DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Maharashtra Politics: उद्धव गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘त्या’ प्रकरणात याचिका दाखल

Maharashtra Politics: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या 10 जानेवारी रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करण्याची शक्यता आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र यापूर्वीच एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रविवारी तब्बल 40 मिनटे बैठक झाली होती. यावर आता शिवसेनेने (उद्धव गट) आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय होण्यापूर्वी सभापती राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीला आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. उद्धव गटाचे नेते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यापूर्वी तीन दिवस आधी सभापतींनी त्यांची भेट घेणे “अत्यंत अयोग्य” आहे. मंगळवारी नार्वेकरांवर निशाणा साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, नार्वेकर यांनी रविवारी शिंदे यांची भेट घेतली. जे ‘जज मीटिंग टू क्रिमिनल’ सारखे आहे. “आम्ही त्यांच्याकडून (स्पीकर) कोणत्या न्यायाची अपेक्षा करू शकतो,” असं ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर 10 जानेवारीपर्यंत निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात, नार्वेकर यांच्या विनंतीवरून, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना, उद्धव गट आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी एकमेकांच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली होती. सभापती राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत मॅरेथॉन सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान दोन्ही गटातील शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार युक्तिवाद केला.  सुमारे 500 पानांचे निकाल तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेचा कोणता आमदार अपात्र ठरणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नार्वेकर यांना शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.   जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली, परिणामी महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही एमव्हीएमध्ये समावेश होता. 30 जून 2022 रोजी भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांच्या आमदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करत सभापतींसमोर याचिका दाखल केल्या होत्या.  दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्य-बाण’ निवडणूक चिन्ह दिले, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे निवडणूक चिन्ह म्हणून ज्वलंत मशाल असलेली शिवसेना (यूबीटी) असे नाव देण्यात आले.

Maharashtra Politics: उद्धव गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘त्या’ प्रकरणात याचिका दाखल Read More »

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणी करिता आमरण उपोषणासाठी पायी मुंबईला जाणार आहे.  मनोज जरांगे पाटील या दौऱ्यात अहमदनगर मार्गे मुंबईला जाणार असल्याने आज शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये संघटनेकडून जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून अनेकांनी सहभाग नोंदवला.  मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुंबईला जाणाऱ्यांसाठी श्रीरामपूर तालुक्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संघटने करून देण्यात आली आहे. याच बरोबर इतर तालुके देखील अनेक प्रकारे मदत करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढण्याची तयारी करणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.   या पायी दिंडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अंदाजे 25 ते 30 लाखा नागरिक असणार आहे. ही पायी दिंडी पाथर्डी, अहमदनगर शहर मार्गे पुणेकडे जाणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील मुंबई दौऱ्यासाठी सज्ज! कोहिनूर मंगल कार्यालयमध्ये बैठक; घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार

Crime News : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. ही धक्कादायक घटना गोंदिया रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी  रात्री 8 वाजता दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.  मृत तरुणाचे नाव मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे असे आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा वापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.  काय आहे प्रकरण गोंदिया रामनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, तक्रारदार प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते.  तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता संतोष मानकर याने प्रवीण मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांच्यासोबतही भांडण व शिवीगाळ केली. तसेच मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश, पवन संतोष जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी लोखंडी रॉड, कुन्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. प्रवीण मेश्राम याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्ह दाखल केलाय. या प्रकरणात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले. यानंतर पथकांनी संतोष मानकर, लकी संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले, तर जॉर्डन शेंडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.  आरोपीना अवघ्या काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात केले होते.

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार Read More »

Ahmednagar News: गामा भागानगरे हत्याकांडातील आरोपींना प्रशासन सहकार्य करते, कुटुंबियांकडून गंभीर आरोप

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित असलेल्या ओंकार (गामा)भागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन व जेल प्रशासन सहकार्य करत असल्याचा आरोप मृत ओंकार (गामा)भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला आहे.  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपी हुच्चे हा आजारी असल्याचे नाटक करत असून त्यानंतर त्याचे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप केला असून या संदर्भातील निवेदन जिल्हाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्राचे बीजी शेखर यांना तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली असून मागणी केली आहे की आरोपींना कठोर कठोर कारवाई व्हावी.  यापूर्वी देखील सबजेल  कारागृहामध्ये खोटे आधार कार्ड दाखवून आरोपी हुच्चे यास अमोल येवले नावाचा एक ईसम भेटायला जात होता ते देखील आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले .  मदत करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी भागानगरे कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्याला सबजेल कारागृहातून हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहामध्ये टाकावं अशी मागणी करण्यात आली. जर ही मागणी मान्य नाही झाली तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.

