DNA मराठी

ताज्या बातम्या

manoj jarange

Manoj Jarange : राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

Manoj Jarange : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांना पुरेसा निधी दिला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकार या संस्थांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा येथील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीवरून झालेल्या वादात एका महिलेला कथितरित्या निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काही आरोपींना अटक झाल्याची माहिती असली तरी संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. रंजना नागापुरकर प्रकरणावर बोलताना, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांच्या तसेच संबंधित सहकाऱ्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे समितीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे सांगत त्यांनी विखे पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे नमूद केले. मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेतले नसल्याबद्दलही त्यांनी सरकारला जाब विचारला. 26 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर कोणाचेही ऐकणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange : राज्य सरकारला 26 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम; मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार? Read More »

Pratap Sarnaik: आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली. ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ मिडी बसेस – विकासाची नवी वाट राज्य परिवहन महामंडळ ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करीत असून या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल ९३% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसना तिथे प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.आता मात्र ही पायपीट थांबणार आहे. पायवाटांवरून चाकवाटांकडे… ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ बस म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे. मंत्री सरनाईक यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, “दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.” विकासाचा नवा संकल्प ‘ लालपरी ’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल. असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Pratap Sarnaik: आता… ‘ गाव तिथे एसटी ’ नव्हे… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »

crime

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Ahilyanagar Crime : एका 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारिरिक संबंध ठेवुन तिला गर्भवती केल्या प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखे पोउपनि/दिपक मेढे पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सुनिल मालणकर, योगेशे कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीस शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते. पथकाने गुन्ह्यातील आरोपीला आण्णाभाऊ साठे चौक, लाल टाकी येथून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहेत.

Ahilyanagar Crime: नगर शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक Read More »

bhiwandi municipal corporation

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महापौर निवडणूक, बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई होणार; रवींद्र चव्हाणांची घोषणा

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणाऱ्या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली. भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, महापौरपदासाठी भिवंडीच्या स्थानिक समितीकडून बहुमताने नारायण चौधरी यांचे नाव पाठविण्यात आले होते. त्यानुसार पक्षाकडून चौधरी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र बऱ्याच चर्चेअंती अखेर स्थानिक पातळीवर कुठल्याही स्वरुपाचे वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेश स्तरावर स्नेहा पाटील यांना पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. चौधरी यांचे कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यासोबतचे स्थानिक पातळीवरचे मतभेद लक्षात घेता वाद टाळण्यासाठी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय प्रदेश स्तरावर पक्षहितासाठी घेण्यात आला. त्यानंतरही नाराज असलेल्या चौधरी आणि त्यांच्या बरोबरच्या नगरसेवकांनी बंडखोरी करू नये यासाठी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आले नाही असे चव्हाण यांनी नमूद केले. तसेच बंडखोरी करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भिवंडी महापौर निवडणुकीत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना 46 मतं मिळाली आहे. तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली आहे.

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महापौर निवडणूक, बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई होणार; रवींद्र चव्हाणांची घोषणा Read More »

Vikhe Patil on Rohit Pawar: अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला अन्…, विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

