DNA मराठी

ताज्या बातम्या

ram khade

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांच्यावर नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर मधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र आता देखील त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.

Ram Khade News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेते राम खाडे जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक Read More »

maharashtra government

Chandrashekhar Bavankule: मोठी बातमी, राज्यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट होणार रद्द

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता राज्यात सुरू असणाऱ्या अवैध वाहतुकीस आळा बसण्याची शक्यता आहे. राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. याबाबत महसूल विभागाने परिपत्रक देखील जारी केले आहे. राज्यात सुरू असणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे राज्य सरकारला महसूलमध्ये मोठा नुकसान होत आहे. त्याच बरोबर पर्यावरणाची मोठी हानी देखील होत असल्याने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट रद्द करण्याचा निर्णय महसूल विभागाकडून देण्यात आले आहे. तीन टप्प्यांत होणार कारवाई महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात तीन टप्प्यात कारवाई करण्यात येणार आहे. अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 अंतर्गत कारवाई होणार आहे. पहिला गुन्हा : 30 दिवसांसाठी परवाना (परमिट) निलंबित करणे आणि वाहन अटकावून ठेवणे. दुसरा गुन्हा : 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करणे आणि वाहन अटकावून ठेवणे. तिसरा गुन्हा : संबंधित वाहनाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत पुढील कारवाईसाठी वाहन जप्त करणे. या वाहनांवर करडी नजर असणार अवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे ड्रील मशीन, जेसीबी व पोकलैंड, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कॉम्प्रेसर, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज्ड बोट, एक्सकॅवेटर, मॅकेनाईज्ड लोडर यासारख्या सर्व प्रकारच्या वाहनांवर व साहित्यावरही कारवाई लागू असणार आहे.

Chandrashekhar Bavankule: मोठी बातमी, राज्यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट होणार रद्द Read More »

pune crime

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल

Pune News : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्हांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात देखील महिलांवर अत्याचारासारखे घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे आता पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेने पुरुषावर गुंगी आणणारे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार केल्या असल्याची घटना घडली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील 47 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणाची ओळख तुळजापूर येथे देवदर्शनादरम्यान आरोपी महिलेशी झाली. सुरुवातीला ‘भाऊ’ म्हणून तिने पीडित तरुणाच्या कुटुंबाशीही जवळीक वाढवली. पुढे वारंवार संपर्क साधत ती त्यांच्या घरात येऊन राहू लागली. घरात राहत असताना त्या महिलेकडून पीडिताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यास विरोध केल्यानंतर पीडिताने तिला घर सोडण्यास सांगितले. नंतर माफी मागत ती महिलेला चंदगडसाठी निघाली मात्र बसस्थानकात आल्यानंतर सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला म्हणाली की मला वॉशरुमला जायचे आहे. तसेच मी उघड्यावर जात नाही म्हणत ती एका लॉजवर गेली आणि तरुणालाही आत बोलावून स्वतःला उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगत तुम्हाला मदत करेन तुमच्या मुलाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या ओळखीने नोकरीला लावले असे सांगत त्याच्यावर मानसिक दबाव टाकला मात्र तो रागाने निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा तिने पीडिताच्या पत्नीला फोन करून त्याला ‘काशी दर्शनासाठी भाऊ म्हणून’ सोबत घेऊन जाते असे सांगून त्याला 25 फेब्रुवारी रोजी पुण्यात बोलावले. तक्रारीनुसार, कोथरूडमधील तिच्या घरी तरुणाला काहीतरी प्यायला दिले त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. विरोध केल्यावर धमकी देण्यात आली मी म्हणेल तसेच करायचे नाहीतर इथेच काहीतरी करेन असे तक्रारीत म्हटले आहे. पुढे मला काशीला नेले त्यांनतर काशीत तीन दिवस बळजबरीने ठेवत शरीरसंबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडिताने केला आहे. पत्नीशी संपर्क झाल्यानंतर तिने या महिलेला फोनवर सुनावले, त्यानंतर काही दिवस फोन आला नाही मात्र त्यानंतर आरोपी महिलेकडून दोन लाख रुपयांची मागणी व फोटो व्हायरल करण्याची धमकी आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे कोथरूड परिसरात आणि शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Pune News: भाऊ म्हणून घरात प्रवेश दिलं अन् तरुणावर अत्याचार; पुण्यात महिलेवर गुन्हा दाखल Read More »

imran khan

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या, असीम मुनीर जबाबदार?

