DNA मराठी

ताज्या बातम्या

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत

Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : मोठी बातमी! महसूल विभागात जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत Read More »

vivo v60e

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त…

Vivo V60e : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एक जबरदस्त कॅमेरा फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी विवोने एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo V60e या नावासह भारतीय बाजारात 200 मेगापिक्सलसह स्मार्टफोन लॉन्च केलाय. कंपनीने दावा केला की हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला सर्वात परवडणारा फोन आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो सुरळीत कामगिरी आणि मल्टीटास्किंग करण्यास मदत करतो. किंमत आणि व्हेरियंट Vivo V60e तीन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. बेस मॉडेल 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत ₹29,999 आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह दुसरा प्रकार ₹31,999 मध्ये उपलब्ध आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह टॉप मॉडेलची किंमत ₹33,999 आहे. हा स्मार्टफोन एलिट पर्पल आणि नोबल गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ते Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर करू शकतात. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्ड ऑफरवर 10% पर्यंत सूट उपलब्ध असेल. उत्कृष्ट डिस्प्ले आणि डिझाइन या फोनमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1600 निट्स आहे, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट होते. हे डायमंड शील्ड ग्लासने संरक्षित आहे, जे टिकाऊपणा वाढवते आणि स्क्रॅचची शक्यता कमी करते. कॅमेरा या फोनमध्ये 200 एमपी प्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑरा फ्लॅशसह 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 50 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये फोटो आणि व्हिडिओ कॉलिटी वाढवणारी अनेक एआय फिचर्स आहेत. बॅटरी आणि चार्जिंग फोनमध्ये 90 वॅट फास्ट चार्जिंगसह 6500 एमएएच बॅटरी आहे. याचा अर्थ बॅटरी लवकर चार्ज होईल आणि दीर्घकाळ टिकणारा बॅकअप मिळेल. सॉफ्टवेअर आणि इतर फिचर्स विवो व्ही60ई हा अँड्रॉइड 15 वर आधारित आहे, ज्यामध्ये कंपनीने अनेक स्मार्ट आणि कस्टमाइज्ड फीचर्स जोडले आहेत. एकंदरीत, हा फोन स्टायलिश डिझाइन, शक्तिशाली कामगिरी आणि प्रीमियम कॅमेरा हवा असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Vivo V60e 200MP कॅमेरा अन् भन्नाट फीचर; किंमत फक्त… Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले

Asaduddin Owais: अहिल्यानगर शहरात एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या सभेपूर्वी पोलिसांनी खासदार ओवैसी यांना सभेसाठी काही अटी आणि शर्ती घातल्याने सभेत बोलताना ओवैसी यांनी फक्त मलाच लव्ह लेटर का? असा प्रश्न विचारत पोलिसांचा भरपूर समाचार घेतला. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता येतो, जेव्हा ठाकरे गटाचा नेता येतो, जेव्हा आरएसएसची सभा असते आणि जेव्हा भाजपचा नेता येतो तेव्हा पोलीस त्यांना लव्ह लेटर देत नाही. फक्त आम्हालाच लव्ह लेटर मिळतो कारण पोलिसांना देखील माहिती मर्द फक्त एकच आहे. अश्या शब्दात खासदार ओवैसी यांनी पोलिसांचा समाचार घेतला. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये मी भारताचा नेतृत्व दुसऱ्या देशामध्ये केलं. कतरचे एक शेख पॅलेस्टाईन संबंधी भारताविषयी बोलत होते तेव्हा माझ्या डेलिगेशनने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या शेख ला उत्तर दिलं की भारतापेक्षा तर तुमचा हा कतर पॅलेस्टाईनच्या अगदी जवळ आहे मग तुम्ही का नाही पहिले मदत पोहोचवत आणि भारत याने आपला एक हिस्सा हा पॅलेस्टाईन साठी ठेवलेला आहे. असं मी कतर मध्ये भारताची साईट घेऊन सांगितलं आज मी भारतासाठी दुसऱ्या देशांशी लढत आहे तरी देखील जिथे मी जातो तिथे मला लव्ह लेटर दिला जातो आणि त्यात सांगितलं जातं की मी काय बोलावं आणि काय नाही ? बीजेपी पार्टीचे नेते येतात, शिंदे पार्टीचे नेते येतात, अजित पवार पार्टीचे नेते येतात तेव्हा त्यांना का हा लव्हलेटर दिला जात नाही. मी एकटाच मर्द पोलिसांना दिसतो का? आणि ज्या कलमान्वये मला हा लेटर देण्यात आला तो कलमला रद्द करण्यासाठी मीच 35 मिनिट सादनात भाषण केलं आहे. कदाचित पोलीस हे विसरले. पोलिसांनी दिलेला हा लव्ह लेटर मी रिजेक्ट करतो असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

