DNA मराठी

ahmednagar news

IMG 20241126 WA0003

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »

Eknath Shinde

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या सर्वकाही…

Maharashtra Election: संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह महायुती सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने निवडणुकीत 131 जागांवर बाजी मारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी इच्छा देखील आरएसएसकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला फक्त 49 जागा मिळाले आहे आणि 3 जागांवर इतरांनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभासह झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली असून पुन्हा एकदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार आहे. त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा देखील केला आहे.

Maharashtra Election: देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे कोण होणार मुख्यमंत्री? जाणून घ्या सर्वकाही… Read More »

IMG 20241115 WA0015

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

FB IMG 1731561717877

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ahmednagar Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी किंवा व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत तक्रार असल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, मुलजी निवास, डॉ. चोंभे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर (दूरध्वनी क्र. ०२४१-२४५१८५२) येथे करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रे.मु.भिसले यांनी केले आहे.

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर Read More »

Salman Khan

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Threat: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने बॉलीवूडमध्ये एकच खडबड उडाली आहे. तर पुन्हा एकदा सलमान खानला धमकी मिळाली आहे. मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवलेल्या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स गेन्सकडून ही धमकी आल्याचा दावा केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीचा तपास सुरू केला आहे. गेल्या 15 दिवसांत सलमानला सहाव्यांदा धमकी मिळाली आहे. तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्याला ही धमकी देण्यात आली आहे. खरे तर हे गाणे लॉरेन्स आणि सलमानने एकत्र करून लिहिले आहे. हे गाणे लिहिणाऱ्याला महिनाभरात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे धमकीत म्हटले आहे. वृत्तानुसार, ‘गीतकार गाणे लिहू शकणार नाही’ अशी धमकी देण्यात आली होती. या मेसेजमध्ये सलमान खानला थेट आव्हान देण्यात आलं आहे. ‘सलमान खानकडे ताकद असेल तर त्यांनी त्यांना वाचवावे’, असे म्हटले आहे. याआधी गुरुवारीच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि त्याच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांनंतर आता शाहरुखला धमक्या आल्या आहेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शाहरुख खानला धमकी देणारा कॉल वांद्रे पोलिस स्टेशनला आला आणि 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबरला सलमानला धमकीही मिळाली होतीसलमान खानला 4 नोव्हेंबरला आणखी एक धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. तो तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा त्याने केला. याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला पकडण्यात आले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. व्यवसायाने वेल्डर असलेल्या या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली.

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी Read More »

Parliament

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान

Parliament Winter Session 2024 : संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. रिजिजू म्हणाले की, संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष सोहळा आयोजित केला जाईल, जो संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल. रिजिजू म्हणाले, माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत हिवाळी अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त समितीने शेवटच्या अधिवेशनात दिलेल्या मुदतीवर टिकून राहिल्यास 29 नोव्हेंबर रोजी संसदेत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकावर लक्षसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकाकडे लागले आहे. या दोन मुद्द्यांवरून संसदेत बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे. वन नेशन-वन इलेक्शनच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाईल. विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत आणि देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने नाहीत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे. वक्फ विधेयकावरही गदारोळ होण्याची शक्यतायाशिवाय वक्फ विधेयक 2024 वर सुरू असलेला गतिरोध देखील संसदेच्या अधिवेशनात मुद्दा बनू शकतो. खरे तर वक्फ विधेयकावर गठित जेपीसी आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. यावरून विरोधी पक्ष सरकारला विरोध करत आहेत. जेपीसीच्या बैठकीत वक्फ विधेयकाबाबत अनेकदा गदारोळ झाला आहे.

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान Read More »

IMG 20241031 WA0004

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

1000018609

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक

Maharashtra Crime News: चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विठ्ठल पवार यांनी 24 ऑक्टोबर रोजी पत्नी चिचोंडी पाटील येथे अंगणवाडी सेविका म्हणुन काम करत असून मात्र आतापर्यंत घरी आली नसल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणात तपास करताना पोलिसांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून पाहिले असता अंगणवाडीमध्ये मयत यांच्या वस्तु व रक्ताचे डाग दिसुन आले. त्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 140 (1) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले. पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी सुभाष बंडू बर्डे, (वय 25) रा.कुक्कडवेढे, रा.चिचोंडी पाटील यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. मयत महिलेने आरोपीस त्याचे मुलीचे पोषण आहाराचे साहित्य घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये बोलविले असता, मयत महिलेस एकटे पाहुन आरोपीने तिचेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता मयताने त्यास विरोध केल्याने, आरोपीने तिचे डोके भिंतीवर आदळले त्यात महिला बेशुध्द पडून जागीच मयत झाली. त्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगणवाडी शेजारील नदीचे पात्रात टाकुन दिलेबाबत माहिती सांगितली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Maharashtra Crime News : धक्कादायक! चिचोंडी पाटीलमध्ये अंगणवाडी सेविकेची निघृण हत्या, आरोपीला अटक Read More »

1000014747

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू Read More »

Salman Khan

Salman Khan : चाहत्यांना धक्का, Singham Again मध्ये दिसणार नाही भाईजान, ‘हे’ आहे कारण

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. तर आता एका वेगळ्या कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आता सिंघम अगेनमध्ये दिसणार नाही. सलमान खान सिंघम अगेनमध्ये कॅमिओ करणार आहे. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु होती मात्र आता माहितीनुसार सिंघम अगेनमध्ये सलमान दिसणार नाही. निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर लोकांसमोर सादर केला होता. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलरही लोकांना खूप आवडला. या ट्रेलरमध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक पाहायला मिळाली. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, मुंबईतील गोल्डन टोबॅकोमध्ये एक दिवस शूटिंग होणार होते पण बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर ते लगेच रद्द करण्यात आले. रोहित शेट्टी आणि एजे देवगण यांनी एकमेकांशी बोलून निर्णय घेतला की या सर्व वादांमध्ये सलमान खानला शूट करण्यास सांगणे योग्य होणार नाही. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी देखील सलमान खानच्या कॅमिओशिवाय चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनुसार, आता तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात कॅमिओ करणार नाही. रोहित शेट्टी आणि चित्रपटाच्या निर्मात्याने आता सलमान खानच्या गोपनीयतेचा आदर करत हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करीना कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक आर्यन आणि विद्या बालनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ 1 नोव्हेंबरला या चित्रपटाची टक्कर होणार आहे.

Salman Khan : चाहत्यांना धक्का, Singham Again मध्ये दिसणार नाही भाईजान, ‘हे’ आहे कारण Read More »