DNA मराठी

ताज्या बातम्या

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता. परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले. तत्काळ योजना आणि पडताळणी तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. पोलिसांचा पडताळणी अहवाल विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. पासपोर्टविषयी पुढील कारवाई घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस Read More »

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही. पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. १० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही Read More »

img 20251009 wa0004

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता

Manoj Jarang : गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नगर जिल्ह्यात मागच्या 2024 वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी 11 गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत. त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलिसांद्वारे सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प व श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर कोतवाली, शेवगाव व श्रीरामपूर पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, मागे घेण्यास पात्र 11 गुन्हे वगळता अन्य गुन्हेही मागे घेण्याबाबत समितीद्वारे तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने तसा निर्णय घेतला व हैदराबाद गॅझेटीयरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुंबई उपोषणाच्या सांगतेच्यावेळी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्रिस्तरीय समिती स्थापन करून दाखल गुन्ह्यांची तपासणी करण्यात आली व या तपासणीनंतर 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरवले गेले आहे. 2024 मध्ये दाखल या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे. भारतीय दंड विधान कलम 341, 143, 188 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) 135, 37 (1) (3) 135 व 37 (1) (3) आदी कलमांन्वये हे गुन्हे दाखल होते. मागे घेण्यास पात्र ठरलेल्या 11 गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे (क्रमांक 85-2024), कोपरगाव शहर पोलिस ठाणे (84-2024), कोपरगाव तालुका पोलिस ठाणे (52-2024), भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (171-2024) व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (172-2024), कोतवाली पोलिस ठाणे (213-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (171-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (172-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (215-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (216-2024) व शेवगाव पोलिस ठाणे (155-2024) या गुन्ह्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने केली चर्चा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याच्या वेळी सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दिलेल्या शब्दाप्रमाणे आंदोलनादरम्यान मराठा समाजातील बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील सर्व मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी त्रिसदस्य समिती गठीत करून गुन्हे माघारी घेण्याची प्रक्रिया केली आहे व त्यानुसार जिल्ह्यातील साधारण 11 पोलिस ठाण्यांतील गुन्हे तपासून माघारीची प्रक्रिया सुरू आहे व बाकीच्या राहिलेले गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती दिली. या कार्यवाहीबद्दल सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली. या शिष्टमंडळात अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड गजेंद्र दांगट, अ‍ॅड हरीश भामरे यांच्यासह मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे, अभय शेडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप, प्रमोद कोरडे, सिद्धांत पानसरे, भारत भोसले, रमेश मुंगसे, सागर भोसले, जगन्नाथ निमसे, सोमनाथ गुंड, राम सातपुते आदी उपस्थित होते.

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता Read More »

saif ali khan

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो…

Saif Ali Khan : बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान नेहमी सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेत असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये सर्वांना धक्का देणारा विधान केला आहे ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने त्याची प्रेयसी आणि पत्नीसोबत काम करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. कोणासोबत काम करणे ही सर्वात मोठी चूक आहे? एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफने 90 च्या दशकातील त्याच्या चित्रपटांवर आणि 2000 नंतर आलेल्या बदलांवर चर्चा केली. त्याने असेही म्हटले की त्याची पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच चांगली कल्पना नसते. 90 च्या दशकातील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात आठवून सैफ म्हणाला की लोक त्याला इतक्या संधी मिळाल्याबद्दल भाग्यवान मानत होते. तथापि, त्याने असेही स्पष्ट केले की त्यावेळी त्याला इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम चित्रपट मिळत नव्हते आणि त्याला क्वचितच मुख्य भूमिकांमध्ये कास्ट केले जात असे. पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे ही चांगली कल्पना का नाही असे विचारले असता, सैफ म्हणाला की कालांतराने त्याला जाणवले की तो त्याच्या सहकलाकारांसोबत निरोगी स्पर्धेत चांगले काम करतो. म्हणूनच त्याला वाटते की पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच फायदेशीर नसते. सैफचा धक्कादायक खुलासा सैफने याबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की जर त्याला आणि करीनाला चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्यांना घरातील कामांमध्ये बदल करावे लागतील. तो पुढे म्हणाला की तो अशा दिग्दर्शकाचा शोध घेईल जो त्यांना फक्त पती-पत्नी म्हणून नव्हे तर ते अभिनेते आहेत म्हणून कास्ट करेल.

