DNA मराठी

ताज्या बातम्या

img 20250823 wa0002

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे. धार्मिक कार्यक्रमा मध्ये धर्म प्रसारण बाजूला ठेऊन राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोक प्रतिनिधी करत आहे. यांना कोणीही जाब विचारायला तयार नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न करत आहे.  मुस्लिम समाजाचे दर्गा मशीद मदरसावर हल्ले होत आहे. काही जातीवादी संघटन लोकांना आव्हान करत आहे. प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही. न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रशासन कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही. दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही. तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीलाच दम देऊन हाकलून देतात. असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि विधानसभेत मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी खुलेआम प्रचार केला, त्याचे आज आवाज बसले आहे. दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे. अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही. मागास्वर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊ पर्यंत मारतात. तसेच गऊ रक्षकांच्या नावाखाली हल्ले करतात, जनावरे चोरून दुसरीकडे विकतात. असे अनेक समस्यांच्या चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याचे उद्देशाने व एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात अहमदनगर महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्तयां सोबत एम आय एम मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश महा सचिव समीर साजिद बिल्डर,प्रदेश सहसचिव शफीउल्लाह काझी यांची मुलाखत औरंगाबाद येथील पक्ष कार्यालय दारुसलाम येथे घेतली. इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले.आणि आपल्या सारखे ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगर पालिकेत पक्षाची महत्त्वाची भूमिका राहील असे सांगितले. समद खान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्याक समाजावर खालची पातळीवर टीका होत असताना एम आय एम व्यतिरिक्त कोण्ही बोलायला तयार नाही.जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहुन काय करू. म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष  इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगर मध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, नगरसेवक समद खान, अंजर खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, यूथ अध्यक्ष अमीर खान, आवेज काझी,जावेद शेख,नवीद शेख सनाउल्लाह खान, समीर खान, वाहिद हुंडेकरी, सज्जाद शेख, अजीम राजे, मोसिन शेख, मतीन खान आदी उपस्थिती होते. येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिले.

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Read More »

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

Eknath Shinde: यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.

Eknath Shinde: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय Read More »

mbbs

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका

MBBS Reservation: महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील निजी अनएडेड (Unaided) मेडिकल महाविद्यालयांमधील MBBS प्रवेशासाठी राखीव जागांचे प्रमाण 50 टक्क्यांवरून थेट 25 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या मुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहे. या मुळे आरक्षणातील कपातीमुळे एकूण 766 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी हुकणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याबाबत डॉ. सिद्धांत भारणे यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत म्हटले की, “हा निर्णय पूर्णपणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून हे एक नियोजित षडयंत्र असल्यचे बोलले आहे” राज्यातील विविध भागातील विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू केला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईसह अनेक शहरांमध्ये आंदोलने होत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांना या संदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पूर्वी 50 टक्के आरक्षणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात आपला वाटा निश्चित करता येत होता. मात्र आता तो हिस्सा अर्ध्यावर आल्याने सामाजिक समतेच्या तत्त्वाला धक्का बसल्याची टीका होत आहे. आधीच महागडी फी व आर्थिक अडचणींच्या कचाट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते, परंतु यामागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयाने आता राजकीय वादाला देखील तोंड फुटले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ला चढवला असून, “शैक्षणिक संधी कमी करून सामाजिक न्यायाचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

MBBS प्रवेशातील आरक्षण 50% वरून 25% वर; विद्यार्थ्यांचा संताप, सरकारवर टीका Read More »

imtiaz jaleel

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.  माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ Read More »

raj thackeray

Raj Thackeray: राज ठाकरे अन् CM फडणवीस यांची भेट; अर्धातास चर्चा, पुन्हा राजकीय भूकंप?

Raj Thackeray : पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार असून यासाठी राजकीय पक्षांकडून देखील वेगाने हालचाली पहायला मिळत आहे. यातच राज्यातील राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या या भेटीमागचे कारण आतापर्यंत गुलदस्त्यात असल्याचे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा येथे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये तब्बल अर्धातास चर्चा झाली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीसोबत जाणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची असणार असल्याची देखील सध्या चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे अन् CM फडणवीस यांची भेट; अर्धातास चर्चा, पुन्हा राजकीय भूकंप? Read More »

bhandardara dam

Ahilyanagar News : पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो…

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी भंडारदरा धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. दरम्यान भंडारदरा धरणातुन २० हजार ७६३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक होत असुन धरणातील पाणी पातळी नियत्रीत ठेवण्यासाठी निळवडे धरणातुन ८ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली. गेल्या आठवड्यात भंडारदरा धरण पाणलोट परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे १५ आँगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम मोडला होता. परंतु सोमवार पासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावासाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे. डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे जोमाने वाहत असून छोट्या नद्या, नाले खळखळून धरणात विसावत आहेत. बुधवारी भंडारदरा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.तर निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे निळवंडे धरणातून एकूण ८ हजार ६०० क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावत आहे. त्यामुळे प्रवरा नदी वाहती बनली आहे. आणि नवीन पाण्याची आवक निळंवडे धरणात वाढत असल्याने निळंवडे धरण लवकरच भरणार असल्याचे वर्तविले जात आहे.

Ahilyanagar News : पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो… Read More »

james vince

The Hundred Tournament : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास; धोनी-कोहलीला टाकले मागे

The Hundred Tournament : टी 20 क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या खेळाडूने नवीन इतिहास रचला आहे. जेम्स विन्सने द हंड्रेड लीगमध्ये खेळताना एक मोठा विक्रम मोडला आहे. विन्स आता कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये सदर्न ब्रेव्ह आणि वेल्स फायर यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात जेम्स विन्सने 26 चेंडूत 29 धावा करून फाफ डू प्लेसिसला मागे टाकले. आता तो या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, जिथे त्याच्या नावावर 6663 धावा आहेत. फाफ डू प्लेसिसचा विक्रम मोडला यापूर्वी, फाफ डू प्लेसिस कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. मेजर लीग क्रिकेट दरम्यान डू प्लेसिसने जुलैमध्ये विराट कोहलीला मागे टाकून हा विक्रम केला होता. तथापि, आता जेम्स विन्सने त्याचा विक्रम मोडला आहे आणि तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. विन्स आता टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 6663 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. या आकडेवारीसह, त्याला फाफ डू प्लेसिससोबत धावांमधील अंतर आणखी वाढवण्याची उत्तम संधी आहे, कारण त्याची टी-20 कारकीर्द अजूनही सुरू आहे. द हंड्रेड लीगमध्ये या हंगामात जेम्स विन्स सदर्न ब्रेव्हचे नेतृत्व करत आहे आणि या स्पर्धेत त्याचा अनुभव खूप मौल्यवान ठरत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू जेम्स विन्स – 6663 धावा (206 डावांमध्ये) फाफ डू प्लेसिस – 6634 धावा (203 डावांमध्ये) विराट कोहली – 6564 धावा (188 डावांमध्ये) एमएस धोनी – 6283 धावा (289 डावांमध्ये) रोहित शर्मा – 6064 धावा (224 डावांमध्ये) जेम्स विन्सची कारकीर्द जेम्स विन्सची टी-20 कारकीर्द खूप यशस्वी झाली आहे. जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळताना त्याने अनेक विक्रम केले आहेत. आतापर्यंत विन्सने 449 सामने खेळले आहेत आणि 437 डावांमध्ये फलंदाजी करताना 32.11 च्या सरासरीने 12557 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने 7 शतके आणि 80 अर्धशतके देखील झळकावली आहेत, जी त्याच्या शानदार कारकिर्दीचे प्रतिबिंब आहेत.

The Hundred Tournament : इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास; धोनी-कोहलीला टाकले मागे Read More »

sanjay kumar

Sanjay Kumar : CSDS चे संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Sanjay Kumar: निवडणूक विश्लेषक आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे प्राध्यापक संजय कुमार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल चुकीची आकडेवारी दिल्याने त्यांच्याविरुद्ध नागपूरनंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांचा डेटा शेअर करताना खोटी विधाने केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी नागपूर जिल्ह्यात आणि नाशिकमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संजय कुमार यांच्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्य विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर मतदारांची संख्या प्रचंड घटली आहे. या दोन्ही निवडणुका सुमारे सहा महिन्यांच्या अंतराने घेण्यात आल्या. नंतर त्यांनी मंगळवारी ही पोस्ट हटवली आणि दुसऱ्या पोस्टमध्ये चुकीचा डेटा पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली. नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या तहसीलदारांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येतील फरकाबाबत केलेल्या दाव्याबाबत तक्रार दाखल केली आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 175 (निवडणुकीसंदर्भात खोटे विधान), 353 (1) ब (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने), 212 (सार्वजनिक सेवकाला खोटी माहिती देणे) आणि 340 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या नायब-तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजीच्या पोस्टमध्ये नमूद केले होते की (2024) लोकसभा निवडणुकीदरम्यान देवळाली मतदारसंघात मतदारांची संख्या 4,56,072 होती, तर प्रत्यक्षात मतदारांची संख्या 2,76,902 होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, संजय कुमार यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देवळालीतील मतदारांची संख्या 2,22,141 असल्याचे कथितपणे सांगितले होते, जे दिशाभूल करणारे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीशी संबंधित दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल बीएनएसच्या संबंधित कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Kumar : CSDS चे संजय कुमार यांच्या अडचणी वाढल्या, नाशिकमध्ये गुन्हा दाखल Read More »

sawedi land scam

“गंभीर चुका असूनही खरेदीखताची दाट शक्यता : अधिकाऱ्यांचे मत”

