DNA मराठी

राजकीय

DNA Marathi News :  जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील

DNA Marathi News : महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व कर्ज वाटप सुरू आहे. पाथर्डी शहर येथे हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजारे बँक व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिकाताई राजळे व अभय काका आव्हाड यांनी उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अजय रक्ताटे, सुभाष बेर्डे, काशिनाथ लवांडे, विष्णुपंत अकोलकर, अंकुश चितळे,  प्रतिक खेडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, अधिकारी व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी उमेद व महाविंग यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्व महिला बचत गटांना आर्थिक व सक्षमीकरण केले जात आहे. मागील सरकारच्या काळात अशा पद्धतीचा उपक्रम का नाही घेता आला? यामध्ये टक्केवारी भेटणार नाही या आशेने विरोधक अशा पद्धतीचे उपक्रम राबवत नसतील.  याउलट फूड प्रोसेसिंग युनिटसाठी दहा टक्के रक्कम ही बचत गटांनी भरायची असते. पण ते त्यांना भरू देता आम्ही व्यक्तिगत खर्चातून प्रत्येक बचत गटाचे 40 हजार रुपये भरले आहेत, ही  दानत लागते असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले. महायुती सरकारच्या काळात महिला बचत गट सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरवर्षी महिलांना वार्षिक नियोजन मधून 40 कोटी खर्च करून महिला बचत गटासाठी पैसे देण्यात येणार आहेत असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केले.  यावेळी त्यांनी केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की, आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. यानुसार केंद्र सरकार स्वतः नाफेड आणि केंद्रीय सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट करणार आहे. याबाबत करार करून केंद्र सरकारने दुसऱ्या शेजारील देशाला कांदा निर्यात कण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी उठवण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो तसाच आहे, मात्र कांदा हा निर्यात होणार याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी सांगितले की, काही माध्यमांद्वारे पूर्णतः गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. यामुळे मोठा संभ्रम निर्माण होऊन शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टला मंत्री समितीकडून मान्यता मिळाली आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी.  केंद्र सरकारद्वारे शेजारच्या देशांनी केलेल्या मागणीनुसार कांदा निर्यात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला आपल्या देशामध्येच उचित भाव मिळेल आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

DNA Marathi News :  जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा धक्का, सर्व 10 खासदार सोडणार पक्ष?

Lok Sabha Elections 2024 :  देशाच्या राजकारणाची एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी मोठा राजकीय खेळ होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावतींना मोठा धक्का बसू शकतो.  या माहितीनुसार, पक्षाचे सर्व 10 खासदार बसपा सोडण्याच्या तयारीत आहेत. यापैकी काही खासदार भारतीय जनता पक्ष तर काही सपा आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी राज्यात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसह आणखी काही नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे आता लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी देशाच्या राजकारणात आणखी काय काय खेळ होणार हे पाहावे लागणार आहे.

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींना मोठा धक्का, सर्व 10 खासदार सोडणार पक्ष? Read More »

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे

Sujay Vikhe News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होत असताना विशेष करून नगर नाशिक पुणे जिल्ह्यातील शेतकरी कांदानिर्यात बंदी निर्णयामुळे हवाल दिल झाले होते.  या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे विशेष करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले. या अनुषंगाने काल दिल्लीमध्ये झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे.  या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास 50 हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्ली सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने  कांदा निर्यात बंदीचा निर्णय उठवलेला आहे.  या अनुषंगाने आज नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, भाजप युवा  मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे,  हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार , धर्माजी आव्हाड आदी  उपस्थित होते. यावेळेस बोलताना खासदार सुजय विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. विशेष करून नगर नाशिक पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका या भागाचा खासदार म्हणून आपण मांडली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.  मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने निर्णय घेतला असून कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन खासदार विखे यांनी केले.  यावेळी त्यांनी विरोधकांचे नाव न घेता अनेक जण केवळ फोटो काढण्या पुरते मागण्याचे निवेदन देतात. मात्र  विखे कुटुंबाने जी ही आश्वासने दिलेली आहेत ती फोटोसेशन न करता पूर्ण केल्याचं खासदार विखे म्हणाले. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही  कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण आणि समाजकारणाचे योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाची असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असे आवाहन केले. ज्या पद्धतीने आम्ही प्रश्नांची मांडणी सरकारकडे केली आणि त्यामुळे हे प्रश्न सुटलेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असा आवर्जून खासदार सुजय विखे यांनी नमूद केले.  माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी  मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचं कर्डिले यावेळी म्हणाले.