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात असताना हत्या करण्यात आली असल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं देखील इमरान खान यांच्या हत्येच्या बाबतीत मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या केली असल्याचा दावा बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत पाकिस्तान सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगाच्या बाहेर या बातमीनंतर PTI समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर अशी देखील पोस्ट व्हायरल होतीय की, इमरान खान यांची बहीण आणि त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना मारहाण झाल्याचा दावा देखील या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अफगाण टाइम्सने दिलेल्या बातमीच्या आधारे बलुचिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने इमरान खान यांची हत्या गुप्तचर संस्था आणि असीम मुनीर यांनी केली असल्याचा दावा केला आहे. अफगाण टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत रावळपिंडीच्या आदियाला जेलमधून बाहेर काढला असल्याचं सांगण्यात आला आहे.

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या, असीम मुनीर जबाबदार? Read More »

hemant patil

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप

Hemant Patil on Ashok Chavan : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील अनेक पक्ष या निवडणुकीत स्वयंबळावर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी म्हणेल तसेच जिल्ह्याने चालावे, या भूमिकेमुळेच चव्हाण यांनी युती तोडली, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी 60-20 टक्के जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे जिल्ह्यातील तीनही आमदार यांनी दोन वेळा चव्हाण यांची भेट घेतली, पण त्यांनी जागा देण्यास नकार दिला. पैशाच्या जोरावर कार्यकर्ते आणि पक्ष संपवण्याचा प्रयोग नांदेडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोपही हेमंत पाटील यांनी केला आहे. मोठ्या निवडणुकांसाठी युती करायची आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत युती तोडायची, ही पद्धत चुकीची असल्याचे मत त्यांनी मांडले. तर दुसरीकडे राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Hemant Patil on Ashok Chavan : भाजप सेनेची युती तुटण्यास अशोक चव्हाण कारणीभूत; हेमंत पाटलांचा गंभीर आरोप Read More »

election

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा

BMC Election: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. मतदार याद्यांतील घोळ आणि प्रभागाच्या तोडफोडीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक झालेत. मतदार यादीतील सगळ्या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाही तोवर निवडणूक घेऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. एका मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार आहेत. ज्या मतदारांची नावं तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेलीत. आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत. मतदारयादीत त्रुटी असल्याचं मान्य केलंय. मतदारयाद्यांत 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय. मतदारयादीत जी नाव दुबार आहेत अशी नाव हटवण्यासाठी महानगरपालिकेने निवडणूक आयोगाने वेळ मागितला असल्याची देखील माहिती आहे. त्याचप्रमाणे मतदारयादीत एकाच व्यक्तीच नाव हे एक-दोन नव्हे तर तर 103 वेळेस असल्याचं देखील महानगरपालिकेने सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला दावा खरा ठरलाय. याबाबत त्यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं होतं. 4 लाख 33 मतदाराची नाव दुबार नोंदवली गेल्यानं हि संख्या 11 लाखांवर गेली. नोंदवल्या गेलेल्या बनावट मतदाराची इत्यंभूत माहिती नसल्यानं प्रशासन यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत हि मोहीम चारणारे असून निवडणूक वार्डांच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही मोहीम राबवणार आहेत.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा Read More »

gautam gambhir

Gautam Gambhir : गौतम गंभीरने दिला मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर पत्र व्हायरल! जाणून घ्या सत्य