Asaduddin Owais: फक्त मलाच लव्ह लेटर का? खासदार ओवेसी भडकले Read More »

imtiaz jaleel

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap : अहिल्यानगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर शहरात चिकनी चमेली राहत असून काम न करता फक्त हिंदू मुस्लिम करत असल्याची टीका त्यांनी नाव न घेता आमदार जगताप यांच्यावर केली आहे. या सभेत बोलताना आम्ही पंतप्रधान मोदींना उत्तर देतो तर तू कोण? तू तर चिल्लर आहे असा टोला देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला. तर दुसरीकडे त्यांनी नगर – औरंगाबाद रस्त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान करत मी 20 हजार रुपये देतो तुम्ही एकदा नगर – औरंगाबाद रस्त्यावर प्रवास करा असं म्हटले आहे. तसेच आमच्या पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो मात्र मी जेव्हा आमदार आणि नंतर खासदार झालो तेव्हा मी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता अशी आठवण देखील जलील यांनी विरोधकांना करून दिली. तर दुसरीकडे नगर शहरात एक विषारी साप असून तो दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या विष मध्ये दम नाही अशी टीका फारुख शाब्दी यांनी आमदार जगताप यांच्यावर केली.

Imtiaz Jaleel On Sangram Jagtap: नगर शहरात चिकनी चमेली; इम्तियाज जलील यांचा आमदार जगतापांना प्रत्युत्तर Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे अहमदनगर शहरात आगमन झाले असून आज संध्याकाळी 7 वाजता मुकुंदनगरमधील सीआयव्ही ग्राउंड येथे ओवैसी जाहीर सभा घेणार आहे. या सभेत ओवैसी यांच्याकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार ओवैसी यांच्यासोबत नगर शहरात एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह मुंबई प्रदेशाध्यक्ष फारुक शाब्दी, माजी आमदार वारीस पठाण आज नगर शहरात येणार आहे. खासदार ओवैसी पहिल्यांदाच नगर शहरात जाहीर सभा घेत असल्याने सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा सभेच्या ठिकाणी दाखल झाला आहे.

Asaduddin Owais: मोठी बातमी, खासदार ओवैसी नगर शहरात दाखल Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता. परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले. तत्काळ योजना आणि पडताळणी तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. पोलिसांचा पडताळणी अहवाल विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. पासपोर्टविषयी पुढील कारवाई घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस Read More »

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही. पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. १० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही Read More »