Ahmednagar News: गामा भागानगरे हत्याकांडातील आरोपींना प्रशासन सहकार्य करते, कुटुंबियांकडून गंभीर आरोप Read More »

Gangster Sharad Mohol : गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ ठार, जाणून घ्या कोण होता पुण्याचा गुन्हेगार?

Gangster Sharad Mohol: पुणे शहरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली आहे.  शुक्रवारी दुपारी काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली.  या हल्ल्यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरदिवसा झालेल्या गोळीबाराने शहरात खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ यांना राजकारणात येण्याची इच्छा   शरद मोहोळवर गुंड सिद्दीकीच्या हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. उपचारादरम्यान शरद मोहोळ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ससून हॉस्पिटलबाहेर चार-पाचशे लोकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शरद मोहोळ हे कोथरूड येथील सुतारदरा परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी मोहोळला लागली. गोळीबार करून आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी मोहोळला उपचारासाठी कोथरूड परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान गुंडाचा मृत्यू झाला. पुणे पोलिसांची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोण होता शरद मोहोळ? शरद मोहोळ हा पुण्याचा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक मोठे गुन्हे दाखल आहेत. पिंटूच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या खुनी सिद्दिकीची येरवडा कारागृहातच शरद मोहोळने हत्या केली होती. मात्र, पुराव्याअभावी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. जुलै 2022 मध्ये त्यांना सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

Gangster Sharad Mohol : गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळ ठार, जाणून घ्या कोण होता पुण्याचा गुन्हेगार? Read More »

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त

Ahmednagar News: 28 डिसेंबर 2023 रोजी कोळगाव शिवारातुन सुमारे 1200 किलो शेतकऱ्याने अंगणात जमा करून ठेवलेली तुर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचा गुन्हा ऋषिकेश देविदार लगड यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि.क.379, 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता.  त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तपास पथक नेमुन जिल्हयात पथके रवाना केले. त्यावेळी पो.नि.स्थागुशा दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही जामगाव येथील संदिप उत्तम गोरे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी चारचाकी वाहनाचे साहाय्याने केली आहे. या माहितीवरून त्यांनी  पारनेर तालुक्यातील जामगाव येथे स्थागुशा यांनी सापळा रचुन संदिप उत्तम गोरे , वैभव उर्फ बाल्या सुरेश औटी,  अमोल संतोष माळी, रोहीत सुनिल शेळके, आकाश आजिनाथ गोलवड,  विकास विठ्ठल घावटे यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला शेतमाल 1200 किलो तुर रुपये 96,000 किमतीची जप्त करण्यात आलेली आहे. तसेच तुर वाहतुक करण्यासाठी वापरलेला 8,00,000 रुपये किमतीची टाटा इंट्रा व्ही व नगर तालुक्यातील चोरुन नेलेले सोयाबीन 06 क्विंटल सोयाबिन 30,000 रुपये कि.चे असा एकुण 9,26,000 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  स्थागुशा अहमदनगर यांनी आरोपी व मुद्देमाल बेलवंडी पोस्टेस पंचनामा करुन ताब्यात देण्यात आले. आरोपींना बेलवंडी पोस्टेचे गुन्हयात अटक केले व पुढील तपास करिता समन्वय साधून बेलवंडी पोस्टेचे पो.नि.ठेंगे व पोलीस उपनिरीक्षक गाजरे, चाटे, पोहेकाँ खेडकर, पो.हे.कॉ. नंदकुमार पठारे, पोना शेख, पोकाँ पवार, भांडवलकर, दिवटे, शिपनकर, शिंदे यांनी आरोपींकडे अटक मुदतीत अधिक तपास करुन नगर तालुक्यातील शेंडी एम आय डी सी पोलीस स्टेशन येथिल दाखल असलेला गुन्हा रजि.1032/2023 भादवि.क.379 प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपीकडुन 08 सोयाबिनचे अर्धवट भरलेले कट्टे जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाँ खेडकर हे करीत आहेत. 

Ahmednagar News : शेतमाल चोरुन नेणारे टोळीकडुन सोयाबिन व तुर जप्त Read More »

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »