DNA मराठी

ताज्या बातम्या

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा

ABS System: जानेवारी 2026 पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याच बरोबर नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. ही ABS सिस्टिम नेमकी काय? याबद्दल जाणून घेऊया.. का घेण्यात आला निर्णय? जानेवारी 2026 पासून, देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये ABS अनिवार्य असेलरस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या एबीएस 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या देशातील अंदाजे 40 टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाही पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आलयं. एबीएस काय आहे? अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर असून जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते. ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते. घसरण्याचा धोका होतो कमी अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी एबीएस फायदेशीर ठरते. एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते ABS कसे काम करते? ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते. जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते आणि बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते. ABS चे किती प्रकार आहेत? सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते.

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा Read More »

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला असेही ते म्हणाले. चंदीगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण  आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला. मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप Read More »

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असणाऱ्या तणावामुळे संपूर्ण जगात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेअर बाजार कोसळत आहे. तर दुसरीकडे आज इराणने इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणने पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर केला. हा हल्ला दक्षिण इस्रायलमधील एका रुग्णालयाला टार्गेट करून करण्यात आला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी, इस्रायलने इराणच्या अणुसुत्रांवर हवाई हल्ले केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने क्लस्टर युद्धसामग्रीने सुसज्ज क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला आतापर्यंतच्या संघर्षातील सर्वात मोठा चिथावणी मानला जातो. युद्धबंदी किंवा राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता दिसत नाही. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला इस्रायली संरक्षण दलाने (IDF) शुक्रवारी इराणच्या अनेक लष्करी आणि अणुतळ तळांना टार्गेट केले. त्यापैकी, इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या स्थळांना विशेषतः लक्ष्य केले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की “आम्ही आमच्या लष्करी योजनेत वेळापत्रकापेक्षा पुढे गेलो आहोत आणि इराणच्या सर्व अणुस्थळांना, अगदी फोर्डोसारख्या मजबूत ठिकाणांना देखील टार्गेट करू शकतो.” इराणने क्लस्टर बॉम्बने प्रत्युत्तर दिले इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने शुक्रवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला. यामध्ये पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, ज्यामुळे इस्रायली रुग्णालयाचे गंभीर नुकसान झाले. या हल्ल्यात 74 लोक जखमी झाले, त्यापैकी बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली किंवा त्यांना पॅनिक अटॅकमुळे उपचारांची आवश्यकता होती. इराणला नेतान्याहू यांचा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी कडक शब्दात इशारा दिला की, “इराणच्या नेतृत्वाला या हल्ल्याची संपूर्ण किंमत मोजावी लागेल.” त्यांनी असेही म्हटले की इस्रायल आपल्या लष्करी रणनीतीत अपेक्षेपेक्षा खूप पुढे गेला आहे. अमेरिका दोन आठवड्यात मोठा निर्णय घेऊ शकते व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन आठवड्यात निर्णय घेतील की अमेरिका इस्रायलला लष्करीदृष्ट्या पाठिंबा देईल की नाही. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मान्यता मिळाल्यास इराण “काही आठवड्यांत” अण्वस्त्रे तयार करू शकेल अशी घोषणा या घोषणेत करण्यात आली आहे. आयआरजीसीमध्ये गुप्त चर्चा आणि मोठे बदल सूत्रांनुसार, ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्यात अनेक फोनवरून संभाषण झाले आहे. दरम्यान, इराणने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या गुप्तचर विभागाच्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. ब्रिगेडियर जनरल माजिद खादेमी यांना नवीन गुप्तचर प्रमुख बनवण्यात आले आहे. ते इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले मोहम्मद काझेमी यांची जागा घेतील. अमेरिकेने कतारमधून आपले लष्करी विमान हटवले वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने कतारमधील आपल्या एका प्रमुख हवाई तळावरून सुमारे 40 लष्करी विमान हटवले आहेत. इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकन मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे Read More »

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…”

Ahilyanagar News : बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील जमीन क्रमांक 34/3 च्या विक्री व्यवहारात कृषीच्या आडून अकृषिक जमीन विकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून सत्ताधारी वरदहस्त आणि स्थानिक प्रशासनातील हलगर्जीपणा यांचा थेट पुरावा म्हणावा लागेल. मिलिंद बाबासाहेब कोरडे यांनी संबंधित व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर तहसील कार्यालयाने नियमांची पुस्तके उघडून विविध शाखांना अहवाल मागवले कुळकायदा संकलन, गौणखनिज विभाग, महसूल खाते… सर्वांनी आपले कर्तव्य निभावल्याचे दाखवत पत्रव्यवहारांचा ढिगारा तयार केला. पण थेट कारवाई शून्य. विशेष म्हणजे, ड्रेनेज, रस्ते, गटारीसाठी वापरलेल्या गौणखनिजांची चलने सादर करण्यास सांगण्यात आलेले असतानाही संबंधितांनी ती सादर केली नाहीत. तलाठ्यांमार्फत नोटीस बजावली गेली, तरीही दुर्लक्ष. महाखनिज प्रणालीवरही परवानगी नोंदली गेल्याचा ग ना बाबद नोंदी आढळून येत नाही. हे सर्व घडत असतानाही प्रशासन ‘बघ्याची भूमिका’ घेत आहे. खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा स्पष्ट पुरावे, अहवाल आणि नियमभंग समोर आहे, तेव्हा कारवाई टाळण्यामागे नेमकं कोण आहे? स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांना ‘सिस्टिम’चा आधार वाटतो कारण त्यांच्या पाठिशी उभे असतात वरिष्ठ अधिकारी वा राजकीय हात. इथेही तसाच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. लोकांनी कायद्याचा आधार घेतला, पण कायदा प्रशासनाच्या फाईलमधून बाहेरच पडलेला नाही. हे चित्र धोक्याचं आहे. कारण जेव्हा कायदा दुर्लक्षित होतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…” Read More »