Gautam Gambhir : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाला आहे. ज्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. या व्हायरल पात्रता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे का? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील व्हायरल पोस्टनुसार, त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. गौतम गंभीरचा फोटो असलेल्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “मी आज अधिकृतपणे प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत आहे. भविष्यात मला कोणत्याही पदावर क्रिकेटच्या जगात सहभागी व्हायचे नाही. खरे सांगायचे तर, सततच्या टीका आणि ट्रोलिंगला मी कंटाळलो आहे. मी माझे सर्वस्व या खेळासाठी दिले. पण माझ्या सभोवतालचे वातावरण, विशेषतः ऑनलाइन, स्पष्टपणे दर्शवते की माझा वेळ संपला आहे. मी डोके उंच ठेवून हे पद सोडत आहे. भविष्यासाठी भारतीय क्रिकेटला शुभेच्छा. तुम्ही असेच यशस्वी होत राहा. आठवणींसाठी धन्यवाद.” व्हायरल सोशल मीडिया पोस्टची तपासणी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरच्या राजीनाम्याबाबत व्हायरल पोस्ट अधिकृत ‘X’ हँडलवरून पोस्ट करण्यात आली नव्हती. गौतम गंभीरचा अधिकृत ‘X’ हँडल @GautamGambhir आहे, तर व्हायरल पोस्ट @imRavY_ वरून आहे. व्हायरल पोस्ट बनावट असल्याचे स्पष्ट आहे. व्हायरल पोस्टमध्ये (Gaotam Gambhir) नावाचे स्पेलिंग देखील चुकीचे आहे. व्हायरल पोस्टवर ब्लू टिक असले तरी, ‘X’ ने ते बनावट घोषित केले आहे. शिवाय, गौतम गंभीरच्या राजीनाम्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून किंवा कोणत्याही विश्वसनीय सूत्राकडून कोणतीही बातमी आलेली नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गौतम गंभीरच्या राजीनाम्याच्या दाव्याची वेळ देखील संशयास्पद आहे.

Gautam Gambhir : गौतम गंभीरने दिला मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर पत्र व्हायरल! जाणून घ्या सत्य Read More »

mallikarjun kharge

Mallikarjun Kharge : काँग्रेस घेणार मोठा निर्णय, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे होणार ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री?

Mallikarjun Kharge : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीत डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोणत्याही किंमतीत आपले पद सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी वारंवार सांगितले आहे की ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांचा एक गट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मागे एकत्र येत आहे आणि त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहे. खरगे हे कर्नाटकातील एक प्रमुख दलित व्यक्ती आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोक कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दलित व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अनेक पत्रे पोहोचली आहेत ज्यात खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटक काँग्रेसचे अधिकारी, माजी आमदार, पत्रकार, बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसह प्रभावशाली आवाजांनी खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन केले आहे. 22 नोव्हेंबर रोजी लिहिलेले पत्र 22 नोव्हेंबर रोजी लिहिलेले आणि दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या पत्रात म्हटले आहे की नेतृत्वात दलितांचे दशकांपासून असलेले कमी प्रतिनिधित्व दुरुस्त करण्याची ही एक ऐतिहासिक संधी आहे. 1956 मध्ये कर्नाटकच्या स्थापनेपासून दलित मुख्यमंत्री नसल्याबद्दल या पत्रात दुःख व्यक्त केले आहे. त्यात म्हटले आहे की या समुदायाची काँग्रेसशी दृढ निष्ठा आहे. नेत्यांनी सांगितले की खरगे हे मुख्यमंत्रीपदासाठी एक सक्षम नेते आहेत. त्यांचा प्रचंड अनुभव, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकातील लोकांशी असलेले सखोल संबंध त्यांना यावेळी राज्याचे मार्गदर्शन करण्यासाठी योग्य उमेदवार बनवतात. दोन नेत्यांमधील मुख्य लढाई मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य लढाई सध्या शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात आहे. शिवकुमार हे राज्यात काँग्रेसला सत्तेत आणण्याचे श्रेय दिले जाणारे एक प्रसिद्ध वोक्कालिगा नेते आहेत. नागा साधूंच्या एका गटाने शनिवारी शिवकुमार यांची त्यांच्या घरी भेट घेतली, त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची जागा घेण्याची विनंती केली. अडीच वर्षांचा फॉर्म्युला काय होता? कर्नाटक काँग्रेसमधील दीर्घकाळापासून चर्चेत असलेला “अडीच वर्षांचा फॉर्म्युला” पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिद्धरामय्या हे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री राहतील असे ठरले होते. आता, सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहू इच्छितात असे वृत्त आहे. या वादाबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कधीही असे म्हटले नव्हते की ते फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील. कार्यकाळात बदल होईल की नाही हे पूर्णपणे हायकमांडवर सोडले आहे. आम्ही स्वतः कोणतेही बदल करू शकत नाही. जर अशी परिस्थिती उद्भवली तर काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल.”