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो… Read More »

upi

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट

UPI New Rules: देशात आता ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन नियम लागू केले आहे. ज्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे. NPCI ने सांगितले की ही नवीन नियम वापरकर्त्यांना पेमेंट करताना अधिक पर्याय आणि सुरक्षितता प्रदान करतात, ज्यामुळे डिजिटल पेमेंटचा अवलंब करणे अधिक सुलभ होते. नवीन बायोमेट्रिक प्रमाणीकरण फीचर हे नवीन फीचर Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी UPI अॅप्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या पारंपारिक UPI पिनऐवजी ऑन-डिव्हाइस बायोमेट्रिक तंत्रज्ञान, जसे की फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन, वापरण्याची परवानगी देते. सध्या, हे फीचर 5,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. NPCI ने सांगितले की वापरकर्त्यांच्या अभिप्राय आणि कामगिरीच्या आधारे भविष्यात ही मर्यादा वाढवली किंवा समायोजित केली जाऊ शकते. हे वैशिष्ट्य पर्यायी आहे, म्हणजे वापरकर्ते त्यांचा जुना UPI पिन किंवा इतर पारंपारिक पेमेंट पर्याय वापरणे सुरू ठेवू शकतात. सुरक्षा आणि तांत्रिक आवश्यकता जेलब्रोकन किंवा रूटेड डिव्हाइसेसवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण उपलब्ध होणार नाही. UPI अॅप्स आणि PSP बँकांनी ग्राहकाची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्षम करावे आणि ते कधीही अक्षम करण्याचा पर्याय प्रदान करावा. कोणत्याही नवीन डिव्हाइसवर व्यवहार करण्यापूर्वी नवीन ग्राहकांची संमती आवश्यक असेल. बँका आणि अॅप्ससाठी सूचना पात्रता तपासणी: बायोमेट्रिक्स सक्षम करण्यापूर्वी ग्राहक पात्रता आणि प्रमाणीकरण क्रेडेन्शियल्सची पुष्टी करणे आवश्यक आहे. ग्राहक संवाद: बायोमेट्रिक सक्षमीकरण आणि व्यवहार प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना अचूक माहिती आणि सूचना प्रदान केल्या पाहिजेत. पिन बदल: जर ग्राहकाने त्यांचा UPI पिन बदलला किंवा रीसेट केला, तर बँकेने सर्व अॅप्समध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरण अक्षम केले पाहिजे. ग्राहक नवीन संमती देत ​​नाही तोपर्यंत व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. निष्क्रियीकरण नियम: जर 90 दिवसांपर्यंत बायोमेट्रिक पद्धत वापरली गेली नाही, तर अॅप्स आणि बँका ती निष्क्रिय करतील. ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ग्राहक पुष्टीकरण आवश्यक असेल. वापरकर्त्यांना फायदे या नवीन उपक्रमामुळे UPI पेमेंट अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होतील. बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरकर्त्यांना पिन प्रविष्ट न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल, ज्यामुळे डिजिटल व्यवहाराचा अनुभव अखंड होईल. भविष्यात मोठ्या व्यवहारांमध्ये हे वैशिष्ट्य विस्तारित करण्याचे NPCI चे उद्दिष्ट आहे.

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट Read More »

himachal pradesh accident

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता भागात एका प्रवासी बसला भूस्खलनाचा धक्का बसला. बसवर डोंगराचा ढिगार कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनएरएफ) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनीही अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि बचाव कार्य जलदगतीने सुरू करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अपघाताच्या तीव्रतेबद्दल दुःख व्यक्त केले आणि बचाव पथकांच्या परिश्रमाचे कौतुक केले.

Himachal Pradesh Accident : भीषण अपघात, बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला; 18 जणांचा मृत्यू Read More »

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

india vs australia

India vs Australia 2025 : मोठी बातमी, भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; कुणाला मिळाली संधी?

India vs Australia 2025 : भारताविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या व्हाईट बॉल मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. एकदिवसीय संघात प्रमुख पुनरागमन मिशेल स्टार्क, मॅथ्यू शॉर्ट आणि मिशेल ओवेन एकदिवसीय संघात पुनरागमन केले. शॉर्टला यापूर्वी साईड स्ट्रेनमुळे वगळण्यात आले होते, तर ओवेन दक्षिण आफ्रिकेतील टी20 मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर संघात परतला आहे. संघात डावखुरा फलंदाज मॅथ्यू रेनशॉ देखील आहे, ज्याला देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर दोन वर्षांत प्रथमच एकदिवसीय संघात परत बोलावण्यात आले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी शेफील्ड शिल्डच्या दुसऱ्या फेरीत सहभागी झाल्यामुळे पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी जोश इंग्लिस विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार. तर दुसरीकडे जोश इंग्लिस आणि नॅथन एलिस टी20 संघात परतले आहेत. इंग्लिस पायाच्या दुखापतीतून बरा झाला आहे, तर एलिस त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर संघात परतला आहे. न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान झालेल्या मनगटाच्या फ्रॅक्चरमुळे ग्लेन मॅक्सवेल अनुपलब्ध आहे. ऑस्ट्रेलियाचे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले की, संघ निवडीत टी20 विश्वचषक तयारी आणि स्थानिक रेड-बॉल हंगामाचे संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बेली म्हणाले, आम्ही पहिल्या दोन एकदिवसीय आणि टी20 साठी संघ जाहीर केला आहे. शेफील्ड शिल्ड क्रिकेटद्वारे उन्हाळ्याची तयारी करताना मालिकेच्या शेवटी काही खेळाडूंचे व्यवस्थापन आवश्यक असेल. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि टी-20 संघ एकदिवसीय संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अ‍ॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा. टी-20 संघ (पहिले दोन सामने): मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.