img 20251009 wa0004

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता

Manoj Jarang : गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात मुंबई येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नगर जिल्ह्यात मागच्या 2024 वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी 11 गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत. त्यांची पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलिसांद्वारे सुरू करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प व श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर कोतवाली, शेवगाव व श्रीरामपूर पोलिस ठाण्यांतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, मागे घेण्यास पात्र 11 गुन्हे वगळता अन्य गुन्हेही मागे घेण्याबाबत समितीद्वारे तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने तसा निर्णय घेतला व हैदराबाद गॅझेटीयरमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरणाचा आदेश काढून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुंबई उपोषणाच्या सांगतेच्यावेळी दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांना दिले होते. त्यानुसार त्रिस्तरीय समिती स्थापन करून दाखल गुन्ह्यांची तपासणी करण्यात आली व या तपासणीनंतर 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरवले गेले आहे. 2024 मध्ये दाखल या गुन्ह्यांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे गुन्हे मागे घेण्यास पात्र ठरल्याने पुढील न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार आहे. भारतीय दंड विधान कलम 341, 143, 188 तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 37 (1) 135, 37 (1) (3) 135 व 37 (1) (3) आदी कलमांन्वये हे गुन्हे दाखल होते. मागे घेण्यास पात्र ठरलेल्या 11 गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर तालुका पोलिस ठाणे (क्रमांक 85-2024), कोपरगाव शहर पोलिस ठाणे (84-2024), कोपरगाव तालुका पोलिस ठाणे (52-2024), भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (171-2024) व भिंगार कॅम्प पोलिस ठाणे (172-2024), कोतवाली पोलिस ठाणे (213-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (171-2024), एमआयडीसी पोलिस ठाणे (172-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (215-2024), श्रीगोंदा पोलिस ठाणे (216-2024) व शेवगाव पोलिस ठाणे (155-2024) या गुन्ह्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने केली चर्चा जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्याच्या वेळी सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दिलेल्या शब्दाप्रमाणे आंदोलनादरम्यान मराठा समाजातील बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील सर्व मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक घार्गे यांनी त्रिसदस्य समिती गठीत करून गुन्हे माघारी घेण्याची प्रक्रिया केली आहे व त्यानुसार जिल्ह्यातील साधारण 11 पोलिस ठाण्यांतील गुन्हे तपासून माघारीची प्रक्रिया सुरू आहे व बाकीच्या राहिलेले गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती दिली. या कार्यवाहीबद्दल सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली. या शिष्टमंडळात अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड गजेंद्र दांगट, अ‍ॅड हरीश भामरे यांच्यासह मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे, अभय शेडगे, निलेश सुबे, राम जरांगे, संदीप जगताप, प्रमोद कोरडे, सिद्धांत पानसरे, भारत भोसले, रमेश मुंगसे, सागर भोसले, जगन्नाथ निमसे, सोमनाथ गुंड, राम सातपुते आदी उपस्थित होते.

Manoj Jarang: मराठा आंदोलकांवरील 11 गुन्हे मागे घेण्यास पात्र; जिल्हा त्रिसदस्यीय समितीची मान्यता Read More »

saif ali khan

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो…

Saif Ali Khan : बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान नेहमी सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेत असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये सर्वांना धक्का देणारा विधान केला आहे ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने त्याची प्रेयसी आणि पत्नीसोबत काम करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. कोणासोबत काम करणे ही सर्वात मोठी चूक आहे? एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफने 90 च्या दशकातील त्याच्या चित्रपटांवर आणि 2000 नंतर आलेल्या बदलांवर चर्चा केली. त्याने असेही म्हटले की त्याची पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच चांगली कल्पना नसते. 90 च्या दशकातील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात आठवून सैफ म्हणाला की लोक त्याला इतक्या संधी मिळाल्याबद्दल भाग्यवान मानत होते. तथापि, त्याने असेही स्पष्ट केले की त्यावेळी त्याला इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्तम चित्रपट मिळत नव्हते आणि त्याला क्वचितच मुख्य भूमिकांमध्ये कास्ट केले जात असे. पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे ही चांगली कल्पना का नाही असे विचारले असता, सैफ म्हणाला की कालांतराने त्याला जाणवले की तो त्याच्या सहकलाकारांसोबत निरोगी स्पर्धेत चांगले काम करतो. म्हणूनच त्याला वाटते की पत्नी आणि प्रेयसीसोबत काम करणे नेहमीच फायदेशीर नसते. सैफचा धक्कादायक खुलासा सैफने याबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले होते की जर त्याला आणि करीनाला चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्यांना घरातील कामांमध्ये बदल करावे लागतील. तो पुढे म्हणाला की तो अशा दिग्दर्शकाचा शोध घेईल जो त्यांना फक्त पती-पत्नी म्हणून नव्हे तर ते अभिनेते आहेत म्हणून कास्ट करेल.