Vikhe Patil on Rohit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर आता त्यांचा अपघात की घातपात यावरून रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संशय व्यक्त केला आहे. यावरती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजितदादा ज्यावेळेस हयात होते तेव्हा रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्याच्या जनतेला माहित आहे. तुम्ही दादांना कधीच सन्मान मिळवून दिला नाही तसेच त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देखील तुम्हीच नाकारली याचं प्रथमता उत्तर द्या अशा शब्दात विखे पाटलांनी शरद पवारांवर देखील टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी बारामती येथील विमानतळावरती विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर अनेक दिवस उलटले असतानाही तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच दादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असा संशय देखील पवारांनी व्यक्त केला. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवीच आहे याचं आम्हालाही दुःख आहे. घटनेची सत्यता जाणून घेण्याचं अधिकार कुटुंबीयांसह राज्यातील जनतेला आहे. त्या पद्धतीने तपास कार्य सुरू आहे. मात्र रोहित पवार सातत्याने माध्यमं समोर येऊन वेगवेगळी माहिती देत आहेत सर्व प्रकरण चौकशी मध्ये असल्याने याची योग्य ती चौकशी होईल. तसेच यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, अजित पवार हे हयात असताना रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यांना कधीच सन्मान जनक वागणूक ही त्यांच्याकडून देण्यात आली नाही. काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीला जास्त जागा मिळून देखील मुख्यमंत्री होण्याची संधी कोणी नाकारली याचे उत्तर प्रथमता त्यांनी द्यावी अशा शब्दात मंत्री विखे यांनी शरद पवार यांच्या नाम उल्लेख टाळत त्यांच्यावरती देखील जोरदार निशाणा साधला. अजित पवारांच्या निधनानंतर वीस दिवस उलटले असताना देखील तपास कार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आमदार रोहित पवार यांनी दोन वेळेस पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडले व अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय देखील त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला तसेच तपास यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला. याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर ती देखील या घटनेवरून जोरदार निशाणा साधला यामुळे रोहित पवारांनी केलेले आरोप तथ्य आहे की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Vikhe Patil on Rohit Pawar: अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला अन्…, विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल Read More »

crime

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका…

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे एक धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल पाच दिवस जंगलात तिला ठेवत तिच्यावरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरीत घडली आहे. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्या आक्रमक झाले असून गाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. यामुळे राहुरीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. कॉलेजला जात असल्याचे सांगून मुलगी घराबाहेर पडली होती मात्र ती परतलीच नाही. या मुलीचे अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात ठेवून तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्थानकात जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित मुलीच्या मोबाईलचे लोकेशन व तांत्रिक साह्याने पोलिसांनी तपास यंत्रणा वेगाने हलवली. पोलीस पथकाने तातडीने पावले उचलत या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती अशी की घटनेतील आरोपीने नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला जवळील परिसरात मुलीला अपहरण करून घेऊन गेला होता. यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली आणि तीन जणांना अटक केली आहे.

Ahilyanagar Crime : राहुरीत अपहरण, पाच दिवस अत्याचार अन् जंगलातून सुटका… Read More »

Supreme Court : नोकरी द्या, दान नको; मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सल्ला

Supreme Court : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मोफत योजनांवर राज्यांना कडक शब्दांत फटकारले आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, करदात्यांसह या योजनांचा खर्च कोण उचलेल. अन्न आणि वीज नंतर आता थेट रोख हस्तांतरण लागू केले जात आहे. न्यायालयाने असेही म्हटले की, सरकारने रोजगारावर लक्ष केंद्रित करावे. विकासावर कमी खर्च केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू वीज वितरण महामंडळ विरुद्ध भारत सरकार या खटल्याची सुनावणी सुरू होती. ग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सर्वांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल न्यायालयाने महामंडळाला फटकारले. सरन्यायाधीशांनी कर्ज असूनही मोफत योजना देणाऱ्या राज्यांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी विचारले, “जर करदाते नसतील तर या योजनांसाठी कोण पैसे देईल?” सर्वोच्च न्यायालयाने रोख आणि मोफत योजनेच्या आर्थिक विवेकबुद्धीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की राज्यांनी मोफत योजना देण्याऐवजी रोजगार निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे. सरन्यायाधीशांनी इशारा दिला की, विकासावर कमी खर्च केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे नमूद केले की, अनेक राज्ये महसुलात तोटा सहन करत आहेत, तरीही ते अजूनही कल्याणकारी योजनांचा विस्तार करत आहेत. न्यायालयाचे मत आहे की, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि “मोफत” चा भार इतका वाढला आहे की, ते विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विचारले की एका वर्षात गोळा होणाऱ्या महसुलापैकी 25 टक्के… विकासात का गुंतवता येत नाही?