Mallikarjun Kharge : काँग्रेस घेणार मोठा निर्णय, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे होणार ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री? Read More »

img 20251125 wa0001

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

Bigg Boss Marathi : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो  बिग बॉस मराठीचा सहावा सीझन  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार आणि एंटरटेनमेंटचा बार पुन्हा उडणार. प्रत्येक वर्षीप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात हजारो प्रश्न घोळू लागले आहेत. यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही. तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. कलर्स मराठीकडून सादर करण्यात आलेल्या खास टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाच्या सीझनच्या थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला तो म्हणजे दरवाजा. या वेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत. यावेळेसचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे. या वर्षीच्या बिग बॉस मराठी सिझन 6 च्या टीझरमध्ये एकाच दाराऐवजी अनेक दरवाजे दिसतात, आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता क्षणात वाढते. खरं काहीच उघड न करता टीझर प्रेक्षकांना थेट गुंतवून ठेवतो. दारांमधून येणारा प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि रहस्यमय वातावरण हे फक्त एकच सांगतं या सीझनमध्ये काहीतरी खूप वेगळं घडणार आहे. सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच उलगडणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्रभर पुन्हा एकदा “Bigg Boss आदेश देत आहेत!” हा आवाज घुमण्याच्या तयारीत आहे आणि मनोरंजनाचा बाप बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच परततोय फक्त कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर!

प्रतीक्षा संपणार, Bigg Boss Marathi 6 लवकरच कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर! Read More »

dharmendra

Dharmendra Passed Away : धर्मेंद्र यांची 51 रुपये मानधन घेऊन इंडस्ट्रीत प्रवेश अन् राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या युगातही सुपरहिट