India vs Australia 2025 : मोठी बातमी, भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर; कुणाला मिळाली संधी? Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »

coldrif syrup death case

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा

Coldrif Syrup Death Case: मध्यप्रदेशात रासायनिक अयोग्यता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून बनवलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 16 मुलांचा मृत्यू झाला असल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर, तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाने 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी श्रीसन फार्मास्युटिकल्स कारखान्यावर छापा टाकला. तपासणीत निकृष्ट दर्जाची परिस्थिती आणि बेकायदेशीर पद्धती आढळून आल्या. निरीक्षकांना प्लास्टिक पाईप्समधून गळणारे रासायनिक अवशेष, गंजलेली यंत्रसामग्री आणि संरक्षक उपकरणे नसलेले कामगार औद्योगिक रसायने हाताने मिसळत असल्याचे आढळले. कारखान्यात प्रशिक्षित केमिस्ट नव्हते आणि उत्पादनादरम्यान कोणतीही गुणवत्ता चाचणी घेण्यात आली नाही. औद्योगिक रसायनांपासून बनवलेले कोल्ड्रिफ कफ सिरप सूत्रांनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रोपीलीन ग्लायकॉलसारखी औद्योगिक रसायने स्थानिक वितरकांकडून रोख रकमेत किंवा गुगल पे द्वारे खरेदी केली गेली. कागदपत्रे टाळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. तपासणी अहवालात असेही उघड झाले की कारखान्याने औद्योगिक दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल वापरले होते, ज्याची डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल सारख्या संभाव्य हानिकारक दूषित घटकांसाठी चाचणी केली गेली नव्हती. प्रिंटिंग इंक, अॅडेसिव्ह, ब्रेक फ्लुइड आणि ल्युब्रिकंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या डायथिलीन ग्लायकॉलमुळे मुलांच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान झाले. तपासणीत असे आढळून आले की SR-13 बॅचमध्ये 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकॉल होते, जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट जास्त आहे. तपासणीत असे आढळून आले की: कोणतीही औषधोपचार यंत्रणा नव्हती, म्हणजेच कोणीही दुष्परिणामांचे निरीक्षण केले नाही किंवा रिकॉल केले नाही. उत्पादनादरम्यान कोणतेही प्रशिक्षित केमिस्ट उपस्थित नव्हते. गुणवत्ता चाचणीशिवाय कच्चा माल वापरण्यात आला. अज्ञात स्त्रोतांकडून पाणी मिळवण्यात आले आणि शुद्धतेसाठी चाचणी केली गेली नाही. कारखान्यात एअर हँडलिंग युनिट्स, HEPA फिल्टर्स, वेंटिलेशन, कीटक नियंत्रण किंवा सुरक्षा नोंदींचा अभाव होता. तपासणीत 39 गंभीर आणि 325 प्रमुख उल्लंघने उघड झाली, ज्यात कीटकांचा प्रादुर्भाव, उघडे गटार, तुटलेली उपकरणे आणि एअर फिल्टरचा अभाव यांचा समावेश आहे. SR-13 बॅचचा विनाशकारी परिणाम मे 2025 मध्ये उत्पादित आणि एप्रिल 2027 पर्यंत वैध असलेली SR-13 बॅच अनेक महिने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बाजारात मुक्तपणे फिरत होती. या बॅचचे सेवन केल्यानंतर चिंदवाडा येथील अनेक मुलांना तीव्र मूत्रपिंड निकामी झाले. सोळा मुलांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक पाच वर्षांखालील होते. रेस्पोलाइट डी, जीएल, एसटी आणि हेप्सँडिन सारख्या इतर सिरपची चाचणी घेण्यात आली आणि ते सामान्य दर्जाचे असल्याचे आढळले. देखरेख आणि जबाबदारीचा अभाव तपासात असे दिसून आले की हा अपघात केवळ निष्काळजीपणाचा परिणाम नव्हता तर एक पद्धतशीर बिघाड होता. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीने स्रेसन फार्मास्युटिकल्सची उत्पादन प्रक्रिया थांबवली आणि सर्व साठा गोठवला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि तिचा परवाना निलंबित करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने दोन औषध निरीक्षक आणि एका उपसंचालकांना निलंबित केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली केली, तर चिंदवाडा येथील एका डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा Read More »