Supreme Court : नोकरी द्या, दान नको; मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सल्ला Read More »

mukesh ambani

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, रिलायन्स 7 वर्षांत करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक

Mukesh Ambani : नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप सादर केला, ज्यामध्ये जिओला भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) क्रांतीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ पुढील सात वर्षांत संयुक्तपणे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ही गुंतवणूक एआय पायाभूत सुविधा, डेटा सेंटर आणि स्वदेशी एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी खर्च केली जाईल. ही गुंतवणूक भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या संपूर्ण लँडस्केपमध्ये बदल घडवून आणेल. ही एक सट्टेबाजीची गुंतवणूक नाही, तर राष्ट्र उभारणीसाठी शिस्तबद्ध भांडवल आहे, ज्यामुळे दशकांपर्यंत चिरस्थायी आर्थिक मूल्य आणि धोरणात्मक ताकद निर्माण होईल. एआयचा सर्वोत्तम टप्पा अजून येणे बाकी शिखर परिषदेतील भाषणादरम्यान, अंबानींनी एआयच्या भविष्यावर भर देत म्हटले की एआयचा सर्वोत्तम टप्पा अजून येणे बाकी आहे. हे तंत्रज्ञान भारतासाठी प्रचंड समृद्धी आणि संधींच्या नवीन युगाची सुरुवात करू शकते. एआय काही लोकांच्या हातात सत्ता केंद्रित करेल की सर्वांसाठी संधी निर्माण करेल याबद्दल सुरू असलेल्या जागतिक चर्चेचा त्यांनी संदर्भ दिला. मुकेश अंबानी यांनी भारताला 21 व्या शतकातील एआय सुपरपॉवर बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि त्याला रिलायन्सचा आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि धाडसी प्रयत्न म्हटले. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत एआयमुळे नोकऱ्या जाण्याच्या भीतीबाबत अंबानी म्हणाले की एआय नोकऱ्या काढून टाकणार नाही, तर त्याऐवजी उच्च-कुशल रोजगारासाठी नवीन संधी निर्माण करेल. एआय भारतातील तरुण प्रतिभेला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुकेश अंबानी म्हणाले की एआयच्या बाबतीत जग एका चौरस्त्यावर आहे. एक मार्ग महागड्या आणि डेटा-चालित एआयकडे घेऊन जातो, तर दुसरा रिलायन्सचा परवडणाऱ्या आणि सुलभ एआयचा दृष्टिकोन आहे जो प्रत्येक भारतीयाला सक्षम करतो. त्यांनी स्पष्ट केले की रिलायन्सचे ध्येय भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एआय सुलभ करणे आहे, केवळ श्रीमंतांसाठी तंत्रज्ञान नाही. ज्याप्रमाणे कंपनीने मोबाइल डेटाची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली, त्याचप्रमाणे आता एआय इन्फरन्सिंगचा खर्च देखील कमी करेल. अंबानी यांनी यावर भर दिला की भारत एआय भाड्याने घेऊ शकत नाही. त्यांचे ध्येय कनेक्टिव्हिटीइतकेच सर्वव्यापी आणि परवडणारे बनवणे आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, रिलायन्स 7 वर्षांत करणार 10 लाख कोटींची गुंतवणूक Read More »

phonepe

PhonePe : पिनची आवश्यकता नाही! फक्त फिंगरप्रिंट अन् फेस आयडीने करता येणार PhonePe वर पेमेंट