बंकर बस्टर, बॉम्बर आणि युद्धनौका…, इराणविरुद्ध अमेरिकेचा प्लॅन तयार

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावात अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवली असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या लष्करी कारवायांची पुष्टी केली आहे, ते म्हणाले की “आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिकता आहे.” पेंटागॉनने लढाऊ विमाने तैनात केली आहेत, टँकर आणि युद्धनौकांना मोक्याच्या ठिकाणी इंधन भरत आहेत, जे अमेरिकेच्या हालचाली आणि संभाव्य कारवाईचे संकेत देतात. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “आता आमचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे,” ज्यामुळे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या अटकळाला बळकटी मिळाली आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की मंगळवारपर्यंत, कोणतेही अमेरिकन विमान इराणी हवाई क्षेत्रात प्रवेश केलेले नाही आणि आतापर्यंतचे सर्व लष्करी कारवाया पूर्णपणे बचावात्मक आहेत. मध्य पूर्वेतील अमेरिकन लढाऊ विमानांची तैनाती जरी अचूक संख्या गुप्त ठेवण्यात आली असली तरी, माहितीनुसार, सुमारे एक डझन एफ-16 लढाऊ विमाने सौदी अरेबियाला पाठवण्यात आली आहेत. अमेरिकन लढाऊ विमाने संपूर्ण प्रदेशात गस्त घालत आहेत. डिएगो गार्सियामध्ये बी-52 बॉम्बर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. 30,000 पौंड वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकणारे बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स सध्या तैनात नसले तरी, ते अमेरिकेकडे एक शक्तिशाली पर्याय आहेत. इराणच्या पर्वतांमध्ये असलेल्या फोर्डो अणुस्थळाला फक्त मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (GBU-57) सारख्या शक्तिशाली बॉम्बनेच लक्ष्य करता येते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, “अशा हल्ल्यासाठी आवश्यक विमाने आणि शस्त्रे फक्त अमेरिकेकडेच आहेत.” युरोपमधूनही धोरणात्मक तैनाती माध्यमांच्या वृत्तानुसार, मध्य पूर्वेतील ओपन-सोर्स इंटेलिजन्सवर लक्ष ठेवणाऱ्या ऑरोरा इंटेलने वृत्त दिले आहे की अमेरिकेने इंग्लंड, स्पेन, जर्मनी आणि ग्रीससह युरोपियन तळांवर इंधन भरणारी विमाने आणि लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत. ही माहिती सार्वजनिक विमान वाहतूक ट्रॅकिंग वेबसाइट्सद्वारे मिळवण्यात आली आहे. अमेरिकन सैन्याची संख्या 40,000 पर्यंत पोहोचली मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्याची संख्या आता सुमारे 40,000 पर्यंत वाढली आहे, जी पूर्वी सामान्यतः 30,000 होती. काही लष्करी तळांवरील कुटुंबांना स्वेच्छेने स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि लष्करी प्रतिष्ठानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि इराणमधील तणाव आणि येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे ही संख्या 43,000 पर्यंत पोहोचली होती.

बंकर बस्टर, बॉम्बर आणि युद्धनौका…, इराणविरुद्ध अमेरिकेचा प्लॅन तयार Read More »

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ जुन २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

Marathi Movie: गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च

Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.” निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ” तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर १७६०’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.” तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Marathi Movie: गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च Read More »

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले!

Maharashtra Politics: महाराष्ट्राची ओळख कष्टकरी, बुद्धिजीवी आणि परिवर्तनवादी राज्य म्हणून होती. पण गेल्या काही दशकांत ही ओळख झाकोळली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, शेतकरी अडचणीत, तरुण बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था कोलमडलेली त्यामुळे जनता अडचणीत आहे. मात्र याच काळात नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये उमेदवार दाखल करत असलेल्या मालमत्ता विवरणपत्रांवर नजर टाकली, तर अनेक नेत्यांची संपत्ती काही वर्षांत दुप्पट-तिप्पट झाल्याचे स्पष्ट होते. कुठून येतो हा पैसा? सत्तेचा वापर फक्त समाजसेवेकरता नाही, तर वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी होतो, अशीच जनता भावना बळावते. शेतकरी कर्जमाफीसाठी विनवणी करत असतो, विद्यार्थी फी भरू शकत नाहीत, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. पण मंत्रीमहोदयांच्या कोट्यवधींच्या गाड्या, फौजफाटा, बंगल्यांची झळाळी मात्र झकास असते. ही दुहेरी परिस्थिती लोकशाहीला सुरुंग लावत आहे. महाराष्ट्रातील सत्ता म्हणजे केवळ सत्ता नव्हे, ती संपत्तीची शिडी बनली आहे. विरोधात असताना “भ्रष्टाचारविरोधी” घोषणा करणारे सत्तेत गेल्यावर मात्र त्याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतात आणि जनतेला आश्वासनांची विषारी गोळी देत राहतात. आज महाराष्ट्राला गरज आहे ती जबाबदार नेतृत्वाची, पारदर्शक कारभाराची आणि जागरूक जनतेची. अन्यथा “महाराष्ट्र गरीब, नेते श्रीमंत” ही ओळख आपणच कायमस्वरूपी स्वीकारावी लागेल.

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले! Read More »

ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार, मुंबईच्या दिशेने रवाना

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर,माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय. नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत. ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर,माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय. नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत.

ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार, मुंबईच्या दिशेने रवाना Read More »

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

Chandrakant Patil:  राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ Read More »