DNA मराठी

राजकीय

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्हुबा येथे बेकायदेशीरपणे काही विघ्नसंतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसा मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घडणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीर बाबा रमजान उर्फ कान्हुबा दर्गा आहे. या दर्गाच्या दिवा बत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यानपिढ्या दीडशे वर्षापासून इनामी जमिनी मिळालेली आहे. शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसा उल्लेख असून, ॲलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे. परंतु गावातील काही विघ्नसंतोषी व गावाबाहेरील जातीवादी संघटनेचे लोक यामध्ये राजकारण करून तीन वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाचे मुजावर यांना दमबाजी करुन दर्गा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात मुस्लिम समाज अल्प असून, त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे. दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून, मजारवर भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या दर्गावर कधीही आरती झालेली नसून, दर्गावर आरती करण्याच्या उद्देशाने चिथावणी देऊन जमाव जमविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 19 जून रोजी दर्गातील मुजावर यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाची बैठक घेतली, मात्र मुस्लिम समाजावर दबाव टाकण्यात येत आहे. जातीय द्वेष पसरविण्यासाठी युवकांचे माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. प्रशासन देखील यासंदर्भात सहकार्य करत नसून, विघ्नसंतोषी लोक दर्गाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा येथे जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यासाठी विघ्नसंतोषी लोकांना गैरकृत्य करण्यापासून रोखण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भैय्या शेख, शाहिद पठाण, डॉ परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफिक शेख, शाकीर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अन्वर शेख, आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी Read More »

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असं या वेळी अजित पवार म्हणाले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले. पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

आता शांततेची वेळ…, डोनाल्ड ट्रम्पकडून इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा

Iran Israel Conflict : गेल्या 12 दिवसांपासून सुरू असणाऱ्या इराण आणि इस्रायल युद्ध अखेर थांबले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये परस्पर संमतीने युद्धबंदीचा करार झाला आहे, जो पुढील काही तासांत लागू होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ वर पोस्ट करत ट्रम्प यांनी माहिती दिली की इराण आणि इस्रायल पुढील ६ तासांत त्यांच्या सध्याच्या लष्करी कारवाया संपवतील. यानंतर, इराण १२ तासांचा युद्धबंदी लागू करेल आणि पुढील १२ तासांनंतर इस्रायल देखील युद्धबंदीचे पालन करण्यास सुरुवात करेल. अशा प्रकारे, एकूण २४ तासांत, हे युद्ध अधिकृतपणे संपल्याचे मानले जाईल. “आता शांततेची वेळ आली आहे” – ट्रम्प ट्रम्प यांनी त्यांच्या संदेशात जगाला अभिनंदन केले आणि लिहिले, “अभिनंदन जग, शांततेची वेळ आली आहे!” त्यांनी या हालचालीला ऐतिहासिक म्हटले आणि म्हटले की जर हे युद्ध सुरू राहिले असते तर ते वर्षानुवर्षे चालू राहिले असते आणि संपूर्ण मध्य पूर्व विनाशाच्या विळख्यात सापडले असते. पण आता हा धोका टळला आहे. ट्रम्प यांच्या जागतिक प्रतिमेला एक नवीन आयाम मिळाला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधीही ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी कराराची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, इराण आणि इस्रायलमधील या युद्धबंदी करारामुळे जागतिक शांतता प्रस्थापित म्हणून त्यांची प्रतिमा आणखी मजबूत होते. दोन्ही देशांचे अभिनंदन ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “हे संपवण्यासाठी धाडस, संयम आणि शहाणपण दाखवल्याबद्दल मी दोन्ही देशांचे अभिनंदन करतो.” ते पुढे म्हणाले, “देव इस्रायलला आशीर्वाद देवो, देव इराणला आशीर्वाद देवो, देव मध्य पूर्व, अमेरिका आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो.” आता पुढे काय? आता सर्वांचे लक्ष या युद्धबंदीची अंमलबजावणी किती जोरदारपणे होते आणि दोन्ही देश दीर्घकालीन शांततेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करतात का याकडे आहे. सध्या तरी, ही बातमी जगासाठी सुटकेचा नि:श्वास आहे – एक युद्ध, जे मोठे रूप घेऊ शकले असते, ते आता थांबले आहे.

आता शांततेची वेळ…, डोनाल्ड ट्रम्पकडून इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा Read More »

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट

Hindi Language Controversy: त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी 23 जूनच्या रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अ‍ॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते.