PhonePe : लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेने अलीकडेच भारतातील युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. युजर्स आता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरून त्यांचे यूपीआय पेमेंट करू शकतात. त्यामुळे आता लहान व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी यूपीआय पिन टाकण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरा आणि पेमेंट त्वरित प्रक्रिया केली जाईल. हा बदल डिजिटल पेमेंटला आणखी जलद, सुरक्षित आणि अधिक वापरकर्ता-अनुकूल बनवतो. बायोमेट्रिक पेमेंट कसे करावे या नवीन फोनपे फीचरसह, वापरकर्ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी त्यांचे बँक खाते अँपशी लिंक करू शकतात. सुरुवातीला, तुम्हाला एकदाच यूपीआय पिन आणि बायोमेट्रिक्स दोन्ही सेट करावे लागतील. त्यानंतर, 5000 पर्यंतच्या पेमेंटसाठी पिनऐवजी फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरता येईल. ही प्रक्रिया केवळ जलदच नाही तर सुरक्षित देखील आहे, कारण डिव्हाइस-स्तरीय बायोमेट्रिक सुरक्षा तुमचे खाते सुरक्षित ठेवते. कसे सेट करायचे? फोनपे वर बायोमेट्रिक पेमेंट सेट करणे खूप सोपे आहे. प्रथम, अँप उघडा, प्रोफाइलवर जा आणि पेमेंट्स व्यवस्थापित करा पर्याय निवडा. त्यानंतर, बायोमेट्रिक पे वर टॅप करा आणि तुमच्या बँक खात्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सक्षम करा. सुरुवातीला, तुम्हाला पिन आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण दोन्ही वापरावे लागतील, परंतु त्यानंतर, लहान व्यवहारांसाठी फक्त बायोमेट्रिक प्रमाणीकरण पुरेसे असेल. आता, युजर्स गर्दीच्या किंवा घाईच्या परिस्थितीतही सहजपणे पेमेंट करू शकतात. शिवाय, हा बदल आरबीआय आणि एनपीसीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आला आहे, जे अधिकृतपणे यूपीआय प्लॅटफॉर्मवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण ओळखतात. हे केवळ पेमेंटला गती देत नाही तर सुरक्षा आणि वापरकर्ता अनुभव देखील सुधारते. हे फीचर सुरुवातीला अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे, तर ते टप्प्याटप्प्याने iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जाईल. भविष्यात, हे फिचर्स इतर यूपीआय-आधारित अँपमध्ये देखील उपलब्ध असू शकते.

PhonePe : पिनची आवश्यकता नाही! फक्त फिंगरप्रिंट अन् फेस आयडीने करता येणार PhonePe वर पेमेंट Read More »

img 20260219 wa0008

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक

Ahilyanagar Police : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत गांजाची वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 132 किलो गांजा असा एकूण 25 लाख 43 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत गणेश अंकुश कराड (वय 32), सुखदेव शिवनाथ कदम (वय -30, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), यांच्या विरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नोडल अधिकारी तथा पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांना रवाना केले. सदर पथक हे मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम. एच. 14 जी. एच.2330 ही मधुन दोन इसम अंमली पदार्थ गांजा विक्रीकरीता कर्जत येथुन पाथर्डीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी कबाडी यांना कळविले असता त्यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ मिरजगाव पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/विजय झंजाड यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/विजय झंजाड यांचेसह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी वाहनाने निघाले. मिरजगाव ते कर्जत जाणारे रोडवरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे जावुन सापळा रचुन थांबले असतांना बातमीतील नमुद स्कॉर्पीओ गाडी येतांना दिसली तेव्हा बातमीतील हकिगतीप्रमाणे खात्री झाल्याने पथकाने स्कॉर्पीओ गाडी थांबवुन गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन इसम बसलेले दिसुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे 1) गणेश अंकुश कराड वय – 32 वर्षे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर, 2) सुखदेव शिवनाथ कदम वय -30 वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि/ विजय झंजाड यांनी बातमीची हकिगत सांगुन त्यांचे व स्कॉर्पीओ गाडीची झडती घेतली असता गाडीचे डिक्कीमध्ये 04 गोण्या मिळुन आले. नमुद इसमांना गोण्या बाबत विचारपुस करता त्याने त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे सांगितले आहे. ताब्यातील आरोपीतांचे ताब्यातुन 18,18,000/-रु कि.चा 132.84 किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, 25,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 7,00,000/-रु कि.चा एक स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असा एकुण 25,43,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/800 भाऊसाहेब राजु काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिरजगाव पोलीस स्टेशन गु. र. नं. 60/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20(ब)ii(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahilyanagar Police: मिरजगावात 132 किलो गांजा पकडला; 2 जणांना अटक Read More »