Sawedi land scam – अहिल्यानगर – अहिल्यानगरातील सावेडी परिसरातील एका ३४ वर्षांपूर्वीच्या खरेदीदस्तावरून उभ्या राहिलेल्या वादातून महसूल यंत्रणेतील त्रुटी आणि संशयास्पद कार्यपद्धतीचे भयावह चित्र समोर आले आहे. दस्त क्रमांक ४३०, दिनांक १५ ऑक्टोबर १९९१ या खरेदीखतात केवळ तांत्रिक चुका नव्हे तर गंभीर कायदेशीर त्रुटी झाल्याचे दस्तऐवज स्पष्ट करतात. मात्र, इतक्या उघड चुका असूनही संबंधित अधिकारी प्रकरण “खरेदीखत व्हावे” यावर ठाम आहेत. ही बाब लोकशाही यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. या खरेदीदस्तात मूलभूत बाबींची शहानिशा करण्यात आली नाही. १९९१ सालचा ७/१२ उतारा जोडलेलाच नव्हता. खरेदी देणाऱ्याचे नाव चुकीचे दाखल झाले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट अधिनियमांतर्गत आवश्यक नोटीस बजावणी झाली नाही. खरेदी घेणारा शेतकरी असल्याचा पुरावा घेण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर १९९०-९१ सालचे महसुली दप्तर तपासले गेले नाही. या सगळ्या त्रुटींवर पडदा टाकून फेरफार मंजुरीला गती देणे हे संशयास्पद ठरत नाही का? आजमितीस शंका व्यक्त होत आहे की, ही प्रकरणे जाणूनबुजून गुंतागुंतीची करून शेवटी कोर्टाकडे ढकलली जात आहेत. अशावेळी मूळ वारसदारांना वेठीस धरून, कमी किंमतीत जमीन “बनावट दस्तावेज” तयार करणाऱ्यांकडे वळवली जावी, असा एक डाव अधिकाऱ्यांच्या मदतीने रचला जात असल्याची चर्चा आहे. खरेदीखताचा फेरफार करण्यासाठी ३४ वर्षे थांबून अचानक दस्तावेज पुढे आणले जाणे हे प्रथमदर्शनीच संशयास्पद आहे. लोकशाहीत प्रशासनाची जबाबदारी सत्य, न्याय आणि पारदर्शकता राखण्याची असते. मात्र इथे प्रशासनच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसते. जमीन ही फक्त एक तुकडा माती नसते, तर ती शेतकऱ्याचे आयुष्य, वारसांचा हक्क, आणि अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्या जमिनीवर अन्यायाने ताबा मिळवण्याचे डावपेच हे समाजाच्या पायाभूत रचनेला खिळ घालणारे आहेत. अधिकारीच म्हणतात, यात खरेदीखत होण्याची दाट शक्यता, सावेडीतील खरेदीदस्तात इतक्या गंभीर त्रुटी, दस्तऐवजांचा अभाव आणि कायदेशीर प्रक्रियेतील उघड चुका असतानाही संबंधित महसूल अधिकारी मात्र “यात खरेदीखत होण्याची दाट शक्यता आहे” असे सांगत आहेत. प्रशासनाकडूनच अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याने प्रकरण आणखीच गुंतागुंतीचे झाले असून, यामागे संशयास्पद हेतू असल्याची चर्चा जनतेत रंगू लागली आहे. सरकारच्या महसूल खात्याने या प्रकरणाचा तातडीने फेरआढावा घ्यावा. दोषींवर कारवाई करावी आणि जमीनबळकावणीच्या प्रयत्नांना आळा घालावा. अन्यथा सावेडीतील हे प्रकरण हे फक्त एक उदाहरण ठरून महाराष्ट्रात अशा असंख्य वारसदारांना वेठीस धरले जाईल. हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्या कडे आहे. त्यामुळे मूळ मालकाला न्याय मिलेसे अशी अपेक्षा आहे.

“गंभीर चुका असूनही खरेदीखताची दाट शक्यता : अधिकाऱ्यांचे मत” Read More »