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट Read More »

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू

Ahilyanagar News : शहरातील माणिक चौक या ठिकाणी असलेले पक्के अतिक्रमण महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यापारी शहर प्रमुख विशाल वालकर यांनी आज महानगरपालिकेच्या समोर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण सुरू केले. महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली असताना देखील सुद्धा कारवाई केली नाही उलट अनेक ठिकाणी मोजक्या कारवाई करून वेळ मारून देण्याचा प्रकार घडलेला आहे असेच उदाहरण शहरातील माणिक चौक भागांमध्ये पाहायला मिळालेले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिक ठिकाणी रस्त्याची, ड्रेनेजची कामे चालू आहेत. त्यापैकी एकमुखी दत्त मंदीर चौक, सोपानराव वडेवाला समोर, माणिक चौक येथे आशा टॉकीज चौक ते कापड बाजार येथे चालु असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणचे कामाच्या रस्त्यात अडथळा निर्माण करणारे ओटे, पत्रा शेड इ. अतिक्रमण हटवुन काम पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर मालमत्ता सि.स.नं. ३६१८/२ या ठिकाणी सन २०१९ पासून अशोक छल्लानी व भागीदार यांनी या मालमत्तेमध्य बेकायदेशीर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम करुन गाळे बांधून महानगरपालिकेच्या जागेमध्ये १० फुटाचा ओटा, पत्र्याची शेड बांधून मोठे अतिक्रमण केले आहे. तसेच अशोक छल्लानी व इतर भागीदार यांनी त्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गाळ्यांमध्ये भाडेकरी टाकले असुन सदर जागेवर डी.एस.पी. फुटवेअर व फुटी फुटवेअर व इतर दुकाने या दोन दुकानदारांनी दुकानासमोर महापालिकेच्या जागेमध्ये वीजेचा खांब पत्रा शेडच्या आत घेऊन रस्त्यावर १० फुट X २० फुट ओटा व पत्राशेड बांधुन मोठे अतिक्रमण केले आहे. तरीपण संबंधीत मालमत्ताधारक हा महानगरपालिकेला न जुमानता वारंवार अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमणाबाबत वालकर यांनी मनपास दिनांक ३० मे २०२५ रोजी आयुक्त रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाकडे महापालिका, अतिक्रमण विभाग व प्रभाग समिती नं. २ या विभागांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून तक्रारीचे निरसन करण्याची विनंती केली होती. परंतु सदर सर्व विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे दि.१३ रोजी उपोषणाला बसण्याचे आवाहन केले होते, त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने मला दिनांक ०9 रोजी पत्र देऊन अश्वासन दिले की, नगर रचना विभागामार्फत माकींग करुन अहवाल सादर झाला की, उचित कारवाई करण्यात येईल असे पत्र देवून संबोधले होते, या करीता मी उपोषण स्थगित केले होते. प्रभाग समिती क्र. २ ने नगर रचना विभागाला रितसर अभिप्राय मिळावा या करीता मागणी केली होती, त्या मागणीचा रोड मार्कीग करुन अतिक्रमण केलेला अभिप्राय त्यांना दि. ९ रोजी प्राप्त झालेला आहे. तरी देखील आज पर्यंत महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अद्याप केलेली नाही व रोडचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, वालकर यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेने त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्राची शेड बाजूला केली मात्र पक्के बांधकाम तसेच ठेवले आहे. त्यामुळे आज पासून माणिक चौक येथील अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे वालकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू Read More »

बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल

Nitesh Rane: महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिल्या. किनारपट्टीच्या विकासासाठी केंद्रीय आणि राज्य विभागाची एकत्रित बैठक ही एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले. राज्यातील बंदर विकास आणि महत्वाच्या प्रकल्पांविषयी केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांची एकत्र बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री सोनोवाल आणि राज्याचे मंत्री राणे बोलत होते. बैठकीस बंदरे व परिवहन सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीटी चे अध्यक्ष उन्मेष वाघ, एम बी पी टी चे उपाध्यक्ष आदेश तितारमारे, डिजिसीएचे महासंचालक श्याम जगन्नाथ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले की, सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी आहेत. महाराष्ट्रातील बंदरे क्षेत्रातील प्रकल्प महत्वाचे असून त्यासाठी लागणाऱ्या परवानगी लवकर देण्यात याव्यात. रेल्वे आणि रस्ते मार्गाने बंदराची जोडणी करणारे प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत. सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले प्रकल्प 2026 सालापर्यंत पूर्ण करावेत. मंत्री राणे म्हणाले की, केंद्रीय विभागांची परवानगी वेळेत मिळण्यासाठी दोन्ही विभागणी समन्वयाने काम करावे. तसेच या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न व्हावे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन खर्चात बचत होईल. आजची बैठक ही सकारात्मक झाली असून यामुळे राज्यातील बंदर विभागाची कामे गतीने मार्गी लागतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीमध्ये वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्प, आनंदवाडी बंदर, रो रो सेवा, वॉटर टॅक्सी, अंतर्गत जलमार्ग, जेटीचे प्रश्न याबाबत चर्चा झाली.

बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करा, केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल Read More »

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला असेही ते म्हणाले. चंदीगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण  आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला. मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप Read More »

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असणाऱ्या तणावामुळे संपूर्ण जगात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेअर बाजार कोसळत आहे. तर दुसरीकडे आज इराणने इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणने पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर केला. हा हल्ला दक्षिण इस्रायलमधील एका रुग्णालयाला टार्गेट करून करण्यात आला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी, इस्रायलने इराणच्या अणुसुत्रांवर हवाई हल्ले केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने क्लस्टर युद्धसामग्रीने सुसज्ज क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला आतापर्यंतच्या संघर्षातील सर्वात मोठा चिथावणी मानला जातो. युद्धबंदी किंवा राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता दिसत नाही. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला इस्रायली संरक्षण दलाने (IDF) शुक्रवारी इराणच्या अनेक लष्करी आणि अणुतळ तळांना टार्गेट केले. त्यापैकी, इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या स्थळांना विशेषतः लक्ष्य केले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की “आम्ही आमच्या लष्करी योजनेत वेळापत्रकापेक्षा पुढे गेलो आहोत आणि इराणच्या सर्व अणुस्थळांना, अगदी फोर्डोसारख्या मजबूत ठिकाणांना देखील टार्गेट करू शकतो.” इराणने क्लस्टर बॉम्बने प्रत्युत्तर दिले इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने शुक्रवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला. यामध्ये पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, ज्यामुळे इस्रायली रुग्णालयाचे गंभीर नुकसान झाले. या हल्ल्यात 74 लोक जखमी झाले, त्यापैकी बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली किंवा त्यांना पॅनिक अटॅकमुळे उपचारांची आवश्यकता होती. इराणला नेतान्याहू यांचा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी कडक शब्दात इशारा दिला की, “इराणच्या नेतृत्वाला या हल्ल्याची संपूर्ण किंमत मोजावी लागेल.” त्यांनी असेही म्हटले की इस्रायल आपल्या लष्करी रणनीतीत अपेक्षेपेक्षा खूप पुढे गेला आहे. अमेरिका दोन आठवड्यात मोठा निर्णय घेऊ शकते व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन आठवड्यात निर्णय घेतील की अमेरिका इस्रायलला लष्करीदृष्ट्या पाठिंबा देईल की नाही. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मान्यता मिळाल्यास इराण “काही आठवड्यांत” अण्वस्त्रे तयार करू शकेल अशी घोषणा या घोषणेत करण्यात आली आहे. आयआरजीसीमध्ये गुप्त चर्चा आणि मोठे बदल सूत्रांनुसार, ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्यात अनेक फोनवरून संभाषण झाले आहे. दरम्यान, इराणने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या गुप्तचर विभागाच्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. ब्रिगेडियर जनरल माजिद खादेमी यांना नवीन गुप्तचर प्रमुख बनवण्यात आले आहे. ते इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले मोहम्मद काझेमी यांची जागा घेतील. अमेरिकेने कतारमधून आपले लष्करी विमान हटवले वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने कतारमधील आपल्या एका प्रमुख हवाई तळावरून सुमारे 40 लष्करी विमान हटवले आहेत. इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकन मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे Read More »

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…”

Ahilyanagar News : बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील जमीन क्रमांक 34/3 च्या विक्री व्यवहारात कृषीच्या आडून अकृषिक जमीन विकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून सत्ताधारी वरदहस्त आणि स्थानिक प्रशासनातील हलगर्जीपणा यांचा थेट पुरावा म्हणावा लागेल. मिलिंद बाबासाहेब कोरडे यांनी संबंधित व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर तहसील कार्यालयाने नियमांची पुस्तके उघडून विविध शाखांना अहवाल मागवले कुळकायदा संकलन, गौणखनिज विभाग, महसूल खाते… सर्वांनी आपले कर्तव्य निभावल्याचे दाखवत पत्रव्यवहारांचा ढिगारा तयार केला. पण थेट कारवाई शून्य. विशेष म्हणजे, ड्रेनेज, रस्ते, गटारीसाठी वापरलेल्या गौणखनिजांची चलने सादर करण्यास सांगण्यात आलेले असतानाही संबंधितांनी ती सादर केली नाहीत. तलाठ्यांमार्फत नोटीस बजावली गेली, तरीही दुर्लक्ष. महाखनिज प्रणालीवरही परवानगी नोंदली गेल्याचा ग ना बाबद नोंदी आढळून येत नाही. हे सर्व घडत असतानाही प्रशासन ‘बघ्याची भूमिका’ घेत आहे. खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा स्पष्ट पुरावे, अहवाल आणि नियमभंग समोर आहे, तेव्हा कारवाई टाळण्यामागे नेमकं कोण आहे? स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांना ‘सिस्टिम’चा आधार वाटतो कारण त्यांच्या पाठिशी उभे असतात वरिष्ठ अधिकारी वा राजकीय हात. इथेही तसाच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. लोकांनी कायद्याचा आधार घेतला, पण कायदा प्रशासनाच्या फाईलमधून बाहेरच पडलेला नाही. हे चित्र धोक्याचं आहे. कारण जेव्हा कायदा दुर्लक्षित होतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…” Read More »