Sujay Vikhe News: नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे Read More »

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली..

Sujay Vikhe :  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक,पुणे या कांदा पट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे अहमदनगर मार्केट कमिटीने शेतकरी आणि मार्केट कमिटीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते. नुकतेच या कांदा निर्यातबंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.  यावेळी शाह यांनी कांदा निर्यातबंदी मुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्या कडून घेतली होती.   केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत 31 मार्च 2024 अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांग्लादेशातही 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Sujay Vikhe : खा.सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी! केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली.. Read More »

Kamalnath In BJP : काँग्रेसला पुन्हा धक्का! कमलनाथसह ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश?

Kamalnath In BJP : गेल्या काही दिवसांपासून देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के लागत आहे. अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहे. यातच आता आणखीन एक मोठा नेता पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी करत असल्याची माहिती समजली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यानंतर पंजाबमधील आनंदपूर साहिब येथील काँग्रेस खासदार मनीष तिवारी भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मनीष तिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार ? अफवा सुरू असून तिवारी काँग्रेससोबतचे नाते संपवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे कमलनाथ यांचाही भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता असून, हा काँग्रेसला मोठा धक्का असेल. तथापि, मनीष तिवारी यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या भाजपशी संबंध असल्याबद्दलची अटकळ “मूर्खपणा” आहे कारण ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहेत.  काँग्रेसच्या एका सूत्राने सांगितले की, ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी काम करत आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अंदाज खोटा आणि निराधार आहे. कमलनाथही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या आवडत्या लोकसभा मतदारसंघ छिंदवाडाला भेट देऊन दिल्ली विमानतळावर पोहोचले. यापूर्वी, काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्याचे राज्य भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांच्या एका पोस्टने कमलनाथ भाजपमध्ये सामील झाल्याच्या अफवांना आणखी खतपाणी घातले होते. सलुजाने शनिवारी कमलनाथ यांचा मुलगा नकुलसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “जय श्री राम.” नकुलनाथ यांच्या बायोमधून काँग्रेस हा शब्द काढला याव्यतिरिक्त, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्या बायोमधून ‘काँग्रेस’ हा शब्द काढून टाकला आहे. तथापि, असे असेल याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अनेक नेत्यांनी यापूर्वीच काँग्रेसला धक्का दिला  लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी काँग्रेस सोडल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईल. त्याच वेळी, गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण, मिलन देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी पक्ष सोडला.

Kamalnath In BJP : काँग्रेसला पुन्हा धक्का! कमलनाथसह ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश? Read More »

