: नितेश राणेंवर पुन्हा गुन्हा दाखल, ‘त्या’ प्रकरणात अडचणीत होणार वाढ Read More »

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले

Kalicharan Maharaj : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्याची घटना घडल्याननंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे. या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळ्याचे कामामध्ये एवढा हलगर्जीपणा हा खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात कालिचरण महाराज यांनी आपला राग व्यक्त केला. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमाला कालिचरण महाराज यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधताना मालवण येथील घटनेवरूण संताप व्यक्त केला. तसेच अशा घटनामधील दोशीवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.  यावेळी बोलताना ते म्हणाले, या घटनेत इंजिनिअर तसेच मूर्ती बनविणाऱ्यांची चूक आहे या सर्वांची योग्य ती चौकशी होऊन यामधील जो कोणी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हा हलगर्जीपणा हा महाराजांचा अवमान आहे.  यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही कारण ते स्वतः मूर्तिकार नाही त्यांनी खाली कामे दिले मात्र संबंधितन्नी त्यांचे काम व्यवस्थित केले नाही. यामुळे मूर्तिकारसह जे इंजिनिअर या मध्ये दोषी आहे अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराज यांनी दिली.

Kalicharan Maharaj : ‘ती’ घटना म्हणजे महाराजांचा अपमान…, कालिचरण महाराज संतापले Read More »

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल

Ahmednagar News:  शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये बाधित झालेल्या मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर तालुक्यातील मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून 6 वर्षे झाली असून, अद्याप शेतकऱ्यांना त्याचा निकाल देऊन लाभ मिळालेला नाही. सदर दावे शेतकऱ्यांनी एएमएस कन्सलटन्स यांच्याकडे दिले असून, शेतकऱ्यांची त्यांच्या बाबत कुठलीही शंका नाही. कन्सलटन्स कडून कशाचीही मागणी करण्यात आलेली नसून, शेतकऱ्यांनी देखील त्यांना काही दिलेले नाही. सदर प्रकरणी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकरी वर्गाला मदत करणाऱ्या एएमएस कन्सलटन्स यांची बदनामी करण्याचे षडयंत्र बनवले असून, ते त्यांना टारगेट करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची बदनामी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व रोष पसरला असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व गावच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जे व्यक्ती शेतकऱ्यांचा कळवळा करण्याचा आव आणत आहे. सर्व शेतकरी गेली 5 ते 6 वर्षा पासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढत आहेत, मग हे मंडळी काय करत होती? असा प्रश्‍न उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

Ahmednagar News: शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल Read More »

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

Rain Alert: गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.  हवामान खात्याने म्हटले आहे की नवीन तीव्र दाबामुळे उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने सल्लागारात म्हटले आहे की पाऊस पश्चिम आणि नैऋत्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम दक्षिण राजस्थान आणि गुजरातवर होईल आणि नंतर 29 ऑगस्टपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छपर्यंत पोहोचेल, त्यानुसार येथे हवामान खराब होण्याची शक्यता आहे. हवामान अद्यतनांनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडसह इतर भागात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाचा इशारा व्यतिरिक्त, IMD ने जोरदार वाऱ्याचा इशारा देखील दिला आहे. मध्य प्रदेशात ताशी 50 किमी आणि दक्षिण राजस्थानमध्ये 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मच्छिमारांसाठी IMD चा सल्ला भारतीय हवामान खात्याने मच्छिमारांना 30 ऑगस्टपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात, विशेषत: गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या आसपास जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये पावसाचा रेड अलर्ट कोलकात्यात गेल्या 5-6 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे गुजरातमधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारपर्यंत (29 ऑगस्ट) पावसामुळे 28 जणांना जीव गमवावा लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमध्ये पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रासह ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी Read More »

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके

Laxman Hake : ओबीसी आंदोलक  लक्ष्मण हाके यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत करण्यात आले.ओबीसी जनजागृती साठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी ते ओबीसींचे मेळावे घेत आहेत.लोहा येथे देखील ओबीसी बांधवाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने ओबीसींच्याच उमेदवारांना मतदान करावे.जर ओबीसी उमेदवार नसेल तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अल्पसंख्याक उमेदवारांना ओबीसींनी मतदान करावे असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांनी केले आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण केला होता.

Laxman Hake : निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा- लक्ष्मण हाके Read More »