पत्नी की गर्लफ्रेंड कुणासोबत काम काम करणं अवघड? Saif Ali Khan म्हणतो… Read More »

upi

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट

UPI New Rules: देशात आता ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन नियम लागू केले आहे. ज्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे. NPCI ने सांगितले की ही नवीन नियम वापरकर्त्यांना पेमेंट करताना अधिक पर्याय आणि सुरक्षितता प्रदान करतात, ज्यामुळे डिजिटल पेमेंटचा अवलंब करणे अधिक सुलभ होते. नवीन बायोमेट्रिक प्रमाणीकरण फीचर हे नवीन फीचर Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी UPI अॅप्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या पारंपारिक UPI पिनऐवजी ऑन-डिव्हाइस बायोमेट्रिक तंत्रज्ञान, जसे की फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन, वापरण्याची परवानगी देते. सध्या, हे फीचर 5,000 पर्यंतच्या व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. NPCI ने सांगितले की वापरकर्त्यांच्या अभिप्राय आणि कामगिरीच्या आधारे भविष्यात ही मर्यादा वाढवली किंवा समायोजित केली जाऊ शकते. हे वैशिष्ट्य पर्यायी आहे, म्हणजे वापरकर्ते त्यांचा जुना UPI पिन किंवा इतर पारंपारिक पेमेंट पर्याय वापरणे सुरू ठेवू शकतात. सुरक्षा आणि तांत्रिक आवश्यकता जेलब्रोकन किंवा रूटेड डिव्हाइसेसवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण उपलब्ध होणार नाही. UPI अॅप्स आणि PSP बँकांनी ग्राहकाची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच बायोमेट्रिक प्रमाणीकरण सक्षम करावे आणि ते कधीही अक्षम करण्याचा पर्याय प्रदान करावा. कोणत्याही नवीन डिव्हाइसवर व्यवहार करण्यापूर्वी नवीन ग्राहकांची संमती आवश्यक असेल. बँका आणि अॅप्ससाठी सूचना पात्रता तपासणी: बायोमेट्रिक्स सक्षम करण्यापूर्वी ग्राहक पात्रता आणि प्रमाणीकरण क्रेडेन्शियल्सची पुष्टी करणे आवश्यक आहे. ग्राहक संवाद: बायोमेट्रिक सक्षमीकरण आणि व्यवहार प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना अचूक माहिती आणि सूचना प्रदान केल्या पाहिजेत. पिन बदल: जर ग्राहकाने त्यांचा UPI पिन बदलला किंवा रीसेट केला, तर बँकेने सर्व अॅप्समध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरण अक्षम केले पाहिजे. ग्राहक नवीन संमती देत ​​नाही तोपर्यंत व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. निष्क्रियीकरण नियम: जर 90 दिवसांपर्यंत बायोमेट्रिक पद्धत वापरली गेली नाही, तर अॅप्स आणि बँका ती निष्क्रिय करतील. ती पुन्हा सक्रिय करण्यासाठी ग्राहक पुष्टीकरण आवश्यक असेल. वापरकर्त्यांना फायदे या नवीन उपक्रमामुळे UPI पेमेंट अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होतील. बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरकर्त्यांना पिन प्रविष्ट न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल, ज्यामुळे डिजिटल व्यवहाराचा अनुभव अखंड होईल. भविष्यात मोठ्या व्यवहारांमध्ये हे वैशिष्ट्य विस्तारित करण्याचे NPCI चे उद्दिष्ट आहे.

UPI New Rules: UPI युजरसाठी मोठा बदल; आता फिंगरप्रिंट अन् फेस रिकग्निशन करता येणार पेमेंट Read More »