Dharmendra Passed Away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वयाचे 89 व्या वर्षीय निधन झाले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख हि मॅन म्हणून होती. त्यांनी कधीही स्टारडम डोक्यावर येऊ दिले नाही आणि कधीही सुपरस्टारशी कोणत्याही सन्मान किंवा स्पर्धेशी स्वतःला जोडले नाही. विनोद खन्ना आणि मिथुन यांच्याशी जवळचे नाते धर्मेंद्र नेहमीच तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत असत. विनोद खन्ना यांच्या आजारपणामुळे आणि त्यानंतरच्या मृत्यूमुळे ते खूप दुःखी झाले. जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या काळातील सुपरस्टारपद असूनही, धर्मेंद्र यांनी कधीही कोणाशीही स्पर्धा केली नाही. राजेश खन्ना यांचा सुपरस्टारपदाचा उदय आणि अमिताभ बच्चन यांचा अँग्री यंग मॅन दर्जाचा उदय यामुळेही त्यांचा आत्मविश्वास कधीही कमी झाला नाही. लुधियानाच्या देओल कुटुंबातील या जाट शीख कलाकाराने त्यांच्या स्वतःच्या शैलीत स्वतःची ओळख निर्माण केली. पहिल्या चित्रपटासाठी फक्त 51 रुपये मिळाले 1960 मध्ये धर्मेंद्र यांनी फिल्मफेअर टॅलेंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ होता आणि त्यासाठी त्यांना फक्त 51 रुपये मिळाले. ही एक माफक रक्कम होती, पण ती त्यांच्या दीर्घ प्रवासाची सुरुवात होती. चित्रपट फ्लॉप झाला, संघर्ष सुरूच राहिला आणि त्यांना खाण्यासाठी किंवा राहण्यासाठी सुरक्षित जागाही मिळाली नाही, परंतु त्यांचे धाडस अबाधित राहिले. बाहेरील असूनही, त्यांनी हार मानण्यास नकार दिला. गावातील मातीतून उठून महानगरात स्वतःला स्थापित करणे सोपे नव्हते, परंतु त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. मनोज कुमारने हात धरला सततच्या अपयशांमुळे धर्मेंद्र निराश झाले आणि त्यांनी जवळजवळ पंजाबला परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याच क्षणी, त्यांचा जवळचा मित्र मनोज कुमार त्यांच्या मदतीला धावला. त्यावेळी ते दोघेही संघर्ष करत होते, परंतु मनोज कुमार म्हणाले, “जर आपण दोन भाकरी कमवल्या तर आपण त्या वाटून घेऊ.” हे शब्द धर्मेंद्रसाठी बळाचा स्रोत बनले. मनोज कुमारच्या मृत्यूनंतर धर्मेंद्रने अनेक वर्षांनी मौन बाळगल्याने त्यांच्या मैत्रीची खोली उघड झाली. संघर्षातून यशाकडे झेप 1963 मध्ये आलेल्या “बंदिनी” चित्रपटाने धर्मेंद्रच्या कारकिर्दीचा मार्ग बदलला. बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अशोक कुमार आणि नूतन सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी अमूल्य ठरली. या चित्रपटामुळे त्यांना त्यांचे पहिले चांगले मानधन, पाच हजार रुपये मिळाले, जे त्यांनी त्यांची पहिली कार खरेदी करण्यासाठी वापरले. त्यांनी विचार केला होता की जर त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही तर ते टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करतील. पण नशिबाने त्यांना साथ दिली आणि “बंदिनी” सारख्या चित्रपटांनी आणि त्यानंतरच्या “मिलन की बेला” सारख्या चित्रपटांनी त्यांना एक मजबूत पाय रोवले. राजेश आणि अमिताभ युगात धर्मेंद्रची लोकप्रियता राजेश खन्नाच्या सुपरस्टारडमने भरारी घेतली आणि अमिताभ बच्चनच्या “अँग्री यंग मॅन” व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना मोहित केले, तरीही धर्मेंद्र त्यांचे खरे व्यक्तिमत्व राहिले. “शोले” मधील पाण्याच्या टाकीचा सीन अजूनही क्लासिक मानला जातो. “चुपके चुपके” मधील त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना चकित केले. धर्मेंद्रची लोकप्रियता कमी झालेली काळ क्वचितच आला असेल. ‘अपने’ पासून ‘रॉकी और रानी…’ पर्यंत दीर्घ काळानंतर, धर्मेंद्र 2007 मध्ये ‘अपने’ चित्रपटाद्वारे पडद्यावर परतले आणि त्यांनी सनी आणि बॉबीसोबतही त्यांची वेगळी ओळख कायम ठेवली. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘तेरी बातें में ऐसा उलझा जिया’ यासारख्या अलीकडील चित्रपटांमध्ये त्यांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांशी भावनिक आणि प्रेमळ नाते निर्माण झाले. आता, त्यांच्या आगामी ‘एकिस’ चित्रपटातून, प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांचा जुना आकर्षण पाहण्याची आशा आहे.

Dharmendra Passed Away : धर्मेंद्र यांची 51 रुपये मानधन घेऊन इंडस्ट्रीत प्रवेश अन् राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या युगातही सुपरहिट Read More »