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ

Congress News:  मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत. यामुळे राज्यातील पक्षांना आणि जनतेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचा बडा नेता काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.  शुक्रवारी छिंदवाडा येथील जनतेसमोर भाषण करताना कमलनाथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, “माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सत्याचे समर्थन करा. सत्याला साथ द्या.” कमलनाथ यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंह यांचे वक्तव्यही समोर आले असून त्यांनी आजवर संघटनेत ज्या पद्धतीने काम केले आहे, ज्या प्रकारे त्यांचे काँग्रेसशी दीर्घ संबंध आहेत, ते पाहता ते काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात जातील, असे मला वाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री मोहन यादव आणि कमलनाथ दोन महिन्यांत तीन वेळा बंद दाराआड भेटले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री मोहन यादव रात्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दोघांची भेट सुमारे तासभर चालली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  तर दुसरीकडे, कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्यांदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांचेही मोठे वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणाल्या की, “कमलनाथांनी रामाचा आशीर्वाद घेऊन यावे. विकासावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भाजपमध्ये जावे,” असा सल्ला यांनी दिला आहे.  कमलनाथ काँग्रेसवर नाराज आहेत? काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याने कमलनाथ संतापले होते. खासदार संघटनेतील बदलांवर कमलनाथ खुश नव्हते. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसने हजर राहण्यास नकार दिला असताना कमलनाथ यांना ते आवडले नाही.त्यांनी छिंदवाड्यात प्रभू रामाच्या नावाने पत्रके वाटली आणि काँग्रेसच्या मोठ्या कार्यक्रमांपासूनही अंतर ठेवले होते. कमलनाथ यांनी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अशोक सिंह यांच्या उमेदवारीपासूनही स्वतःला दूर केले होते. नकुल नाथ यांनी घेतला ‘हा’ निर्णय  कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढून टाकले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नकुलनाथ हे छिंदवाड्याचे खासदार असून मागील अनेक दिवसांपासून ते त्यांच्या परिसरात जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत.

Congress News: काँग्रेसला बसणार मोठा धक्का! बडा नेता सोडणार काँग्रेसची साथ Read More »

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकारणात पक्ष उभे …”

Sharad Pawar : निवडणूक आयोगाने अजित पवार यांचा गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात आगामी निवडणुकीबाबत एक मोठं विधान केले.   यावर आता शरद पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट बारामतीतून हल्ला केला आहे. “देशात असे पहिल्यांदा घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय कायद्याला धरून आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच येईल”, असंही शरद पवार म्हणाले आहेत. “चिन्हाची काळजी करायची गरज नसते. कारण मी १४ निवडणूक लढलो आहे. यात ५ वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत. चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवीन येतात. माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना टोला लगावला आहे. “एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतल्यास त्या संघटनेचं अस्तित्व संपल असं होत नाही. कोणी गेलं तरी आपण आपले विचार सोडायचे नाहीत, विरोधकांची जागा आपण लोकशाही मार्गाने दाखवून देऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल घेऊ. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा,” असा सल्ला शरद पवारांनी दिला आहे.

Sharad Pawar : पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “राजकारणात पक्ष उभे …” Read More »

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय?

Pankaja Munde : दिवसेंदिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाद होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा 19 कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्यामुळे नोटीस देण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. नेमकं कारण काय? या कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तब्बल 61 लाख 47 हजार रुपये रक्कम थकवली आहे. ही रक्कम भरली नसल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने त्यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.  कारखाना बंद असल्याने या साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे भरली नाही. त्यामुळे ही नोटीस दिली आहे. हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जीएसटीची नोटीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पैसे जमा केल्यानंतर पंकजा मुंडे भारावून गेल्या होत्या. पण त्यांनी हे पैसे घेतले नाहीत. “तुमचे प्रेम माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील खात्यात जमा करा. तेच माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. मला तुमच्याकडून रक्कम घेणं योग्य वाटत नाही. कारण माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ! नेमकं कारण काय? Read More »

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर टायर पेटवले, वाहतुकीची कोंडी

Ahmednagar News:  अहमदनगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर शेंडी जवळ अज्ञात व्यक्तीने टायर जाळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र अद्याप टायर पेटवणारा कोण? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.  तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून त्यामुळे टायर पेटवून दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता राज्यात अनेक आंदोलने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता आहे.

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर रोडवर टायर पेटवले, वाहतुकीची कोंडी Read More »

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल

Ahmednagar News:  मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण   मिळावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला अहमदनगर शहरात देखील प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट एका  व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली.   आता या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रामदास जरांगे यांच्या फिर्यादीवरून कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

Ahmednagar News: व्हाट्सअप ग्रुपवर मराठा समाजाची बदनामी, गुन्हा दाखल Read More »